Shuru
Apke Nagar Ki App…
मुस्लिम महापौर केला तर विरोधकांचं पोट दुखतं, तुम्ही केलं तर ठीक आम्ही केलं तर बाईट - आमदार डॉ राहुल पाटील
Sayad Jamil
मुस्लिम महापौर केला तर विरोधकांचं पोट दुखतं, तुम्ही केलं तर ठीक आम्ही केलं तर बाईट - आमदार डॉ राहुल पाटील
More news from महाराष्ट्र and nearby areas
- मुस्लिम महापौर केला तर विरोधकांचं पोट दुखतं, तुम्ही केलं तर ठीक आम्ही केलं तर बाईट - आमदार डॉ राहुल पाटील2
- १० लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त; तिघांवर गुन्हा जिल्हा प्रतिनिधी मोहम्मद रफीख नांदेड : गोदावरी नदीच्या पात्रातून अवैधरित्या रेती उपसा करून साठवणूक करणाऱ्यांविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई करत अंदाजे १० लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५.३० वाजता मार्कंड शिवारातील गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उत्खनन सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या पथकाने तत्काळ छापा टाकला. या कारवाईत अंदाजे ५ ब्रास रेती (सुमारे २५ हजार रुपये), एक जेसीबी मशीन (३ लाख रुपये) आणि एक ट्रॅक्टर (७ लाख ५० हजार रुपये) असा एकूण १०,७५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी धर्मपाल ज्ञानोबा कांबळे (वय ३४, व्यवसाय पोलीस, नांदेड ग्रामीण) यांच्या फिर्यादीवरून आरोपी बालाजी केशवराव लमदाडे, बापुराव शीरसागर, मदन येवले (सर्व रा. मार्कंड) व इतर दोन अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ३०३(२), ३०३(५) सह महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, पर्यावरण संरक्षण अधिनियम तसेच सार्वजनिक संपत्ती नुकसानी प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील (भोकर), अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत पोलीस कर्मचारी विठ्ठल शिंदे, आरिफ, जमीर सरवे आदींचा सहभाग होता. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी अवैध रेती उत्खनन व वाहतुकीविरुद्ध “ऑपरेशन फ्लश आऊट” अंतर्गत कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा दिला आहे.2
- शिवपुतळ्यासाठी आमरण उपोषण सुरू 🚨 हिमायतनगर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी तातडीने जागा निश्चित करावी या मागणीसाठी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने नगरपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. प्रशासनाकडून तोंडी आश्वासन देण्यात आले असले तरी लेखी आदेश मिळाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही, असा ठाम निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे. दि. 10 ऑगस्ट 2023 पासून मागणी प्रलंबित असूनही ठोस निर्णय न झाल्याने शिवप्रेमी व नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शिवरायांच्या जयंतीपूर्वी पेटलेला हा प्रश्न प्रशासन कसा सोडवते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. ✊ शिवरायांच्या सन्मानासाठी लढा सुरूच! #हिमायतनगर #शिवपुतळा #छत्रपतीशिवाजीमहाराज #स्वाभिमानीसंभाजीब्रिगेड #आमरणउपोषण #शिवप्रेमी #महाराष्ट्र #लोकशाही #नगरपंचायत #BreakingNews1
- महाशिवरात्रीच्या पवित्र प्रभातकाळी मंठा नगरी जणू शिवतत्त्वाच्या अलौकिक स्पंदनांनी न्हाऊन निघाली होती. मंदिरांच्या घंटानादात, मंत्रोच्चारांच्या गंभीर लयीत आणि भक्तिभावाच्या ओलाव्यात अध्यात्म, सेवा आणि समाजबंध यांचा दिव्य त्रिवेणी संगम साकार झाला. या मंगल क्षणी Press Council of Maharashtra (पीसीएम) पत्रकार संघ, मंठा शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवमय फराळ-वाटप उपक्रमाने सेवाभावाची साक्षात मूर्तीच उभी केली. श्री लक्ष्मीनारायण मंदिर तसेच जगदंबादेवी मार्गावरील वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना प्रेमपूर्वक व सात्विक भावनेने फराळाचे वितरण करण्यात आले. पहाटे ६.४५ ते ११.०० या वेळेत पार पडलेल्या या उपक्रमात प्रत्येक क्षण ‘ॐ नमः शिवाय’च्या अखंड गजराने दुमदुमत होता. वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांच्या स्वरांनी संपूर्ण परिसर शिवमय झाला होता; जणू भक्ती आणि सेवा एकरूप होऊन शिवआराधनेचे सजीव रूप धारण करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वारकरी शिक्षण संस्थेचे ह.भ.प. मदने माऊली महाराज विराजमान होते. प्रमुख पाहुणे म्हणून पीसीएम पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार हरिराम तिवारी (बाबूजी तिवारी) तसेच जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रा. प्रदीप देशमुख उपस्थित होते. व्यासपीठावर पीसीएम पत्रकार संघ मंठाचे तालुकाध्यक्ष डॉ. आशिष तिवारी, योगेश देशमुख, जीवन काळे, अतुल खरात, गजानन माळकर, आतिश राठोड, अंकुश देशमाने, सुभाष झरेकर आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. अध्यक्षीय मनोगतात ह.भ.प. मदने माऊली महाराजांनी अन्नदानाचे दैवी महात्म्य अत्यंत भावपूर्ण शब्दांत अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, अन्नदान ही केवळ सामाजिक कृती नसून ती आत्म्याला परमेश्वराशी जोडणारी साधना आहे. सेवा हीच खरी शिवपूजा असून, गरजूंना प्रेमाने अन्न देणे म्हणजे शिवतत्त्वाची प्रत्यक्ष आराधना होय. या प्रसंगी त्यांनी अभंगाच्या ओव्या सादर करत वातावरण अधिक भक्तिमय केले— “तेथे एक शीत दिधल्या अन्न! कोटी कुळांचे होय उद्धरण! कोटी याग केले पूर्ण! ऐसे महिमान ये तीर्थाचे!” प्रेमपूर्वक अर्पण केलेला अन्नाचा एक घासही कोटी कुळांच्या उद्धाराचे कारण ठरतो, असे सांगत त्यांनी या उपक्रमास ‘शिवपूजेचे साक्षात रूप’ असे संबोधले. वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांप्रती अनेक वर्षांपासून सातत्याने होत असलेले फराळ-वाटप हे निस्सीम सेवाभावाचे तेजस्वी उदाहरण असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. समाजात समत्व, करुणा आणि बांधिलकी जपण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. प्रा. प्रदीप देशमुख यांनीही आपल्या मनोगतात सेवा आणि औदार्य हीच खरी संस्कृतीची ओळख असल्याचे प्रतिपादन केले. “आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो” ही भावना जपली तर समाजपरिवर्तन सहज शक्य होते, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पीसीएम पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष डॉ. आशिष तिवारी यांनी केले, तर आभार प्रदर्शन अतुल खरात यांनी मानले. उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी योगेश देशमुख, गणेश खराबे, आतिश राठोड, बाळासाहेब खराबे, राजकुमार कांगणे, रशीद पठाण, विजय राठोड, उस्मान पठाण, एकनाथ एंडइत, जिजाभाऊ गते, शेंडगेभाऊ आदींनी परिश्रम घेतले. फराळाची सात्विक व रुचकर तयारी आचारी कैलास पवार, हुकुमसिंग राजपुरोहित आणि प्रल्हाद नरवडे यांनी केली. महाशिवरात्रीच्या या पावन पर्वावर साकारलेली ही प्रसादवाटप केवळ अन्नवितरणाचा उपक्रम न ठरता समत्व, सेवा आणि श्रद्धेचा सजीव उत्सव ठरली. शिवनामाच्या अखंड गजरात आणि सेवाभावाच्या ऊर्जेतून प्रकटलेली ही शिवआराधना मंठा नगरीसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ ठरली—जिथे सेवा म्हणजेच साधना आणि दान म्हणजेच देवत्व, याची अनुभूती सर्वांना लाभली.1
- Post by Today One Live1
- जालना - आयशर व दुचाकीचा अपघात एकजण ठार एक गंभीर ! भरघाव आयशर दुचाकीला धडकला जालन्यात भीषण अपघाताची एक घटना समोर येत असून भारघव आयशर व दुचाकीचा अपघात होऊन एक तरुण जण ठार तर एक गंभीर झाल्याची घटना आज मंगळवारी 17 फेब्रुवारी रोजी घडलीय.1
- *शहीद संतोष जगदाळे यांच्या कन्येला पुणे महानगरपालिकेत शासकीय सेवा; डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पाठपुराव्याला यश* २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगम (जम्मू-काश्मीर) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेले शहीद संतोष जगदाळे यांच्या कुटुंबाला आज मोठा दिलासा मिळाला आहे. जगदाळे कुटुंबातील एकमेव कमावत्या व्यक्तीचे छत्र हरपल्याने निर्माण झालेल्या संकटाच्या काळात, त्यांच्या कन्या आसावरी जगदाळे यांना पुणे महानगरपालिकेत शासकीय सेवेत सामावून घेण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून, त्यांना नियुक्ती देण्याचे आदेश निर्गमित होत आहेत. शहीद संतोष जगदाळे यांच्या निधनानंतर जगदाळे कुटुंब उघड्यावर पडले होते. या घटनेची गांभीर्याने दखल घेत विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी २५ मे २०२५ रोजी जगदाळे कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली होती. कुटुंबाची हलाखीची परिस्थिती आणि व्यथा जाणून घेतल्यानंतर, डॉ. गोऱ्हे यांनी २७ मे २०२५ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांना पत्र लिहून आसावरी जगदाळे यांना विशेष बाब म्हणून शासकीय सेवेत सामावून घेण्याची विनंती केली होती. डॉ. गोऱ्हे यांच्या पत्राच्या अनुषंगाने १९ जून २०२५ रोजी नगरविकास विभागाने पुणे महानगरपालिकेला प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, या प्रक्रियेत अनेक तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्या होत्या. या अडचणींमुळे नियुक्ती लांबणीवर पडत असताना डॉ. गोऱ्हे यांनी खचून न जाता सातत्याने पाठपुरावा केला. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या वारंवार बैठका घेतल्या आणि सकारात्मक प्रस्ताव तयार करण्यासाठी प्रशासनावर दबाव निर्माण केला. सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री ना. श्री. एकनाथजी शिंदे यांनी या प्रकरणात संवेदनशीलतेने लक्ष घातले. तांत्रिक अडचणी असूनही एका शहीद कुटुंबाच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका त्यांनी घेतली. डॉ. गोऱ्हे यांच्या सततच्या पाठपुराव्याला आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या सकारात्मक निर्णयाला आज यश आले असून आसावरी यांना नोकरी प्राप्त होत आहे. "संतोष जगदाळे यांनी देशासाठी बलिदान दिले, त्यांचे जाणे ही न भरून निघणारी हानी आहे. त्यांच्या बलिदानाची परतफेड आपण करू शकत नाही, मात्र त्यांच्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडणे ही आपली संस्कृती नाही. आसावरीला नोकरी मिळवून देण्यासाठी तांत्रिक अडचणींमुळे थोडा विलंब झाला, त्याबद्दल आम्ही जगदाळे कुटुंबाच्या भावनेशी सहमत आहोत. मात्र, आज तिला नियुक्ती मिळत असल्याचा समाधान आहे. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, ते केवळ राज्याचे प्रमुख नसून खऱ्या अर्थाने 'लाडक्या बहिणीचे राखणदार' आहेत." या निर्णयामुळे जगदाळे कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभणार असून, एका वीरपुत्राच्या बलिदानाचा सन्मान शासनाकडून करण्यात आला आहे.1
- Post by Mohammad Rafikh1