logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पशुधन विमा योजना शेतकरी पशुपालकांसाठी महत्त्वाची माहिती महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत पशुधन विमा योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत गायीसाठी ₹70 हजारांपर्यंत, म्हशीसाठी ₹80 हजारांपर्यंत, बैलासाठी ₹70 हजारांपर्यंत, रेड्यासाठी ₹80 हजारांपर्यंत, तर शेळी व मेंढीसाठी प्रति जनावर ₹7 हजारांपर्यंत विमा संरक्षण उपलब्ध आहे. विमा कालावधी 1, 2 किंवा 3 वर्षांचा असून प्रीमियम दर अनुक्रमे 8.30%, 9.40% आणि 10.40% असल्याचे दिले आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी पशुधनाची NDLM वर नोंदणी आणि 12 अंकी UID/Ear Tag असणे आवश्यक आहे. महत्त्वाचे म्हणजे, आवश्यक कागदपत्रे व पोस्टमॉर्टेम अहवाल सादर केल्यानंतर 15 दिवसांच्या आत विम्याची रक्कम DBTद्वारे थेट बँक खात्यात जमा केली जाणार असल्याचे जाहिरातीत नमूद आहे. अधिक माहितीसाठी हेल्पलाइन: 1962 WhatsApp: 9063142299

49 min ago
user_SHEGAONlive
SHEGAONlive
Local News Reporter Buldana, Buldhana•
49 min ago
1b1c0239-bbd4-4538-ad1b-696d9a485ec1

पशुधन विमा योजना शेतकरी पशुपालकांसाठी महत्त्वाची माहिती महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत पशुधन विमा योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत गायीसाठी ₹70 हजारांपर्यंत, म्हशीसाठी ₹80 हजारांपर्यंत, बैलासाठी ₹70 हजारांपर्यंत, रेड्यासाठी ₹80 हजारांपर्यंत, तर शेळी व मेंढीसाठी प्रति जनावर ₹7 हजारांपर्यंत विमा संरक्षण उपलब्ध आहे. विमा कालावधी 1, 2 किंवा 3 वर्षांचा असून प्रीमियम दर अनुक्रमे 8.30%, 9.40% आणि 10.40% असल्याचे दिले आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी पशुधनाची NDLM वर नोंदणी आणि 12 अंकी UID/Ear Tag असणे आवश्यक आहे. महत्त्वाचे म्हणजे, आवश्यक कागदपत्रे व पोस्टमॉर्टेम अहवाल सादर केल्यानंतर 15 दिवसांच्या आत विम्याची रक्कम DBTद्वारे थेट बँक खात्यात जमा केली जाणार असल्याचे जाहिरातीत नमूद आहे. अधिक माहितीसाठी हेल्पलाइन: 1962 WhatsApp: 9063142299

More news from Buldhana and nearby areas
  • बुलढाणा राजुर घाटातील दरड कोसळण्याचा धोका मॉर्निंग वॉक व पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी व नागरिकासह वाहन चालक धोक्याच्या कक्षेत राजूर घाटात दरड कोसळण्याचा धोका; वाहन चालकासह मॉर्निंग वॉक व पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी धोक्याच्या कक्षेत बुलढाणा–राजूर घाटातील हनुमान मंदिर जवळील पहिल्याच वळणावर रस्त्यालगत असलेल्या डोंगराची कड पावसामुळे मोठ्या प्रमाणात सैल झाली असून, डोंगराचा काही भाग व दरड कोसळण्याच्या स्थितीत आला आहे. मातीचे थर व दगड सैल झाल्याने सध्या पावसाळा सुरू असून पावसाचा जोर वाढल्यास अचानक दरड रस्त्यावर कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालक व प्रवाशांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.मॉर्निंग वॉक करणारे नागरिक आणि पोलीस भरतीचे विद्यार्थी थेट धोक्याच्या परिसरात राजूर घाटातील हा परिसर केवळ वाहनांची वाहतूक असलेला मार्ग नसून, सकाळच्या वेळेत मोठ्या संख्येने नागरिक मॉर्निंग वॉकसाठी तसेच पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी धावण्याच्या सरावासाठी या रनिंग ट्रॅकचा नियमित वापर करतात.
    4
    बुलढाणा राजुर घाटातील दरड कोसळण्याचा धोका मॉर्निंग वॉक व पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी व नागरिकासह वाहन चालक धोक्याच्या कक्षेत
राजूर घाटात दरड कोसळण्याचा धोका; वाहन चालकासह मॉर्निंग वॉक व पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी धोक्याच्या कक्षेत
बुलढाणा–राजूर घाटातील हनुमान मंदिर जवळील पहिल्याच वळणावर रस्त्यालगत असलेल्या डोंगराची कड पावसामुळे मोठ्या प्रमाणात सैल झाली असून, डोंगराचा काही भाग व दरड कोसळण्याच्या स्थितीत आला आहे. मातीचे थर व दगड सैल झाल्याने सध्या पावसाळा सुरू असून पावसाचा जोर वाढल्यास अचानक दरड रस्त्यावर कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालक व प्रवाशांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.मॉर्निंग वॉक करणारे नागरिक आणि पोलीस भरतीचे विद्यार्थी थेट धोक्याच्या परिसरात राजूर घाटातील हा परिसर केवळ वाहनांची वाहतूक असलेला मार्ग नसून, सकाळच्या वेळेत मोठ्या संख्येने नागरिक मॉर्निंग वॉकसाठी तसेच पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी धावण्याच्या सरावासाठी या रनिंग ट्रॅकचा नियमित वापर करतात.
    user_Apsar Shaikh
    Apsar Shaikh
    Buldana, Buldhana•
    3 hrs ago
  • सायरन वाजला अन् चोरट्यांची पाचावर धारण! खामगाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे आदर्श नगरमधील घरफोडी टळली ​खामगाव ; शहरातील आदर्श नगर भागात बंद घराचे कुलूप तोडून आत शिरलेल्या चोरट्यांचा डाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला आहे. गस्तीवरील पोलीस वाहनाचा सायरन वाजताच तिन्ही चोरट्यांनी पळ काढला. या प्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा माग काढला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आदर्श नगर येथील जसवंत सिंग चव्हाण हे कुटुंबासह बाहेरगावी गेल्याने त्यांचे घर बंद होते. हीच संधी साधून मध्यरात्री तीन चोरट्यांनी चव्हाण यांच्या घराचा कडी-कोंडा आणि कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील कपाट फोडून साहित्याची आणि कपड्यांची उथापालथ केली.​दरम्यान,त्याच वेळी शहर पोलिसांचे पेट्रोलिंग वाहन परिसरात गस्तीवर होते. पोलिसांच्या वाहनाचा सायरन ऐकताच चोरट्यांची धांदल उडाली. पोलिसांची गाडी पाहताच चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून पोबारा केला. गस्ती पथकाने तत्काळ संशयितांचा पाठलाग करत परिसरात कसून शोध घेतला, परंतु चोरटे पसार होण्यात यशस्वी ठरले. ​घटनेची माहिती मिळताच आज सकाळी शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेंद्र अहेरकर यांनी डी.बी.पथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणातील परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्यात तीन चोरटे स्पष्टपणे दिसून येत आहेत. पोलिसांनी या फुटेजच्या आधारे आणि तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने तपास चक्र वेगाने फिरवली आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले.
    1
    सायरन वाजला अन् चोरट्यांची पाचावर धारण! खामगाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे आदर्श नगरमधील घरफोडी टळली


​खामगाव ; शहरातील आदर्श नगर भागात बंद घराचे कुलूप तोडून आत शिरलेल्या चोरट्यांचा डाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला आहे. गस्तीवरील पोलीस वाहनाचा सायरन वाजताच तिन्ही चोरट्यांनी पळ काढला. या प्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा माग काढला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आदर्श नगर येथील जसवंत सिंग चव्हाण हे कुटुंबासह बाहेरगावी गेल्याने त्यांचे घर बंद होते. हीच संधी साधून मध्यरात्री तीन चोरट्यांनी चव्हाण यांच्या घराचा कडी-कोंडा आणि कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील कपाट फोडून साहित्याची आणि कपड्यांची उथापालथ केली.​दरम्यान,त्याच वेळी शहर पोलिसांचे पेट्रोलिंग वाहन परिसरात गस्तीवर होते. पोलिसांच्या वाहनाचा सायरन ऐकताच चोरट्यांची धांदल उडाली. पोलिसांची गाडी पाहताच चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून पोबारा केला. गस्ती पथकाने तत्काळ संशयितांचा पाठलाग करत परिसरात कसून शोध घेतला, परंतु चोरटे पसार होण्यात यशस्वी ठरले. ​घटनेची माहिती मिळताच आज सकाळी शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेंद्र अहेरकर यांनी डी.बी.पथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणातील परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्यात तीन चोरटे स्पष्टपणे दिसून येत आहेत. पोलिसांनी या फुटेजच्या आधारे आणि तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने तपास चक्र वेगाने फिरवली आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • दिवसा ढवळ्या जालना शहरात हत्या, जुना वादातून हत्या, जालना शहरासह परिसरात खळबळ, संजय शर्मा वय 40 असे मयताचे नाव दिवसा ढवळ्या जालना शहरात हत्या, जुना वादातून हत्या, जालना शहरासह परिसरात खळबळ, संजय शर्मा वय 40 असे मयताचे नाव
    1
    दिवसा ढवळ्या जालना शहरात हत्या, जुना वादातून हत्या,
जालना शहरासह परिसरात खळबळ, संजय शर्मा वय 40 असे मयताचे नाव
दिवसा ढवळ्या जालना शहरात हत्या, जुना वादातून हत्या,
जालना शहरासह परिसरात खळबळ, संजय शर्मा वय 40 असे मयताचे नाव
    user_Bharat 24Taas News
    Bharat 24Taas News
    TV News Anchor Bhokardan, Jalna•
    2 hrs ago
  • निधी खर्च होऊनही विकास शून्य! सेवली ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर; ५ निधी खर्च होऊनही विकास शून्य! सेवली ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर; ५ वर्षांतील निधीचा हिशोब देण्याची ग्रामस्थांची मागणी
    1
    निधी खर्च होऊनही विकास शून्य! सेवली ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर; ५ 
निधी खर्च होऊनही विकास शून्य! सेवली ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर; ५ वर्षांतील निधीचा हिशोब देण्याची ग्रामस्थांची मागणी
    user_बबन धसाळ
    बबन धसाळ
    Farmer भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • आईवडिलांनी मुलावर योग्य संस्कार दिले तर...कीर्तनकार ह भ प विष्णु सास्ते आईवडिलांनी मुलावर योग्य संस्कार दिले तर...कीर्तनकार ह भ प विष्णु सास्ते
    1
    आईवडिलांनी मुलावर योग्य संस्कार दिले तर...कीर्तनकार ह भ प विष्णु सास्ते 
आईवडिलांनी मुलावर योग्य संस्कार दिले तर...कीर्तनकार ह भ प विष्णु सास्ते
    user_विश्वास धसाळ Press
    विश्वास धसाळ Press
    भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • बुलढाण्यातील चिखलीमध्ये रेशन दुकानात लाभार्थ्यांना निकृष्ट दर्जाचा तांदूळ पुरवला जातोय असा गंभीर आरोप करण्यात येतोय... याचाच निषेध म्हणून लाभार्थ्यांनी संपूर्ण रेशनचा तांदूळ तहसीलदारांच्या केबीनबाहेर फेकलाय... बुलढाण्यातील चिखलीमध्ये रेशन दुकानात लाभार्थ्यांना निकृष्ट दर्जाचा तांदूळ पुरवला जातोय असा गंभीर आरोप करण्यात येतोय... याचाच निषेध म्हणून लाभार्थ्यांनी संपूर्ण रेशनचा तांदूळ तहसीलदारांच्या केबीनबाहेर फेकलाय... प्रतिनिधी गजानन राऊत असा तांदूळ जनावरंही खात नाहीत असा संतापही त्यांनी व्यक्त केलाय...बुलढाणा ब्रेकिंग या राशन च्या तांदळाची खिचडी तहसीलदारांनी त्यांच्या बायका पोरांसोबत खावी.. मग, आम्ही सुद्धा खाऊ हे तांदूळ आमची कोंबडी पण खात नाही . संतप्त लाभार्थ्यानी चिखली तहसीलदारांच्या कॅबिनसमोर फेकला निकृष्ट दर्जाचा रेशनचा तांदूळ राशन चे दुकानातून मिळालेल्या या तांदळाची खिचडी तहसीलदारांनी त्यांचा बायका पोरांसोबत खावी मग आम्ही सुद्धा खाऊ अशा शब्दात आपला संताप व्यक्त करत सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या ढिसाळ कारभाराविरोधात चिखलीत लाभार्थी नागरिकांनी थेट तहसीलदार यांच्या केबिन समोर पोहोचले.. रेशन दुकानातून वाटप करण्यात आलेले निकृष्ट दर्जाचे तांदूळ हातात घेऊन त्यांनी चक्क तहसीलदारांच्या कॅबीनसमोरच ते ओतून देत या तांदळाची खिचडी तहसीलदारांनी बायका पोरांसोबत खावी; मग आम्ही सुद्धा खाऊ आमच्या कोंबड्या सुद्धा हा तांदूळ खात नाही, असे म्हणत प्रशासनाच्या कारभाराचा तीव्र निषेध नोंदवला.. या अनोख्या आंदोलनामुळे महसूल तसेच पुरवठा विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.. शिवाय राशन दुकानातून मिळणारा तांदूळ किती निकृष्ट आहे , यावर ही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे .. बुलढाणा जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानातून शासनामार्फत वितरित होणारे धान्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारी यापूर्वी अनेक नागरिकांकडून सातत्याने होत आहेत. याच पार्श्वभूमीवर चिखली शहरातील काही लाभार्थ्यी कुटुंबाला वितरित करण्यात आलेले तांदूळ खराब, चुरियुक्त आणि खाण्यायोग्य नसल्याचा आरोप करण्यात आला आहे .. संतापलेल्या नागरिकाने हे धान्य थेट तहसील कार्यालयात आणले आणि तहसीलदारांच्या कॅबीनसमोर ओतून आपला रोष व्यक्त केला.. जे धान्य जनावरेही खाणार नाहीत, ते माणसांच्या ताटात देऊन त्यांच्या आरोग्याशी खेळणार का असा संतप्त सवाल यावेळी करण्यात आला.. बाईट - लाभार्थी .. बाईट - प्रियंका सोनकुसळे , निरीक्षण अधिकारी ..
    4
    बुलढाण्यातील चिखलीमध्ये रेशन दुकानात लाभार्थ्यांना निकृष्ट दर्जाचा तांदूळ पुरवला जातोय असा गंभीर आरोप करण्यात येतोय... याचाच निषेध म्हणून लाभार्थ्यांनी संपूर्ण रेशनचा तांदूळ तहसीलदारांच्या केबीनबाहेर फेकलाय...

बुलढाण्यातील चिखलीमध्ये रेशन दुकानात लाभार्थ्यांना निकृष्ट दर्जाचा तांदूळ पुरवला जातोय असा गंभीर आरोप करण्यात येतोय... याचाच निषेध म्हणून लाभार्थ्यांनी संपूर्ण रेशनचा तांदूळ तहसीलदारांच्या केबीनबाहेर फेकलाय...
प्रतिनिधी गजानन राऊत  
असा तांदूळ जनावरंही खात नाहीत असा संतापही त्यांनी व्यक्त केलाय...बुलढाणा ब्रेकिंग
या राशन च्या  तांदळाची खिचडी तहसीलदारांनी त्यांच्या बायका पोरांसोबत खावी..
मग, आम्ही सुद्धा खाऊ 
हे तांदूळ आमची कोंबडी पण खात नाही .
संतप्त लाभार्थ्यानी  चिखली तहसीलदारांच्या कॅबिनसमोर फेकला निकृष्ट दर्जाचा रेशनचा तांदूळ राशन चे दुकानातून मिळालेल्या या तांदळाची खिचडी तहसीलदारांनी त्यांचा बायका पोरांसोबत खावी मग आम्ही सुद्धा खाऊ   अशा शब्दात आपला संताप व्यक्त करत सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या ढिसाळ कारभाराविरोधात चिखलीत  लाभार्थी नागरिकांनी थेट तहसीलदार यांच्या केबिन समोर पोहोचले.. रेशन दुकानातून वाटप करण्यात आलेले निकृष्ट दर्जाचे तांदूळ हातात घेऊन त्यांनी चक्क  तहसीलदारांच्या कॅबीनसमोरच ते ओतून देत  या तांदळाची खिचडी तहसीलदारांनी बायका पोरांसोबत खावी; मग आम्ही सुद्धा खाऊ  आमच्या कोंबड्या सुद्धा हा तांदूळ खात नाही, असे म्हणत प्रशासनाच्या कारभाराचा तीव्र निषेध नोंदवला.. या अनोख्या आंदोलनामुळे महसूल तसेच पुरवठा विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.. शिवाय राशन दुकानातून मिळणारा तांदूळ किती निकृष्ट आहे , यावर ही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे .. बुलढाणा जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानातून शासनामार्फत वितरित होणारे धान्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारी यापूर्वी अनेक नागरिकांकडून सातत्याने होत आहेत. याच पार्श्वभूमीवर चिखली शहरातील  काही लाभार्थ्यी कुटुंबाला वितरित करण्यात आलेले तांदूळ खराब, चुरियुक्त आणि खाण्यायोग्य नसल्याचा आरोप करण्यात आला आहे .. संतापलेल्या नागरिकाने हे धान्य थेट तहसील कार्यालयात आणले आणि तहसीलदारांच्या कॅबीनसमोर ओतून आपला रोष व्यक्त केला.. जे धान्य जनावरेही खाणार नाहीत, ते माणसांच्या ताटात देऊन त्यांच्या आरोग्याशी खेळणार का  असा संतप्त सवाल यावेळी करण्यात आला..
बाईट - लाभार्थी  ..
बाईट - प्रियंका सोनकुसळे , निरीक्षण अधिकारी ..
    user_गजानन कडुजी राऊत
    गजानन कडुजी राऊत
    Graphic designer मेहकर, बुलढाणा, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • Buldhana News : रस्त्यावरच महिलेची प्रसुती, ग्रामीण रुग्णालयातील स्टाफने मदतीस नकार दिल्याचा आरोप Buldhana News : रस्त्यावरच महिलेची प्रसुती, ग्रामीण रुग्णालयातील स्टाफने मदतीस नकार दिल्याचा आरोप (गजानन राऊत बुलढाणा) केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचं होमटाऊन असलेल्या मेहकर मध्येच आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे उडवणारा धक्कादायक प्रकार काल घडला...! ग्रामीण रुग्णालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या घरात एका महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर त्या महिलेचा पती ऑटोरिक्षा आणण्याकरता गेला असता महिला घरात एकटीच होती. प्रसुती वेदना असह्य झाल्याने महिला घराच्या बाहेर रस्त्यावर आली व कुणाच्या मदततीची अपेक्षा करू लागली मात्र त्यातच अर्धवट प्रसुती झाली आणि विव्हळतच व तळमळत या महिलेच्या आवाजाने शेजारी योगेश सौभागे हे उठले. ते पत्नीसह या महिलेजवळ गेले असता महिलेची अर्धवट प्रस्तुती बघून ते हादरले ग्रामीण रुग्णालय पन्नास फुटावर असल्याने ते धावतच ग्रामीण रुग्णालयात गेले मात्र तेथील उपस्थित परिचारिकेने त्यांना त्या महिलेला रुग्णालयात घेऊन या असे फर्मावले... अशा परिस्थितीतही योगेश यांनी त्या परिचारिकेला विनंती केली . मात्र त्यांनी असमवेदनशीलता दाखवत मी येऊ शकत नाही असं फर्मावलं...
    4
    Buldhana News : रस्त्यावरच महिलेची प्रसुती, ग्रामीण रुग्णालयातील स्टाफने मदतीस नकार दिल्याचा आरोप
Buldhana News : रस्त्यावरच महिलेची प्रसुती, ग्रामीण रुग्णालयातील स्टाफने मदतीस नकार दिल्याचा आरोप
(गजानन राऊत बुलढाणा) 
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचं होमटाऊन असलेल्या मेहकर मध्येच आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे उडवणारा धक्कादायक प्रकार काल घडला...! ग्रामीण रुग्णालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या घरात एका महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर त्या महिलेचा पती ऑटोरिक्षा आणण्याकरता गेला असता महिला घरात एकटीच होती. प्रसुती वेदना असह्य झाल्याने महिला घराच्या बाहेर रस्त्यावर आली व कुणाच्या मदततीची अपेक्षा करू लागली मात्र त्यातच अर्धवट प्रसुती झाली आणि विव्हळतच व तळमळत या महिलेच्या आवाजाने शेजारी योगेश सौभागे हे उठले. ते पत्नीसह या महिलेजवळ गेले असता महिलेची अर्धवट प्रस्तुती बघून ते हादरले ग्रामीण रुग्णालय पन्नास फुटावर असल्याने ते धावतच ग्रामीण रुग्णालयात गेले मात्र तेथील उपस्थित परिचारिकेने त्यांना त्या महिलेला रुग्णालयात घेऊन या असे फर्मावले... अशा परिस्थितीतही योगेश यांनी त्या परिचारिकेला विनंती केली . मात्र त्यांनी असमवेदनशीलता दाखवत मी येऊ शकत नाही असं फर्मावलं...
    user_गजानन कडुजी राऊत
    गजानन कडुजी राऊत
    Graphic designer मेहकर, बुलढाणा, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • ब्रेकिंग न्यूज 🚨 नेपाळमध्ये भीषण महापूर; १५७ जणांचा मृत्यू, ४०० हून अधिक बेपत्ता 🚨 ब्रेकिंग न्यूज 🚨 नेपाळमध्ये भीषण महापूर; १५७ जणांचा मृत्यू, ४०० हून अधिक बेपत्ता काठमांडू : नेपाळ-चीन सीमेवरील भोटेकोशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे मोठी जीवितहानी झाली आहे. नेपाळ पोलिसांच्या ताज्या माहितीनुसार आतापर्यंत १५७ जणांचे मृतदेह सापडले असून ४०० हून अधिक नागरिक बेपत्ता आहेत. पुरामुळे रस्ते, पूल, घरे आणि वीज प्रकल्पांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक भागांचा संपर्क तुटला आहे. बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. बेपत्ता असलेल्या नागरिकांमध्ये परदेशी नागरिकांचाही मोठा समावेश असून १३३ भारतीय नागरिक बेपत्ता असल्याची ताजी माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार हिमनदीचा मोठा भाग कोसळल्याने नदीत माती, दगड आणि पाण्याचा प्रचंड लोंढा निर्माण झाला असावा. या घटनेचा सविस्तर तपास सुरू आहे. बचाव पथके, सुरक्षा दल आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने बेपत्ता नागरिकांचा शोध सुरू असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
    1
    ब्रेकिंग न्यूज 🚨

 नेपाळमध्ये भीषण महापूर; १५७ जणांचा मृत्यू, ४०० हून अधिक बेपत्ता

🚨 ब्रेकिंग न्यूज 🚨
नेपाळमध्ये भीषण महापूर; १५७ जणांचा मृत्यू, ४०० हून अधिक बेपत्ता
काठमांडू : नेपाळ-चीन सीमेवरील भोटेकोशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे मोठी जीवितहानी झाली आहे. नेपाळ पोलिसांच्या ताज्या माहितीनुसार आतापर्यंत १५७ जणांचे मृतदेह सापडले असून ४०० हून अधिक नागरिक बेपत्ता आहेत.
पुरामुळे रस्ते, पूल, घरे आणि वीज प्रकल्पांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक भागांचा संपर्क तुटला आहे. बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
बेपत्ता असलेल्या नागरिकांमध्ये परदेशी नागरिकांचाही मोठा समावेश असून १३३ भारतीय नागरिक बेपत्ता असल्याची ताजी माहिती समोर आली आहे.
प्राथमिक माहितीनुसार हिमनदीचा मोठा भाग कोसळल्याने नदीत माती, दगड आणि पाण्याचा प्रचंड लोंढा निर्माण झाला असावा. या घटनेचा सविस्तर तपास सुरू आहे.
बचाव पथके, सुरक्षा दल आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने बेपत्ता नागरिकांचा शोध सुरू असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    13 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.