Shuru
Apke Nagar Ki App…
Asaduddin Owaisi vs Police 😡 | Aamne-Saamne Takkar #shorts Asaduddin Owaisi vs Police 😡 | Aamne-Saamne Takkar
Haq Ki Baat
Asaduddin Owaisi vs Police 😡 | Aamne-Saamne Takkar #shorts Asaduddin Owaisi vs Police 😡 | Aamne-Saamne Takkar
More news from महाराष्ट्र and nearby areas
- जालन्यात उघड्यावर मांस विक्री करणाऱ्या दुकानांवर महापालिकेचा हातोडा! नूतन वसाहत, अंबड चौफुली, इंदेवाडी रोडवर कारवाई नियम तोडणाऱ्यांवर दंड व गुन्हा दाखल करण्याचा इशारा1
- सुरक्षित प्रवास, एसटीचा प्रवास' असं ब्रीदवाक्य मिरवणाऱ्या एसटी महामंडळाच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बुलढाणा जिल्ह्यात एका धावत्या एसटी बसचे चाक निखळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.हरणखेड ते मलकापूर मार्ग, जिल्हा बुलढाणामलकापूर आगाराची एक बस हनवतखेडवरून प्रवाशांना घेऊन परत येत होती. बस पूर्ण वेगात असताना अचानक चालकाच्या बाजूचे किंवा मागील बाजूचे चाक निखळून बाहेर पडले.धावत्या बसचे चाक निखळल्याचे लक्षात येताच, बसचालकाने अत्यंत संयमाने आणि कौशल्याने बस रस्त्याच्या कडेला नियंत्रित करून थांबवली. चालकाच्या या प्रसंगावधानतेमुळे बस उलटली नाही किंवा मोठा अपघात झाला नाही.सुदैवाने, या घटनेत कोणत्याही प्रवाशाला इजा झालेली नाही. मोठी दुर्घटना टळल्याने प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. मात्र, या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.या घटनेमुळे एसटी महामंडळाचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे खालील महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होत आहेत एसटीच्या ताफ्यात नादुरुस्त आणि भंगार बसेसची संख्या वाढत आहे का? बस डेपोमध्ये गाड्यांचे वेळोवेळी मेंटेनन्स (देखभाल) केले जात नाही का? प्रवाशांच्या जीवाशी असा खेळ कधीपर्यंत सुरू राहणार? निष्कर्ष: बुलढाणा जिल्ह्यातील या घटनेने एसटीच्या सुरक्षित प्रवासाच्या दाव्यांची पोलखोल केली आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने जुन्या बसेसची दुरुस्ती करावी किंवा नवीन बसेस ताफ्यात सामील कराव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे1
- बार्शीत भक्तीरसाचा महापूर..... शिवलीलाताई पाटील यांच्या कीर्तनाला महिलांचा विक्रमी प्रतिसाद..!1
- आजच्या जनता दरबारात अनेक समस्यांची सोडवणूक, नागरिकांचे समाधान हाच माझा ध्यासः लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्या समस्या सोडवणे ही केवळ जबाबदारी नाही, तर एक भावनिक नाते आहे. आज चिखली मतदारसंघातून मोठ्या संख्येने व मोठ्या विश्वासाने अनेक नागरिक प्रत्यक्ष भेटीसाठी आले, आपले प्रश्न मांडले आणि त्यांची सोडवणूक मला करता आली हीच माझ्यासाठी सर्वात आनंदाची बाब आहे. शांततेत आणि सुरळीत पार पडलेला हा जनता दरबार म्हणजे जनतेच्या विश्वासाचं जिवंत प्रतीक आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहून माझ्या कामाला खऱ्या अर्थाने यश आल्याची जाणीव झाली. जनतेची सेवा करणे हाच माझा ध्यास आहे, आणि हा ध्यास अखंडपणे जपणे हाच माझा निर्धार आहे.1
- कन्नड. गाय गोठा अनुदान संबंधित माहिती देताना माजी आमदार हर्षवर्धन रायभान जाधव1
- गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन परिसरातील आरापूर–सुलतानाबाद एमआयडीसी संदर्भात शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक शुक्रवारी, २५ एप्रिल रोजी गवळीशिवरा येथील सप्ताह मैदानात पार पडली. या बैठकीला मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.एमआयडीसी प्रकल्प, जमीन अधिग्रहण, स्थानिक शेतकऱ्यांच्या समस्या आणि विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा होत असताना आमदार बंब यांनी शिक्षण व्यवस्थेबाबतही कठोर भूमिका मांडली.1
- Madrason Ka Survey: Sahi Ya Galat? 🤔1
- पोलीस कॉम्प्लेक्स जवळ दुकानाला भीषण आग; आगीमध्ये संपूर्ण साहित्य जळून खाक दुकान मालकाचे लाखोचे नुकसान.. दुकानाच्या आगीने जवळच असलेल्या विद्युत रोहीत्राला सुध्दा लागली आग अग्निशमन दलाच्या जवानांनी मिळवले आगीवर नियंत्रण1
- एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येतेय खामगाव शहरातून. जिथे केवळ नाचताना धक्का लागला म्हणून एका तरुणाला आपली सोन्यासारखी आयुष्याची किंमत मोजावी लागली आहे.खामगाव शहरातील बर्डे प्लॉट परिसरात २५ एप्रिलच्या मध्यरात्री एका लग्न समारंभाचा उत्साह सुरू होता. डीजेचा कडकडाट आणि तरुणांचा जल्लोष सुरू असतानाच नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. मृत तरुण, २३ वर्षीय शोएब खान अमीन खान, हा आपल्या मित्रांसोबत डीजेवर नाचत होता.नाचण्याच्या नादात त्याचा धक्का तिथेच असलेल्या एका दुसऱ्या तरुणाला लागला. खरं तर हे कारण अतिशय शुल्लक होतं, पण या धक्क्यामुळे अहंकाराची ठिणगी पडली आणि वादाला सुरुवात झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की, काही क्षणातच ४ ते ५ जणांच्या टोळीने संगनमत करून शोएबवर हल्ला चढवला.आरोपींनी केवळ हातघाईवर न थांबता धारदार शस्त्रे आणि फायटरचा वापर केला. अत्यंत निर्घृणपणे शोएबवर वार करण्यात आले. या अचानक झालेल्या हल्ल्यात शोएब रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. ज्या लग्नात काही वेळापूर्वी आनंदाचे वातावरण होते, तिथे आता फक्त किंकाळ्या आणि रक्ताचा सडा पाहायला मिळत होता.या घटनेमुळे संपूर्ण बर्डे प्लॉट परिसरात दहशतीचे सावट पसरले आहे. स्थानिक पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून आरोपींचा शोध सुरू आहे. एका तरुणाचा अशा प्रकारे बळी गेल्याने खामगावात हळहळ व्यक्त केली जात आहे.1