Shuru
Apke Nagar Ki App…
वन विकास महामंडळाच्या शिवनी वनपरिक्षेत्रात कार्यालयीन शासकीय दप्तर विखुरलेल्या अवस्थेत रस्त्यावर आढळून आल्याने उडाली खळबळ #van vikas mahamandal news##news#kinwatnews#
गौतम कांबळे
वन विकास महामंडळाच्या शिवनी वनपरिक्षेत्रात कार्यालयीन शासकीय दप्तर विखुरलेल्या अवस्थेत रस्त्यावर आढळून आल्याने उडाली खळबळ #van vikas mahamandal news##news#kinwatnews#
More news from महाराष्ट्र and nearby areas
- #van vikas mahamandal news##news#kinwatnews#1
- लोखंडी पत्र्याच्या छतावरून गेलेल्या विजेच्या ताराचा स्पर्श झाल्याने एका मुलाला गंभीर दुखापत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात मुलगा गंभीर जखमी झाला असून तातडीने उपचारासाठी त्याला नांदेड येथे हलविण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. हि घटना नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्याच्या कुंडलवाडी येथील चुंगीनाक्याजवळ घडली. अशा घटना टाळण्यासाठी नागरिकांनी विजेच्या तारांपासून सुरक्षित अंतर ठेवावे तसेच घराच्या छतावर काम करताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. मुलाच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी हीच प्रार्थना. #अपघात #वीजतार #सावधान #SafetyFirst #Nanded BreakingNews StaySafe1
- दारव्हा तालुक्यातील तरनोळी गावात शुक्रवारी झालेल्या वादळी पावसाने जोरदार तडाखा दिला. सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, रबी पिके, भाजीपाला आणि फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. वादळासह विजांच्या कडकडाटात सुमारे तासभर पाऊस कोसळला. यामुळे अनेक शेतांतील पिके जमिनीवर आडवी झाली. यशवंत श्रोत्री यांच्या शेतातील पपई पिकाचे नुकसान झाले, तर श्याम श्रीहरी कदम यांच्या मक्याला व पपईला फटका बसला. सुशील कदम व विजय कदम यांच्या शेतातील आंब्याच्या झाडांवरील सुमारे ९० टक्के आंबे वाऱ्यामुळे गळून पडले.याशिवाय कांदा व इतर पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. वादळाच्या तडाख्यामुळे काही ठिकाणी वीजतारा तुटून खाली पडल्या. या जिवंत तारांचा धक्का लागून याकूब शहा यांचा बैल मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना घडली.दरम्यान, वाऱ्यामुळे अनेक झाडे रस्त्यावर कोसळल्याने काही मार्ग तात्पुरते बंद झाले होते. प्रशासनाने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.2
- 🚩 नांदेडमध्ये शिवकालीन वैभव अवतरणार: 'सुवर्ण होन' आणि पुरातन शस्त्रास्त्रांचे भव्य प्रदर्शन! नांदेड: छत्रपती शिवाजी महाराजांच्या देदीप्यमान इतिहासाची साक्ष देणारे 'शिवकालीन सुवर्ण होन' आणि ऐतिहासिक शस्त्रास्त्रांचे भव्य प्रदर्शन नांदेडमध्ये आयोजित करण्यात आले आहे. 'नंदगिरी किल्ल्याचे किल्लेदार' आणि 'नंदगिरी किल्ला संवर्धन संस्था, नांदेड' यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून, नांदेडकरांसाठी ही एक दुर्मिळ पर्वणी ठरणार आहे. 🔍 प्रदर्शनाची मुख्य आकर्षणे: शिवकालीन सुवर्ण होन: श्री अशोक सिंह ठाकूरजी यांनी संग्रहित केलेला, शिवरायंच्या राज्याभिषेकाचा प्रत्यक्ष साक्षीदार असलेला सोन्याचा 'होन' पाहण्याची संधी पहिल्यांदाच नांदेडमध्ये उपलब्ध झाली आहे. प्राचीन नाणी: निलंगा (लातूर) येथील 'श्री चक्रधर संग्रहालय' यांच्या संग्रहातील इ.स. पूर्व ६०० वर्षांपासूनची दुर्मिळ नाणी प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. ऐतिहासिक शस्त्रास्त्रे: 'शहाजीराजे भोसले ऐतिहासिक वस्तू संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट' यांच्याकडील शिवकालीन आणि ऐतिहासिक शस्त्रांचे प्रदर्शन यावेळी करण्यात येईल. 📍 प्रदर्शनाचा तपशील: दिनांक: शुक्रवार, ३ एप्रिल २०२६ ते रविवार, ५ एप्रिल २०२६. वेळ: सकाळी १०:०० ते सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत. स्थळ: नंदगिरी किल्ला, होळी परिसर, नावघाट, नांदेड. विशेष टीप: छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळी सोन्याचे 'होन' चलनात आणले होते. या प्रदर्शनाच्या निमित्ताने अशा दुर्मिळ ऐतिहासिक वारशाचे दर्शन घडणार आहे. नांदेडमधील इतिहासप्रेमी, विद्यार्थी आणि नागरिकांनी या प्रदर्शनाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.4
- Post by वैजनाथ पावडे1
- काटेपूर्णा जलाशयात अत्यल्प जलसाठा; पाणीटंचाईची भीती वाढली वाशिम जिल्ह्यातील जऊळका रेल्वे गावानजीक असलेल्या काटेपूर्णा जलाशय प्रकल्पामध्ये सध्या अत्यल्प जलसाठा उपलब्ध असून केवळ सुमारे ७ टक्के मूर्त साठा शिल्लक आहे. उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे येत्या काळात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या जलाशयातून मालेगाव शहरासह जऊळका रेल्वे, जामखेड, वडी वरदरी बुद्रुक या गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र सध्याच्या परिस्थितीत जलाशयातून अतिरिक्त पाणी उपसा होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. उन्हाळ्याचा कालावधी लक्षात घेता उपलब्ध पाणीसाठा फक्त पिण्यासाठी व जनावरांच्या गरजांसाठी राखून ठेवावा, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन योग्य नियोजन करावे, अन्यथा येत्या काही महिन्यांत गंभीर पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.1
- Post by Sharad Dayedar1
- नांदेड हादरले! गँगवॉरमधून तिहेरी खून नांदेड शहरात शुक्रवारी मध्यरात्री भीषण गँगवॉर उफाळून आला. वर्चस्वाच्या वादातून दोन गट आमनेसामने येत तलवारी-खंजरांनी हल्ला केला. ⚔️ 👉 ई-स्क्वेअर परिसरात दोघांचा जागीच खून 👉 काही तासांतच रुग्णालयात सूडाने तिसऱ्याची हत्या 👉 शहरात दहशतीचे वातावरण भररस्त्यात झालेल्या या रक्तरंजित घटनेनंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथेच मध्यरात्री घडलेल्या सूडाच्या हल्ल्यामुळे भीती आणखी वाढली. 👮♂️ पोलिसांचा तपास वेगात 👉 काही संशयित ताब्यात 👉 फरार आरोपींचा शोध सुरू ⚠️ सलग तिहेरी हत्येमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर #Nanded #CrimeNews #GangWar #TripleMurder #BreakingNews Maharashtra LawAndOrder1