पाण्याअभावी कृषी चिकित्सालय रोपवाटिका धोक्यात, रामगड येथील रोपवाटिका पाण्याअभावी कृषी चिकित्सालय रोपवाटिका धोक्यात कुरखेडा. कुरखेडा तालुक्यातील रामगड (पुराडा) येथील कृषी चिकित्सालय रोपवाटिका सध्या पाण्याअभावी आणि मोकाट गुरांच्या त्रासामुळे संकटात सापडली आहे. लाखो रुपयांचा खर्च करून तयार करण्यात आलेल्या रोपवाटिकेकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. रोपवाटिकेत विविध प्रकारची वनस्पती व फळझाडांची रोपे तयार करण्यात आली आहेत. मात्र उन्हाळ्याच्या तीव्र झळा, नियमित पाणीपुरवठ्याचा अभाव आणि संरक्षणासाठी योग्य कुंपण नसल्याने अनेक रोपे सुकण्याच्या मार्गावर आहेत. मोकाट गुरे रोपवाटिकेत शिरून रोपांचे नुकसान करत असल्याचेही नागरिकांनी सांगितले. रोपवाटिकेच्या परिसरातील फलक गंजलेल्या अवस्थेत असून देखभालीअभावी संपूर्ण परिसर ओसाड दिसत आहे. शासनाच्या महत्त्वाकांक्षी वृक्षलागवड व पर्यावरण संवर्धन उपक्रमाला यामुळे फटका बसत असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे. स्थानिक नागरिकांनी संबंधित कृषी विभागाने तातडीने लक्ष देऊन पाणीपुरवठा, संरक्षक कुंपण व नियमित देखभालीची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकानी केली आहे.
पाण्याअभावी कृषी चिकित्सालय रोपवाटिका धोक्यात, रामगड येथील रोपवाटिका पाण्याअभावी कृषी चिकित्सालय रोपवाटिका धोक्यात कुरखेडा. कुरखेडा तालुक्यातील रामगड (पुराडा) येथील कृषी चिकित्सालय रोपवाटिका सध्या पाण्याअभावी आणि मोकाट गुरांच्या त्रासामुळे संकटात सापडली आहे. लाखो रुपयांचा खर्च
करून तयार करण्यात आलेल्या रोपवाटिकेकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. रोपवाटिकेत विविध प्रकारची वनस्पती व फळझाडांची रोपे तयार करण्यात आली आहेत. मात्र उन्हाळ्याच्या तीव्र झळा, नियमित पाणीपुरवठ्याचा अभाव आणि संरक्षणासाठी
योग्य कुंपण नसल्याने अनेक रोपे सुकण्याच्या मार्गावर आहेत. मोकाट गुरे रोपवाटिकेत शिरून रोपांचे नुकसान करत असल्याचेही नागरिकांनी सांगितले. रोपवाटिकेच्या परिसरातील फलक गंजलेल्या अवस्थेत असून देखभालीअभावी संपूर्ण परिसर ओसाड दिसत आहे. शासनाच्या महत्त्वाकांक्षी वृक्षलागवड व
पर्यावरण संवर्धन उपक्रमाला यामुळे फटका बसत असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे. स्थानिक नागरिकांनी संबंधित कृषी विभागाने तातडीने लक्ष देऊन पाणीपुरवठा, संरक्षक कुंपण व नियमित देखभालीची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकानी केली आहे.
- काळी दौलत येथुन ९ जनावरे चोरी, नागरीकांमध्ये खळबळ, पोलीस प्रशासन आरोपींच्या शोधात काळी दौलत येथुन ९ जनावरे चोरी काळी दौलत परिसरात अज्ञात चोरट्यांनी जनावरे चोरी केल्याची घटना उघडकीस आली असून गावात खळबळ उडाली आहे. फिर्यादी संतोष पुंड यांनी दिलेल्या जबानी रिपोर्टनुसार दिनांक १० मे २०२६ रोजी रात्री घरासमोर खुट्याला बांधून ठेवलेली पांढऱ्या रंगाची गाय सकाळी आढळून आली नाही. शोध घेतल्यानंतर गावातील इतर नागरिकांचीही जनावरे चोरीला गेल्याचे समोर आले. यामध्ये मिर्झा तहा बेग यांची एक गाय, आदित्य डवरे यांची एक गाय, विपूल मिरासे यांची गाय तसेच इतर तीन जनावरे आणि फिर्यादीची गाय अशा एकूण सुमारे १ लाख ५ हजार रुपयांची जनावरे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची माहिती समोर आली.तसेच दोन दिवसांपूर्वी नागेंद्र मोरे व निखील गायकवाड यांच्या गायी व गोऱ्हा चोरीला गेल्याचीही बाब समोर आली असून त्यांची किंमत सुमारे ४२ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. अशाप्रकारे परिसरातील एकूण १ लाख ४७ हजार रुपयांची जनावरे चोरीला गेल्याने शेतकरी व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.1
- गोंदिया जिल्ह्याच्या सडक-अर्जुनी तालुक्यात आलेल्या वादळी वाऱ्यामुळे एका राईस मिलमधील लाकडं थेट गावात फेकली गेली. यामुळे नागरिकांच्या जीविताला आणि घरांना मोठा धोका निर्माण झाला असून, परिसरात भीतीचे वातावरण आहे.1
- भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे डीजे आणि फटाक्यांविना एक आगळावेगळा भक्तिमय विवाह सोहळा संपन्न झाला. प्रसिद्ध कीर्तनकार पौर्णिमा इटनकर यांचा सौरभ चांदेवार यांच्याशी हरिनामाच्या गजरात विवाह विठ्ठल-रुक्मिणीच्या साक्षीने पार पडला. या संस्कारमय सोहळ्याने समाजात एक नवा आदर्श घालून दिला आहे.2
- मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत भिवापूर पंचायत समितीचे एक पथक बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा पंचायत समितीमधील ग्रामपंचायतींचे मूल्यांकन करण्यासाठी रवाना झाले आहे. गटविकास अधिकारी डॉ. चेतन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक मूल्यांकनाचे महत्त्वाचे काम करणार आहे.1
- नागपूर जिल्ह्यातील उमरेड उप-जिल्ह्यात नाल्यांची नियमित साफसफाई न झाल्याने कचरा साचून दुर्गंधी पसरली आहे. यामुळे डासांची वाढ होऊन साथीच्या रोगांचा धोका निर्माण झाला आहे. वारंवार तक्रारी करूनही परिस्थिती सुधारली नसल्याने स्थानिकांनी तात्काळ उपाययोजनांची मागणी केली आहे.1
- मोदी जी ने कल देश को उपदेश नहीं, अपनी नाकामी के सबूत दिए।मोदी जी ने कल देश को उपदेश नहीं, अपनी नाकामी के सबूत दिए। मोदी जी ने कल देश को उपदेश नहीं, अपनी नाकामी के सबूत दिए।1
- *Breaking News...* नागपुर. (New Ring Road) *खडगाव* बायपास रोडवर भीषण अपघात.1
- उमरेडमध्ये सर्व समाज सेवा समितीने भीषण उष्णतेत पक्ष्यांसाठी 'पक्षी पाणपोई अभियान' सुरू केले आहे. या मोहिमेत पक्ष्यांसाठी पाणी आणि दाण्याची व्यवस्था करून जीवदया आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला जात आहे.1