माजी विद्यार्थ्याची सामाजिक बांधिलकी; गरीब विद्यार्थी फंडासाठी ५१ हजारांची मदत दादा पाटील महाविद्यालय, कर्जत येथील भौतिकशास्त्र विभागाचे माजी विद्यार्थी युवराज हनुमंत जाधव (रा. वीट, ता. करमाळा) यांनी आपल्या मातृमहाविद्यालयाप्रती कृतज्ञता व्यक्त करत गरीब विद्यार्थी फंडासाठी ५१ हजार रुपयांची देणगी दिली आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या या निधीच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत केली जाणार आहे. यावेळी माजी पोलीस उपायुक्त संजय निंबाळकर उपस्थित होते. युवराज जाधव हे दादा पाटील महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागाचे २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील माजी विद्यार्थी आहेत. सध्या ते सौरऊर्जा क्षेत्रात युवा उद्योजक म्हणून कार्यरत असून कॉस्मिक मोड या सौरऊर्जा ईपीसी कंपनीचे संस्थापक आहेत. ग्रामीण व निमशहरी भागात सौरऊर्जेबाबत जनजागृती करण्यासोबतच तांत्रिकदृष्ट्या सक्षम, पारदर्शक आणि विश्वासार्ह सेवा उपलब्ध करून देण्याचे कार्य ते करीत आहेत. सौरऊर्जा ही केवळ वीजबिल कमी करण्याची व्यवस्था नसून दीर्घकालीन आर्थिक बचत आणि पर्यावरणपूरक भविष्यासाठीची महत्त्वपूर्ण गुंतवणूक आहे, या विचारातून त्यांची कंपनी कार्यरत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांना सौरऊर्जेचे महत्त्व समजावून सांगणे, योग्य तांत्रिक मार्गदर्शन देणे आणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्यावर त्यांचा भर आहे. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर जाधव यांनी काही काळ आयटी क्षेत्रात काम केले. मात्र, आपल्या तांत्रिक ज्ञानाचा आणि कौशल्याचा उपयोग करून स्वतंत्र व्यवसाय उभारण्याचा निर्णय घेत त्यांनी सौरऊर्जा क्षेत्रात उद्योजकतेची वाट निवडली. भौतिकशास्त्रातील मूलभूत ज्ञान, तंत्रज्ञानाची आवड आणि नव्या संधींचा शोध घेण्याची वृत्ती यामुळे त्यांनी या क्षेत्रात उल्लेखनीय वाटचाल केली आहे. आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये, या सामाजिक भावनेतून जाधव यांनी केलेली ५१ हजार रुपयांची मदत माजी विद्यार्थी आणि मातृसंस्था महाविद्यालय यांच्यातील जिव्हाळ्याचे नाते अधोरेखित करणारी आहे. ‘शिक्षणातून मिळालेले ज्ञान समाजासाठी आणि पुढील पिढीसाठी उपयोगी ठरावे’ या महाविद्यालयाच्या संस्कारांची प्रचिती त्यांच्या योगदानातून येते. युवराज जाधव यांच्या उद्योजकीय यशाबद्दल तसेच विद्यार्थी हितासाठी केलेल्या आर्थिक योगदानाबद्दल प्राचार्य डॉ. संजय नगरकर, भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. महेश भदाणे, प्रा. बलभीम महारणवर, प्रा. अमोल परदेशी, प्रा. सहदेव कानगुडे, प्रा. वैभव लोहकरे, प्रा. राणी गायकवाड, प्रा. ऋतुजा माळवे, प्रा. मंगल म्हस्के, प्रा. संपदा कर्पे तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
माजी विद्यार्थ्याची सामाजिक बांधिलकी; गरीब विद्यार्थी फंडासाठी ५१ हजारांची मदत दादा पाटील महाविद्यालय, कर्जत येथील भौतिकशास्त्र विभागाचे माजी विद्यार्थी युवराज हनुमंत जाधव (रा. वीट, ता. करमाळा) यांनी आपल्या मातृमहाविद्यालयाप्रती कृतज्ञता व्यक्त करत गरीब विद्यार्थी फंडासाठी ५१ हजार रुपयांची देणगी दिली आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या या निधीच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत केली जाणार आहे. यावेळी माजी पोलीस उपायुक्त संजय निंबाळकर उपस्थित होते. युवराज जाधव हे दादा पाटील महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागाचे २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील माजी विद्यार्थी आहेत. सध्या ते सौरऊर्जा क्षेत्रात युवा उद्योजक म्हणून कार्यरत असून कॉस्मिक मोड या सौरऊर्जा ईपीसी कंपनीचे संस्थापक आहेत. ग्रामीण व निमशहरी भागात सौरऊर्जेबाबत जनजागृती करण्यासोबतच तांत्रिकदृष्ट्या सक्षम, पारदर्शक आणि विश्वासार्ह सेवा उपलब्ध करून देण्याचे कार्य ते करीत आहेत. सौरऊर्जा ही केवळ वीजबिल कमी करण्याची व्यवस्था नसून दीर्घकालीन आर्थिक बचत आणि पर्यावरणपूरक भविष्यासाठीची महत्त्वपूर्ण गुंतवणूक आहे, या विचारातून त्यांची कंपनी कार्यरत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांना सौरऊर्जेचे महत्त्व समजावून सांगणे, योग्य तांत्रिक मार्गदर्शन देणे आणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्यावर त्यांचा भर आहे. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर जाधव यांनी काही काळ आयटी क्षेत्रात काम केले. मात्र, आपल्या तांत्रिक ज्ञानाचा आणि कौशल्याचा उपयोग करून स्वतंत्र व्यवसाय उभारण्याचा निर्णय घेत त्यांनी सौरऊर्जा क्षेत्रात उद्योजकतेची वाट निवडली. भौतिकशास्त्रातील मूलभूत ज्ञान, तंत्रज्ञानाची आवड आणि नव्या संधींचा शोध घेण्याची वृत्ती यामुळे त्यांनी या क्षेत्रात उल्लेखनीय वाटचाल केली आहे. आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये, या सामाजिक भावनेतून जाधव यांनी केलेली ५१ हजार रुपयांची मदत माजी विद्यार्थी आणि मातृसंस्था महाविद्यालय यांच्यातील जिव्हाळ्याचे नाते अधोरेखित करणारी आहे. ‘शिक्षणातून मिळालेले ज्ञान समाजासाठी आणि पुढील पिढीसाठी उपयोगी ठरावे’ या महाविद्यालयाच्या संस्कारांची प्रचिती त्यांच्या योगदानातून येते. युवराज जाधव यांच्या उद्योजकीय यशाबद्दल तसेच विद्यार्थी हितासाठी केलेल्या आर्थिक योगदानाबद्दल प्राचार्य डॉ. संजय नगरकर, भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. महेश भदाणे, प्रा. बलभीम महारणवर, प्रा. अमोल परदेशी, प्रा. सहदेव कानगुडे, प्रा. वैभव लोहकरे, प्रा. राणी गायकवाड, प्रा. ऋतुजा माळवे, प्रा. मंगल म्हस्के, प्रा. संपदा कर्पे तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
- स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कडून थकीत ऊस बिल मिळवण्यासाठी तिरडी मोर्चा.1
- मुप्टा बीड जिल्हा च्या वतीने तीव्र निदर्शने : शिक्षकांनी बहुसंख्येने उपस्थित रहा: प्रा शशिकांत जावळे (जिल्हा सचिव) मुप्टा बीड जिल्हा च्या वतीने तीव्र निदर्शने : शिक्षकांनी बहुसंख्येने उपस्थित रहा: प्रा शशिकांत जावळे (जिल्हा सचिव) बीड: (महाराष्ट्र अंडर प्रिव्हिलेज्ड् टिचर्स असोसिएशन.)मुप्टा चे संस्थापक सचिव प्रा. सुनील मगरे यांच्या आदेशाने व बीड जिल्हाध्यक्ष शरदराव मगर यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात दिनांक 27 ऑगस्ट 2026 रोजी माध्यमिक शिक्षण विभाग कार्यालय जिल्हा परिषद, बीड येथे तीव्र निदर्शने करण्यात येणार आहेत. *प्रमुख मागण्या:* 1)कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अतिरिक्त करण्यास कारणीभूत ऑनलाइन संच मान्यतेत टाकण्यात आलेल्या जाचक अटी रद्द करून पूर्वीप्रमाणे संच मान्यता देण्यात याव्यात. 2) इयत्ता अकरावी व बारावी विज्ञान वर्गाच्या प्रात्यक्षिक बॅच चा कार्यभार 30 विद्यार्थ्या ऐवजी प्रति 20 विद्यार्थ्या ची बॅच प्रचलित पूर्वीसारखे कायम करावी. 3) शिक्षकांचे प्रलंबित देयके (वैद्यकीय प्रतिपूर्ती, वरिष्ठ वेतन श्रेणी फरक ,निवड श्रेणी फरक आदी.) तात्काळ अदा करावीत. 4) शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक मान्यता व शालार्थ आयडी प्रस्ताव तात्काळ निकाली काढावीत. 5) 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांचे बंद केलेले जीपीएफ खाते तात्काळ पूर्ववत करावीत. 6) सातव्या वेतन आयोगामधील पाचवा हप्ता रोखीने अदा करावा. 7) सर्व शिक्षकांचे जीपीएफ खाते तात्काळ ऑनलाइन करून ऑनलाईन स्लिप वितरित कराव्यात . 8) अनुदान प्रचलित टप्पा वाढ देण्यात यावा. 9) सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या न्याय व हक्कासाठी संघटनेच्या वतीने बीड जिल्ह्यातील सर्व शिक्षक प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बीड जिल्हा सचिव प्रा. शशिकांत जावळे , जिल्हा कार्याध्यक्ष भैय्यासाहेब आदोडे ,ज्युनियर विभाग चे जिल्हाध्यक्ष नारायण घोलप, जिल्हा सचिव प्रा.संजय बागुल, माध्यमिक विभाग जिल्हाध्यक्ष प्रवीणकुमार तरकसे, प्राथमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद साळवे, जिल्हा सचिव शैलेश चिलवंत आदी पदाधिकाऱ्यांनी केले आहे.शिक्षकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी या निदर्शनास बहुसंख्येने उपस्थित राहावे.1
- *नगर परीषद प्रशासन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय बीड व मुख्य अभियंता औ.वि केंद्र यांनी लेखी पत्र दिल्यामुळे तुर्तास अन्नत्याग उपोषण स्थगित- भाई गौतम आगळे *नगर परीषद प्रशासन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय बीड व मुख्य अभियंता औ.वि केंद्र यांनी लेखी पत्र दिल्यामुळे तुर्तास अन्नत्याग उपोषण स्थगित- भाई गौतम आगळे* बीड दि. २१ (प्रतिनिधी) रोजंदारी मजदुर सेना मराठवाडा अध्यक्ष तथा कामगार प्रतिनिधी भाई राजेशकुमार जोगदंड यांनी बीड जिल्ह्यातील घनकचरा व्यवस्थापनातील कंत्राटी कामगारांना किमान वेतन व प्रचलित कामगार कायद्याच्या सोई सवलतीचा लाभ मिळवून देण्यासाठी व औष्णिक विद्युत केंद्रातील वीज कंत्राटी कामगारांना किमान वेतन व अनुषंगिक लाभ मिळवून देण्यासाठी वीज कंत्राटी कामगार वैजनाथ पिराजी पतंगे यांनी १५ आॅगस्ट २०२६ स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालय बीड समोर अन्नत्याग उपोषणाला सुरुवात केली होती . आज आंदोलनाचा 7 वा दिवस सुरू झाला तरी त्यांचे अन्नत्याग उपोषण सुरूच होते, जिल्हा प्रशासनाने तात्काळ दखल घेतली नाही तर आज ते टोकाची भूमिका घेतील असा इशारा संघटनेच्या वतीने दिला होता. त्याची दखल संबंधित अधिकाऱ्यांनी घेऊन प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी लेखी पत्र दिल्यामुळे सलग सात दिवस सुरू असलेले अन्नत्याग उपोषण तुर्तास स्थगित करण्यात आले, अशी माहिती कामगार नेते तथा रोजंदारी मजदुर सेना केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे सर यांनी एका प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे. बीड जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी, नगरपरिषद / नगरपंचायत यांच्या अधिनस्थ कंत्राटदाराकडून कंत्राटी कामगारांना किमान वेतन अधिनियम व प्रचलित कामगार कायद्याच्या सोई सवलतीचा लाभ आजतागायत मिळत नाही तो मिळावा, शासनाने वेळोवेळी काढलेल्या शासन परिपत्रक / आदेश निर्गमित केले त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करत नसल्याने त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी. तसेच औष्णिक विद्युत केंद्रातील वीज कंत्राटी कामगारांना किमान वेतन व अनुषंगिक लाभ मिळवून देण्यासाठी अन्नत्याग उपोषणाचे हत्यार उपसले होते. अखेर ७ व्या दिवशी लोकशाही मार्गाने आंदोलन केले त्याला यश मिळाले.वीज कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नावर मुख्य अभियंता यांनी दि . २४ ऑगस्ट २०२६ रोजी संयुक्त बैठक आयोजित केली , तर घनकचरा व्यवस्थापनातील कंत्राटी कामगारांना येत्या १५ दिवसात त्यांचे मूलभूत अधिकार व हक्क मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी, नगरपरिषद/ नगरपंचायत यांना जिल्हा सह आयुक्त नगरपरिषद प्रशासन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांनी लेखी पत्र देऊन त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंग विषयक कारवाईचा प्रस्ताव आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय सीबीडी बेलापूर नवी मुंबई यांच्याकडे सादर केला जाईल असे लेखी पत्र दिले. नगरपरिषद बीड च्या सफाईची निविदा काढून कामगारांना लवकरच कामावर रुजू करण्यात येईल असे लेखी पत्र मुख्याधिकारी नगरपरिषद बीड यांनी दिल्यामुळे सलग ७ दिवस सुरू असलेले भाई राजेश कुमार जोगदंड यांचे अन्नत्याग उपोषण स्थगित करण्यात आले. अपर जिल्हादंडाधिकारी यांचे प्रतिनिधी महसूल सहायक शिवाजी पाटील यांनी वीज कंत्राटी कामगार वैजनाथ पतंगे यांना लिंबू सरबत दिले तर जिल्हा सह आयुक्त नगरपरिषद प्रशासन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांचे प्रतिनिधी सुधाकर नागरगोजे, किशोर डमाले यांनी रोजंदारी मजदुर सेना मराठवाडा अध्यक्ष भाई राजेशकुमार जोगदंड तथा सफाई कामगारांचे प्रतिनिधी यांना जलपान देऊन अन्नत्याग उपोषणाची सांगता केली, सदरील आंदोलनास भारतीय दलित पँथर चे संस्थापक अध्यक्ष अंबादास शिंदे सर, बीड जिल्हाध्यक्ष वैजनाथ गायकवाड यांनी पाठिंबा दिला होता. अशी माहिती रोजंदारी मजदुर सेना केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे सर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.1
- *‘सड़क के गड्ढे नहीं, सिस्टम का आलस भर रहे हैं’—युवा समाजसेवी प्रभाष सिंह पटेल का वायरल कारनामा!* शंकरगढ़(प्रयागराज) प्रयागराज के शंकरगढ़ में जब जर्जर सड़कों से परेशान जनता और बेपरवाह तंत्र के बीच उम्मीद की कोई किरण नहीं दिख रही थी, तब एक युवा आगे आया और उसने दिखा दिया कि जनसेवा भाषणों से नहीं, कर्मों से होती है। युवा समाजसेवी प्रभाष सिंह पटेल ने किसी सरकारी बजट या प्रशासनिक मंजूरी का इंतजार किए बिना, अपनी जेब से पैसे खर्च कर सड़क के खतरनाक गड्ढों को भरवाने की एक अनूठी और प्रेरणादायक पहल शुरू की है। सोशल मीडिया पर प्रभाष सिंह पटेल के इस कदम की चौतरफा तारीफ हो रही है। लोग उनकी तस्वीरों और वीडियो को शेयर करते हुए लिख रहे हैं—"नेता सिर्फ वादे करते हैं, लेकिन प्रभाष जैसे युवा बदलाव लाते हैं।" *क्या बोले स्थानीय लोग?* इस सड़क से गुजरने वाले दैनिक यात्रियों और ग्रामीणों के चेहरे पर राहत साफ देखी जा सकती है। लोगों का कहना है कि आए दिन इन गड्ढों की वजह से हादसे हो रहे थे। प्रभाष पटेल ने अपने निजी खर्च से गिट्टी और मौरंग मंगवाकर न सिर्फ सड़क को चलने लायक बनाया, बल्कि कई अनमोल जिंदगियों को हादसों से भी बचा लिया। *प्रशासन की नींद कब खुलेगी?* युवा समाजसेवी की इस सराहनीय पहल ने जहां एक तरफ जनता का दिल जीत लिया है, वहीं दूसरी तरफ संबंधित प्रशासनिक अधिकारियों की कार्यशैली पर भी बड़े सवाल खड़े कर दिए हैं। *सामूहिक प्रयास ही असली समाधान* प्रभाष सिंह पटेल की यह पहल एक बड़ा संदेश देती है: अगर समाज का हर नागरिक और प्रशासनिक अमला एक साथ मिलकर कदम उठाए, तो आमजन को सुरक्षित, सुगम और दुर्घटनामुक्त आवागमन मिल सकता है। प्रभाष पटेल का यह जज्बा आज के युवाओं के लिए एक मिसाल बन चुका है। सलाम है ऐसे जनसेवकों को, जो समाज को गड्ढों से निकालकर प्रगति की राह पर ले जाने का दम रखते हैं!1
- कै.सौ. शांताबाई तुळशीदास कुरकुटे यांच्या गंगापूजनानिमित्त ह.भ.प. प्रकाश महाराज साठे यांचे किर्तन संपन्न वडवणी प्रतिनिधी : वडवणी येथील प्रतिष्ठित कुरकुटे परिवारातील कै. सौ. शांताबाई तुळशीदास कुरकुटे यांच्या गंगापूजनानिमित्त चौंडेश्वरी मंगल कार्यालय, वडवणी येथे महाराष्ट्रातील प्रसिद्ध शिवकीर्तनकार ह.भ.प. प्रकाश महाराज साठे यांच्या सुश्राव्य किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ह.भ.प. प्रकाश महाराज साठे यांनी संत तुकाराम महाराज यांच्या “शेवटची विनवणी । संतजनीं परिसावी । विसर तो न पडावा । माझा देवा तुम्हांसी ॥” या अभंगावर निरूपण करत उपस्थितांना भक्ती, संतविचार आणि जीवनाचे मर्म समजावून सांगितले. आपल्या किर्तनातून महाराजांनी संत तुकाराम महाराजांची विठ्ठल चरणी असलेली अखेरची विनवणी अत्यंत भावपूर्ण पद्धतीने मांडली. “हे देवा, माझा तुम्हाला कधीही विसर पडू देऊ नका. मी तुमच्या चरणी आहे, तुमची सेवा करणे एवढेच मला ठाऊक आहे,” असा या अभंगाचा भावार्थ त्यांनी उपस्थितांसमोर उलगडला. त्यांच्या रसाळ वाणीतून संतविचार ऐकताना उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. गंगापूजनानिमित्त कुरकुटे परिवाराच्या वतीने उपस्थितांसाठी गोड जेवणाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या शेवटी कै. सौ. शांताबाई तुळशीदास कुरकुटे यांच्या स्मृतीस दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. “गंध असा जन्म लाभावा, देहाचा चंदन व्हावा; गंध संपला तरी, गंध दरवळत राहावा...” या भावनेतून कै. सौ. शांताबाई कुरकुटे यांच्या प्रेमळ आठवणींना उपस्थितांनी उजाळा दिला. कै. सौ. शांताबाई तुळशीदास कुरकुटे यांच्या पश्चात हनुमंत कुरकुटे, दत्तात्रय कुरकुटे, डिगांबर कुरकुटे अशी तीन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कुरकुटे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्या आठवणी सदैव स्मरणात राहतील. कार्यक्रमास कुरकुटे परिवारातील सदस्य, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
- अप्पर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण गणेश बिरादार आई रागावली म्हणून मुलीची पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या पत्रकार परिषद.. बारामती: 22 ऑगस्ट रोजी अल्पवयीन मुलगी तिच्या आईने रागावले म्हणून बाहेर पडते रुई गावातील साई गणेश नगर येथील असून दुसऱ्या एका पाच मजली इमारतीवरून उडी मारून तीन आत्महत्या केली आहे. 23 ऑगस्ट रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यात अपहरण म्हणून शोध घेत असताना तिची डेड बॉडी मिळून आली. तिने त्या इमारतीचा दरवाजा बाहेरून बंद केला होता तिची चप्पल ही त्या ठिकाणी मिळून आले. त्यामुळे तिने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे1
- निर्वी येथे NH-548D मार्गावर दुचाकीचा अपघात; बाप्पू धुमाळ जखमी निर्वी : NH-548D निर्वी–जामखेड मार्गावर आज, दि. 26 ऑगस्ट 2026 रोजी दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात बाप्पू धुमाळ, रा. धुमाळवाडी, ता. शिरूर, जि. पुणे हे जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बाप्पू धुमाळ हे Hero Splendor दुचाकी क्रमांक MH-12-OB-5976 वरून प्रवास करत असताना निर्वी परिसरात अपघात झाला. या अपघातात त्यांच्या चेहऱ्याला दुखापत झाली असून दुचाकीचेही नुकसान झाले आहे. अपघातानंतर जखमी बाप्पू धुमाळ यांना तातडीने न्हावरे येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना शिरूर येथे पाठवण्यात आले. अपघाताची नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मदत करून जखमीला उपचारासाठी हलवले. या अपघातामुळे NH-548D निर्वी–जामखेड मार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.4
- हडपसर दारूकांड: २२ बळी घेणारा सराईत आरोपी वेषांतर करून पळून जाण्याच्या तयारीत असताना जेरबंद पुणे ग्रामीण: उरूळी कांचन पोलीस ठाणे आणि सी.आय.डी. पुणे यांच्या संयुक्त पथकाने हडपसर दारूकांडातील मुख्य तथा सराईत आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले आहे. पुणे शहर हद्दीत विषारी दारू सेवनामुळे घडलेल्या दुर्घटनेत तब्बल २२ नागरिकांचे बळी गेले होते, ज्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. गुन्ह्यांची नोंद व पार्श्वभूमी: सदर प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये खालीलप्रमाणे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत: हडपसर पोलीस ठाणे: गुन्हा नोंद क्रमांक ३७९/२०२६ दापोडी पोलीस ठाणे: गुन्हा नोंद क्रमांक ११४/२६, कलम १०५, १२३, १२५ भारतीय न्याय संहिता कारवाई आणि आरोपीला अटक: गुन्ह्यातील पाहिजे असलेला सराईत आरोपी दत्ता उर्फ भावड्या भीमराव लोंढे (रा. पांढरस्थळ, उरुळी कांचन) हा शिंदवणे व शिंदवणे घाट परिसरात येणार असल्याची आणि तो पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी वेषांतर करून व रूप बदलून फिरत असल्याबाबतची अत्यंत गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कसून शोध घेतला असता, आरोपी दत्ता उर्फ भावड्या भीमराव लोंढे हा पुरंदर तालुक्यातील राजेवाडी गावी वेषांतर करून, रूप बदलून आणि आपल्या गाडीची नंबर प्लेट बदलून त्या ठिकाणावरून पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस पथकाने तातडीने सापळा रचून त्याला अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले आणि त्याची ओळख पटवून उरूळी कांचन पोलीस ठाण्यात आणले. सद्यस्थितीत सदर कारवाई उरूळी कांचन पोलीस ठाणे व सी.आय.डी. पुणे यांनी संयुक्तपणे केली असून, आरोपीला पुढील तपासकामी सी.आय.डी. पुणे पथकाचे प्रमुख डी.वाय.एस.पी. शामराव काळे व त्यांच्या पथकाच्या ताब्यात देण्यात आले आहे. मार्गदर्शक वरिष्ठ अधिकारी: सदरची संपूर्ण कारवाई खालील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली: श्री. संदीप सिंह गिल्ल (पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण) शफकत अमना (पोलीस अधीक्षक, सी.आय.डी. पुणे घटक) श्री. गणेश बिरादार (अप्पर पोलीस अधीक्षक) श्री. बापुराव दडस (उपविभागीय पोलीस अधिकारी, दौंड विभाग, पुणे ग्रामीण) तपास पथकातील अधिकारी व अंमलदार: गुन्ह्याची गोपनियता पाळून आरोपीचा शोध घेण्यासाठी नेमण्यात आलेल्या उरूळी कांचन पोलीस स्टेशनच्या विशेष पथकात खालील अधिकारी व अंमलदारांचा समावेश होता: विजयमाला पवार (वरिष्ठ पोलीस निरीक्षक) पांडुरंग पवार (सहायक पोलीस निरीक्षक) अजिनाथ शिंदे (पोलीस उपनिरीक्षक) रमेश भोसले (सहायक फौजदार) सोमनाथ चितारे (पोलीस हवालदार) सचिन जगताप (पोलीस हवालदार) कमलेश होले (पोलीस हवालदार) अक्षय कामठे (पोलीस शिपाई) ऋषिकेश रासकर (पोलीस शिपाई) संजय दाणे (पोलीस शिपाई) सोमनाथ सुपेकर (पोलीस शिपाई)1