हिंगोलीत अफू शेतीवर धडाकेबाज कारवाई; 3.54 लाखांचा मुद्देमाल जप्त हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात अफू लागवडीवर मोठी कारवाई करत पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल चार गुंठे शेतीतील अफू पिकावर छापा टाकला. या कारवाईत 1 क्विंटल 77 किलो 45 ग्रॅम अफूची झाडे जप्त करण्यात आली असून एकूण 3 लाख 54 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी प्रताप सुरेश नलगे (वय 42, रा. शिरळी, ता. वसमत) याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध कुरुंदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोली जिल्ह्यातील चार गुंठे शेतीमध्ये अफूची बेकायदेशीर लागवड करण्यात आली होती. जिल्ह्याच्या इतिहासातील ही पहिलीच मोठी कारवाई असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या संदर्भात पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी स्पष्ट इशारा देत म्हटले की, “अफू, गांजा तसेच इतर अमली पदार्थांची लागवड व विक्री करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही. अशा प्रकारांवर कठोर कारवाई सुरूच राहील.” सदर कारवाई डॉ. नीलाभ रोहन, अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोउपनि कारामुंगे तसेच पोलीस अंमलदार भुजंग कोकरे, गजानन पोकळे, ज्ञानेश्वर गोरे, साईनाथ कंठे, आकाश टापरे, नरेंद्र साळवे, किशोर सावंत, संदीप टाक, साठे आदींच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली. या धडाकेबाज कारवाईमुळे जिल्ह्यातील अमली पदार्थविरोधी मोहिमेला मोठे बळ मिळाले असून अवैध शेती व तस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
हिंगोलीत अफू शेतीवर धडाकेबाज कारवाई; 3.54 लाखांचा मुद्देमाल जप्त हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात अफू लागवडीवर मोठी कारवाई करत पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल चार गुंठे शेतीतील अफू पिकावर छापा टाकला. या कारवाईत 1 क्विंटल 77 किलो 45 ग्रॅम अफूची झाडे जप्त करण्यात आली असून एकूण 3 लाख 54 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी प्रताप सुरेश नलगे (वय 42, रा. शिरळी,
ता. वसमत) याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध कुरुंदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोली जिल्ह्यातील चार गुंठे शेतीमध्ये अफूची बेकायदेशीर लागवड करण्यात आली होती. जिल्ह्याच्या इतिहासातील ही पहिलीच मोठी कारवाई असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या संदर्भात पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी स्पष्ट इशारा देत म्हटले की, “अफू, गांजा तसेच इतर अमली पदार्थांची लागवड व विक्री करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही. अशा प्रकारांवर कठोर कारवाई
सुरूच राहील.” सदर कारवाई डॉ. नीलाभ रोहन, अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोउपनि कारामुंगे तसेच पोलीस अंमलदार भुजंग कोकरे, गजानन पोकळे, ज्ञानेश्वर गोरे, साईनाथ कंठे, आकाश टापरे, नरेंद्र साळवे, किशोर सावंत, संदीप टाक, साठे आदींच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली. या धडाकेबाज कारवाईमुळे जिल्ह्यातील अमली पदार्थविरोधी मोहिमेला मोठे बळ मिळाले असून अवैध शेती व तस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
- ज्ञानेशप्रसाद, ब्युरो चिफ न्यूज मराठी वाशिम* संवाद:- 9923230821 रिसोड: न. प. चे कर्मचारी विनोद बांगर यांच्यामुळे, गावात पुन्: पक्षांचा चिव चिवाट ऐकायला मिळतोय!1
- *“धानोरा विकासकामांचा भांडाफोड; जलसंधारण घोटाळ्यावर जि.प. प्रशासन कोंडीत!”* - जि.प. यवतमाळसमोर आमरण उपोषणाला सुरवात! उमरखेड : धानोरा (सा), ता. उमरखेड येथील कथित विकासकामांतील गैरव्यवहार आणि जलसंधारण विभागातील अनियमिततेच्या गंभीर आरोपांमुळे जिल्हा परिषद प्रशासनाविरोधात संतापाचा ज्वालामुखी उसळला आहे. सोमवारी (दि. १६ फेब्रुवारी २०२६) पासून जिल्हा परिषद यवतमाळ कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात झाली असून प्रशासनावर थेट कारवाईचा दबाव वाढला आहे. पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचा या आमरण उपोषणात रामदास अंबादास कांबळे (अध्यक्ष, संयुक्त पत्रकार संघ), शेख इरफान शेख इसा (कार्याध्यक्ष) आणि सुरेंद्रनाथ पंजाबराव दळवी (उपाध्यक्ष) सहभागी झाले आहेत त्यांनी जि.प. कार्यालयासमोर “दोषींवर कारवाई झाल्याशिवाय माघार नाही” असा स्पष्ट इशारा दिला. *धानोरा प्रकरणातील आरोप गंभीर* उपोषणकर्त्यांनी केलेले आरोप थेट जनहिताशी निगडित असून त्यात प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल गैरव्यवहार, स्मशानभूमीकडे जाणाऱ्या सीसी रस्त्याचे काम न करता बिले काढल्याचा आरोप, सार्वजनिक शौचालयाच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाबाबत तक्रारींकडे दुर्लक्ष यांचा समावेश आहे. संबंधित प्रकरणांत चौकशी व कार्यवाही न झाल्याने आमरण उपोषण करत असल्याचे त्यांनी सांगितले. *जलसंधारण विभागावर लाखोंच्या भ्रष्टाचाराचा ठपका* जि.प. उपविभाग पुसद येथे कार्यरत उपविभागीय जलसंधारण अधिकारी सीमा तायडे यांच्या कार्यकाळात पुसद, दिग्रस, उमरखेड व महागाव तालुक्यांतील विकासकामांत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. धरण–तलाव गाळ उपसा योजनेत अनियमितता,वीटभट्टी धारकांना नियमबाह्य माती परवाने, संबंधित अधिकाऱ्यांच्या संपत्तीची सखोल चौकशी अशा मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या आहेत. तसेच संबंधित अधिकाऱ्यांची तात्काळ निलंबन आणि फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे. *तक्रारींनंतरही कारवाई नाही* १७ डिसेंबर २०२५ रोजी लेखी निवेदन, ९ जानेवारी २०२६ रोजी स्मरणपत्र आणि ३० जानेवारी २०२६ रोजी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व ग्रामविकास मंत्र्यांना ई-मेलद्वारे तसेच प्रत्यक्ष तक्रार करूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. “दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत उपोषण मागे घेणार नाही. उपोषणादरम्यान काही अनुचित घडल्यास प्रशासन जबाबदार राहील,” असा थेट इशारा देत उपोषणकर्त्यांनी उपोषण तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान जि.प. कार्यालया समोर सुरू असलेल्या आमरण उपोषणातील गंभीर आरोपांवर प्रशासन काय भूमिका घेते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- १० लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त; तिघांवर गुन्हा जिल्हा प्रतिनिधी मोहम्मद रफीख नांदेड : गोदावरी नदीच्या पात्रातून अवैधरित्या रेती उपसा करून साठवणूक करणाऱ्यांविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई करत अंदाजे १० लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५.३० वाजता मार्कंड शिवारातील गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उत्खनन सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या पथकाने तत्काळ छापा टाकला. या कारवाईत अंदाजे ५ ब्रास रेती (सुमारे २५ हजार रुपये), एक जेसीबी मशीन (३ लाख रुपये) आणि एक ट्रॅक्टर (७ लाख ५० हजार रुपये) असा एकूण १०,७५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी धर्मपाल ज्ञानोबा कांबळे (वय ३४, व्यवसाय पोलीस, नांदेड ग्रामीण) यांच्या फिर्यादीवरून आरोपी बालाजी केशवराव लमदाडे, बापुराव शीरसागर, मदन येवले (सर्व रा. मार्कंड) व इतर दोन अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ३०३(२), ३०३(५) सह महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, पर्यावरण संरक्षण अधिनियम तसेच सार्वजनिक संपत्ती नुकसानी प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील (भोकर), अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत पोलीस कर्मचारी विठ्ठल शिंदे, आरिफ, जमीर सरवे आदींचा सहभाग होता. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी अवैध रेती उत्खनन व वाहतुकीविरुद्ध “ऑपरेशन फ्लश आऊट” अंतर्गत कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा दिला आहे.2
- शिवपुतळ्यासाठी आमरण उपोषण सुरू 🚨 हिमायतनगर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी तातडीने जागा निश्चित करावी या मागणीसाठी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने नगरपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. प्रशासनाकडून तोंडी आश्वासन देण्यात आले असले तरी लेखी आदेश मिळाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही, असा ठाम निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे. दि. 10 ऑगस्ट 2023 पासून मागणी प्रलंबित असूनही ठोस निर्णय न झाल्याने शिवप्रेमी व नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शिवरायांच्या जयंतीपूर्वी पेटलेला हा प्रश्न प्रशासन कसा सोडवते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. ✊ शिवरायांच्या सन्मानासाठी लढा सुरूच! #हिमायतनगर #शिवपुतळा #छत्रपतीशिवाजीमहाराज #स्वाभिमानीसंभाजीब्रिगेड #आमरणउपोषण #शिवप्रेमी #महाराष्ट्र #लोकशाही #नगरपंचायत #BreakingNews1
- Post by Today One Live1
- मुस्लिम महापौर केला तर विरोधकांचं पोट दुखतं, तुम्ही केलं तर ठीक आम्ही केलं तर बाईट - आमदार डॉ राहुल पाटील2
- Post by Mohammad Rafikh1