logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

संभाजीनगर येथील क्रांतीचौकात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा जल्लोष करण्यात आला. या ठिकाणी जमा झालेल्या लोकांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानिमित्त हा आनंदोत्सव साजरा केला.

9 hrs ago
user_शेख अजहर ताहेर (पत्रकार)
शेख अजहर ताहेर (पत्रकार)
गंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
9 hrs ago

संभाजीनगर येथील क्रांतीचौकात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा जल्लोष करण्यात आला. या ठिकाणी जमा झालेल्या लोकांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानिमित्त हा आनंदोत्सव साजरा केला.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • संभाजीनगर येथील क्रांतीचौकात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा जल्लोष करण्यात आला. या ठिकाणी जमा झालेल्या लोकांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानिमित्त हा आनंदोत्सव साजरा केला.
    1
    संभाजीनगर येथील क्रांतीचौकात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा जल्लोष करण्यात आला. या ठिकाणी जमा झालेल्या लोकांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानिमित्त हा आनंदोत्सव साजरा केला.
    user_शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    गंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ आणि देशभरातील वाढत्या पेपरफुटीच्या घटनांविरोधात छत्रपती संभाजीनगरात रविवारी, 26 जुलै रोजी भव्य तिरंगा मार्च काढण्यात आला. भारत मातेच्या पाल्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी क्रांती चौक ते पैठण गेट दरम्यान काढण्यात आलेल्या या मार्चमध्ये शहरवासीय, तरुण, महिला, विद्यार्थी व विविध क्षेत्रांतील हजारो नागरिक उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरले. या आंदोलनात सहभागी नागरिकांनी कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा न घेता हातात केवळ राष्ट्रध्वज तिरंगा, महापुरुषांचे फ्लेक्स आणि केंद्र सरकारच्या भूमिकेचा निषेध करणारे फलक घेतले होते. विद्यार्थ्यांवरील अत्याचार आणि पेपरफुटीचा निषेध करण्यासाठी सर्व जण काळे कपडे परिधान करून सहभागी झाले होते. या वेळी 'केंद्र सरकार हाय हाय...', 'मोदी सरकार हाय हाय...' आणि 'विद्यार्थ्यांवर आणि माता-भगिनींवर हात उचलणाऱ्या सरकारचा धिक्कार असो...' अशा जोरदार घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. देशातील विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित झाले पाहिजे, पेपरफुटीच्या घटनांना आळा बसला पाहिजे आणि विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय थांबला पाहिजे, अशी ठाम भूमिका या वेळी शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी मांडली. या तिरंगा मार्चमध्ये शिवसेना नेते तथा आमदार अंबादास दानवे, शिवसेना उपनेते सुभाष पाटील, माजी मंत्री अनिस पटेल, काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, सीपीआय नेते कॉम्रेड अभय टाकसाळ, माजी आमदार नामदेवराव पवार, संतोष जेजुरकर, संतोष खेंडके, राशीद मामू, काँग्रेस शहराध्यक्ष सय्यद अक्रम, बाळासाहेब थोरात, हरिभाऊ हिवाळे, ज्ञानेश्वर डांगे, दिग्विजय शेरखाने, जगन्नाथ काळे, शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक आशा दातार, महानगर संघटक सुकन्या भोसले, काँग्रेस महिला शहराध्यक्ष दिपाली मिसाळ, रेखा वाहटूळे, विद्या गायकवाड यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
    2
    दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ आणि देशभरातील वाढत्या पेपरफुटीच्या घटनांविरोधात छत्रपती संभाजीनगरात रविवारी, 26 जुलै रोजी भव्य तिरंगा मार्च काढण्यात आला. भारत मातेच्या पाल्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी क्रांती चौक ते पैठण गेट दरम्यान काढण्यात आलेल्या या मार्चमध्ये शहरवासीय, तरुण, महिला, विद्यार्थी व विविध क्षेत्रांतील हजारो नागरिक उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरले.

या आंदोलनात सहभागी नागरिकांनी कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा न घेता हातात केवळ राष्ट्रध्वज तिरंगा, महापुरुषांचे फ्लेक्स आणि केंद्र सरकारच्या भूमिकेचा निषेध करणारे फलक घेतले होते. विद्यार्थ्यांवरील अत्याचार आणि पेपरफुटीचा निषेध करण्यासाठी सर्व जण काळे कपडे परिधान करून सहभागी झाले होते. या वेळी 'केंद्र सरकार हाय हाय...', 'मोदी सरकार हाय हाय...' आणि 'विद्यार्थ्यांवर आणि माता-भगिनींवर हात उचलणाऱ्या सरकारचा धिक्कार असो...' अशा जोरदार घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. देशातील विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित झाले पाहिजे, पेपरफुटीच्या घटनांना आळा बसला पाहिजे आणि विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय थांबला पाहिजे, अशी ठाम भूमिका या वेळी शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी मांडली.

या तिरंगा मार्चमध्ये शिवसेना नेते तथा आमदार अंबादास दानवे, शिवसेना उपनेते सुभाष पाटील, माजी मंत्री अनिस पटेल, काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, सीपीआय नेते कॉम्रेड अभय टाकसाळ, माजी आमदार नामदेवराव पवार, संतोष जेजुरकर, संतोष खेंडके, राशीद मामू, काँग्रेस शहराध्यक्ष सय्यद अक्रम, बाळासाहेब थोरात, हरिभाऊ हिवाळे, ज्ञानेश्वर डांगे, दिग्विजय शेरखाने, जगन्नाथ काळे, शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक आशा दातार, महानगर संघटक सुकन्या भोसले, काँग्रेस महिला शहराध्यक्ष दिपाली मिसाळ, रेखा वाहटूळे, विद्या गायकवाड यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
    user_रविंद्र सुरडकर गुरव
    रविंद्र सुरडकर गुरव
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरी यांना 'खड्डामंत्री' म्हणत थेट डिवचले आहे. या खोचक टीकेनंतर आता e20 पेट्रोलचा मुद्दा अधिक चिघळणार का, असा सवाल उपस्थित होत असून राजकीय वातावरणात यावरून जोरदार चर्चा रंगू लागली आहे.
    1
    उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरी यांना 'खड्डामंत्री' म्हणत थेट डिवचले आहे. या खोचक टीकेनंतर आता e20 पेट्रोलचा मुद्दा अधिक चिघळणार का, असा सवाल उपस्थित होत असून राजकीय वातावरणात यावरून जोरदार चर्चा रंगू लागली आहे.
    user_Sudam gadekar
    Sudam gadekar
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • फुलंब्री तालुक्यातील दरेगाव दरी येथील शालेय समितीच्या अध्यक्षपदी बाबासाहेब मालोदे यांची निवड करण्यात आली आहे.
    1
    फुलंब्री तालुक्यातील दरेगाव दरी येथील शालेय समितीच्या अध्यक्षपदी बाबासाहेब मालोदे यांची निवड करण्यात आली आहे.
    user_AKBAR SHAHA REPORTER
    AKBAR SHAHA REPORTER
    Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर पंढरपूर नगरीत लाखो वारकऱ्यांच्या जयघोषाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून चंद्रभागेच्या पवित्र तीरावर "ज्ञानोबा-तुकाराम"च्या गजरात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे. या आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. महापूजेसाठी मंदिराच्या दर्शन रांगेतील पहिल्या निष्ठावंत वारकरी दांपत्याला मानाचा वारकरी म्हणून बसण्याचा सन्मान दिला जातो. यंदा हा मान धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गौरगाव येथील बाबासाहेब माधव माने व प्रभावती बाबासाहेब माने या दांपत्याला मिळाला आहे. गेली २० वर्षे अखंड पंढरीची वारी करणारे माने दांपत्य हे वारकरी परंपरेची तिसरी पिढी आहे. साक्षात विठुरायाच्या महापूजेचा मान मिळाल्याने आयुष्य कृतार्थ झाले असून असा बहुमान मिळेल असे स्वप्नातही वाटले नव्हते, अशी भावना त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली.
    2
    आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर पंढरपूर नगरीत लाखो वारकऱ्यांच्या जयघोषाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून चंद्रभागेच्या पवित्र तीरावर "ज्ञानोबा-तुकाराम"च्या गजरात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे. या आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली.

महापूजेसाठी मंदिराच्या दर्शन रांगेतील पहिल्या निष्ठावंत वारकरी दांपत्याला मानाचा वारकरी म्हणून बसण्याचा सन्मान दिला जातो. यंदा हा मान धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गौरगाव येथील बाबासाहेब माधव माने व प्रभावती बाबासाहेब माने या दांपत्याला मिळाला आहे. गेली २० वर्षे अखंड पंढरीची वारी करणारे माने दांपत्य हे वारकरी परंपरेची तिसरी पिढी आहे. साक्षात विठुरायाच्या महापूजेचा मान मिळाल्याने आयुष्य कृतार्थ झाले असून असा बहुमान मिळेल असे स्वप्नातही वाटले नव्हते, अशी भावना त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली.
    user_सुभाष मस्के पत्रकार
    सुभाष मस्के पत्रकार
    Construction Contractor पैठण, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • आषाढी एकादशीचे औचित्य साधून कोपरगाव येथील श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयातर्फे 'आषाढी वारी व साक्षरता दिंडी' अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात काढण्यात आली. टाळ-मृदुंगाचा गजर आणि "ज्ञानबा-तुकाराम"च्या जयघोषाने संपूर्ण परिसर विठ्ठलमय झाला होता. विद्यालयातून निघालेली ही दिंडी श्रीराममंदिर मार्गे कोपरगाव पंचायत समितीपर्यंत काढण्यात आली. या दिंडीत वारकरी वेशभूषेत आलेले विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि विठ्ठल-रखुमाईचे रूप धारण केलेल्या विद्यार्थ्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या दिंडीतून भक्तीसोबतच साक्षरतेचा संदेशही प्रभावीपणे देण्यात आला, ज्यामध्ये साक्षरता फलकाचे आकर्षक लेखन श्री. अतुल कोताडे यांनी केले. यावेळी स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन श्री. चंद्रकांत ठोळे, कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. कैलास ठोळे, सचिव श्री. दिलीप अजमेरे, सहसचिव श्री. सचिन अजमेरे, खजिनदार श्री. आनंद ठोळे, सदस्य डॉ. अमोल अजमेरे, श्री. राजेश ठोळे, श्री. संदीप अजमेरे आणि श्री. दिलीप तुपसैंदर आदी मान्यवरांनी उपस्थित राहून दिंडीचे स्वागत केले व विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक श्री. सुरेंद्र शिरसाळे, पर्यवेक्षक श्री. बलभीम उल्हारे यांच्यासह श्री. संजय बर्डे, सौ. शितल अजमेरे, सौ. संजीवनी डरांगे, सौ. रूपाली साळुंखे, श्रीमती स्वाती जाधव, सौ. पल्लवी तुपसैंदर, सौ. छाया निंबाळकर, श्री. योगेश गवळे, श्री. दिगंबर देसाई, श्री. सचिन डोळे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध, भक्तिमय आणि उत्स्फूर्त सहभागामुळे या आषाढी वारीने सर्व कोपरगावकरांची मने जिंकली.
    3
    आषाढी एकादशीचे औचित्य साधून कोपरगाव येथील श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयातर्फे 'आषाढी वारी व साक्षरता दिंडी' अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात काढण्यात आली. टाळ-मृदुंगाचा गजर आणि "ज्ञानबा-तुकाराम"च्या जयघोषाने संपूर्ण परिसर विठ्ठलमय झाला होता. विद्यालयातून निघालेली ही दिंडी श्रीराममंदिर मार्गे कोपरगाव पंचायत समितीपर्यंत काढण्यात आली. या दिंडीत वारकरी वेशभूषेत आलेले विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि विठ्ठल-रखुमाईचे रूप धारण केलेल्या विद्यार्थ्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

या दिंडीतून भक्तीसोबतच साक्षरतेचा संदेशही प्रभावीपणे देण्यात आला, ज्यामध्ये साक्षरता फलकाचे आकर्षक लेखन श्री. अतुल कोताडे यांनी केले. यावेळी स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन श्री. चंद्रकांत ठोळे, कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. कैलास ठोळे, सचिव श्री. दिलीप अजमेरे, सहसचिव श्री. सचिन अजमेरे, खजिनदार श्री. आनंद ठोळे, सदस्य डॉ. अमोल अजमेरे, श्री. राजेश ठोळे, श्री. संदीप अजमेरे आणि श्री. दिलीप तुपसैंदर आदी मान्यवरांनी उपस्थित राहून दिंडीचे स्वागत केले व विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले.

उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक श्री. सुरेंद्र शिरसाळे, पर्यवेक्षक श्री. बलभीम उल्हारे यांच्यासह श्री. संजय बर्डे, सौ. शितल अजमेरे, सौ. संजीवनी डरांगे, सौ. रूपाली साळुंखे, श्रीमती स्वाती जाधव, सौ. पल्लवी तुपसैंदर, सौ. छाया निंबाळकर, श्री. योगेश गवळे, श्री. दिगंबर देसाई, श्री. सचिन डोळे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध, भक्तिमय आणि उत्स्फूर्त सहभागामुळे या आषाढी वारीने सर्व कोपरगावकरांची मने जिंकली.
    user_Press Rajendra Taskar
    Press Rajendra Taskar
    कोपरगाव, अहमदनगर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत मंत्री संजय शिरसाट यांनी इंडिया आघाडी आणि विरोधी नेत्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर इंडिया आघाडी पूर्णपणे संपली असून त्यांच्यात कुठेही एकवाक्यता उरलेली नाही, असा दावा त्यांनी केला. दिल्लीतील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे श्रेय घेण्यासाठी विरोधी नेत्यांमध्ये चढाओढ लागली होती आणि भविष्यातही ही आघाडी राहणार नाही, असे शिरसाट यांनी स्पष्ट केले. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना शिरसाट म्हणाले की, शरद पवार माझ्यामुळे आंदोलनाची दिशा बदलली म्हणतात, तर राहुल गांधी टी-शर्ट घालून आंदोलन करून दिशा बदलल्याचा दावा करतात; त्यामुळे नेमक्या कोणामुळे दिशा बदलली हे सांगण्यासाठी वेगळा वक्ता आणावा लागेल. पेपर फुटीच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी सांगितले की, ही घटना पहिल्यांदा घडलेली नाही. पूर्वी दरवर्षी पेपर लीक व्हायचे आणि विद्यार्थी जीव द्यायचे, मात्र यावेळच्या मजबूत आंदोलनामुळे शिक्षण क्षेत्रात वेगळी दिशा पाहायला मिळाली आहे. कोणतेही सरकार आले तरी ते आता विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणार नाही. हुकूमशाही केल्यानंतर तरुण वर्ग चिरडला जातो आणि सत्ताही जाते, हा काहींचा मागचा अनुभव आता कामी आला आहे. राजकीय पक्ष आपली बाजू मांडण्यासाठी खेळ खेळत असून लोकांना या खेळाशी काही देणेघेणे नाही, असे सांगत शिरसाट यांनी नमूद केले की, 'माझा पेपर लीक होणार नाही' या भावनेतून तरुण आनंद व्यक्त करत आहेत. शरद पवार यांच्या बदलत्या भूमिकांवर बोट ठेवत ते म्हणाले की, पवार एनडीए मध्ये जातील की नाही माहित नाही, पण त्यांचा मागचा अनुभव पाहता ते जास्त काळ एनडीए मध्ये राहणार नाहीत. तसेच राज ठाकरे यांच्यावर बाळासाहेबांचा प्रभाव असल्याने ते तसे विधान करतात, असेही शिरसाट यांनी म्हटले.
    1
    छत्रपती संभाजीनगर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत मंत्री संजय शिरसाट यांनी इंडिया आघाडी आणि विरोधी नेत्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर इंडिया आघाडी पूर्णपणे संपली असून त्यांच्यात कुठेही एकवाक्यता उरलेली नाही, असा दावा त्यांनी केला. दिल्लीतील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे श्रेय घेण्यासाठी विरोधी नेत्यांमध्ये चढाओढ लागली होती आणि भविष्यातही ही आघाडी राहणार नाही, असे शिरसाट यांनी स्पष्ट केले.

उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना शिरसाट म्हणाले की, शरद पवार माझ्यामुळे आंदोलनाची दिशा बदलली म्हणतात, तर राहुल गांधी टी-शर्ट घालून आंदोलन करून दिशा बदलल्याचा दावा करतात; त्यामुळे नेमक्या कोणामुळे दिशा बदलली हे सांगण्यासाठी वेगळा वक्ता आणावा लागेल. पेपर फुटीच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी सांगितले की, ही घटना पहिल्यांदा घडलेली नाही. पूर्वी दरवर्षी पेपर लीक व्हायचे आणि विद्यार्थी जीव द्यायचे, मात्र यावेळच्या मजबूत आंदोलनामुळे शिक्षण क्षेत्रात वेगळी दिशा पाहायला मिळाली आहे. कोणतेही सरकार आले तरी ते आता विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणार नाही. हुकूमशाही केल्यानंतर तरुण वर्ग चिरडला जातो आणि सत्ताही जाते, हा काहींचा मागचा अनुभव आता कामी आला आहे.

राजकीय पक्ष आपली बाजू मांडण्यासाठी खेळ खेळत असून लोकांना या खेळाशी काही देणेघेणे नाही, असे सांगत शिरसाट यांनी नमूद केले की, 'माझा पेपर लीक होणार नाही' या भावनेतून तरुण आनंद व्यक्त करत आहेत. शरद पवार यांच्या बदलत्या भूमिकांवर बोट ठेवत ते म्हणाले की, पवार एनडीए मध्ये जातील की नाही माहित नाही, पण त्यांचा मागचा अनुभव पाहता ते जास्त काळ एनडीए मध्ये राहणार नाहीत. तसेच राज ठाकरे यांच्यावर बाळासाहेबांचा प्रभाव असल्याने ते तसे विधान करतात, असेही शिरसाट यांनी म्हटले.
    user_रविंद्र सुरडकर गुरव
    रविंद्र सुरडकर गुरव
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगरमधील सातारा गावाजवळील वल्मी तलावात रविवारी सायंकाळी एका अंदाजे २५ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच कांचनवाडी अग्निशमन केंद्राचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पदमपुरा अग्निशमन पथकाच्या मदतीने तलावात शोधमोहीम राबवून संबंधित तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर मृतदेह सातारा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे. मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नसून सातारा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गोविंद एकीलवाले पुढील तपास करत आहेत. ही बचाव मोहीम मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक एन. खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन दलाने यशस्वीरीत्या पार पाडली.
    2
    छत्रपती संभाजीनगरमधील सातारा गावाजवळील वल्मी तलावात रविवारी सायंकाळी एका अंदाजे २५ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच कांचनवाडी अग्निशमन केंद्राचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पदमपुरा अग्निशमन पथकाच्या मदतीने तलावात शोधमोहीम राबवून संबंधित तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

त्यानंतर मृतदेह सातारा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे. मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नसून सातारा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गोविंद एकीलवाले पुढील तपास करत आहेत. ही बचाव मोहीम मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक एन. खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन दलाने यशस्वीरीत्या पार पाडली.
    user_Marathi News Point
    Marathi News Point
    Video editing service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.