logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

“मनोजदादा जरांगे पाटील यांच्याबद्दल आम्हाला आदर; गैरसमज दूर करून वस्तुस्थितीची खात्री करावी”— डॉ. संजयराव तायडे पाटील “मनोजदादा जरांगे पाटील यांच्याबद्दल आम्हाला आदर; गैरसमज दूर करून वस्तुस्थितीची खात्री करावी”— डॉ. संजयराव तायडे पाटील छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोजदादा जरांगे पाटील यांचा आम्ही नेहमीच आदर केला असून, मराठा समाजाला दिशा देणारे ते मोठे नेतृत्व आहे. मात्र, कोणाकडूनही मिळालेल्या अपुऱ्या अथवा चुकीच्या माहितीच्या आधारे गैरसमज करून घेण्याऐवजी संबंधित घटनेची वस्तुस्थिती जाणून घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेतर सेनेचे राज्य उपाध्यक्ष डॉ. संजयराव तायडे पाटील यांनी केले आहे. डॉ. तायडे पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ज्या बैठकीबाबत मा. ना. एकनाथराव शिंदे यांच्या सांगण्यावरून मनोजदादा जरांगे पाटील यांच्या विरोधात बैठक घेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला, त्या बैठकीचा एकनाथराव शिंदे यांच्याशी कोणताही संबंध नव्हता. संबंधित दिवशी रविवार असल्याने शाळा व महाविद्यालयांना सुट्टी होती. शहरात गेल्या सुमारे ३० वर्षांपासून मराठा समाजासाठी काम करणाऱ्या काही जुन्या सहकाऱ्यांची बैठक जवळच्या शिवछत्रपती कॉलेजच्या सभागृहात नियोजित होती. मात्र, तेथे दुसरा कार्यक्रम असल्यामुळे जागा उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर असलेल्या शाळेची जागा एक-दोन तास चर्चेसाठी उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली. बैठकीतील अनेक जण संबंधित शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक असल्यामुळे त्यांची विनंती मान्य करण्यात आली. यामागे कोणताही राजकीय हेतू किंवा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या विरोधातील भूमिका नव्हती, असे त्यांनी स्पष्ट केले. “या संपूर्ण घटनाक्रमात एकनाथराव शिंदे साहेबांचा संबंध कुठेही येत नाही. त्यामुळे दादांनी कोणत्याही माहितीची शहानिशा करूनच त्यावर विश्वास ठेवावा,” असे डॉ. तायडे पाटील यांनी म्हटले आहे. *मराठा आरक्षणासाठी एकनाथराव शिंदे सरकारने उचललेली ठोस पावले* एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या सरकारने मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण मिळावे यासाठी अनेक ठोस पावले उचलली. मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपण सिद्ध करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत राज्यव्यापी सर्वेक्षण करण्यात आले. न्या. सुनील शुक्रे यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाने सादर केलेला अहवाल सरकारने स्वीकारला. या अहवालाच्या आधारे २० फेब्रुवारी २०२४ रोजी महाराष्ट्र विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले. या अधिवेशनात मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग म्हणून स्वतंत्रपणे १० टक्के आरक्षण देणारे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत एकमताने मंजूर करण्यात आले. त्यानंतर या विधेयकाचे कायद्यात रूपांतर करून शिक्षण आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये मराठा समाजासाठी १० टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली. हे आरक्षण ओबीसी समाजाच्या विद्यमान आरक्षणाला धक्का न लावता स्वतंत्र प्रवर्गातून देण्यात आले. त्याचप्रमाणे, मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेतील अडचणी दूर करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या माध्यमातून राज्यातील जुन्या महसुली, शैक्षणिक, निजामकालीन आणि इतर शासकीय अभिलेखांमधील कुणबी नोंदी शोधण्याची व्यापक मोहीम राबविण्यात आली. उपलब्ध नोंदींच्या आधारे पात्र व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया गतिमान करण्यात आली. मराठा आरक्षण न्यायालयात टिकावे यासाठी आवश्यक सांख्यिकीय माहिती, कायदेशीर पुरावे आणि आयोगाचा सविस्तर अहवाल तयार करण्यावरही शिंदे सरकारने भर दिला. मराठा आंदोलकांशी चर्चा करून शांततामय आणि कायदेशीर मार्गाने प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. “एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असताना मराठा समाजाच्या आंदोलनाची दखल घेऊन त्यांच्या सरकारने राज्यव्यापी सर्वेक्षण केले, मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारला, विशेष अधिवेशन बोलावले आणि मराठा समाजासाठी स्वतंत्र १० टक्के आरक्षणाचा कायदा मंजूर केला. कुणबी नोंदी शोधण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करून प्रमाणपत्र वितरणाची प्रक्रियाही गतिमान केली. त्यामुळे एकनाथराव शिंदे हे मनोजदादा जरांगे पाटील किंवा मराठा समाजाच्या विरोधात आहेत, असा गैरसमज निर्माण करणे योग्य नाही,” असे डॉ. तायडे पाटील यांनी नमूद केले. “काही लोक स्वतःच्या वैयक्तिक किंवा राजकीय स्वार्थासाठी चुकीची अथवा अपूर्ण माहिती देत असतील, तर दादांनी त्या माहितीची खात्री करावी. आम्ही मनोजदादांचे विरोधक नाही. त्यांच्याबद्दल आमच्या मनात आदर आहे आणि तो कायम राहील. गैरसमज दूर करण्यासाठी आवश्यक असल्यास आम्ही त्यांच्यासमोर संपूर्ण वस्तुस्थिती मांडण्यास तयार आहोत,” असे डॉ. संजयराव तायडे पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केले.

1 hr ago
user_रविंद्र सुरडकर गुरव
रविंद्र सुरडकर गुरव
Aurangabad, Pune•
1 hr ago

“मनोजदादा जरांगे पाटील यांच्याबद्दल आम्हाला आदर; गैरसमज दूर करून वस्तुस्थितीची खात्री करावी”— डॉ. संजयराव तायडे पाटील “मनोजदादा जरांगे पाटील यांच्याबद्दल आम्हाला आदर; गैरसमज दूर करून वस्तुस्थितीची खात्री करावी”— डॉ. संजयराव तायडे पाटील छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोजदादा जरांगे पाटील यांचा आम्ही नेहमीच आदर केला असून, मराठा समाजाला दिशा देणारे ते मोठे नेतृत्व आहे. मात्र, कोणाकडूनही मिळालेल्या अपुऱ्या अथवा चुकीच्या माहितीच्या आधारे गैरसमज करून घेण्याऐवजी संबंधित घटनेची वस्तुस्थिती जाणून घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेतर सेनेचे राज्य उपाध्यक्ष डॉ. संजयराव तायडे पाटील यांनी केले आहे. डॉ. तायडे पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ज्या बैठकीबाबत मा. ना. एकनाथराव शिंदे यांच्या सांगण्यावरून मनोजदादा जरांगे पाटील यांच्या विरोधात बैठक घेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला, त्या बैठकीचा एकनाथराव शिंदे यांच्याशी कोणताही संबंध नव्हता. संबंधित दिवशी रविवार असल्याने शाळा व महाविद्यालयांना सुट्टी होती. शहरात गेल्या सुमारे ३० वर्षांपासून मराठा समाजासाठी काम करणाऱ्या काही जुन्या सहकाऱ्यांची बैठक जवळच्या शिवछत्रपती कॉलेजच्या सभागृहात नियोजित होती. मात्र, तेथे दुसरा कार्यक्रम असल्यामुळे जागा उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर असलेल्या शाळेची जागा एक-दोन तास चर्चेसाठी उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली. बैठकीतील अनेक जण संबंधित शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक असल्यामुळे त्यांची विनंती मान्य करण्यात आली. यामागे कोणताही राजकीय हेतू किंवा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या विरोधातील भूमिका नव्हती, असे त्यांनी स्पष्ट केले. “या संपूर्ण घटनाक्रमात एकनाथराव शिंदे साहेबांचा संबंध कुठेही येत नाही. त्यामुळे दादांनी कोणत्याही माहितीची शहानिशा करूनच त्यावर विश्वास ठेवावा,” असे डॉ. तायडे पाटील यांनी म्हटले आहे. *मराठा आरक्षणासाठी एकनाथराव शिंदे सरकारने उचललेली ठोस पावले* एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या सरकारने मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण मिळावे यासाठी अनेक ठोस पावले उचलली. मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपण सिद्ध करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत राज्यव्यापी सर्वेक्षण करण्यात आले. न्या. सुनील शुक्रे यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाने सादर केलेला अहवाल सरकारने स्वीकारला. या अहवालाच्या आधारे २० फेब्रुवारी २०२४ रोजी महाराष्ट्र विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले. या अधिवेशनात मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग म्हणून स्वतंत्रपणे १० टक्के आरक्षण देणारे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत एकमताने मंजूर करण्यात आले. त्यानंतर या विधेयकाचे कायद्यात रूपांतर करून शिक्षण आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये मराठा समाजासाठी १० टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली. हे आरक्षण ओबीसी समाजाच्या विद्यमान आरक्षणाला धक्का न लावता स्वतंत्र प्रवर्गातून देण्यात आले. त्याचप्रमाणे, मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेतील अडचणी दूर करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या माध्यमातून राज्यातील जुन्या महसुली, शैक्षणिक, निजामकालीन आणि इतर शासकीय अभिलेखांमधील कुणबी नोंदी शोधण्याची व्यापक मोहीम राबविण्यात आली. उपलब्ध नोंदींच्या आधारे पात्र व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया गतिमान करण्यात आली. मराठा आरक्षण न्यायालयात टिकावे यासाठी आवश्यक सांख्यिकीय माहिती, कायदेशीर पुरावे आणि आयोगाचा सविस्तर अहवाल तयार करण्यावरही शिंदे सरकारने भर दिला. मराठा आंदोलकांशी चर्चा करून शांततामय आणि कायदेशीर मार्गाने प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. “एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असताना मराठा समाजाच्या आंदोलनाची दखल घेऊन त्यांच्या सरकारने राज्यव्यापी सर्वेक्षण केले, मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारला, विशेष अधिवेशन बोलावले आणि मराठा समाजासाठी स्वतंत्र १० टक्के आरक्षणाचा कायदा मंजूर केला. कुणबी नोंदी शोधण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करून प्रमाणपत्र वितरणाची प्रक्रियाही गतिमान केली. त्यामुळे एकनाथराव शिंदे हे मनोजदादा जरांगे पाटील किंवा मराठा समाजाच्या विरोधात आहेत, असा गैरसमज निर्माण करणे योग्य नाही,” असे डॉ. तायडे पाटील यांनी नमूद केले. “काही लोक स्वतःच्या वैयक्तिक किंवा राजकीय स्वार्थासाठी चुकीची अथवा अपूर्ण माहिती देत असतील, तर दादांनी त्या माहितीची खात्री करावी. आम्ही मनोजदादांचे विरोधक नाही. त्यांच्याबद्दल आमच्या मनात आदर आहे आणि तो कायम राहील. गैरसमज दूर करण्यासाठी आवश्यक असल्यास आम्ही त्यांच्यासमोर संपूर्ण वस्तुस्थिती मांडण्यास तयार आहोत,” असे डॉ. संजयराव तायडे पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केले.

More news from Pune and nearby areas
  • “मनोजदादा जरांगे पाटील यांच्याबद्दल आम्हाला आदर; गैरसमज दूर करून वस्तुस्थितीची खात्री करावी”— डॉ. संजयराव तायडे पाटील “मनोजदादा जरांगे पाटील यांच्याबद्दल आम्हाला आदर; गैरसमज दूर करून वस्तुस्थितीची खात्री करावी”— डॉ. संजयराव तायडे पाटील छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोजदादा जरांगे पाटील यांचा आम्ही नेहमीच आदर केला असून, मराठा समाजाला दिशा देणारे ते मोठे नेतृत्व आहे. मात्र, कोणाकडूनही मिळालेल्या अपुऱ्या अथवा चुकीच्या माहितीच्या आधारे गैरसमज करून घेण्याऐवजी संबंधित घटनेची वस्तुस्थिती जाणून घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेतर सेनेचे राज्य उपाध्यक्ष डॉ. संजयराव तायडे पाटील यांनी केले आहे. डॉ. तायडे पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ज्या बैठकीबाबत मा. ना. एकनाथराव शिंदे यांच्या सांगण्यावरून मनोजदादा जरांगे पाटील यांच्या विरोधात बैठक घेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला, त्या बैठकीचा एकनाथराव शिंदे यांच्याशी कोणताही संबंध नव्हता. संबंधित दिवशी रविवार असल्याने शाळा व महाविद्यालयांना सुट्टी होती. शहरात गेल्या सुमारे ३० वर्षांपासून मराठा समाजासाठी काम करणाऱ्या काही जुन्या सहकाऱ्यांची बैठक जवळच्या शिवछत्रपती कॉलेजच्या सभागृहात नियोजित होती. मात्र, तेथे दुसरा कार्यक्रम असल्यामुळे जागा उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर असलेल्या शाळेची जागा एक-दोन तास चर्चेसाठी उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली. बैठकीतील अनेक जण संबंधित शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक असल्यामुळे त्यांची विनंती मान्य करण्यात आली. यामागे कोणताही राजकीय हेतू किंवा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या विरोधातील भूमिका नव्हती, असे त्यांनी स्पष्ट केले. “या संपूर्ण घटनाक्रमात एकनाथराव शिंदे साहेबांचा संबंध कुठेही येत नाही. त्यामुळे दादांनी कोणत्याही माहितीची शहानिशा करूनच त्यावर विश्वास ठेवावा,” असे डॉ. तायडे पाटील यांनी म्हटले आहे. *मराठा आरक्षणासाठी एकनाथराव शिंदे सरकारने उचललेली ठोस पावले* एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या सरकारने मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण मिळावे यासाठी अनेक ठोस पावले उचलली. मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपण सिद्ध करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत राज्यव्यापी सर्वेक्षण करण्यात आले. न्या. सुनील शुक्रे यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाने सादर केलेला अहवाल सरकारने स्वीकारला. या अहवालाच्या आधारे २० फेब्रुवारी २०२४ रोजी महाराष्ट्र विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले. या अधिवेशनात मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग म्हणून स्वतंत्रपणे १० टक्के आरक्षण देणारे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत एकमताने मंजूर करण्यात आले. त्यानंतर या विधेयकाचे कायद्यात रूपांतर करून शिक्षण आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये मराठा समाजासाठी १० टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली. हे आरक्षण ओबीसी समाजाच्या विद्यमान आरक्षणाला धक्का न लावता स्वतंत्र प्रवर्गातून देण्यात आले. त्याचप्रमाणे, मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेतील अडचणी दूर करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या माध्यमातून राज्यातील जुन्या महसुली, शैक्षणिक, निजामकालीन आणि इतर शासकीय अभिलेखांमधील कुणबी नोंदी शोधण्याची व्यापक मोहीम राबविण्यात आली. उपलब्ध नोंदींच्या आधारे पात्र व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया गतिमान करण्यात आली. मराठा आरक्षण न्यायालयात टिकावे यासाठी आवश्यक सांख्यिकीय माहिती, कायदेशीर पुरावे आणि आयोगाचा सविस्तर अहवाल तयार करण्यावरही शिंदे सरकारने भर दिला. मराठा आंदोलकांशी चर्चा करून शांततामय आणि कायदेशीर मार्गाने प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. “एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असताना मराठा समाजाच्या आंदोलनाची दखल घेऊन त्यांच्या सरकारने राज्यव्यापी सर्वेक्षण केले, मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारला, विशेष अधिवेशन बोलावले आणि मराठा समाजासाठी स्वतंत्र १० टक्के आरक्षणाचा कायदा मंजूर केला. कुणबी नोंदी शोधण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करून प्रमाणपत्र वितरणाची प्रक्रियाही गतिमान केली. त्यामुळे एकनाथराव शिंदे हे मनोजदादा जरांगे पाटील किंवा मराठा समाजाच्या विरोधात आहेत, असा गैरसमज निर्माण करणे योग्य नाही,” असे डॉ. तायडे पाटील यांनी नमूद केले. “काही लोक स्वतःच्या वैयक्तिक किंवा राजकीय स्वार्थासाठी चुकीची अथवा अपूर्ण माहिती देत असतील, तर दादांनी त्या माहितीची खात्री करावी. आम्ही मनोजदादांचे विरोधक नाही. त्यांच्याबद्दल आमच्या मनात आदर आहे आणि तो कायम राहील. गैरसमज दूर करण्यासाठी आवश्यक असल्यास आम्ही त्यांच्यासमोर संपूर्ण वस्तुस्थिती मांडण्यास तयार आहोत,” असे डॉ. संजयराव तायडे पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केले.
    1
    “मनोजदादा जरांगे पाटील यांच्याबद्दल आम्हाला आदर; गैरसमज दूर करून वस्तुस्थितीची खात्री करावी”— डॉ. संजयराव तायडे पाटील

“मनोजदादा जरांगे पाटील यांच्याबद्दल आम्हाला आदर; गैरसमज दूर करून वस्तुस्थितीची खात्री करावी”— डॉ. संजयराव तायडे पाटील
छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोजदादा जरांगे पाटील यांचा आम्ही नेहमीच आदर केला असून, मराठा समाजाला दिशा देणारे ते मोठे नेतृत्व आहे. मात्र, कोणाकडूनही मिळालेल्या अपुऱ्या अथवा चुकीच्या माहितीच्या आधारे गैरसमज करून घेण्याऐवजी संबंधित घटनेची वस्तुस्थिती जाणून घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेतर सेनेचे राज्य उपाध्यक्ष डॉ. संजयराव तायडे पाटील यांनी केले आहे.
डॉ. तायडे पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ज्या बैठकीबाबत मा. ना. एकनाथराव शिंदे यांच्या सांगण्यावरून मनोजदादा जरांगे पाटील यांच्या विरोधात बैठक घेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला, त्या बैठकीचा एकनाथराव शिंदे यांच्याशी कोणताही संबंध नव्हता.
संबंधित दिवशी रविवार असल्याने शाळा व महाविद्यालयांना सुट्टी होती. शहरात गेल्या सुमारे ३० वर्षांपासून मराठा समाजासाठी काम करणाऱ्या काही जुन्या सहकाऱ्यांची बैठक जवळच्या शिवछत्रपती कॉलेजच्या सभागृहात नियोजित होती. मात्र, तेथे दुसरा कार्यक्रम असल्यामुळे जागा उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर असलेल्या शाळेची जागा एक-दोन तास चर्चेसाठी उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली. बैठकीतील अनेक जण संबंधित शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक असल्यामुळे त्यांची विनंती मान्य करण्यात आली. यामागे कोणताही राजकीय हेतू किंवा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या विरोधातील भूमिका नव्हती, असे त्यांनी स्पष्ट केले.
“या संपूर्ण घटनाक्रमात एकनाथराव शिंदे साहेबांचा संबंध कुठेही येत नाही. त्यामुळे दादांनी कोणत्याही माहितीची शहानिशा करूनच त्यावर विश्वास ठेवावा,” असे डॉ. तायडे पाटील यांनी म्हटले आहे.
*मराठा आरक्षणासाठी एकनाथराव शिंदे सरकारने उचललेली ठोस पावले*
एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या सरकारने मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण मिळावे यासाठी अनेक ठोस पावले उचलली. मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपण सिद्ध करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत राज्यव्यापी सर्वेक्षण करण्यात आले. न्या. सुनील शुक्रे यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाने सादर केलेला अहवाल सरकारने स्वीकारला.
या अहवालाच्या आधारे २० फेब्रुवारी २०२४ रोजी महाराष्ट्र विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले. या अधिवेशनात मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग म्हणून स्वतंत्रपणे १० टक्के आरक्षण देणारे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत एकमताने मंजूर करण्यात आले. त्यानंतर या विधेयकाचे कायद्यात रूपांतर करून शिक्षण आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये मराठा समाजासाठी १० टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली. हे आरक्षण ओबीसी समाजाच्या विद्यमान आरक्षणाला धक्का न लावता स्वतंत्र प्रवर्गातून देण्यात आले.
त्याचप्रमाणे, मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेतील अडचणी दूर करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या माध्यमातून राज्यातील जुन्या महसुली, शैक्षणिक, निजामकालीन आणि इतर शासकीय अभिलेखांमधील कुणबी नोंदी शोधण्याची व्यापक मोहीम राबविण्यात आली. उपलब्ध नोंदींच्या आधारे पात्र व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया गतिमान करण्यात आली.
मराठा आरक्षण न्यायालयात टिकावे यासाठी आवश्यक सांख्यिकीय माहिती, कायदेशीर पुरावे आणि आयोगाचा सविस्तर अहवाल तयार करण्यावरही शिंदे सरकारने भर दिला. मराठा आंदोलकांशी चर्चा करून शांततामय आणि कायदेशीर मार्गाने प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
“एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असताना मराठा समाजाच्या आंदोलनाची दखल घेऊन त्यांच्या सरकारने राज्यव्यापी सर्वेक्षण केले, मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारला, विशेष अधिवेशन बोलावले आणि मराठा समाजासाठी स्वतंत्र १० टक्के आरक्षणाचा कायदा मंजूर केला. कुणबी नोंदी शोधण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करून प्रमाणपत्र वितरणाची प्रक्रियाही गतिमान केली. त्यामुळे एकनाथराव शिंदे हे मनोजदादा जरांगे पाटील किंवा मराठा समाजाच्या विरोधात आहेत, असा गैरसमज निर्माण करणे योग्य नाही,” असे डॉ. तायडे पाटील यांनी नमूद केले.
“काही लोक स्वतःच्या वैयक्तिक किंवा राजकीय स्वार्थासाठी चुकीची अथवा अपूर्ण माहिती देत असतील, तर दादांनी त्या माहितीची खात्री करावी. आम्ही मनोजदादांचे विरोधक नाही. त्यांच्याबद्दल आमच्या मनात आदर आहे आणि तो कायम राहील. गैरसमज दूर करण्यासाठी आवश्यक असल्यास आम्ही त्यांच्यासमोर संपूर्ण वस्तुस्थिती मांडण्यास तयार आहोत,” असे डॉ. संजयराव तायडे पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केले.
    user_रविंद्र सुरडकर गुरव
    रविंद्र सुरडकर गुरव
    Aurangabad, Pune•
    1 hr ago
  • जात पडताळणीच्या अन्यायाविरोधात कोळी समाज आक्रमक; समिती कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा मराठवाड्यातील कोळी महादेव व कोळी मल्हार जमात बांधवांनी जात पडताळणी समितीच्या कारभाराविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. विविध प्रकरणांमध्ये जात पडताळणी करताना अन्याय होत असल्याचा आरोप करत छत्रपती संभाजीनगर येथे समिती कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. मागण्यांची तातडीने दखल न घेतल्यास समिती कार्यालयावर टाळेठोक आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.
    1
    जात पडताळणीच्या अन्यायाविरोधात कोळी समाज आक्रमक; समिती कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा
मराठवाड्यातील कोळी महादेव व कोळी मल्हार जमात बांधवांनी जात पडताळणी समितीच्या कारभाराविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
विविध प्रकरणांमध्ये जात पडताळणी करताना अन्याय होत असल्याचा आरोप करत छत्रपती संभाजीनगर येथे समिती कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.
मागण्यांची तातडीने दखल न घेतल्यास समिती कार्यालयावर टाळेठोक आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.
    user_Marathi News Point
    Marathi News Point
    Video editing service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • ब्रेकिंग छत्रपती संभाजीनगर ANC - कॉकरोच जनता पक्षाने बनवलेल्या कार्यकारणीच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर मध्ये CJP च्या तीन युवकांनी अमरण उपोषण सुरू केले आहे, अभिजीत दिपकेने कॉकरोच जनता पार्टीसाठी बनवलेल्या कार्यकारणी मध्ये मैत्रिणी आणि आम आदमी पक्षाच्या जुन्या लोकांना कॉकरोच जनता पार्टीचे पदाधिकारी बनवल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे, मुळातील आंदोलकांना पदाधिकारी करावे अशी मागणी घेऊन पुकारलेल्या उपोषणा दरम्यान उपोषणाचा चौथा दिवस असताना उपोषणकर्ते पोलिसांनी उपचारासाठी दाखल केले आहे. शासकीय घाटी रुग्णालयामध्ये उपोषणकर्त्यांवर उपचार सुरू आहेत. अभिजीत दिपकेच्या विरोधामध्ये पुकारलेले संभाजीनगर मधील हे आंदोलन आहे... ब्रेकिंग छत्रपती संभाजीनगर ANC - कॉकरोच जनता पक्षाने बनवलेल्या कार्यकारणीच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर मध्ये CJP च्या तीन युवकांनी अमरण उपोषण सुरू केले आहे, अभिजीत दिपकेने कॉकरोच जनता पार्टीसाठी बनवलेल्या कार्यकारणी मध्ये मैत्रिणी आणि आम आदमी पक्षाच्या जुन्या लोकांना कॉकरोच जनता पार्टीचे पदाधिकारी बनवल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे, मुळातील आंदोलकांना पदाधिकारी करावे अशी मागणी घेऊन पुकारलेल्या उपोषणा दरम्यान उपोषणाचा चौथा दिवस असताना उपोषणकर्ते पोलिसांनी उपचारासाठी दाखल केले आहे. शासकीय घाटी रुग्णालयामध्ये उपोषणकर्त्यांवर उपचार सुरू आहेत. अभिजीत दिपकेच्या विरोधामध्ये पुकारलेले संभाजीनगर मधील हे आंदोलन आहे...
    3
    ब्रेकिंग छत्रपती संभाजीनगर

ANC - कॉकरोच जनता पक्षाने बनवलेल्या कार्यकारणीच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर मध्ये CJP च्या तीन युवकांनी अमरण उपोषण सुरू केले आहे, अभिजीत दिपकेने कॉकरोच जनता पार्टीसाठी बनवलेल्या कार्यकारणी मध्ये मैत्रिणी आणि आम आदमी पक्षाच्या जुन्या लोकांना कॉकरोच जनता पार्टीचे पदाधिकारी बनवल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे, मुळातील आंदोलकांना पदाधिकारी करावे अशी मागणी घेऊन पुकारलेल्या उपोषणा दरम्यान उपोषणाचा चौथा दिवस असताना उपोषणकर्ते पोलिसांनी उपचारासाठी दाखल केले आहे. शासकीय घाटी रुग्णालयामध्ये उपोषणकर्त्यांवर उपचार सुरू आहेत. अभिजीत दिपकेच्या विरोधामध्ये पुकारलेले संभाजीनगर मधील हे आंदोलन आहे...
ब्रेकिंग छत्रपती संभाजीनगर
ANC - कॉकरोच जनता पक्षाने बनवलेल्या कार्यकारणीच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर मध्ये CJP च्या तीन युवकांनी अमरण उपोषण सुरू केले आहे, अभिजीत दिपकेने कॉकरोच जनता पार्टीसाठी बनवलेल्या कार्यकारणी मध्ये मैत्रिणी आणि आम आदमी पक्षाच्या जुन्या लोकांना कॉकरोच जनता पार्टीचे पदाधिकारी बनवल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे, मुळातील आंदोलकांना पदाधिकारी करावे अशी मागणी घेऊन पुकारलेल्या उपोषणा दरम्यान उपोषणाचा चौथा दिवस असताना उपोषणकर्ते पोलिसांनी उपचारासाठी दाखल केले आहे. शासकीय घाटी रुग्णालयामध्ये उपोषणकर्त्यांवर उपचार सुरू आहेत. अभिजीत दिपकेच्या विरोधामध्ये पुकारलेले संभाजीनगर मधील हे आंदोलन आहे...
    user_बोल बिंदास बोल
    बोल बिंदास बोल
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • लोक कल्याण जय जवान जय किसान जय भारत जय महाराष्ट्र जय महाराणा प्रताप जय छत्रपति शिवाजी महाराज जय डॉ भीमराव अंबेडकर जय एसपी जय हिंद प्रधानमंत्री लोगों को कभी भी वक्त से पहले नहीं मारना चाहिए लोगोंका जीवन बहुत अनमोल होता है लोगों को यह बात समझनी चाहिए लोगों को तो वैसे भी मरने के लिए ही जीवन मिला है कोई भी अमर नहीं जय हिंद जय महाराष्ट्र जय छत्रपति शिवाजी महाराज की जय जय डॉक्टर भीमराव अंबेडकर की जय लोकाला एक कोष्टक कळालि पाझेन है पूरी दुनिया लोकांच्या जीवना पेकषा मोठ काहिच नाही
    2
    लोक कल्याण जय जवान जय किसान जय भारत जय महाराष्ट्र जय महाराणा प्रताप जय छत्रपति शिवाजी महाराज जय डॉ भीमराव अंबेडकर जय एसपी जय हिंद प्रधानमंत्री लोगों को कभी भी वक्त से पहले नहीं मारना चाहिए लोगोंका जीवन बहुत अनमोल होता है लोगों को यह बात समझनी चाहिए लोगों को तो वैसे भी मरने के लिए ही जीवन मिला है कोई भी अमर नहीं जय हिंद जय महाराष्ट्र जय छत्रपति शिवाजी महाराज की जय जय डॉक्टर भीमराव अंबेडकर की जय
लोकाला एक कोष्टक  कळालि पाझेन है पूरी दुनिया लोकांच्या जीवना पेकषा मोठ काहिच नाही
    user_Sachin fakirchand Pathare
    Sachin fakirchand Pathare
    Artist Aurangabad, Maharashtra•
    17 hrs ago
  • महाराष्ट्र पोलीस मा. श्री. अशोक लालसिंग राजपूत सहाय्यक पोलीस आयुक्त, छत्रपती संभाजीनगर राष्ट्रपती पदक विजेते सेवापूर्ती सत्कार समारंभ महाराष्ट्र पोलीस मा. श्री. अशोक लालसिंग राजपूत सहाय्यक पोलीस आयुक्त, छत्रपती संभाजीनगर राष्ट्रपती पदक विजेते सेवापूर्ती सत्कार समारंभ
    1
    महाराष्ट्र पोलीस मा. श्री. अशोक लालसिंग राजपूत सहाय्यक पोलीस आयुक्त, छत्रपती संभाजीनगर राष्ट्रपती पदक विजेते सेवापूर्ती सत्कार समारंभ
महाराष्ट्र पोलीस मा. श्री. अशोक लालसिंग राजपूत सहाय्यक पोलीस आयुक्त, छत्रपती संभाजीनगर राष्ट्रपती पदक विजेते सेवापूर्ती सत्कार समारंभ
    user_Gallinews Bharat
    Gallinews Bharat
    पत्रकार Aurangabad, Maharashtra•
    20 hrs ago
  • खुलताबाद येथील हजरत ख्वाजा मुन्तजिबुद्दीन रहेमतुल्लाह अलैह उर्फ जर जरी जर बक्ष दुल्हा यांच्या उरूस ची जय्यत तयारी सुरू, *खुलताबाद येथील प्रसिद्ध जर जरी जर बक्ष दुल्हा यांच्या उरूस ची जय्यत तयारी सुरू* *हजरत ख्वाजा मुन्तजिबुद्दीन रहेमतुल्लाह अलैह यांचा ७४० वा उरुस २० ऑगस्ट पासून सुरू होत आहे,* छत्रपती संभाजीनगर जिल्हा खुलताबाद येथील प्रसिद्ध दर्गा वली हजरत ख्वाजा मुन्तजिबुद्दीन रहेमतुल्लाह अलैह उर्फ जर जरी जर बक्ष दुल्हा यांच्या ७४० व्या उरूसाची जय्यत तयारी सुरू, हजरत ख्वाजा मुन्तजिबुद्दीन रहेमतुल्लाह अलैह यांना जर जरी जर बक्ष दुल्हा म्हणून ओळखले जाते, हे १४ व्या शतकाच्या सुरुवातीस दिल्लीहून दख्खनमध्ये आलेले एक प्रसिद्ध सुफी संत होते, त्यांनी महाराष्ट्रातील औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) जिल्ह्याच्या खुलताबाद येथे आपले आध्यात्मिक कार्य केले, त्यांचा प्रसिद्ध दर्गा याच ऐतिहासिक खुलताबाद शहरात आहे, यांचे गुरू हजरत बाबा फरिदुद्दीन आहे तर प्रसिद्ध सुफी संत हजरत निजामुद्दीन औलिया ते निकटवर्तीय होते, हजरत निजामुद्दीन औलिया यांनी जर जरी जर बक्ष दुल्हा यांना ७०० किंवा १४०० शिष्यांच्या काफिल्यासह दक्षिण भारतात (दख्खन) येथे इस्लामचा संदेश व सुफी विचार पोहोचवण्यासाठी पाठवले होते, ते शिष्यांच्या काफिल्यामध्ये सर्वात पुढे आणि नव्या वरासारखे तेजाने भरलेले दिसत म्हणून त्यांना दुल्हा म्हटले गेले, त्यांच्याकडे दैवी मदतीने येणाऱ्या संपत्तीतून गरिबांना व संतांना सोन्याची मदत केली जात असे या वरून त्यांना जर जरी जर बक्ष म्हणजे सोन्याचे दान करणारा ही पदवी मिळाली, त्यांनी वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी ७०९ हिजरी सन १३०९ मध्ये खुलताबाद येथे अखेरचा श्वास घेतला, दरवर्षी इस्लामिक रब्बी - उल - अव्वल महिन्यात त्यांचा उरूस भरतो, या वर्षी ७४० व्या उरूस निमित्त दिनांक १८ ऑगस्ट रोजी चूना, १९ ऑगस्ट रोजी फर्श व जलसा एक सिरतुन्नबी, तर २० ऑगस्ट गुरुवार रोजी सायंकाळी चार वाजता संदल शरीफ मिरवणूक निघणार आहे, २१ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता कुस्त्यांचे जंगी मुकाबला राहणार आहे, तर याच दिवशी रात्री चिरागा राहणार आहे, २२ ऑगस्ट रोजी ऑल इंडिया सेमिनार व महेफिल ए समा कव्वाली मुकाबला राहणार आहे, २३ ऑगस्ट रवीवार रोजी ऑल इंडिया मुशाएरा चा कार्यक्रम रहाणार आहे, २४ ऑगस्ट रोजी मुजाहिरा ए किरत, तसेच इस्लामिक तारखे नुसार २५ , किंवा २६ ऑगस्ट रोजी इद - ए - मिलादुन्नबी कार्यक्रम घेण्यात येणार आहे, *रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा*
    1
    खुलताबाद येथील हजरत ख्वाजा मुन्तजिबुद्दीन रहेमतुल्लाह अलैह उर्फ जर जरी जर बक्ष दुल्हा यांच्या उरूस ची जय्यत तयारी सुरू,
*खुलताबाद येथील प्रसिद्ध जर जरी जर बक्ष दुल्हा यांच्या उरूस ची जय्यत तयारी सुरू*
*हजरत ख्वाजा मुन्तजिबुद्दीन रहेमतुल्लाह अलैह यांचा ७४० वा उरुस २० ऑगस्ट पासून सुरू होत आहे,*
छत्रपती संभाजीनगर जिल्हा खुलताबाद येथील प्रसिद्ध दर्गा वली हजरत ख्वाजा मुन्तजिबुद्दीन रहेमतुल्लाह अलैह उर्फ जर जरी जर बक्ष दुल्हा यांच्या ७४० व्या उरूसाची जय्यत तयारी सुरू,
हजरत ख्वाजा मुन्तजिबुद्दीन रहेमतुल्लाह अलैह यांना जर जरी जर बक्ष दुल्हा म्हणून ओळखले जाते, हे १४ व्या शतकाच्या सुरुवातीस दिल्लीहून दख्खनमध्ये आलेले एक प्रसिद्ध सुफी संत होते, त्यांनी महाराष्ट्रातील औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) जिल्ह्याच्या खुलताबाद येथे आपले आध्यात्मिक कार्य केले, त्यांचा प्रसिद्ध दर्गा याच ऐतिहासिक खुलताबाद शहरात आहे, यांचे गुरू हजरत बाबा फरिदुद्दीन आहे तर प्रसिद्ध सुफी संत हजरत निजामुद्दीन औलिया ते निकटवर्तीय होते, हजरत निजामुद्दीन औलिया यांनी जर जरी जर बक्ष दुल्हा यांना ७०० किंवा १४०० शिष्यांच्या काफिल्यासह दक्षिण भारतात (दख्खन) येथे इस्लामचा संदेश व सुफी विचार पोहोचवण्यासाठी पाठवले होते,  ते शिष्यांच्या काफिल्यामध्ये सर्वात पुढे आणि नव्या वरासारखे तेजाने भरलेले दिसत म्हणून त्यांना दुल्हा म्हटले गेले, त्यांच्याकडे दैवी मदतीने येणाऱ्या संपत्तीतून गरिबांना व संतांना सोन्याची मदत केली जात असे या वरून त्यांना जर जरी जर बक्ष म्हणजे सोन्याचे दान करणारा ही पदवी मिळाली, त्यांनी वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी ७०९ हिजरी सन १३०९ मध्ये खुलताबाद येथे अखेरचा श्वास घेतला, दरवर्षी इस्लामिक रब्बी - उल - अव्वल महिन्यात त्यांचा उरूस भरतो, 
या वर्षी ७४० व्या उरूस निमित्त दिनांक १८ ऑगस्ट रोजी चूना, १९ ऑगस्ट रोजी फर्श व जलसा एक सिरतुन्नबी, तर २० ऑगस्ट गुरुवार रोजी सायंकाळी चार वाजता संदल शरीफ मिरवणूक निघणार आहे, २१ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता कुस्त्यांचे जंगी मुकाबला राहणार आहे, तर याच दिवशी रात्री चिरागा राहणार आहे, 
२२ ऑगस्ट रोजी ऑल इंडिया सेमिनार व महेफिल ए समा कव्वाली मुकाबला राहणार आहे, 
२३ ऑगस्ट रवीवार रोजी ऑल इंडिया मुशाएरा चा कार्यक्रम रहाणार आहे, 
२४ ऑगस्ट रोजी मुजाहिरा ए किरत, तसेच इस्लामिक तारखे नुसार २५ , किंवा २६  ऑगस्ट रोजी इद - ए - मिलादुन्नबी कार्यक्रम घेण्यात येणार आहे, 
*रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा*
    user_AKBAR SHAHA REPORTER
    AKBAR SHAHA REPORTER
    Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • ज्योती नगरातील चायनीज हॉटेल संचालक महिलेचे गंभीर आरोप; दुकान खाली करण्यासाठी दबाव आणल्याचा दावा ज्योती नगरातील चायनीज हॉटेल संचालक महिलेचे गंभीर आरोप; दुकान खाली करण्यासाठी दबाव आणल्याचा दावा छत्रपती संभाजीनगर : ज्योती नगर, शानूर मियाँ दर्गा रोड येथील चोपेस्टिक चायनीज हॉटेल संदर्भात एक प्रकरण समोर आले आहे. हॉटेल संचालक महिलेने आरोप केला आहे की, न्यायालयात प्रकरण सुरू असतानाही दुकान खाली करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात आहे. महिलेच्या म्हणण्यानुसार, त्यांना कथितरित्या त्रास देण्यात येत असून धमकी आणि मारहाणीचे आरोपही त्यांनी केले आहेत. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधित प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी आणि आपल्याला न्याय मिळावा, अशी मागणी महिलेने केली आहे. ❓ महत्त्वाचे प्रश्न न्यायालयात प्रकरण प्रलंबित असताना दुकान खाली करण्यासाठी दबाव आणला जात आहे का? महिलेने केलेल्या आरोपांची प्रशासनाकडून निष्पक्ष चौकशी होणार का? या प्रकरणात संबंधित दुसऱ्या पक्षाची भूमिका काय आहे? ⚠️ महत्त्वाची सूचना / डिस्क्लेमर या बातमीत नमूद केलेले सर्व आरोप संबंधित हॉटेल संचालक महिलेने केलेले आहेत. क्राईम रिपोर्टर या आरोपांची स्वतंत्रपणे पुष्टी करत नाही आणि कोणत्याही व्यक्तीला दोषी ठरवत नाही. क्राईम रिपोर्टरचा या प्रकरणाशी कोणताही वैयक्तिक संबंध नाही. जनतेचा आवाज संबंधित प्रशासनापर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष चौकशीद्वारे न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त करणे, एवढाच आमचा उद्देश आहे. संबंधित दुसऱ्या पक्षाला आपली बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे.
    1
    ज्योती नगरातील चायनीज हॉटेल संचालक महिलेचे गंभीर आरोप; दुकान खाली करण्यासाठी दबाव आणल्याचा दावा
ज्योती नगरातील चायनीज हॉटेल संचालक महिलेचे गंभीर आरोप; दुकान खाली करण्यासाठी दबाव आणल्याचा दावा
छत्रपती संभाजीनगर : ज्योती नगर, शानूर मियाँ दर्गा रोड येथील चोपेस्टिक चायनीज हॉटेल संदर्भात एक प्रकरण समोर आले आहे. हॉटेल संचालक महिलेने आरोप केला आहे की, न्यायालयात प्रकरण सुरू असतानाही दुकान खाली करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात आहे.
महिलेच्या म्हणण्यानुसार, त्यांना कथितरित्या त्रास देण्यात येत असून धमकी आणि मारहाणीचे आरोपही त्यांनी केले आहेत. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधित प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी आणि आपल्याला न्याय मिळावा, अशी मागणी महिलेने केली आहे.
❓ महत्त्वाचे प्रश्न
न्यायालयात प्रकरण प्रलंबित असताना दुकान खाली करण्यासाठी दबाव आणला जात आहे का?
महिलेने केलेल्या आरोपांची प्रशासनाकडून निष्पक्ष चौकशी होणार का?
या प्रकरणात संबंधित दुसऱ्या पक्षाची भूमिका काय आहे?
⚠️ महत्त्वाची सूचना / डिस्क्लेमर
या बातमीत नमूद केलेले सर्व आरोप संबंधित हॉटेल संचालक महिलेने केलेले आहेत. क्राईम रिपोर्टर या आरोपांची स्वतंत्रपणे पुष्टी करत नाही आणि कोणत्याही व्यक्तीला दोषी ठरवत नाही.
क्राईम रिपोर्टरचा या प्रकरणाशी कोणताही वैयक्तिक संबंध नाही. जनतेचा आवाज संबंधित प्रशासनापर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष चौकशीद्वारे न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त करणे, एवढाच आमचा उद्देश आहे.
संबंधित दुसऱ्या पक्षाला आपली बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे.
    user_क्राइम रिपोर्टर
    क्राइम रिपोर्टर
    Advertising Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • जात पडताळणी समितीविरोधात कोळी समाजाचा मोर्चा; टाळेठोक आंदोलन मराठवाड्यातील कोळी महादेव, कोळी मल्हार जमात बांधवांनी जात पडताळणी समितीच्या कथित अन्यायकारक कारभाराविरोधात छत्रपती संभाजीनगर येथे मोर्चा काढला. जात प्रमाणपत्र व पडताळणी प्रक्रियेत वारंवार अडचणी निर्माण होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. समिती कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करत आंदोलकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
    1
    जात पडताळणी समितीविरोधात कोळी समाजाचा मोर्चा; टाळेठोक आंदोलन
मराठवाड्यातील कोळी महादेव, कोळी मल्हार जमात बांधवांनी जात पडताळणी समितीच्या कथित अन्यायकारक कारभाराविरोधात छत्रपती संभाजीनगर येथे मोर्चा काढला.
जात प्रमाणपत्र व पडताळणी प्रक्रियेत वारंवार अडचणी निर्माण होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. समिती कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करत आंदोलकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
    user_Marathi News Point
    Marathi News Point
    Video editing service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.