Shuru
Apke Nagar Ki App…
वार्ड नंबर 32 से चर्चित समाजसेवी का नाज़ मोहम्मद अहमद खान बनी उम्मीदवार रैली निकाल कर दिखाया शक्ति प्रदर्शन
AEM TV NEWS
वार्ड नंबर 32 से चर्चित समाजसेवी का नाज़ मोहम्मद अहमद खान बनी उम्मीदवार रैली निकाल कर दिखाया शक्ति प्रदर्शन
More news from महाराष्ट्र and nearby areas
- वार्ड नंबर 32 से चर्चित समाजसेवी का नाज़ मोहम्मद अहमद खान बनी उम्मीदवार रैली निकाल कर दिखाया शक्ति प्रदर्शन1
- वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा देवळाली प्रवरा नगरपालिकेचे नगरसेवक संतोष चोळके यांच्या निवेदनानंतर पाटबंधारे विभाग खडबडून जागे1
- अहिल्या नगर जिल्ह्यातील शेतीसाठी सोलर पंप बसविण्यासाठी निवड झालेल्या शेतकऱ्याची झाली फसवणूक....... श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील रहिवासी श्री सुंदर लक्ष्मण नजन यांनी महाराष्ट्र शासनाच्या सौर पंप योजनेत सौर पंप मिळण्यासाठी अर्ज केला होता तथापि यांचा अर्ज मंजूर झाल्यावर त्यांनी शक्ती सोलर पंप इंडिया या कंपनीची निवड केली होती. सदरील कंपनीने यांच्या शेतामध्ये सोलर पॅनल बसविण्यात आले परंतु त्यामध्ये मोटर बसविण्यात आली नाही. सदरील बाबीची वारंवार कंपनीकडे तक्रार करून देखील त्यांच्या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. कंपनीला अनेक वेळा पत्रव्यवहार केला, कंपनीच्या ग्राहक क्रमांक वर फोन केला असता केवळ आश्वासन देण्यात आले. त्याचप्रमाणे कंपनीला ईमेल द्वारे तक्रार नोंदविण्यात आली तरी देखील कंपनीने याची दखल घेतली नाही. त्यामुळे शासनाची योजना सर्व शेतकऱ्यांसाठी सौर पंप बसवण्याची ही पूर्णत्वास जाईल याची खात्री राहिली नाही. सौर पंप देणाऱ्या अनेक कंपन्यांनी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केलेली आहे. तरीदेखील राज्य शासन व कृषी विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. यामध्ये सरकारमधील असलेल्या काही मंत्र्यांच्या नातेवाईकांच्या कंपन्या असल्याकारणाने कुठली कारवाई केली जात नाही. त्यामुळे यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. यामध्ये शक्ती सोलर पंप इंडिया यासारख्या फसवणूक करणाऱ्या कंपन्या तातडीने ब्लॅक लिस्ट करण्यात आले पाहिजे.1
- Post by दत्तात्रय पवार1
- भोर शहराला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन फुटली विक्रम शिंदे /भोर दि.15 सध्या भोर ते कापूरहोळ मार्गावरील रस्ता रुंदीकरणाचे काम चालू आहे .मात्र आतापर्यंत अनेकवेळा शहराला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन फुटली असून नागरिकांना ऐन सणासुदीला पाणी टंचाईचा सामना करावा लागला आहे.पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी भाजपाच्या नगरसेविका अँड.जयश्री शिंदे यांनी केली आहे .1
- Post by दिगंबर गुजर1
- “Online Business करताय? देशभर ऑर्डर पोहोचवण्यासाठी हवी आहे विश्वासार्ह Courier सेवा. तुमचं पार्सल सुरक्षित आणि वेळेत पोहोचवण्याची जबाबदारी – Kiran Courier ची. Sambhajinagar मधून Pickup सुविधा उपलब्ध.” 📢 🔹 आजच कॉल करा 95457899661
- हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पुणे जिल्ह्यात 3 ठिकाणी 'हिंदुराष्ट्र जागृती सभा' संपन्न! विक्रम शिंदे /भोर दि.15 अर्बन नक्षलवादाच्या विरोधात हिंदूंनी संघटित होणे काळाची गरज - पराग गोखले, हिंदु जनजागृती समिती पुणे - अर्बन नक्षलवादाच्या माध्यमातून हिंदूंची दिशाभूल करण्यात येत आहे. या देशविघातक शक्तींना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी आता सर्व हिंदूंनी जात-पात, पक्ष विसरून एकजूट व्हायला हवे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी केले. मुळशी तालुक्यातील उरवडे येथे ११ जानेवारी रोजी नवखंडेनाथ मंदिराच्या प्रांगणात आयोजित 'हिंदुराष्ट्र जागृती सभेत' ते बोलत होते. या सभेला २०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी आणि जिज्ञासूंची उपस्थिती होती. उरवडे गावातील प्रखर हिंदुत्ववादी श्री.अंकुश गुंड, श्री नितीन रायरीकर यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. पुणे जिल्ह्यात उरवडेसह तळेगाव दाभाडे (मावळ) आणि पेठ (हवेली) अशा तीन ठिकाणी या सभांचे आयोजन करण्यात आले होते. या तिन्ही सभांना उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मंदिर सरकारीकरण आणि 'वक्फ'च्या विळख्यातून मुक्तता मिळेपर्यंत लढा सुरूच ! - श्री. दीपक आगवणे पेठ (ता. हवेली) येथील सभेत बोलताना समितीचे श्री. दीपक आगवणे यांनी सांगितले की, मंदिर सरकारीकरण आणि वक्फ बोर्डाच्या कचाट्यातून भारतातील मंदिरे आणि त्यांच्या जमिनी मुक्त केल्याशिवाय हिंदु जनजागृती समिती स्वस्थ बसणार नाही. या सभेची सुरुवात ह.भ.प. तुषार आबा चौधरी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. हिंदुराष्ट्र स्थापनेसाठी संघर्षरत राहणे आवश्यक - नागेश जोशी तळेगाव दाभाडे येथील सभेत श्री. नागेश जोशी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, अयोध्येत श्रीराम मंदिर झाले आता हिंदुराष्ट्र स्थापनेसाठी संघर्षरत राहणे आवश्यक आहे. धर्मावरील आघातांना रोखण्यासाठी प्रत्येकाने धर्मशिक्षण घेणे गरजेचे आहे. मान्यवरांची उपस्थिती आणि धर्मप्रेमींचा सहभाग ! पेठ येथील सभेत हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे संयोजक श्री. सचिन घुले, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे पुणे जिल्हा समन्वयक ह.भ.प. चोरघे महाराज, पोलीस पाटील श्री. दत्तात्रय चौधरी, ह.भ.प. रघुनाथ किसन चौधरी, चिंतामणी प्रासादिक दिंडीचे उपाध्यक्ष श्री. दत्तात्रय चौधरी, माजी सरपंच सौ. शोभाताई चौधरी आणि थेऊरचे ह.भ.प. ज्ञानोबा कुंजीर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. या तिन्ही सभांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, याचे संपूर्ण नियोजन आणि सूत्रसंचालन स्थानिक धर्मप्रेमींनीच स्वयंस्फूर्तीने पार पाडले. समाजातील वाढता सहभाग हा हिंदुराष्ट्राच्या दिशेने पडणारे आश्वासक पाऊल आहे1