Shuru
Apke Nagar Ki App…
Nandkumar Motiram Totewad
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- उष्णतेची लाट… आणि वानरांचा दिलासा देणारा संदेश! हिमायतनगरमध्ये तापमान 44-45°C पर्यंत पोहोचलंय माणसांसोबतच प्राणीही उष्णतेने हैराण झाले आहेत. श्री परमेश्वर मंदिर परिसरात वानरांचा एक गट लिंबाच्या झाडाखाली शांतपणे विसावा घेताना दिसला जणू तेच सांगत आहेत — “बाहेर ऊन खूप आहे… सावलीतच आराम करा!” हे सुंदर दृश्य रामभाऊ सूर्यवंशी यांनी टिपले असून सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संदेश स्पष्ट आहे: स्वतःची काळजी घ्या, भरपूर पाणी प्या आणि दुपारच्या उन्हापासून दूर रहा! #हिमायतनगर #HeatWave #SummerAlert #StaySafe #NatureMessage ViralPost MonkeyLife SaveYourself Climate NNLDigitalMedia1
- Post by Today One Live1
- नांदेड शहरात अनेक ठिकाणी अतिक्रमण करणाऱ्या विरोधात महानगरपालिका तथा पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमानाने नांदेड शहरांमधील अतिक्रमण हटवण्याचे काम प्रगतीपथावर अवैद्यरीत्या अतिक्रमण करणाऱ्या व्यापारी तथा नागरिकांच्या विरोधात प्रशासन ॲक्शन मोडवर अतिक्रमण केलेल्या सर्व ठिकाणी अतिक्रमण जेसीबीच्या साह्याने तोडून काढण्यात आले, रस्त्यावर अवैद्यरित्या टपऱ्या व इतर दुकाने मांडून ठेवलेल्या त्या सुद्धा मोठ्या प्रमाणात अतिक्रमण कारवाई मध्ये जाण्यात आले, अतिक्रमण कराल तर कठोर कारवाई होईल अशा सज्जन इशारासह प्रशासनाने अतिक्रमण करणाऱ्यांना ठणकावून चांगले आहे, परंतु सरकारी जमिनीवर कब्जा करणाऱ्या विरोधात सुद्धा मोठ्या प्रमाणात कठोर कारवाई कधी करणार.? असा देखील सवाल सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे. शहरात अनेक टीका सरकारी जागेवर कब्जा करून बसणारे काही गुंड प्रवृत्तीचे प्रकार राजकीय पदाधिकारी व इतर समाजाचा ठेका देणारे लोक यांनी मोठ्या प्रमाणात सरकारी जमिनीवर कब्जा केलेला आहे. प्रताप सरकारी जमीन बिल्डरांच्या घशात घालून मोठ्या प्रमाणात कोट्यावधी रुपये यांचा आर्थिक व्यवहार सुद्धा करण्यात आला आहे. यांच्या विरोधात स्थानिक प्रशासन कारवाई करणार का हे सुद्धा अतिशय गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. ? स्थानिक प्रशासनाचे अर्धवट सोडलेले काम देखील सध्या चर्चेत आलेले असून रखडलेले रस्ते रखडलेले ड्रेनेजलाइन पाण्याच्या लाईन नाल्या ,अस्वच्छता, कचऱ्याने तुडुंब भरलेल्या नाल्या सुद्धा आतापर्यंत नालेसफाई करण्यात आलेली नाही मागील प्रशासकीय कार्यकाळात सुद्धा कुठल्याही प्रकारे नालेसफाई करण्यात आलेली नाही आजही तेच हाल असून नालेसफाई कधी करणार एखादा महापौर येण्याची वाट बघत आहे का प्रशासन असे देखील सवाल मोठ्या प्रमाणात निर्माण झालेले आहे, 300 कोटी रुपयाच्या जवळपास वार्षिक खर्च करून देखील स्वच्छता ही होत नसताना देखील बघण्यास मिळत नाही. यावर प्रशासन लक्ष देईल का. सोमेश कॉलनी, कला मंदिर, एसपी ऑफिसच्या पाठचा रस्ता, कैकाडी गल्ली, गुजराती हायस्कूल परिसर, गोवर्धन घाट मधील परिसर, आता इतर ठिकाणी ड्रेनेज चेंबर रस्त्याच्या वर आणि रस्ता खाली अशी अवस्था आज रस्त्याची झालेली आहे मग वाहनधारक वाहन चालवणार कशी.....? अशा प्रकारे बोगस निष्कृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरवर कठोर दंडात्मक कारवाई होईल का शासन करणार का असा देखील सवाल सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झालेला आहे. अवैधरित्या जड वाहतूक शहरी भागामध्ये बिनधास्तपणे क्षमतेपेक्षा जास्त मालवाहतूक करून फिरत आहे. या हायवा टिप्पर गाड्यांमुळे अनेक निरपराध नागरिकांना आपला जीव गमावा लागला आहे. या निरापराधाच्या नुकसान भरपाई शासन कधी करणार. आणि जड वाहतूक बंद असताना वाहतूक करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई कधी करणार. याकडे नांदेडकरांचे लक्ष आहे.! अनेक समस्यांना वाचा फोडणारा युवा राज्य न्यूज चैनल. वेळोवेळी सर्वसामान्य नागरिकांच्या आवाज म्हणून उभा आहे4
- सर्व शक्तीपीठग्रस्त शेतकरी बांधवांना विनंती आपल्या हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री श्री नरहरी झिरवाळ हे जिल्हा दौऱ्यावर येत असून आपल्याला सर्व शेतकरी बांधवांना 1 मे रोजी त्यांना शक्तीपीठ रद्द करा या मागणीचे निवेदन द्यायचे आहे. त्याप्रमाणे नियोजन करावे व जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी हिंगोली शासकीय विश्रामगृहावर सकाळी 9 वाजता अगदी वेळेवर उपस्थित राहावे.1
- 💥 *बड़ी खबर*💥 *बाइक और तेंदुए की भीषण टक्कर, चलती बाइक के चेन-स्पॉकेट में फंसा तेंदुआ, दहाड़ से मचा हड़कंप।* उत्तराखंड के नैनीताल के भीमताल में चलती बाइक से टकराया तेंदुआ। सड़क पार करते समय एक चलती बाइक से टकरा गया और उसके चेन-स्पॉकेट में फंस गया. प्रत्यक्षदर्शियों के अनुसार, तेंदुआ अचानक झाड़ियों से निकलकर सड़क पार कर रहा था, तभी वह एक तेज रफ्तार बाइक से टकरा गया। टक्कर इतनी जबरदस्त थी कि बाइक सवार दंपति गिर गए और तेंदुए का पैर बाइक की चेन और पिछले हिस्से में बुरी तरह फंस गया. घायल होने के कारण तेंदुआ आक्रामक हो गया और जोर-जोर से दहाड़ने लगा, जिससे वहां मौजूद राहगीरों में भगदड़ मच गई।1
- शेवटी फाट्याजवळ ट्रक चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटून चालक जागीच ठार दि 29/4/26 प्राप्त माहितीनुसार सकाळी दीडच्या सुमारास जालना वरून कारंजा कडे येत असताना शेवटी फाट्याजवळ सदर ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक रोडच्या कडेला पलटी होऊन ट्रक चालक ट्रक खाली दाबून जागीच ठार झाला अपघाताची माहिती महाराष्ट्र पोलीस दीपक ढोबळे यांनी तात्काळ श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांना दिली त्यांनी तात्काळ कारंजा ॲम्बुलन्स चे शुभम खोड हे तात्काळ घटनास्थळी जाऊन ट्रक खाली दबून असलेल्या ट्रक चालकाला क्रेनच्या साह्याने बाहेर काढून चालकाला उपजिल्हा रुग्णालयाचे येथे आणले येथील वैद्यकीय अधिकारी त्यांना मृत घोषित केले त्यांचे नाव सुनील विष्णू पवार वय 48 रा सोनोशी तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा त्यावेळी मदतीसाठी कक्षा सेवक अमर सोनोने व कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी हे प्रामुख्याने घटनास्थळी उपस्थित होते. पुढील तपास कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशन करीत आहे. नेहमी आपल्या सेवेत श्री गुरु मंदिर रुग्णवाहिका सेवा रुग्णसेवक रमेश देशमुख3
- शिवकुमार काळे सविस्तर वृत्त दिनांक २९ एप्रिल नांदेड: इतिहासाचा वारसा जपणारा नांदेड येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ला सध्या प्रशासकीय उदासीनता आणि स्थानिक लोकांच्या अतिक्रमणामुळे शेवटच्या घटका मोजत आहे. पुरातत्व विभाग आणि स्थानिक प्रशासनाचे या ऐतिहासिक वास्तूकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने, हा किल्ला आता केवळ अस्वच्छता आणि अवैध प्रकारांचा अड्डा बनला असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. गटारगंगेच्या विळख्यात किल्ला पाण्याच्या मध्यभागी असलेल्या या किल्ल्याचे सौंदर्य एकेकाळी पर्यटकांचे आकर्षण होते. मात्र, आता परिस्थिती उलट झाली आहे. स्थानिक रहिवाशांनी किल्ल्याच्या भोवतालच्या परिसरात चक्क गटारीचे आणि नाल्याचे पाणी सोडले आहे. यामुळे किल्ल्याच्या तटबंदीला धोका निर्माण झाला असून परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. स्वच्छतेचा अभाव आणि साचलेले सांडपाणी यामुळे ऐतिहासिक वास्तूची विटंबना होत आहे. अवैध कब्जे आणि सुरक्षेचा अभाव किल्ल्याच्या आत आणि आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध रित्या ताबा मिळवण्याचे कटकारस्थान सुरू असल्याचे दिसून येत आहे. किल्ल्यात कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था उपलब्ध नाही. सुरक्षा रक्षकांच्या अभावामुळे या ठिकाणी 'तवाळगिरी' करणाऱ्या युवकांचा वावर वाढला असून, पर्यटकांना दमदाटी करणे आणि त्यांच्याशी उद्धटपणे बोलण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. कर्मचाऱ्यांची मनमानी आणि माहिती फलकांची दुरवस्था मिळालेल्या माहितीनुसार, या ठिकाणी नियुक्त असलेल्या कर्मचाऱ्यांकडून मनमानी कारभार सुरू आहे. ऐतिहासिक वस्तूंची जोपासना करण्याऐवजी त्यांची विटंबना केली जात आहे. किल्ल्याची माहिती देणारे फलक आणि महत्त्वाच्या ऐतिहासिक खुणा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. पर्यटकांसाठी कोणत्याही मूलभूत सुविधा येथे उपलब्ध नाहीत. संवर्धनाची गरज: प्रशासन कधी जागे होणार? नांदेडच्या वैभवात भर टाकणारा हा भुईकोट किल्ला आता पूर्णपणे ढासळण्याच्या स्थितीत आहे. पुरातत्व विभागाने याकडे त्वरित लक्ष देऊन अवैध बांधकामे हटवावीत आणि किल्ल्याच्या संवर्धनासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी इतिहासप्रेमींकडून केली जात आहे. स्थानिक प्रशासन आणि पुरातत्व विभाग या सर्व प्रकारावर काय भूमिका घेणार आणि या ऐतिहासिक वारशाचे जतन करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर वेळीच पावले उचलली नाहीत, तर नांदेडचा हा ऐतिहासिक वारसा कायमचा नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.3