बदलत्या काळात आर्थिक नियोजन काळाची गरज - यतिराज माने मायणी येथे मायणी सोशल फाउंडेशनमार्फत 'आर्थिक साक्षरता' कार्यशाळा संपन्न बदलत्या काळात आर्थिक नियोजन काळाची गरज - यतिराज माने मायणी येथे मायणी सोशल फाउंडेशनमार्फत 'आर्थिक साक्षरता' कार्यशाळा संपन्न मायणी दि.१३ : प्रतिनिधी बदलत्या जागतिक अर्थव्यवस्थेत आणि वाढत्या गरजांच्या काळात प्रत्येकाने आपल्या कुटुंबाचे आर्थिक भविष्य सुरक्षित करणे आवश्यक आहे. हेच महत्त्व ओळखून टाटा एआयए लाईफ इन्शुरन्स आणि मायणी सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मायणी येथे शनिवारी एका विशेष 'आर्थिक साक्षरता' (Financial Awareness Program) कार्यशाळेचे आयोजन केल्याचे ,टाटा एआयएचे असोसिएट डायरेक्टर ऑफ एजन्सी यतिराज माने यांनी सांगितले. ते किंग रेस्टॉरंट येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात बोलत होते. विशेष म्हणजे, जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला हा उपक्रम राबवून मायणी सोशल फाउंडेशनने महिलांच्या आणि कुटुंबाच्या आर्थिक सबलीकरणासाठी पाऊल उचलले आहे. कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक यतिराज माने आणि अतुल शितोळे यांनी उपस्थितांना आर्थिक सुरक्षा समजावताना भविष्यातील अनपेक्षित संकटांपासून कुटुंबाला वाचवण्यासाठी आर्थिक नियोजनाची भूमिका, आयुर्विमा म्हणजे केवळ गुंतवणूक म्हणून नव्हे, तर संरक्षणाचे कवच म्हणून आयुर्विम्याचे महत्त्व. बचतीचे रूपांतर फायदेशीर गुंतवणुकीत कसे करावे आणि महागाईवर मात कशी करावी. याबद्दल मार्गदर्शन केले. मायणी सोशल फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. यावर्षी महिला दिनाचे औचित्य साधून 'आर्थिक साक्षरता' हा विषय निवडल्याबद्दल उपस्थितांनी संस्थेचे कौतुक केले. आर्थिक दृष्ट्या साक्षर समाजच यापुढे जीवनात स्थिरता व प्रगती करू शकतो, हा संदेश या कार्यशाळेतून देण्यात आला. या कार्यक्रमाला डॉ. अमोद चोथे, डॉ. सूर्यकांत कुंभार, डॉ. दत्तात्रय तांबवेकर, डॉ. सय्यद, डॉ. योगेश महामुनी, संदीप काटकर, धनाजी माने, गणेश पाटील आणि सतीश कोकाटे, सुजाता माळी, प्रतिभा माळी, सुनीता बागडे, सुनीता पिटके, स्वाती माळी, अनिता पाटोळे यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप डॉ. अमोद चोथे यांनी मानलेल्या आभार प्रदर्शनाने झाला. फोटो - मायणी सोशल फाउंडेशनच्या वतीने मायणी येथे आयोजित आर्थिक साक्षरता या कार्यशाळेत बोलताना यतिराज माने.(छाया - दत्ता कोळी)
बदलत्या काळात आर्थिक नियोजन काळाची गरज - यतिराज माने मायणी येथे मायणी सोशल फाउंडेशनमार्फत 'आर्थिक साक्षरता' कार्यशाळा संपन्न बदलत्या काळात आर्थिक नियोजन काळाची गरज - यतिराज माने मायणी येथे मायणी सोशल फाउंडेशनमार्फत 'आर्थिक साक्षरता' कार्यशाळा संपन्न मायणी दि.१३ : प्रतिनिधी बदलत्या जागतिक अर्थव्यवस्थेत आणि वाढत्या गरजांच्या काळात प्रत्येकाने आपल्या कुटुंबाचे आर्थिक भविष्य सुरक्षित करणे आवश्यक आहे. हेच महत्त्व ओळखून टाटा एआयए लाईफ इन्शुरन्स आणि मायणी सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मायणी येथे शनिवारी एका
विशेष 'आर्थिक साक्षरता' (Financial Awareness Program) कार्यशाळेचे आयोजन केल्याचे ,टाटा एआयएचे असोसिएट डायरेक्टर ऑफ एजन्सी यतिराज माने यांनी सांगितले. ते किंग रेस्टॉरंट येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात बोलत होते. विशेष म्हणजे, जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला हा उपक्रम राबवून मायणी सोशल फाउंडेशनने महिलांच्या आणि कुटुंबाच्या आर्थिक सबलीकरणासाठी पाऊल उचलले आहे. कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक यतिराज माने आणि अतुल शितोळे यांनी उपस्थितांना आर्थिक सुरक्षा समजावताना भविष्यातील अनपेक्षित संकटांपासून कुटुंबाला वाचवण्यासाठी आर्थिक नियोजनाची भूमिका, आयुर्विमा
म्हणजे केवळ गुंतवणूक म्हणून नव्हे, तर संरक्षणाचे कवच म्हणून आयुर्विम्याचे महत्त्व. बचतीचे रूपांतर फायदेशीर गुंतवणुकीत कसे करावे आणि महागाईवर मात कशी करावी. याबद्दल मार्गदर्शन केले. मायणी सोशल फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. यावर्षी महिला दिनाचे औचित्य साधून 'आर्थिक साक्षरता' हा विषय निवडल्याबद्दल उपस्थितांनी संस्थेचे कौतुक केले. आर्थिक दृष्ट्या साक्षर समाजच यापुढे जीवनात स्थिरता व प्रगती करू शकतो, हा संदेश या कार्यशाळेतून देण्यात आला. या कार्यक्रमाला डॉ. अमोद चोथे,
डॉ. सूर्यकांत कुंभार, डॉ. दत्तात्रय तांबवेकर, डॉ. सय्यद, डॉ. योगेश महामुनी, संदीप काटकर, धनाजी माने, गणेश पाटील आणि सतीश कोकाटे, सुजाता माळी, प्रतिभा माळी, सुनीता बागडे, सुनीता पिटके, स्वाती माळी, अनिता पाटोळे यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप डॉ. अमोद चोथे यांनी मानलेल्या आभार प्रदर्शनाने झाला. फोटो - मायणी सोशल फाउंडेशनच्या वतीने मायणी येथे आयोजित आर्थिक साक्षरता या कार्यशाळेत बोलताना यतिराज माने.(छाया - दत्ता कोळी)
- काटेवाडीमध्ये आमदार रोहित पवार यांच्यासमोर देवांश लखन पाथरकर या चिमुकल्याने दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर भावनिक भाषण केलं.. रोहित पवार यांनी या भाषणाचा व्हिडीओ शेअर करत देवांशचं भाषण एकदम ओक्के अशा शब्दात कौतुक केलंय.. या निरागस चिमुकल्याच्या भाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून आजही आबालवृद्धांच्या मनात अजितदादांचं स्थान अबाधित असल्याची प्रचिती या निमित्तानं आली..1
- Post by मन्सूर शेख1
- चेन्नईत भोरच्या श्लोकची सुवर्ण कामगिरी विक्रम शिंदे /भोर दि.१५ चेन्नई येथे पार पडलेल्या रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया स्केट गेम स्पर्धेत भेलकेवाडी ,भोर येथील श्लोक पराग भेलके याने चमकदार कामगिरी केली आहे. दि.१४ ते १७ एप्रिल दरम्यान पार पडलेल्या रोलर स्केटिंग स्पर्धेतील पाचशे आणि दोनशे मीटर स्पर्धेत अनुक्रमे कांस्य आणि सुवर्ण पदकाची कमाई केली आहे.देशाच्या विविध राज्यातील खेळाडू सहभागी झाले असून ग्रामीण भागातील असूनही श्लोक याने नेत्रदीपक कामगिरी केल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.1
- Post by संजय गाडे साहेब जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया1
- स्वप्ना यादव यांचा मोबाईल तपासात; सीडीआर अहवालाकडे लक्ष प्रतिनिधी : स्वाती हडकर चिपळूण : पत्रकार दीपक भागवत मारहाण प्रकरणाच्या तपासात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला आहे. दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतरही पूरक तपास सुरू ठेवत पोलिसांनी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव यांचा मोबाईल ताब्यात घेतला असून, संबंधित क्रमांकाचा कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) तपासण्याची प्रक्रिया हाती घेतली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी तथा तपास अधिकारी प्रकाश बेले यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता सर्व तांत्रिक पुरावे तपासणे आवश्यक आहे. त्यानुसार संबंधित मोबाईल क्रमांकाचा सीडीआर मिळवण्यासाठी दूरसंचार कंपनीकडे अधिकृत पत्रव्यवहार करण्यात आला आहे. सीडीआर अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील तपासाची दिशा अधिक स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले. या प्रकरणात यापूर्वी १० कर्मचाऱ्यांविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सीसीटीव्ही फुटेज, ओळख परेड आणि साक्षीदारांचे जबाब यांसारख्या पुराव्यांच्या आधारे कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, प्रशांत यादव यांच्या संदर्भातील सीडीआर तपासात ते घटनास्थळी नसल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती समोर आली आहे. आता स्वप्ना यादव यांच्या सीडीआर तपासातून प्रकरणातील इतर पैलू उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पत्रकारांकडून सुरुवातीपासूनच निष्पक्ष आणि सखोल तपासाची मागणी करण्यात येत होती. पूरक तपासाद्वारे प्रत्येक तांत्रिक बाबींची पडताळणी केली जात असल्याने तपास प्रक्रियेबाबत विश्वास वाढत असल्याची प्रतिक्रिया काही पत्रकारांनी व्यक्त केली आहे. दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेला प्रारंभ होणार असला तरी, पूरक तपासातून समोर येणारी माहितीही खटल्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे सीडीआर अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले असून, या प्रकरणातील अंतिम सत्य न्यायालयीन प्रक्रियेतूनच स्पष्ट होणार आहे.1
- Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज1
- आम्ही कोंढवावासिय भारतीय नागरिक नाहीत का? मूलभूत सुविधांच्या अभावी कोंढवा प्रभाग १९ च्या नागरिकांचा पुणे महानगरपालिका आणि नवनियुक्त लोकप्रतिनिधींवर रोष..! @highlight #kondhwa #all1
- Post by संजय गाडे साहेब जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया1