Shuru
Apke Nagar Ki App…
*नवोदय विद्यालयातील अनुष्का पाटोळे विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणी धिरज विलासराव देशमुख यांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट* *➡️पारदर्शकपणे तपास होवून दोषींवर कडक कार्यवाही व्हावी यासाठी निवेदन देवून केली मागणी* https://youtube.com/shorts/P-CBPb9bgE8?feature=share
फोटो क्राईम न्यूज
*नवोदय विद्यालयातील अनुष्का पाटोळे विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणी धिरज विलासराव देशमुख यांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट* *➡️पारदर्शकपणे तपास होवून दोषींवर कडक कार्यवाही व्हावी यासाठी निवेदन देवून केली मागणी* https://youtube.com/shorts/P-CBPb9bgE8?feature=share
- Phatha NoorLatur, Maharashtra😤2 hrs ago
- Phatha NoorLatur, Maharashtra😤2 hrs ago
More news from Maharashtra and nearby areas
- *नवोदय विद्यालयातील अनुष्का पाटोळे विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणी धिरज विलासराव देशमुख यांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट* *➡️पारदर्शकपणे तपास होवून दोषींवर कडक कार्यवाही व्हावी यासाठी निवेदन देवून केली मागणी* https://youtube.com/shorts/P-CBPb9bgE8?feature=share1
- सोन्याचे बनावट बिस्किट विकणारी टोळी गजाआड! सोन्याच्या बनावट बिस्किटांचा करायचे धंदा !! एलसीबीच्या बावकरा समोर कुठपर्यंत तग धरेल पळपुटा बंदा ? लातूर (ॲड. एल पी उगिले) लातूर जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा महाराष्ट्र मध्ये अव्वल ठरू पाहत आहे. अत्यंत गुंतागुंतीचे आणि किचकट गुन्हे देखील सहजपणे उलगडून आरोपींना जेलची हवा दाखवण्यामध्ये सध्या या पथकाचा कोणी हात धरू शकत नाही. जिल्ह्यातच नव्हे तर परिसरातील जिल्ह्यात देखील आपले गुप्त बातमीदाराचे जाळे पसरवणारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या तपासाच्या शैलीच्या बाबतीत तर बोलायलाच नको त्याही पलीकडे जाऊन सध्या त्यांनी जमवलेली टीम हि लाजबाब आहे, असे म्हटले तर वावगे होणार नाही. अशाच या पथकाला जेव्हा जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी ग्रामीण भागातील साध्या भोळ्या माणसांची होत असलेली फसवणुकीच्या संदर्भामध्ये माहिती दिली आणि अशा फसवणुकीपासून नागरिकांना सावध करावे तसेच ही फसवणूक करणारी जी टोळी आहे त्या टोळीचा ही पडदाफास करावा, अशा सूचना केल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर आणि त्यांच्या पथकाने त्या अनुषंगाने माहिती मिळवायला सुरुवात केली. महाराष्ट्र लगेचच्या कर्नाटक राज्यात तसेच मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात सोने खरेदीसाठी इच्छुक असलेले मात्र वाढलेल्या सोन्याच्या भावामुळे हैरान झालेले ग्राहक शोधून त्यांना खरे सोने म्हणून बोगस आणि बनावट सोन्याच्या विटा बिस्किटाच्या स्वरूपामध्ये विकून त्यांची फसवणूक करणारी मोठी टोळी सक्रिय झाल्याची माहिती हाती लागली. सुतावरून स्वर्ग गाठणाऱ्या या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने लगेच यासंदर्भामध्ये घडलेल्या विविध गुन्ह्याच्या संदर्भामध्ये माहिती मिळवायला सुरुवात केली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी आपली वेगवेगळी पथके निर्माण केली त्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या आणि आपले गोपनीय बातमीदार सक्रिय केले. अशा पद्धतीचे सोन्याचे बनावट आणि डुप्लिकेट बिस्किटे बनवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा शोध घेण्याच्या दृष्टीने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथके बनवत असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी आपल्या गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे राजेश घाडगे प्रमोद देशमुख तसेच पोलिस अंमलदार साहेबराव हाके रियाज सौदागर राजेश कंचे मोहन सुरवसे युवराज गिरी मनोज खोसे आनंद हल्लाळे प्रवीण कोळसुरे सिद्धेश्वर मदने जमीर शेख राहुल कांबळे प्रदीप चोपणे व्यंकटेश निटुरे संतोष खांडेकर शैलेश सुडे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने अंजली गायकवाड यांची वेगवेगळी पथके निर्माण करून त्यांना उदगीर शहर पोलीस स्टेशन, उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन, औसा पोलीस स्टेशन देवणी पोलीस स्टेशन लातूर येथील शिवाजीनगर पोलीस स्टेशन तसेच चाकूर येथील पोलीस स्टेशन या ठिकाणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 318 (4), 3(5) कलमान्वये दाखल असलेल्या विविध गुन्ह्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन करून तपास करण्याच्या आवश्यक त्या सूचना दिल्या आणि पथके रवाना केली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सक्रिय झालेल्या या पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमर सुरेश केंद्रे यांनी अत्यंत चौकस पणे आपल्या पथकाचे काम बजावले आणि त्या संदर्भामध्ये संक्रांतीच्या पूर्वसंध्येला बनावट सोने खरे सोने आहे म्हणून विकणाऱ्या टोळीचा शोध लावला केवळ शोधच लावला नाही तर या टोळीतील पाच आरोपींनाही ताब्यात घेऊन त्यांच्याकडून जवळपास नऊ लाख एक हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यामध्ये देखील यश मिळवले आहे. यासंदर्भामध्ये पोलीस उपनिरीक्षक अमरकेंद्रे यांनी दिलेल्या अहवालानुसार पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भुजबळ पोलीस उपनिरीक्षक घाडगे पोलीस उपनिरीक्षक देशमुख पोलीस हवालदार हाके सौदागर कंचे सुरवसे गिरी खोसे हल्लाळे कोळसुरे मदने शेख कांबळे महिला पोलीस हवालदार मदने नीटुरे प्रदीप चोपने अंजली गायकवाड इत्यादी शासकीय वाहन क्रमांक एम एच 24 डी ७८३९ या वाहनाने लॅपटॉप सह प्रिंटर घेऊन रवाना होऊन लातूर जिल्ह्यात माला विषयी गुन्हे करणाऱ्या आरोपी यांचा शोध घेत गरुड चौक लातूर येथे आले असताना तेथे त्यांना मार्फत माहिती मिळाली की गरुड चौक लातूर ते राजीव गांधी चौक जाणाऱ्या रिंग रोडवरील सिकंदरपुर जाणाऱ्या रोडवर एक होंडा एक्टिवा स्कुटी मोटरसायकल व एक पांढऱ्या रंगाची इंडिगो कार्स पाच इसम सोन्याचे बिस्किट विक्री करण्यासाठी थांबलेले असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. ही माहिती हाती लागतात हे पथक तातडीने पंचनाम्यातील नमूद दोन पंचांना बोलावून त्यांना मिळालेली माहिती सांगून पंच म्हणून हजर राहण्यास सांगितले असता त्यांनी होकार दिल्यानंतर त्यांना सोबत घेऊन मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी सापळा लावून बातमीदारांनी सांगितल्याप्रमाणे गाड्यांचा शोध घेतला असता नमूदकार व स्कुटी मोटरसायकल सह पाच इसम पंचायत समक्ष अंदाजे पाच वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेऊन त्यांचे नावे गाव याबाबत विचारणा केली असता त्यांनी आपली नावे असे सांगितली की, अभिमान राजेंद्र कांबळे (वय 25 वर्ष राहणार तुपडी तालुका निलंगा जिल्हा लातूर), धनंजय बालाजी गायकवाड (वय 28 वर्ष राहणार दगडवाडी तालुका जिल्हा लातूर), बालाजी प्रशांत कांबळे (वय 22 वर्ष राहणार तुपडी तालुका निलंगा जिल्हा लातूर), बालाजी विठ्ठल गायकवाड (वय 54 वर्ष राहणार भातखेडा तालुका जिल्हा लातूर), सचिन बालाजी गायकवाड (वय 28 वर्षे राहणार मेघराज नगर शाहू चौक लातूर) असे असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन त्यांची व त्यांच्याकडील कार व स्कुटी मोटरसायकलची पंचायत समक्ष अंग जडती घेतली असता त्यांच्याकडील कार मध्ये एका लाल रंगाच्या पिशवीमध्ये सोनेरी रंगाचे डुप्लिकेट 16 बिस्किटे व सोनेरी रंगाच्या पिळ दिलेल्या तीन अंगठ्या तसेच सोन्याचे दागिने व रोख एक लाख 80 हजार रुपये मिळून आले. त्यांच्याकडे या आढळून आलेल्या बोगस बिस्किटे व सोन्याच्या दागिन्याच्या संदर्भात व माला विषयी गुन्ह्याच्या अनुषंगाने विश्वासात घेऊन विचारपूस केली असता आरोपी क्रमांक एक ते चार यांनी सांगितले की सचिन बालाजी गायकवाड व आमचा फरार साथीदार संदीप दगडू जाधव वय अंदाजे 27 वर्ष राहणार सलगरा तालुका जिल्हा लातूर हाल मुक्काम जठाळ कॉलनी लातूर हे दोघे सोनार असून ते आम्हाला सोन्याचे डुप्लिकेट बिस्किटे व अंगठ्या व इतर सोन्याचे दागिने बनवून देऊन आम्हास लोकाकडे जाऊन विक्री करण्याचे भासून लोकांची फसवणूक करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेण्यास सांगतात त्याप्रमाणे आम्ही खालील प्रमाणे लोकांची फसवणूक करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी करून त्यातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम संदीप दगडू जाधव व सचिन बालाजी गायकवाड यांच्याकडे दिलेले आहेत आम्ही चौघांनी मिळून आमच्याकडील सदर मिळून आलेल्या टाटा इंडिगो कार क्रमांक एम एच 23 वाय 92 22 व होंडा एक्टिवा स्कुटी मोटरसायकल क्रमांक एम एच २४ बी झेड 93 झिरो आठ या गाडीने जाऊन मागील एक वर्षापासून लातूर जिल्ह्यातील उदगीर बस स्थानकाच्या बाजूच्या रोडवर एका महिलेस सोन्याचे बिस्कीट खाली पडलेले कोणाचे आहे म्हणून तिच्याकडील कानातील सोन्याचे फुले फसवून करून चोरी केली आहे तसेच चार महिन्यापूर्वी आवसा येतील कुमार स्वामी शाळेच्या बाजूच्या रोडवर एका महिलेस तिच्याकडे मनी मंगळसूत्र कानातील फुले फसवणूक करून चोरी केली आहेत एक वर्षांपूर्वी दोन नंबर बस स्थानक लातूर येथे एका डुप्लिकेट सोन्याचे दागिने देऊन त्याची फसवणूक करून तीन लाख चोरी केली आहे आठ महिन्यापूर्वी मौजे देवणी येथे सोन्याचे दागिने उजळून देतो म्हणून फसवणूक करून सोन्याचे गंठण चोरी केले आहे सात महिन्यापूर्वी लातूर रोड बायपास येथे एक विश्वास महिलेस अडून आम्ही पोलिस आहोत म्हणून त्यांची फसवणूक करून सोन्याचे दागिने चोरी केले आहेत आठ महिन्यापूर्वी मौजे हेर रोडवर एक महिलेस मोटार सायकल वर बसून नेऊन तिची फसवणूक करून सोन्याची बोरमाळ चोरी केली आहे तसेच लातूर जिल्ह्यातील इतर ठिकाणी पण फसवणूक करून चोरी केलेली आहे वगैरे नमूद ठिकाणी फसवणूक करून चोरी केलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम संदीप दगडू जाधव व सचिन बालाजी गायकवाड यांच्याकडे दिलेले आहेत आमच्याकडे मिळून आलेले सोन्याचे व रोख रक्कम संदीप जाधव याने दिलेली आहेत व इतर सर्व सोन्याचे दागिने व रोख रक्कम संदीप जाधव यांच्याकडे असून वर नमूद सर्व गुन्हे संदीप जाधव यांच्या सांगण्यावरून केलेले असल्याचे सांगितले त्यानुसार नमूद रोख रक्कम सोन्याचे दागिने तसेच मोटार सायकल व कार दोन्ही पंचा समक्ष ताब्यात घेण्यात आली आहे आरोपी वर नमूद प्रमाणे सांगितलेल्या सांगितलेल्या ठिकाणावरून लातूर जिल्हा पोलीस स्टेशनच्या अभिलेखाची पाहणी केली असता नमूद फसवणूक करून चोरीबाबत उदगीर शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 284 /25 कलम 318 (4), 3 (5) भारतीय न्याय संहिता तसेच पोलीस स्टेशन औसा येथे गुन्हा रजिस्टर नंबर 325/25 प्रमाणे त्याच कलमाखाली तसेच पोलीस स्टेशन चाकूर येथे गु.र. नंबर 262/25 गुन्ह्यात त्याच कलमाखाली गुन्हा नोंद करण्यात आला होता तसेच अशाच प्रकारे पोलीस स्टेशन शिवाजीनगर येथे गुरन 261 /25 , पोलीस स्टेशन उदगीर ग्रामीण येथे गुरन 116 /25, पोलीस स्टेशन चाकूर येथे गुरन 262 /25 प्रमाणे वरील प्रमाणे कलमान्वये गुन्हा दाखल झाला असून मिळून आलेल्या सोन्याचे दागिने सोनाराकडे जाऊन पंचा समक्ष तपासणी केली असता सदरचे दागिने हे सोन्याचे असल्याचे सांगून तसे प्रमाणपत्र हस्तगत करण्यात आले त्यातील बिस्किट व अंगठ्या डुप्लिकेट असल्याचे सांगितले सदर सोन्याचे दागिने रोख रक्कम कार व मोटारसायकल आरोपीकडून पंचा समक्ष ताब्यात घेऊन जप्त करण्यात आले आहे. या अनुषंगाने सविस्तर माहिती घेतली असता उदगीर शहर पोलीस स्टेशन येथील गुन्ह्यामध्ये जवळपास 20 हजार रुपयांचा मुद्देमाल याच सात आरोपींनी मिळून फसवणूक करून चोरीस नेले होते तसेच औसा येथे नमूद असलेल्या गुन्ह्यांमध्ये 26 हजार रुपयांचा मुद्देमाल या आरोपीतांनी हस्तगत केला होता तोही जप्त करण्यात आला. याच आरोपींनी देवणी पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या पुण्यातील 90 हजार रुपयांचे दागिने व रोख रक्कम जप्त करून गुन्हा उघड केला आहे. अशाच पद्धतीने लातूर येथील शिवाजीनगर येथे दाखल असलेल्या गुन्ह्यात 90 हजारांचा मुद्देमाल याच आरोपी त्यांनी चोरल्याचे कबूल केले असून उदगीर ग्रामीण मध्ये देखील 50 हजार रुपयांच्या सोन्याची बोरमाळ व इतर दागिने चोरीस केल्याचे नमूद केले आहेत चाकूर येथील गुन्ह्यांमध्ये 75 हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. असा एकूण पाच लाख 50 हजार रुपयांचा ऐवज आणि पाच लाख रुपयांची इंडिगो कार तसेच पन्नास हजार रुपयांची एक्टिवा स्कुटी मोटरसायकल असा एकूण नऊ लाख 100 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सध्या सोन्याचे भाव प्रचंड वाढू लागल्याने आणि लग्नसराई आता जवळ आल्याने हे सापडलेले सोने आहे स्वस्तात विकत आहोत असे लोकांना फसवून सांगून बोगस बनावट आणि डुप्लिकेट सोने किंवा सोन्याचे दागिने किंवा बिस्किटे देऊन फसवणूक करण्यात ही टोळी चांगलीच पटाईत झाली होती त्यावरून त्यांनी केलेले विविध गुन्हे उघड करण्यात आले असून या टोळीकडून इतरही अनेक गुन्हे उघड होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे तपास पथकाने घेतलेल्या विशेष परिश्रमानंतर या संदर्भामध्ये सदरील टोळीला पुन्हा विश्वासात घेऊन त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की याशिवाय धाराशिव नांदेड परभणी जिल्ह्यातही डुप्लिकेट सोन्याचे बिस्किट देऊन फसवणुकीचे गुन्हे केल्याचे कबूल केले आहे या टोळीचा मुख्य सूत्रधार व टोळीचा प्रमुख फरार आरोपी संदीप जाधव यांच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे विशेष पथक रवाना करण्यात आले असून अधिक तपास करण्यासाठी या आरोपींना उदगीर शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.3
- देगलूर येथे पाऊस1
- पिता का प्रचार1
- माझं पहीलं नमन महाराष्ट्र व अठरापगड जातीच्या मराठी बांधवांना.. छत्रपतींचं प्राकट्य,संतांची मांदियाळी व पानीपत चा झुंजार रणसंग्राम या तीन घटनांमुळे भारतातच नव्हे तर जगभरात मराठी माणसांना प्रचंड आदर आहे..🙏🏼🚩🚩🚩1
- भिगवण–राशीन राज्य महामार्गावर ऊस वाहतूक ट्रॅक्टर आणि चारचाकी वाहनाचा भीषण अपघात….. अपघातात एकाचा दुर्दैवी मृत्यू….. या *राज्य महामार्गावरील हा सातवा अपघात……* इंदापूर तालुक्यातील भिगवण–राशीन राज्य महामार्गावर डिकसळ गावाजवळ ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर आणि चारचाकी स्विफ्ट कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. स्विफ्ट कार (एम.एच. 12 के.वाय. 1615) आणि ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर (एम.एच. 45 एफ 3025) यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडकेचा जोर इतका भीषण होता की ट्रॅक्टरचे दोन तुकडे झाले. या अपघातात अतुल बाबूलाल गजरमल (रा. कात्रज, ता. करमाळा, जि. सोलापूर) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर चारचाकी वाहनातील अन्य दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुदैवाने ट्रॅक्टर चालकाला मोठी दुखापत झाली नसली, तरी या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच भिगवण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. विशेष म्हणजे, सुरू असलेल्या ऊस गाळप हंगामात बारामती–राशीन राज्य महामार्गावरील हा सातवा बळी ठरला आहे. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांच्या बेफिकीर व नियमबाह्य वाहनचालना मुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.2
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- मनपा इलेक्शन के पोलीस तैयार1