Shuru
Apke Nagar Ki App…
Accident News | दोन दुचाकींची समोरासमोर धडक ; दोघांचा मृत्यू , रावेर तालुक्यातील घटना ! रावेर तालुक्यातील बुऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावरील रावेर शहराजवळील बिजासन माता मंदिराजवळ दोन मोटरसायकल समोरासमोर धडकल्याने मोठा अपघात झाला या अपघातात दोघे युवक मृत्युमुखी पडले असून यात एक गंभीर जखमी आहे या दुर्दैवी घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे ! #latestnews #maharashtranews #marathinews #ravernews #breakingnews #accident #hindinews #accidentnews
Ravi Mahajan
Accident News | दोन दुचाकींची समोरासमोर धडक ; दोघांचा मृत्यू , रावेर तालुक्यातील घटना ! रावेर तालुक्यातील बुऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावरील रावेर शहराजवळील बिजासन माता मंदिराजवळ दोन मोटरसायकल समोरासमोर धडकल्याने मोठा अपघात झाला या अपघातात दोघे युवक मृत्युमुखी पडले असून यात एक गंभीर जखमी आहे या दुर्दैवी घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे ! #latestnews #maharashtranews #marathinews #ravernews #breakingnews #accident #hindinews #accidentnews
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Accident News | दोन दुचाकींची समोरासमोर धडक ; दोघांचा मृत्यू , रावेर तालुक्यातील घटना ! रावेर तालुक्यातील बुऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावरील रावेर शहराजवळील बिजासन माता मंदिराजवळ दोन मोटरसायकल समोरासमोर धडकल्याने मोठा अपघात झाला या अपघातात दोघे युवक मृत्युमुखी पडले असून यात एक गंभीर जखमी आहे या दुर्दैवी घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे ! #latestnews #maharashtranews #marathinews #ravernews #breakingnews #accident #hindinews #accidentnews1
- खामगाव: शहरातील महत्त्वाचा मार्ग असलेल्या जगदंबा चौक ते शहर पोलीस स्टेशन दरम्यानच्या रस्त्यावरील खड्ड्यांनी आता नवे संकट उभे केले आहे. प्रशासनाने हे खड्डे बुजवण्यासाठी चक्क मातीमिश्रित मुरमाचा वापर केल्यामुळे संपूर्ण परिसरात धुळीचे लोट उसळत आहेत. यामुळे स्थानिक व्यापारी आणि नागरिक प्रचंड त्रस्त झाले असून, आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.धुळीमुळे व्यवसायावर परिणाम आणि आरोग्याचा धोका जगदंबा चौक हा परिसरातील गजबजलेला भाग आहे. येथे अनेक दुकाने आणि प्रतिष्ठाने आहेत. मात्र, खड्ड्यात टाकलेल्या मातीमुळे वाहने जाताच प्रचंड धूळ उडते. ही धूळ थेट दुकानांमध्ये शिरत असल्याने मालाचे नुकसान होत आहे. तसेच, दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांना डोळ्यांचे आणि श्वसनाचे त्रास जाणवू लागले आहेत. नागरिकांनी प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला आहे. "एकीकडे नगरपालिकेकडून कराची वाढीव आणि सक्तीने वसुली केली जाते, मात्र त्या बदल्यात किमान धूळमुक्त रस्तेही दिले जात नाहीत," अशी भावना नागरिकांमध्ये आहे. हवाच्या सव्वा कर भरूनही मूलभूत सुविधांसाठी नागरिकांना मागणी करावी लागत आहे, ही मोठी शोकांतिका आहे.धुळीचा हा त्रास कमी करण्यासाठी प्रशासनाने तात्काळ पावले उचलण्याची गरज आहे. जोपर्यंत रस्त्याचे डांबरीकरण किंवा कायमस्वरूपी दुरुस्ती होत नाही,सकाळी आणि संध्याकाळी रस्त्यावर पाणी फवारणी करण्यात यावी,मातीऐवजी दर्जेदार खडीचा वापर करून रस्ता दुरुस्त करावा,प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास येणाऱ्या काळात नागरिक आंदोलनाचे हत्यार उपसण्याची शक्यता नाकारता येत नाही.3
- "उबाळखेड ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराचा संशय; ग्रामसभेला सरपंच-ग्रामसेवकांची दांडी, ग्रामस्थांचे थेट जिल्हा परिषदेत धाव !"1
- बुलडाणा: वाचा आजचा पीपल्स न्यूज Digital Media Additions ५,१,२०२६1
- नक्की. तुमचा मुद्दा ठेवत भाषा थोडी अधिक धारदार, स्पष्ट आणि जनआवाहनात्मक अशी सुधारित मांडणी देतो 👇 सुधारित आवाहन (प्रचारासाठी योग्य) खामगांव शहरातील नागरिकांनो, खामगांव नगर परिषदेच्या वतीने मालमत्ता करामध्ये अव्वाच्या सव्वा वाढ करण्यात आलेली आहे. ही अन्यायकारक व जुलमी वाढ सर्वसामान्य नागरिकांवर मोठा आर्थिक भार टाकणारी आहे. ही मालमत्ता कर वाढ रद्द व्हावी किंवा किमान कमी व्हावी, यासाठी खामगांव नगर परिषद हद्दीतील प्रत्येक मालमत्ता धारकाने वैयक्तिकरित्या हरकत अर्ज सादर करून या अन्यायकारक निर्णयाचा ठाम विरोध करावा, असे आवाहन खामगांव शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात येत आहे.1
- भोकरदन :सिरसगाव मंडप येथील कोल्हापूरी बंधाऱ्याचे रात्रीला दरवाजे उघडले. काही लिटर पाणी गेले वाया वाळू माफियांनी हद्दच ओलांडली शेतकऱ्यांनी केली कारवाईची मागणी1
- जालना शहरात गुन्हेगारीला लगाम लागणार; पोलिसांच्या ताफ्यात १० बिट मार्शल दुचाकी अन् २ दंगल नियंत्रण वाहने दाखल! प्रतिनिधी: गौतम हिवराळे जालना महानगरपालिका क्षेत्रात मागील काही महिन्यांपासून खून, लूटमार, चोरी आणि घरफोड्यांसारख्या गुन्ह्यांच्या आलेखात मोठी वाढ झाली आहे. या वाढत्या गुन्हेगारीमुळे शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर, शहरात गस्त वाढवण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी जालना पोलीस दलाच्या ताफ्यात नवीन वाहने दाखल झाली आहेत. छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक (IG) वीरेंद्र मिश्र आणि जालन्याचे पोलीस अधीक्षक (SP) अजयकुमार बन्सल यांच्या प्रमुख उपस्थितीत या वाहनांचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. गस्त होणार हायटेक; गुन्हेगारांवर राहणार वॉच शहरातील अरुंद गल्ल्या आणि संवेदनशील भागात तातडीने पोहोचण्यासाठी पोलीस दलाला १० नवीन बिट मार्शल दुचाकी देण्यात आल्या आहेत. यामुळे पोलिसांची गस्त वाढणार असून, कोणत्याही गुन्ह्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी वेगाने पोहोचू शकतील. तसेच, शहरात अचानक उद्भवणाऱ्या अनुचित प्रकारांना आणि दंगलीसारख्या परिस्थितीला हाताळण्यासाठी २ अत्याधुनिक दंगल नियंत्रण वाहने देखील ताफ्यात समाविष्ट करण्यात आली आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी आयजी वीरेंद्र मिश्र यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. गुन्हेगारांवर कडक जरब बसवण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. या कार्यक्रमाला अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि विविध पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते. नागरिकांना दिलासा मिळणार? वाढत्या घरफोड्या आणि चोऱ्यांमुळे त्रस्त असलेल्या जालनाकरांना या नवीन सुविधेमुळे मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पोलिसांची वाढलेली गस्त आणि अद्ययावत वाहनांमुळे गुन्हेगारांच्या हालचालींवर मर्यादा येतील, असा विश्वास पोलीस प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. 1
- खामगाव: संघ शताब्दी वर्षानिमित्त आयोजित सकल हिंदू समाजाच्या वतीने विश्वकर्मा वस्ती, सुटाळा बु. येथे हिंदू समाजातील एकता, सनातन धर्म-संस्कृतीचे संवर्धन आणि हिंदू जागृतीस चालना देण्यासाठी विराट हिंदू संमेलन कन्या शाळेजवळच्या मैदानात पार पडले. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते स्वप्नील राऊत (बुलढाणा विभाग प्रचारक) तसेच ह.भ.प.संतोष महाराज मनसुटे (रोहणा), आरती सुनील मुळे, खामगाव यांची उपस्थित होती. सुरुवातीला गोमाता पूजन व भारतमाता आणि छत्रपती शिवाजी महाराज तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ते स्वप्नील राऊत यांनी आपल्या भाषणात सांगितले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हे शताब्दी वर्ष असून या निमित्ताने खामगाव शहरात व्यापक गृहसंपर्क अभियान तसेच हिंदू संमेलन असे दोन महत्त्वाचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. संघाच्या माध्यमातून समाजात पंचपरिवर्तन या संकल्पनेद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. यामध्ये सामाजिक समरसता, पर्यावरण संरक्षण, कुटुंब प्रबोधन, स्व-आधारित जीवनशैली आणि नागरिक कर्तव्ये या पाच मूल्यांचा समाजाने अंगीकार करून त्यानुसार आचरण करणे आजच्या काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यानंतर शिवव्याख्याते ह.भ.प. संतोष महाराज मनसुटे यांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी १८ पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्याची निर्मिती केली. त्याचप्रमाणे आजच्या काळात जातीभेद नष्ट करून सर्वांनी हिंदू म्हणून एकत्र येणे हि काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी आरती मुळे यांनी नारी शक्ती जागरण या विषयावर नागरिकांना मार्गदर्शन केले. या संमेलनात परिसरातील सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींचे सत्कार करण्यात आले. विध्यार्त्यानी माँ जिजाऊ वंदना, ऑपरेशन सिंदूर नाटिका, तसेच मोबाईलचे वाढते व्यसन या विषयावर पथनाट्य सादर केले. कार्यक्रमाचे संचालन श्वेता अनासने तर आभार हर्षल देवकर यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता भारत मातेची सामूहिक आरतीने करण्यात आली.2