वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट ग्रामीण मंडळातर्फे वेळा येथे 'कृषी माऊली सोहळा' मोठ्या उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडला. या सोहळ्याच्या प्रसंगी गरजू व विधवा महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना शेतीविषयक किटचे वाटप करून मोलाचा उपक्रम राबवण्यात आला. याच कार्यक्रमात कृषी सहाय्यक अधिकारी श्री. चौधरी सर यांनी उपस्थितांना माती परीक्षण आणि सेंद्रिय शेती या विषयावर मार्गदर्शन करत आधुनिक व शाश्वत शेतीविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली. हा उपक्रम भाजप प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रविंद्रजी चव्हाण, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष सौ. चित्राताई वाघ व जिल्हाध्यक्ष सौ. वैशालीताई येरावार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश महामंत्री तथा जिल्ह्याच्या प्रभारी सौ. मायाताई ननावरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. या वेळी जिल्हा उपाध्यक्ष सारिका ठोंबरे, जिल्हा महामंत्री श्रेया देशमुख, जिल्हा महामंत्री रवीला आखाडे, सहसंयोजक उमा पानवटकर, जिल्हा विधानसभा प्रमुख चित्राताई ठाकूर, हिंगणघाट ग्रामीण अध्यक्ष कीर्ती सायंकार, अलका लोणकर, ममता डुकरे, कांचन खाटिक, कविता धारणे, भारती महाकाळकर, भारती गोडे, वैशाली बालपांडे, सोनाली नौकरकार, मंगला कुमरे, सुनीता कामडी यांच्यासह पक्षाच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट ग्रामीण मंडळातर्फे वेळा येथे 'कृषी माऊली सोहळा' मोठ्या उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडला. या सोहळ्याच्या प्रसंगी गरजू व विधवा महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना शेतीविषयक किटचे वाटप करून मोलाचा उपक्रम राबवण्यात आला. याच कार्यक्रमात कृषी सहाय्यक अधिकारी श्री. चौधरी सर यांनी उपस्थितांना माती परीक्षण आणि सेंद्रिय शेती या विषयावर मार्गदर्शन करत आधुनिक व शाश्वत शेतीविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली. हा उपक्रम भाजप प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रविंद्रजी चव्हाण, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष सौ. चित्राताई वाघ व जिल्हाध्यक्ष सौ. वैशालीताई येरावार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश महामंत्री तथा जिल्ह्याच्या प्रभारी सौ. मायाताई ननावरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. या वेळी जिल्हा उपाध्यक्ष सारिका ठोंबरे, जिल्हा महामंत्री श्रेया देशमुख, जिल्हा महामंत्री रवीला आखाडे, सहसंयोजक उमा पानवटकर, जिल्हा विधानसभा प्रमुख चित्राताई ठाकूर, हिंगणघाट ग्रामीण अध्यक्ष कीर्ती सायंकार, अलका लोणकर, ममता डुकरे, कांचन खाटिक, कविता धारणे, भारती महाकाळकर, भारती गोडे, वैशाली बालपांडे, सोनाली नौकरकार, मंगला कुमरे, सुनीता कामडी यांच्यासह पक्षाच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
- वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट ग्रामीण मंडळातर्फे वेळा येथे 'कृषी माऊली सोहळा' मोठ्या उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडला. या सोहळ्याच्या प्रसंगी गरजू व विधवा महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना शेतीविषयक किटचे वाटप करून मोलाचा उपक्रम राबवण्यात आला. याच कार्यक्रमात कृषी सहाय्यक अधिकारी श्री. चौधरी सर यांनी उपस्थितांना माती परीक्षण आणि सेंद्रिय शेती या विषयावर मार्गदर्शन करत आधुनिक व शाश्वत शेतीविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली. हा उपक्रम भाजप प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रविंद्रजी चव्हाण, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष सौ. चित्राताई वाघ व जिल्हाध्यक्ष सौ. वैशालीताई येरावार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश महामंत्री तथा जिल्ह्याच्या प्रभारी सौ. मायाताई ननावरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. या वेळी जिल्हा उपाध्यक्ष सारिका ठोंबरे, जिल्हा महामंत्री श्रेया देशमुख, जिल्हा महामंत्री रवीला आखाडे, सहसंयोजक उमा पानवटकर, जिल्हा विधानसभा प्रमुख चित्राताई ठाकूर, हिंगणघाट ग्रामीण अध्यक्ष कीर्ती सायंकार, अलका लोणकर, ममता डुकरे, कांचन खाटिक, कविता धारणे, भारती महाकाळकर, भारती गोडे, वैशाली बालपांडे, सोनाली नौकरकार, मंगला कुमरे, सुनीता कामडी यांच्यासह पक्षाच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.1
- न्यूटेक्सी चॅनेलवर डॉ. मेहर अब्बास यांनी दिलेल्या माहितीनुसार, साखर आजाराच्या रुग्णांसाठी नवीन 'वीकली बेसल इन्सुलिन' हे इंजेक्शन मोठा दिलासा ठरत आहे. दररोज दिल्या जाणाऱ्या बेसल इन्सुलिनच्या तुलनेत या नवीन औषधामुळे रुग्णांना वारंवार टोचून घ्यावे लागत नाही आणि रक्तातील साखरेवर अधिक चांगले नियंत्रण मिळवता येते. तसेच हे औषध दररोजच्या इन्सुलिनच्या तुलनेत स्वस्त देखील आहे. हे वीकली इन्सुलिन केवळ टाईप १ आणि टाईप २ च्या मधुमेही रुग्णांसाठीच मंजूर करण्यात आले असून प्री-डायबेटिक रुग्णांसाठी याला मंजुरी मिळालेली नाही. या औषधाचा एकमेव दुष्परिणाम हायपोग्लायसेमिया हा सांगण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती आणि सल्ल्यासाठी +91 9125734374 या क्रमांकावर कॉल किंवा व्हॉट्सॲपद्वारे संपर्क साधता येऊ शकतो.1
- गडचिरोली येथील एक दाम्पत्य आपल्या तीन वर्षांच्या चिमुकलीसह दिल्लीतील आंदोलनात दाखल झाले आहे. गडचिरोलीहून थेट दिल्ली गाठून हे दाम्पत्य आपल्या तीन वर्षांच्या लहान मुलीला सोबत घेऊन या आंदोलनात सहभागी झाले आहे.1
- पर्यावरणाच्या संवर्धनाची जाणीव समाजात रुजविण्याच्या उद्देशाने अलिबाग येथील F80 फिटनेस स्टुडिओच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे. २४ जुलै रोजी शुक्रवारी बेलकडे येथे या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.1
- शेतकऱ्यांच्या शेतरस्त्यांच्या वादावर एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाअंतर्गत मामलेदार न्यायालयाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आली आहे.1
- अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण (अ, ब, क, ड) प्रभावीपणे लागू करून मातंग समाजाला न्याय मिळावा, या प्रमुख मागण्यांसाठी अमरावती येथे सकल मातंग समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला विराट ‘आक्रोश क्रांती मोर्चा’ मोठ्या उत्साहात आणि शांततेत पार पडला. शुक्रवार, २४ जुलै २०२६ रोजी राजकमल चौक येथून मोर्चास प्रारंभ होऊन तो जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला, जिथे शासनाच्या प्रतिनिधींना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. या मोर्चात विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण भागांतून मोठ्या संख्येने समाजबांधव, पदाधिकारी, युवक, महिला, विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ते वाहनांच्या ताफ्यासह अमरावतीत दाखल झाले होते. मोर्चादरम्यान समाजाच्या घटनात्मक हक्कांसाठी घोषणाबाजी करण्यात आली तसेच आरक्षण उपवर्गीकरण तात्काळ लागू करण्याची मागणी करण्यात आली. यामध्ये अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण (अ, ब, क, ड) लागू करणे, मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने निर्णय घेणे, समाजाला समान प्रतिनिधित्व व घटनात्मक हक्कांची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक विकासासाठी विशेष योजना राबविण्याची मागणी समाविष्ट आहे. मोर्चा शांततेत पार पडल्याबद्दल आयोजकांनी सर्व सहभागींचे आभार मानले असून, समाजाच्या न्याय्य मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.1
- हिंगणघाट पोलिसांनी दारूबंदी कायद्यान्वये कारवाई करत विदेशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत १ लाख २१ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. २४ जुलै रोजी हिंगणघाट पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे ही धडक कारवाई करण्यात आली. मौजा जाम येथून हिंगणघाटकडे ब्रह्मा पाटील (रा. चाकूर, ता. समुद्रपूर) हा MH-40-DK-8157 क्रमांकाच्या टीव्हीएस ज्युपिटर मोपेडवर विदेशी दारूची वाहतूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून एनएच-४४ सर्व्हिस रोडवरील रायडग हॉटेलजवळ दोन पंचांसमक्ष सापळा रचण्यात आला. संशयिताला थांबवून वाहनाची तपासणी केली असता, मोपेडच्या पुढील चुंगडीत व डिकीत रॉयल स्टॅग कंपनीच्या १८० मिलीच्या ३० निपा (₹१२,०००), ओ.सी.डब्ल्यू. कंपनीच्या ३० निपा (₹१०,५००), ऑल सीझन कंपनीच्या १५ निपा (₹५,७५०) आणि कासबर्ग कंपनीचे ८ बिअर टिन (₹३,२००) आढळून आले. या दारूसाठ्यासह ₹९०,००० किमतीची मोपेडही जप्त करण्यात आली. याप्रकरणी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये हिंगणघाट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक अनिल राऊत यांच्या निर्देशानुसार पोलीस हवालदार प्रविण बोधाने, स्वप्नील जिवने, जगदीश चव्हाण आणि पोलीस अंमलदार सागर समृतवार व अमोल गीते यांनी पार पाडली.1
- Post by Tojibur1