महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकात कोणतीही व्यावसायिक वाढ होणार नाही नगरसेवक शारंगधर देशमुख व ॠतुराज क्षीरसागर यांची कोल्हापूर चेंबरच्या शिष्टमंडळाला ग्वाही कोल्हापूर दि. १३: सिटी न्यूज नेटवर्क कोल्हापूर महानगरपालिकेचे सन २०२६-२७ चे बजेट (अंदाजपत्रक) लवकरच सादर होत असून सदर अंदाजपत्रकात कोणत्याही प्रकारची दरवाढ करु नये असे निवेदन कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या शिष्टमंडळाने आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांना दिले. नगरसेवक शारंगधर देशमुख व ॠतुराज क्षीरसागर यांनी बैठक घडवून आणली. यावेळी बोलताना चेंबरचे मानद सचिव अजित कोठारी म्हणाले, कोल्हापूर महानगरपालिकेच्या मालकीच्या गाळेधारकांच्या भाडे प्रश्नांसंबंधी सन २०१५ पासून वाद सुरु आहे. महानगरपालिकेच्या भाडे व ठेव निर्धारण समितीने सन २०१९ पुढील भाडे निश्चित केले होते. सदर भाडे एकरकमी भरल्यास त्यावर जे दंड व व्याज येईल त्यावर अभय योजना लागू करुन देण्यात आली होती. गाळेधारक त्यावेळी नुकतेच कोरोनाच्या संकटातून बाहेर आले होते त्यामुळे काही गाळेधारकांनी आर्थिक अडचणी अभावी आपले भाडे भरले नाही. सदर गाळेधारकांवर महानगरपालिकेच्या नगररचना विभागातर्फे गाळे सीलची कारवाई चालू आहे. सदर गाळेधारकांना थकीत भाड्यापोटी देण्यात येणाऱ्या नोटीसा भाडे, दंड, व्याज, जीएसटी इ. सह देण्यात येत आहे. एखादा गाळेधारक भाड्यापोटी १ लाख रुपये भरण्यास गेल्यास त्यातील जवळपास ६० हजार रुपये दंड व व्याजातून वसूल केले जात आहेत. गाळेधारक आपले भाडे भरण्यास तयार असून त्यांच्या नोटीसीमधून ब्रेकअप देत मुळ भाडे, दंड, व्याज इ. ची वेगळी नोटीस काढावी अशी मागणी नगरसेवक शारंगधर देशमुख व ॠतुराज क्षीरसागर यांच्याकडे केली. यावर उत्तर देताना नगरसेवक शारंगधर देशमुख यांनी गाळेधारकांसाठी पुन्हा अभय योजना आणणेसाठी आपण प्रयत्नशील आहे असे सांगितले. यावेळी आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी कायद्याने दोनवेळा अभय योजना देता येते का याची माहिती घेऊन निर्णय घेऊ असे सांगितले. ज्या गाळेधारकांनी सन २०१९ पुढील भाडे अजूनही भरलेले नाही त्यांची यादी कोल्हापूर चेंबरकडे द्यावी व ज्यांनी भाडे भरले आहे त्यांना एनओसी द्यावी असेही अजित कोठारी यांनी सांगितले. अमर क्षीरसागर यांनी जीएसटी जुलै २०१७ मध्ये लागू झाला असताना सन २०१५ ते २०१७ मधील थकीत गाळेधारकांना जीएसटी च्या नोटीसा महापालिकेने काढल्या आहेत. सदर नोटीसा दुरुस्त करुन देण्याची मागणी त्यांनी केली. खुल्या व विस्थापित गाळेधारकांच्या प्रश्नांवर बोलताना किशोर काटवे यांनी कोल्हापूर चेंबरच्या पुढाकारातून खुले व विस्थापित झालेले गाळेधारक रेडिरेकनरच्या दोन टक्के भाडीवाढीने भाडे भरण्यास सदर गाळेधारक तयार आहेत पण नगररचना विभाग त्यावर निर्णय देत नाही असे सांगितले. सील केलेले गाळे चालू करुन देण्याची मागणी ॠतुराज क्षीरसागर व शारंगधर देशमुख यांनी आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांना केली. आमदार अमल महाडिक व आमदार राजेश क्षीरसागर याबाबत विधानसभेत लक्षवेधी मांडणार असून तोवर कारवाई थांबविण्यात यावी असे ॠतुराज क्षीरसागर यांनी सांगितले. व्यवसाय परवाना बाबतीत महानगरपालिकेने व्यवसाय परवाना व अग्निशमन कर विभाग एकत्र केल्याने ज्या व्यवसायाला अग्निशमन कर लागू होत नव्हता त्यांना तो लागू झाला आहे. परवान्यात वेगवेगळ्या वर्गवारी करण्यात आल्या आहेत. परवाना हा जागेचा असून स्क्वेअर फुटावर परवाना घेण्याची नवीन पध्दत महापालिकेने चालू केली आहे. परवाना फेरफार करताना फी एक वर्षाची आकारली जाते. सदर फी कमीतकमी असावी. परवाना नूतनीकरणाची मुदत एक महिन्याची असते. महापालिकेकडे असणाऱ्या परवानाधारकांची संख्या पाहता एक महिन्यात परवाना नूतनीकरण करुन घेणे शक्य होत नाही. त्यामुळे परवाना नूतनीकरणाची मुदत सहा महिन्याची करावी. चालू वर्षी महापालिकेने व्यवसाय परवाना फी मध्ये भरमसाठ वाढ केल्याने अनेक परवानाधारकांनी आपले परवाने नूतनीकरण केले नव्हते. याबाबीस महापालिकेचा परवाना विभाग असल्याने व्यवसाय परवानाधारकांना अभय योजना लागू करावी असे अजित कोठारी यांनी सांगितले. यावर परवान्याला अभय योजना लागू करता येत नाही असे आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांनी सांगितले. त्यावर अजित कोठारी यांनी सन २०२३-२४ मध्ये महापालिकेने परवानाधारकांना सवलत योजना लागू केल्याचे निदर्शनास आणून देत यावर्षी देखील अभय योजना लागू करावी असे सांगितले. फायरसेस कायद्याप्रमाणे सन २००६ पुढील बांधकामांना अग्निशमन कर लागू होतो. पण परवाना विभागाने त्याचा चुकीचा अर्थ काढत सर्वांनाच अग्निशमन कर लावला आहे. परवाना फेरफार बाबत झालेल्या दोन शिबिरांची माहिती आम्हांला आजतागायत मिळाली नसल्याने चुकीचा लागलेला फायरसेस मागे घ्यावा. कोल्हापूर शहरातील सर्व प्रॉपर्टीजचा सर्व्हे करुन त्यांना घरफाळा बसविला जात नाही तोपर्यंत घरफाळ्यामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ करु नये. व्यावसायीक घरफाळा लावताना तो देखील रेडिरेकनर प्रमाणे लावावा. त्याचप्रमाणे भाड्याच्या व्यावसायीक इमारती वरील घरफाळा हा महानगरपालिका सर्वसाधारण सभा ठराव क्रमांक ५७ दिनांक १८/०२/२०१९ च्या मंजुरी नुसार लावावा व तशी भाड्याच्या इमारती वरील दुरुस्ती करावी मिळावी. सध्या आखाती देशामध्ये सुरु असलेल्या युध्दजन्य परिस्थितीमुळे व्यापार-उद्योगाची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. हॉटेल व कॅटरिंग व्यवसायाला गॅसचा तुटवडा जाणवू लागल्याने त्यांचे व्यवसाय सध्या बंद होण्याच्या मार्गावर आले आहेत. भविष्यात युध्दजन्य परिस्थिती कशी असेल याची कल्पना सध्या नाही. भविष्यात पेट्रोलजन्य पदार्थांच्या किंमती गगनाला भिडण्याची शंका येत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात महागाईच्या झळा सोसाव्या लागतील असे दिसून येत आहे. याचा परिणाम व्यापार-उद्योगावर होणार असून त्यामुळे व्यापार-उद्योग कोलमडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महापालिकेच्या अंदाजपत्रकात कोणतीही व्यावसायिक दरवाढ करु नये असे के. मंजूलक्ष्मी यांना सांगितले. यावेळी चेंबरचे संचालक संपत पाटील, राहुल नष्टे, अविनाश नासिपुडे, संदीप वीर, गाळेधारक व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकात कोणतीही व्यावसायिक वाढ होणार नाही नगरसेवक शारंगधर देशमुख व ॠतुराज क्षीरसागर यांची कोल्हापूर चेंबरच्या शिष्टमंडळाला ग्वाही कोल्हापूर दि. १३: सिटी न्यूज नेटवर्क कोल्हापूर महानगरपालिकेचे सन २०२६-२७ चे बजेट (अंदाजपत्रक) लवकरच सादर होत असून सदर अंदाजपत्रकात कोणत्याही प्रकारची दरवाढ करु नये असे निवेदन कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या शिष्टमंडळाने आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांना दिले. नगरसेवक शारंगधर देशमुख व ॠतुराज क्षीरसागर यांनी बैठक घडवून आणली. यावेळी बोलताना चेंबरचे मानद सचिव अजित कोठारी म्हणाले, कोल्हापूर महानगरपालिकेच्या मालकीच्या गाळेधारकांच्या भाडे प्रश्नांसंबंधी सन २०१५ पासून वाद सुरु आहे. महानगरपालिकेच्या भाडे व ठेव निर्धारण समितीने सन २०१९ पुढील भाडे निश्चित केले होते. सदर भाडे एकरकमी भरल्यास त्यावर जे दंड व व्याज येईल त्यावर अभय योजना लागू करुन देण्यात आली होती. गाळेधारक त्यावेळी नुकतेच कोरोनाच्या संकटातून बाहेर आले होते त्यामुळे काही गाळेधारकांनी आर्थिक अडचणी अभावी आपले भाडे भरले नाही. सदर गाळेधारकांवर महानगरपालिकेच्या नगररचना विभागातर्फे गाळे सीलची कारवाई चालू आहे. सदर गाळेधारकांना थकीत भाड्यापोटी देण्यात येणाऱ्या नोटीसा भाडे, दंड, व्याज, जीएसटी इ. सह देण्यात येत आहे. एखादा गाळेधारक भाड्यापोटी १ लाख रुपये भरण्यास गेल्यास त्यातील जवळपास ६० हजार रुपये दंड व व्याजातून वसूल केले जात आहेत. गाळेधारक आपले भाडे भरण्यास तयार असून त्यांच्या नोटीसीमधून ब्रेकअप देत मुळ भाडे, दंड, व्याज इ. ची वेगळी नोटीस काढावी अशी मागणी नगरसेवक शारंगधर देशमुख व ॠतुराज क्षीरसागर यांच्याकडे केली. यावर उत्तर देताना नगरसेवक शारंगधर देशमुख यांनी गाळेधारकांसाठी पुन्हा अभय योजना आणणेसाठी आपण प्रयत्नशील आहे असे सांगितले. यावेळी आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी कायद्याने दोनवेळा अभय योजना देता येते का याची माहिती घेऊन निर्णय घेऊ असे सांगितले. ज्या गाळेधारकांनी सन २०१९ पुढील भाडे अजूनही भरलेले नाही त्यांची यादी कोल्हापूर चेंबरकडे द्यावी व ज्यांनी भाडे भरले आहे त्यांना एनओसी द्यावी असेही अजित कोठारी यांनी सांगितले. अमर क्षीरसागर यांनी जीएसटी जुलै २०१७ मध्ये लागू झाला असताना सन २०१५ ते २०१७ मधील थकीत गाळेधारकांना जीएसटी च्या नोटीसा महापालिकेने काढल्या आहेत. सदर नोटीसा दुरुस्त करुन देण्याची मागणी त्यांनी केली. खुल्या व विस्थापित गाळेधारकांच्या प्रश्नांवर बोलताना किशोर काटवे यांनी कोल्हापूर चेंबरच्या पुढाकारातून खुले व विस्थापित झालेले गाळेधारक रेडिरेकनरच्या दोन टक्के भाडीवाढीने भाडे भरण्यास सदर गाळेधारक तयार आहेत पण नगररचना विभाग त्यावर निर्णय देत नाही असे सांगितले. सील केलेले गाळे चालू करुन देण्याची मागणी ॠतुराज क्षीरसागर व शारंगधर देशमुख यांनी आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांना केली. आमदार अमल महाडिक व आमदार राजेश क्षीरसागर याबाबत विधानसभेत लक्षवेधी मांडणार असून तोवर कारवाई थांबविण्यात यावी असे ॠतुराज क्षीरसागर यांनी सांगितले. व्यवसाय परवाना बाबतीत महानगरपालिकेने व्यवसाय परवाना व अग्निशमन कर विभाग एकत्र केल्याने ज्या व्यवसायाला अग्निशमन कर लागू होत नव्हता त्यांना तो लागू झाला आहे. परवान्यात वेगवेगळ्या वर्गवारी करण्यात आल्या आहेत. परवाना हा जागेचा असून स्क्वेअर फुटावर परवाना घेण्याची नवीन पध्दत महापालिकेने चालू केली आहे. परवाना फेरफार करताना फी एक वर्षाची आकारली जाते. सदर फी कमीतकमी असावी. परवाना नूतनीकरणाची मुदत एक महिन्याची असते. महापालिकेकडे असणाऱ्या परवानाधारकांची संख्या पाहता एक महिन्यात परवाना नूतनीकरण करुन घेणे शक्य होत नाही. त्यामुळे परवाना नूतनीकरणाची मुदत सहा महिन्याची करावी. चालू वर्षी महापालिकेने व्यवसाय परवाना फी मध्ये भरमसाठ वाढ केल्याने अनेक परवानाधारकांनी आपले परवाने नूतनीकरण केले नव्हते. याबाबीस महापालिकेचा परवाना विभाग असल्याने व्यवसाय परवानाधारकांना अभय योजना लागू करावी असे अजित कोठारी यांनी सांगितले. यावर परवान्याला अभय योजना लागू करता येत नाही असे आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांनी सांगितले. त्यावर अजित कोठारी यांनी सन २०२३-२४ मध्ये महापालिकेने परवानाधारकांना सवलत योजना लागू केल्याचे निदर्शनास आणून देत यावर्षी देखील अभय योजना लागू करावी असे सांगितले. फायरसेस कायद्याप्रमाणे सन २००६ पुढील बांधकामांना अग्निशमन कर लागू होतो. पण परवाना विभागाने त्याचा चुकीचा अर्थ काढत सर्वांनाच अग्निशमन कर लावला आहे. परवाना फेरफार बाबत झालेल्या दोन शिबिरांची माहिती आम्हांला आजतागायत मिळाली नसल्याने चुकीचा लागलेला फायरसेस मागे घ्यावा. कोल्हापूर शहरातील सर्व प्रॉपर्टीजचा सर्व्हे करुन त्यांना घरफाळा बसविला जात नाही तोपर्यंत घरफाळ्यामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ करु नये. व्यावसायीक घरफाळा लावताना तो देखील रेडिरेकनर प्रमाणे लावावा. त्याचप्रमाणे भाड्याच्या व्यावसायीक इमारती वरील घरफाळा हा महानगरपालिका सर्वसाधारण सभा ठराव क्रमांक ५७ दिनांक १८/०२/२०१९ च्या मंजुरी नुसार लावावा व तशी भाड्याच्या इमारती वरील दुरुस्ती करावी मिळावी. सध्या आखाती देशामध्ये सुरु असलेल्या युध्दजन्य परिस्थितीमुळे व्यापार-उद्योगाची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. हॉटेल व कॅटरिंग व्यवसायाला गॅसचा तुटवडा जाणवू लागल्याने त्यांचे व्यवसाय सध्या बंद होण्याच्या मार्गावर आले आहेत. भविष्यात युध्दजन्य परिस्थिती कशी असेल याची कल्पना सध्या नाही. भविष्यात पेट्रोलजन्य पदार्थांच्या किंमती गगनाला भिडण्याची शंका येत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात महागाईच्या झळा सोसाव्या लागतील असे दिसून येत आहे. याचा परिणाम व्यापार-उद्योगावर होणार असून त्यामुळे व्यापार-उद्योग कोलमडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महापालिकेच्या अंदाजपत्रकात कोणतीही व्यावसायिक दरवाढ करु नये असे के. मंजूलक्ष्मी यांना सांगितले. यावेळी चेंबरचे संचालक संपत पाटील, राहुल नष्टे, अविनाश नासिपुडे, संदीप वीर, गाळेधारक व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- कुडाळ येथील कचरा डेपोला आज अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीचे स्वरूप अत्यंत गंभीर होते, मात्र कुडाळच्या नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता शिरवलकर यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे ही आग वेळीच नियंत्रणात आली असून मोठा अनर्थ टळला आहे. नेमकी घटना काय? आज दुपारच्या सुमारास कुडाळ येथील कचरा डेपोमध्ये अचानक धूर निघू लागला आणि काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. वाऱ्याच्या वेगामुळे आग वेगाने पसरत होती, ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नगराध्यक्षा मैदानात घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांनी क्षणाचाही विलंब न लावता स्वतः घटनास्थळी धाव घेतली. केवळ सूचना देऊन न थांबता, त्या स्वतः अग्निशामक बंबासोबत (Fire Tender) घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांच्या या सक्रिय सहभागामुळे प्रशासकीय यंत्रणा तातडीने कामाला लागली. आग नियंत्रणात नगराध्यक्षांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले. आगीवर पाण्याचा मारा करून ती अधिक पसरण्यापासून रोखण्यात आली. नगराध्यक्षांच्या समयसूचकतेमुळे आणि तातडीने घेतलेल्या निर्णयामुळे ही भीषण आग आता पूर्णपणे नियंत्रणात आली आहे. या संकटसमयी लोकप्रतिनिधी म्हणून धावून येत कामात प्रत्यक्ष सहभाग घेतल्याबद्दल कुडाळवासीयांकडून नगराध्यक्षांचे कौतुक होत आहे.6
- स्वप्ना यादव यांचा मोबाईल तपासात; सीडीआर अहवालाकडे लक्ष प्रतिनिधी : स्वाती हडकर चिपळूण : पत्रकार दीपक भागवत मारहाण प्रकरणाच्या तपासात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला आहे. दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतरही पूरक तपास सुरू ठेवत पोलिसांनी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव यांचा मोबाईल ताब्यात घेतला असून, संबंधित क्रमांकाचा कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) तपासण्याची प्रक्रिया हाती घेतली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी तथा तपास अधिकारी प्रकाश बेले यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता सर्व तांत्रिक पुरावे तपासणे आवश्यक आहे. त्यानुसार संबंधित मोबाईल क्रमांकाचा सीडीआर मिळवण्यासाठी दूरसंचार कंपनीकडे अधिकृत पत्रव्यवहार करण्यात आला आहे. सीडीआर अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील तपासाची दिशा अधिक स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले. या प्रकरणात यापूर्वी १० कर्मचाऱ्यांविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सीसीटीव्ही फुटेज, ओळख परेड आणि साक्षीदारांचे जबाब यांसारख्या पुराव्यांच्या आधारे कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, प्रशांत यादव यांच्या संदर्भातील सीडीआर तपासात ते घटनास्थळी नसल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती समोर आली आहे. आता स्वप्ना यादव यांच्या सीडीआर तपासातून प्रकरणातील इतर पैलू उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पत्रकारांकडून सुरुवातीपासूनच निष्पक्ष आणि सखोल तपासाची मागणी करण्यात येत होती. पूरक तपासाद्वारे प्रत्येक तांत्रिक बाबींची पडताळणी केली जात असल्याने तपास प्रक्रियेबाबत विश्वास वाढत असल्याची प्रतिक्रिया काही पत्रकारांनी व्यक्त केली आहे. दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेला प्रारंभ होणार असला तरी, पूरक तपासातून समोर येणारी माहितीही खटल्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे सीडीआर अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले असून, या प्रकरणातील अंतिम सत्य न्यायालयीन प्रक्रियेतूनच स्पष्ट होणार आहे.1
- Post by संजय गाडे साहेब जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया1
- काटेवाडीमध्ये आमदार रोहित पवार यांच्यासमोर देवांश लखन पाथरकर या चिमुकल्याने दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर भावनिक भाषण केलं.. रोहित पवार यांनी या भाषणाचा व्हिडीओ शेअर करत देवांशचं भाषण एकदम ओक्के अशा शब्दात कौतुक केलंय.. या निरागस चिमुकल्याच्या भाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून आजही आबालवृद्धांच्या मनात अजितदादांचं स्थान अबाधित असल्याची प्रचिती या निमित्तानं आली..1
- Post by मन्सूर शेख1
- चेन्नईत भोरच्या श्लोकची सुवर्ण कामगिरी विक्रम शिंदे /भोर दि.१५ चेन्नई येथे पार पडलेल्या रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया स्केट गेम स्पर्धेत भेलकेवाडी ,भोर येथील श्लोक पराग भेलके याने चमकदार कामगिरी केली आहे. दि.१४ ते १७ एप्रिल दरम्यान पार पडलेल्या रोलर स्केटिंग स्पर्धेतील पाचशे आणि दोनशे मीटर स्पर्धेत अनुक्रमे कांस्य आणि सुवर्ण पदकाची कमाई केली आहे.देशाच्या विविध राज्यातील खेळाडू सहभागी झाले असून ग्रामीण भागातील असूनही श्लोक याने नेत्रदीपक कामगिरी केल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.1
- Post by TNMaharashtra News Channel1
- शिवसेनेतील अंतर्गत वाद, एस.आय.टी. चौकशी आणि 'सी.डी.आर.' वरून होणारे आरोप या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "विरोधकांकडे आमच्या विरुद्ध काहीही ठोस पुरावे नसल्याने केवळ ओळखीचे निमित्त करून आम्हाला टार्गेट केले जात आहे, हे एक राजकीय षडयंत्र आहे," अशा शब्दांत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत केसरकर यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. सी.डी.आर. आणि चौकशीवर भाष्य सुषमा अंधारे आणि अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना केसरकर म्हणाले की, "एस.आय.टी. आणि ई.डी. या यंत्रणा आपले काम करत आहेत. कोणासोबत फोटो असणे किंवा जुनी ओळख असणे हा गुन्हा नाही. केवळ राजकीय बदनामीसाठी आमची नावे घेतली जात आहेत. यंत्रणांना जिथे संशयास्पद माहिती मिळते, तिथे ते चौकशीसाठी कोणालाही बोलावू शकतात, त्यात गैर काहीच नाही." गोपनीय सी.डी.आर. राजकीय नेत्यांकडे कसे पोहोचले, याची चौकशी सरकार करेल, असेही त्यांनी नमूद केले. अजित पवारांचा अपघात आणि 'काळी जादू'चे आरोप अजित पवार यांच्या अपघातापूर्वी 'काळी जादू' झाल्याच्या आरोपांवर विचारले असता केसरकर म्हणाले, "दादांचा अपघात अत्यंत दुर्दैवी होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः स्पष्ट केले आहे की, या प्रकरणाची सखोल चौकशी होईल आणि दोषींना सोडले जाणार नाही. मात्र, कोणीही काहीही विधाने करणे आणि त्याला मी उत्तर देणे योग्य नाही." शक्तीपीठ महामार्गाच्या आराखड्यात बदलाची मागणी शक्तीपीठ महामार्गाबाबत महत्त्वाची भूमिका मांडताना केसरकर यांनी सध्याच्या आराखड्यावर आक्षेप घेतला. ते म्हणाले: सध्याचा मार्ग कोकणावर अन्याय करणारा आहे, कारण तो थेट प्रवाशांना गोव्याला नेतो.हा मार्ग आजऱ्यावरून थेट रेडी बंदराला जोडला जावा, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. यामुळे कोकणातील पर्यटन, कोस्टल रोड आणि स्थानिक बंदरांचा विकास होईल.तिलारी आणि चंदगड मार्गे 'फोर लेन' रस्ता करून दक्षिण व उत्तर गोव्याला जोडल्यास इको-सेन्सिटिव्ह झोनचेही रक्षण होईल. शिवसेनेतील अंतर्गत खदखद डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर केलेल्या विधानावर केसरकर यांनी सावध प्रतिक्रिया दिली. "हा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्तरावरील आहे. जर कुठे चूक झाली असेल, तर मुख्यमंत्री संबंधितांना योग्य त्या सूचना देतील. पक्षामध्ये कोणतीही नाराजी राहणार नाही याची मला खात्री आहे," असे त्यांनी स्पष्ट केले. आंबा-काजू उत्पादकांना मदत आंबा आणि काजू उत्पादकांना मिळालेली मदत तुटपुंजी असल्याच्या आरोपावर ते म्हणाले की, आंब्याला नुकसान भरपाई मिळण्याची ही केवळ दुसरीच वेळ आहे. ही शेतकऱ्यांसाठी समाधानाची बाब असून भविष्यात अधिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील.1