Shuru
Apke Nagar Ki App…
वरवंड नगरीत खंडेरायाचा विवाह सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न; विजय सपकाळ यांनी ओढला मानाचा नंगर!
बुलढाणा माझा न्युज
वरवंड नगरीत खंडेरायाचा विवाह सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न; विजय सपकाळ यांनी ओढला मानाचा नंगर!
More news from Buldhana and nearby areas
- नांदुरा तालुक्यातील शेलगाव मुकुंद येथे सध्या तीव्र पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली असून, गावकऱ्यांना दैनंदिन जीवनात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. उपलब्ध माहितीनुसार, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अपुरा पडत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी नांदुरा पंचायत समिती कार्यालयात जाऊन आपल्या अडचणी प्रशासनासमोर मांडल्या. नागरिकांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पाण्याची परिस्थिती गंभीर बनत चालली असून, यावर लवकर तोडगा काढणे आवश्यक आहे. दरम्यान, प्रशासनाकडून या समस्येची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. जर परिस्थितीत सुधारणा झाली नाही, तर पुढील काळात आणखी आंदोलनात्मक पावले उचलली जाऊ शकतात, असा इशारा काही ग्रामस्थांनी दिला आहे.1
- चिखली - चिखली येथून च जवळ असलेल्या किन्होळा गावी आज दि .1 एप्रिल रोजी अंबिका माता या 1 दिवशीय यात्रेला दूरच्या गावावरून मोठे भाविक भक्त येतात. आज पहाटे पारंपारिक विधिवत पूजा करून मंगलमय प्रारंभ झाला आहे.. या सोहळ्यात यंदा भाविकांसाठी विशेष धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.. भक्ती शक्ती यांनी श्रद्धेचा त्रिवेणी. संगम असलेल्या किन्होळा गावात आज उत्साह ओसंडून गेला आहे. आईच्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला असून, भाविकांनी दर्शनासाठी रांगाच रांगा लागल्या होत्या. संस्थांच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते.. यामध्ये कार्यक्रम महापूजा, अभिषेक,आरती, भजनाचे कार्यक्रम, रंगले होते... भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून. संस्थांच्या वतीने चोक बंदोबस्त करण्यात आला ...शेगाव संस्थांचे सेवेकरी यांची विशेष मदत लाभली व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.... या ठिकाणी श्रद्धेचा महाकुंभ मेळा भरल्यासारखा वाटत होता...1
- Post by अब तक न्यूज महाराष्ट्र1
- किरकोळ वादातून रांजणगाव येथे टोळक्याकडून लाकडी बॅटने मारहाण; गुन्हा दाखल रांजणगाव (ता. पैठण) येथे किरकोळ वादातून एका व्यक्तीवर टोळक्याने लाकडी बॅटने हल्ला केल्याची घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.1
- पत्रकार रामेश्वर दरेकर साहेब यांच्यावरील कारवाई आणि त्याविरोधात 'ऑल इंडिया पँथर सेने'ने घेतलेली आक्रमक भूमिका हा विषय सध्या लोकशाहीतील 'चौथ्या स्तंभा'च्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरत आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी प्रश्नांची भीती वाटते का? एखाद्या पत्रकाराने शेतकऱ्यांच्या किंवा कष्टकऱ्यांच्या व्यथा मांडल्या तर ते 'गुन्हा' कसे ठरतात? सरकारला जनतेच्या प्रश्नांची उत्तरे देण्यापेक्षा प्रश्न विचारणाऱ्याचा आवाज दाबणे सोपे वाटते का? लोकशाही की हुकूमशाही? संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सन्मान करण्याऐवजी, कायद्याचा धाक दाखवून पत्रकारांना गप्प करणे ही अघोषित आणीबाणी नाही का? कारवाईचा निकष काय? ज्या वेगाने पत्रकारांवर गुन्हे दाखल होतात, त्याच वेगाने शेतकऱ्यांच्या आत्महत्या किंवा कष्टकऱ्यांचे शोषण थांबवण्यासाठी सरकार पावले का उचलत नाही? कारवाईचा रोख नेहमी सत्याच्या बाजूने उभे राहणाऱ्यांकडेच का असतो? दडपशाहीने प्रश्न सुटतील का? रामेश्वर दरेकर यांच्यासारख्या पत्रकाराला कायदेशीर कचाट्यात अडकवून तुम्ही प्रश्न संपवू पाहत आहात की ते अधिक प्रखर करू पाहत आहात? ही दडपशाही जनतेचा असंतोष वाढवणारी ठरणार नाही का? पोलिस प्रशासनाचा राजकीय वापर? सामान्यांचा आवाज उठवणाऱ्यांविरुद्ध पोलिस यंत्रणेचा वापर करणे हा सत्तेचा दुरुपयोग नाही का? ऑल इंडिया पँथर सेनेने उपस्थित केलेले प्रश्न हे केवळ एका संघटनेचे नसून संपूर्ण लोकशाही प्रेमी जनतेचे आहेत, त्याचे उत्तर सरकार कधी देणार? लोकशाहीत टीका सहन करण्याची क्षमता हा सत्तेचा दागिना असतो. जेव्हा लेखणीवर निर्बंध येतात, तेव्हा समाज अधोगतीकडे जातो. रामेश्वर दरेकर यांच्यावरील कारवाईचा निषेध करणे हा केवळ एका व्यक्तीचा बचाव नसून, तो 'बोलण्याच्या स्वातंत्र्याचा' बचाव आहे. या प्रकरणात सरकारने केवळ कारवाई मागे न घेता, पत्रकारांच्या संरक्षणासाठी असलेल्या कायद्याची कडक अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. 1
- समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ८ महिलांचा जागीच मृत्यू, ३ जखमी.. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली1
- विठाबाई नारायणगावकर तमाशा महिला कलावंताना जबर मारहाण.घारगाव पोलिस स्टेशनला कलावंत आक्रमक.1
- पक्षविरोधी कारवाई; काँग्रेसकडून जालन्यात 7 नगरसेवक निलंबित स्वीकृत सदस्य निवडणुकीत भाजप उमेदवाराला मतदान केल्याचा ठपका; पक्षाची कडक कारवाई1
- अशोक खरात के ऑफिस से मिला 20 फीट लंबा सांप, रिमोट से होता था कंट्रोल महाराष्ट्र के नासिक में खुद को 'गॉडमैन' बताने वाले अशोक खरात के मामले में चौंकाने वाला खुलासा हुआ है. उसके ऑफिस से 20 फीट लंबा रिमोट कंट्रोल से चलने वाला सांप बरामद किया गया है, जिसका इस्तेमाल वह लोगों को अपनी कथित अलौकिक शक्तियों का विश्वास दिलाने के लिए करता था. इस खुलासे के बाद मामले ने और गंभीर रूप ले लिया है. दुष्कर्म के आरोपों में घिरे अशोक खरात को कोर्ट ने 14 दिन की न्यायिक हिरासत में भेज दिया है. सत्र न्यायाधीश बी. एन. इचपुरानी की अदालत ने उसे 14 अप्रैल तक जेल में रखने का आदेश दिया है. फिलहाल उसे नासिक रोड सेंट्रल जेल में रखा जाएगा.1