Shuru
Apke Nagar Ki App…
खामगाव: जलंब येथे जिगाव प्रकल्पाचे HDPE पाईप स्टॉक यार्ड ला भीषण आग
Shivaji Bhosale
खामगाव: जलंब येथे जिगाव प्रकल्पाचे HDPE पाईप स्टॉक यार्ड ला भीषण आग
More news from महाराष्ट्र and nearby areas
- एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येतेय खामगाव शहरातून. जिथे केवळ नाचताना धक्का लागला म्हणून एका तरुणाला आपली सोन्यासारखी आयुष्याची किंमत मोजावी लागली आहे.खामगाव शहरातील बर्डे प्लॉट परिसरात २५ एप्रिलच्या मध्यरात्री एका लग्न समारंभाचा उत्साह सुरू होता. डीजेचा कडकडाट आणि तरुणांचा जल्लोष सुरू असतानाच नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. मृत तरुण, २३ वर्षीय शोएब खान अमीन खान, हा आपल्या मित्रांसोबत डीजेवर नाचत होता.नाचण्याच्या नादात त्याचा धक्का तिथेच असलेल्या एका दुसऱ्या तरुणाला लागला. खरं तर हे कारण अतिशय शुल्लक होतं, पण या धक्क्यामुळे अहंकाराची ठिणगी पडली आणि वादाला सुरुवात झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की, काही क्षणातच ४ ते ५ जणांच्या टोळीने संगनमत करून शोएबवर हल्ला चढवला.आरोपींनी केवळ हातघाईवर न थांबता धारदार शस्त्रे आणि फायटरचा वापर केला. अत्यंत निर्घृणपणे शोएबवर वार करण्यात आले. या अचानक झालेल्या हल्ल्यात शोएब रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. ज्या लग्नात काही वेळापूर्वी आनंदाचे वातावरण होते, तिथे आता फक्त किंकाळ्या आणि रक्ताचा सडा पाहायला मिळत होता.या घटनेमुळे संपूर्ण बर्डे प्लॉट परिसरात दहशतीचे सावट पसरले आहे. स्थानिक पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून आरोपींचा शोध सुरू आहे. एका तरुणाचा अशा प्रकारे बळी गेल्याने खामगावात हळहळ व्यक्त केली जात आहे.1
- कन्नड घाटात थरार, काळजाचा ठोका चुकवणारा अपघात जळगाव जिल्ह्यातील कन्नड घाटात एक भीषण अपघात घडला. होंडा सिटी कार दरीत कोसळली, मात्र मध्येच झाडाला अडकल्यामुळे मोठा अनर्थ टळला आणि कारमधील चारही प्रवासी थोडक्यात बचावले. प्राथमिक माहितीनुसार, घाटातील धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दरीत घसरली. काही अंतर खाली गेल्यानंतर कार झाडाला अडकली, त्यामुळे ती आणखी खोल दरीत जाण्यापासून थांबली. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मोठ्या प्रयत्नांनंतर कारमधील चौघांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. 📌 या घटनेमुळे घाटातील धोकादायक वळणांवर वाहन चालवताना अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.1
- Post by Sharad Dayedar1
- Post by Jansagar 9 Marathi1
- भगवंत महोत्सवात डिजिटल मीडिया पत्रकार संघ असोसिएशनचा सेवाभाव: भाविकांच्या मोफत पाणी वाटप1
- Madrasa Issue: Owaisi vs Himanta Biswa Sarma 🔥 Tez Rajneetik Takkar!1
- खामगाव: एका २२ वर्षीय तरुणाची किरकोळ वादातून चाकू आणि दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी याप्रकरणी चार आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मृतक शोएबखान अमिनखान याचा लग्नात नाचण्यावरून आरोपींशी वाद झाला होता. हाच राग मनात धरून बर्डे प्लॉट येथील जोशी ले-आउट मधील मैदानात आरोपींनी शोएब ला गाठले.आरोपींनी संगनमत करून शोएब वर चाकू, फायटर, वस्तरा आणि दगडाने हल्ला केला.त्याच्या डोक्यावर आणि शरीरावर गंभीर वार करण्यात आल्याने तो जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडला.याप्रकरणी मृताकाचा मामा मोहम्मद साबीर शेख मुसा यांनी शिवाजीनगर पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दिली.पोलिसांनी शेख आफताब, फैजान खान, शेख तालीब रा.खामगाव आणि शेख रफिक रा.अकोला याच्या मुलावर भारतीय न्याय संहिता नुसार कलम १०३ (१), ११८ (२), ११५ (२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत. यासंदर्भात माहिती देताना पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, "आरोपींच्या अटकेसाठी चार पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत.आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.1
- बुलढाणा जिल्ह्यामध्ये सध्या सूर्य अक्षरशः आग ओकत असून तापमानाचा पारा ४३ अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. खामगावसह संपूर्ण जिल्ह्यात उन्हाचा कडाका जाणवत असून घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांच्या जीवाची लाहीलाही होत आहेगेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाली आहे. विशेषतः मलकापूर, नांदुरा, खामगाव आणि शेगाव या शहरांमध्ये उन्हाचा तडाका सर्वाधिक जाणवत आहे. दुपारच्या वेळी कडक उन्हामुळे रस्ते ओस पडत असल्याचे चित्र दिसत आहेअत्यंत महत्त्वाची कामे करण्यासाठी बाहेर पडणारे नागरिक उन्हापासून बचावासाठी विशेष काळजी घेत आहेत. अनेक जण आपल्या डोक्याला कापड बांधून किंवा रुमालाने चेहरा झाकून प्रवास करताना दिसत आहेतवाढत्या उन्हाचा धोका लक्षात घेता प्रशासनाने खबरदारी म्हणून शासकीय रुग्णालयांमध्ये स्वतंत्र 'उष्मघात कक्षाची' स्थापना केली आहेआरोग्य विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कडक उन्हाच्या वेळी शक्यतो बाहेर पडू नये. तसेच, शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्यावे आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी1
- बार्शीत भक्तीरसाचा महापूर..... शिवलीलाताई पाटील यांच्या कीर्तनाला महिलांचा विक्रमी प्रतिसाद..!1