हद्दपार केलेल्या तरुणाची माजलगावमध्ये गळफास घेऊन आत्महत्या; पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद हद्दपार केलेल्या तरुणाची माजलगावमध्ये गळफास घेऊन आत्महत्या; पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद अंबाजोगाई प्रतिनिधी बीड, जालना आणि परभणी जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलेल्या १९ वर्षीय अशोक वसंत मंदे या तरुणाने माजलगाव येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे पोलीस अधीक्षकांनी त्याला जिल्ह्याबाहेर राहण्याचे आदेश दिले होते, मात्र आदेशाचे उल्लंघन करून तो माजलगावमध्येच वास्तव्य करत होता. १३ एप्रिल रोजी दुपारी त्याने घरातील लोखंडी अँगलला ओढणीने गळफास लावून आपले जीवन संपवले. या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. माजलगाव पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूसह आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस कर्मचारी गणेश नांगरे यांच्या तक्रारीवरून पुढील तपास सुरू असून या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
हद्दपार केलेल्या तरुणाची माजलगावमध्ये गळफास घेऊन आत्महत्या; पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद हद्दपार केलेल्या तरुणाची माजलगावमध्ये गळफास घेऊन आत्महत्या; पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद अंबाजोगाई प्रतिनिधी बीड, जालना आणि परभणी जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलेल्या १९ वर्षीय अशोक वसंत मंदे या तरुणाने माजलगाव येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे पोलीस अधीक्षकांनी त्याला जिल्ह्याबाहेर राहण्याचे आदेश दिले होते, मात्र आदेशाचे उल्लंघन करून तो माजलगावमध्येच वास्तव्य करत होता. १३ एप्रिल रोजी दुपारी त्याने घरातील लोखंडी अँगलला ओढणीने गळफास लावून आपले जीवन संपवले. या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. माजलगाव पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूसह आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस कर्मचारी गणेश नांगरे यांच्या तक्रारीवरून पुढील तपास सुरू असून या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
- विशेष अधिवेशन घेऊन नारिशक्ती वंदन या अभियाना अंतर्गत घटना दुरुस्ती करणार असल्यामुळे देशाचे पंत प्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार -भारतीय जनता पार्टी प्रदेश उप अध्यक्षा अर्चना पाटील चाकूरकर1
- नारी शक्ती बिल होणार पारित, महाराष्ट्र उपाध्यक्षा डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांची पत्रकार परिषदेत माहिती1
- लातूर शहरात भीमजयंतीचा जल्लोष; मिरवणूक मार्गावर स्वागतासाठी भीम आर्मीच्या स्टेजवर मिरवणूक व मिरवणूक अध्यक्षाचे सन्मान चिन्ह देऊन केले स्वागत. सुरू ॲप इन मराठी न्यूज. बुधवार दिनांक 15 एप्रिल 2026. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मंगळवारी (दि. १४) शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. यासाठी संपूर्ण शहर निळ्या ध्वजांनी, शुभेच्छांच्या फलकांनी आणि आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाले होते. एका बाजूला आंबेडकर अनुयायांनी, भीम सैनिकांनी समतेचा संदेश देत लातूर शहरातून अनेक भागातून मिरवणुका काढण्यात आल्या या मिरवणुकांना शांततेचा संदेश देत भीम आर्मीचे रणधीर सुरवसे यांनी मिरवणुकीतील अध्यक्षांना स्टेजवर बोलावून त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी भीम आर्मीचे अध्यक्ष रणधीर सुरवसे यांनी बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले शिका संघर्ष करा परंतु आपला समाज संघटित झाला नाही तो झाला पाहिजे, संघटन करा असे समाजाला संदेश देत सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती भीम आर्मीने उत्साहात साजरी केली. याप्रसंगी भीम आर्मीचे सर्व पदाधिकारी व सदस्य भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
- 🙏 मी तुम्हाला एका खास उपक्रमासाठी आमंत्रित करत आहे… 🌍 आज जगात ताण, भीती आणि अस्थिरता वाढत आहे… पण एक सुंदर सत्य आहे - 👉 समाजातील फक्त 1% लोक जर नियमित ध्यान करू लागले, तर त्यांचा शांत आणि सकारात्मक प्रभाव हळूहळू संपूर्ण समाजात पसरतो 💫 🧘♂️14 दिवसांची विनामूल्य मेडिटेशन सिरीज 🗓 20 एप्रिलपासून ⏰ Batch Timings: 👉 7:00 AM | 11:00 AM | 7:00 PM ✨ प्राणायाम • ध्यान • सकारात्मक ऊर्जा आताच विनामूल्य नोंदणी करा आणि त्या 1% चा भाग बनन्यासाठी व्हॉटसअप करा 9422366147 🌿 शांत मनातूनच शांत जग निर्माण होतं 🌍1
- Post by बाळकृष्ण प्रकाश कदम4
- Post by Ramesh Mulgir1
- परभणी, दि. 15 (प्रतिनिधी) : खरीप 2025 हंगामात झालेल्या अतिवृष्टी, सततचा पाऊस व पुरामुळे जिल्ह्यातील सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, अपेक्षित पिकविमा मिळालेला नसल्याने शेतकऱ्यांना तातडीने विमा भरपाई देऊन न्याय द्यावा, अशी मागणी राजेश विटेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.निवेदनानुसार, जिल्ह्यात सुमारे 2 लाख 83 हजार हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन पिकाचा विमा काढण्यात आला होता. तरीही नुकसानीच्या तुलनेत केवळ सहा तालुक्यांसाठी सुमारे 45 कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे. परभणी, गंगाखेड व सोनपेठ तालुके वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे, तर इतर तालुक्यांनाही अत्यल्प भरपाई मिळत असल्याचे सांगण्यात आले.पीक कापणी प्रयोगानुसार सरासरी उत्पादन मोठ्या प्रमाणात घटल्याचे स्पष्ट होत असून, सुमारे 60 टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यानुसार विमा भरपाई मिळणे अपेक्षित असल्याचे नमूद करण्यात आले. उपग्रह छायाचित्रांवर आधारित निकष ‘ओला दुष्काळ’ परिस्थितीत लागू होत नसल्याचेही विटेकर यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील सुमारे 3.64 लाख शेतकऱ्यांनी विमा भरला असून, अपेक्षित रक्कम शेकडो कोटींमध्ये असताना केवळ 45 कोटी मंजूर झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासन व राज्य शासनाने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली.1
- Post by Sanjhsuyog News Channel1