अनुपस्थिती व हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही; १५ ऑगस्टनंतर कठोर कारवाईचा आमदार प्रशांत बंब यांचा इशारा 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान' अंतर्गत आंबेलोहोळ व खुलताबाद येथे आयोजित समाधान शिबिरात आमदार प्रशांत बंब यांनी नागरिकांशी संवाद साधत महसूल विभागाच्या विविध सेवांचा आढावा घेतला. यावेळी ७/१२ उतारे, विविध दाखले, प्रमाणपत्रे तसेच महसुली कामांशी संबंधित नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यात आले. शासनाच्या योजना व सेवा थेट जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा शिबिरांचे महत्त्व अधोरेखित करत लोकाभिमुख, पारदर्शक व गतिमान प्रशासनासाठी सर्वांनी जबाबदारीने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्पष्ट इशारा देताना, अनुपस्थिती आणि हलगर्जीपणा कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, १५ ऑगस्टनंतर अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आमदार प्रशांत बंब यांनी दिला. जनतेला शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळावा, यासाठी प्रशासनाने अधिक तत्परतेने कार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.
अनुपस्थिती व हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही; १५ ऑगस्टनंतर कठोर कारवाईचा आमदार प्रशांत बंब यांचा इशारा 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान' अंतर्गत आंबेलोहोळ व खुलताबाद येथे आयोजित समाधान शिबिरात आमदार प्रशांत बंब यांनी नागरिकांशी संवाद साधत महसूल विभागाच्या विविध सेवांचा आढावा घेतला. यावेळी ७/१२ उतारे, विविध दाखले, प्रमाणपत्रे तसेच महसुली कामांशी संबंधित नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यात आले. शासनाच्या योजना व सेवा थेट जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा शिबिरांचे महत्त्व अधोरेखित करत लोकाभिमुख, पारदर्शक व गतिमान प्रशासनासाठी सर्वांनी जबाबदारीने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्पष्ट इशारा देताना, अनुपस्थिती आणि हलगर्जीपणा कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, १५ ऑगस्टनंतर अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आमदार प्रशांत बंब यांनी दिला. जनतेला शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळावा, यासाठी प्रशासनाने अधिक तत्परतेने कार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.
- शासकीय कार्यक्रमात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांना आमंत्रण नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांसमोर तक्रार *ब्रेकिंग छत्रपती संभाजीनगर* शासकीय कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या सदस्यांना डावलले महा राजस्व अभियानाच्या कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्यांना आमंत्रणच मिळाले नसल्याची मंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांसमोर सभापतीची खंत वारंवार जिल्हा परिषदेच्या सदस्यांना आमंत्रण केली होती तक्रार तीन तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्यांना डावलल्याची मंत्र्यांचे उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार2
- छत्रपती संभाजीनगर -पैठणच्या जायकवाडी धरणांचा पाणीसाठा ८२.१८ टक्क्यांवर छत्रपती संभाजीनगर पैठणच्या जायकवाडी धरणांचा पाणीसाठा ८२.१८ टक्क्यांवर धरण उजव्या कालव्यातून १,१००, डाव्या कालव्यातून ७०० क्युसेक विसर्ग गोदावरीच्या वरच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जायकवाडी धरणातील पाण्याची आवक वेगाने सुरू आहे. रविवारी सकाळी धरणात ५० हजार क्युसेक वेगाने पाणी जमा होत आहे. त्यामुळे धरणाचा उपयुक्त पाणीसाठा ८२.१८ टक्क्यांवर पोहोचला आहे. उजव्या कालव्यातून १,१०० आणि डाव्या कालव्यातून ७०० क्युसेक विसर्ग सुरू आहे.2
- रहेमानिया कब्रस्तान परिसरात 100 वृक्षांची लागवड; स्लॉटर हाऊसला विरोध कायम अमजद खान अकबर खान यांच्या पुढाकारातून वृक्षारोपण महानगरपालिकेकडून स्लॉटर हाऊस उभारणीसाठी प्रयत्न सुरू; स्लॉटर हाऊस उभारण्यास स्थानिकांचा तीव्र विरोध अकबर खान.. आज दिनांक 2 रविवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार* जालना शहरातील गांधी नगर भागातील रहेमानिया कब्रस्तान परिसरात सामाजिक कार्यकर्ते अमजद खान अकबर खान यांच्या पुढाकारातून वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत मान्यवरांच्या हस्ते तब्बल 100 वृक्षांची लागवड करण्यात आली. या माध्यमातून परिसराचे सुशोभीकरण करण्यासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन जालन्याचे आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते नियोजित करण्यात आले होते. रहेमानिया कब्रस्तान परिसरात 100 वृक्षांची लागवड; स्लॉटर हाऊसला विरोध कायम अमजद खान अकबर खान यांच्या पुढाकारातून वृक्षारोपण महानगरपालिकेकडून स्लॉटर हाऊस उभारणीसाठी प्रयत्न सुरू; स्लॉटर हाऊस उभारण्यास स्थानिकांचा तीव्र विरोध अकबर खान.. आज दिनांक 2 रविवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार* जालना शहरातील गांधी नगर भागातील रहेमानिया कब्रस्तान परिसरात सामाजिक कार्यकर्ते अमजद खान अकबर खान यांच्या पुढाकारातून वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत मान्यवरांच्या हस्ते तब्बल 100 वृक्षांची लागवड करण्यात आली. या माध्यमातून परिसराचे सुशोभीकरण करण्यासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन जालन्याचे आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते नियोजित करण्यात आले होते.1
- बाल तस्करी रोखण्यासाठी जालन्यात जनजागृती मोहीम; रेल्वे स्थानकावर नागरिकांना दिला जागर ‘जस्ट राइट फॉर चिल्ड्रेन’ आणि ISWSचा संयुक्त उपक्रम; बाल तस्करी आणि बालमजुरीविरोधात जनजागृती बाल तस्करी रोखण्यासाठी जालन्यात जनजागृती मोहीम; रेल्वे स्थानकावर नागरिकांना दिला जागर ‘जस्ट राइट फॉर चिल्ड्रेन’ आणि ISWSचा संयुक्त उपक्रम; बाल तस्करी आणि बालमजुरीविरोधात जनजागृती1
- *भोकरदन शहरातील रस्त्यांची दुरवस्था; खड्ड्यांमुळे वाहनधारक व नागरिक त्रस्त Bharat 24taas News भोकरदन | प्रतिनिधी जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरात झालेल्या पावसामुळे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक सिल्लोड रोड, भोकरदन सिल्लोड या महा मार्गांवरील अनेक सिमेंट रस्त्यांवर जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना वाहने चालविताना अक्षरशः कसरत करावी लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांसह चारचाकी वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि पादचाऱ्यांनाही ये-जा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पावसामुळे रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून तातडीने दुरुस्तीची आवश्यकता आहे. संभाव्य अपघात टाळण्यासाठी संबंधित विभागाने त्वरित पाहणी करून खड्डे बुजवावेत, अशी मागणी वाहनधारक व नागरिकांकडून करण्यात येत आहे. छायाचित्र -कमलकिशोर जोगदंडे1
- तर.... जनता वसाहत नाल्याचा पाणी प्रश्न असा सुटणार आमदार किशोर आप्पा पाटील....!!! तर.... जनता वसाहत नाल्याचा पाणी प्रश्न असा सुटणार आमदार किशोर आप्पा पाटील....!!!1
- पावसाने लासूर स्टेशनचा आठवडी बाजार चिखलात; व्यापाऱ्यांचा बाजार थेट रस्त्यावर सततच्या पावसामुळे लासूर स्टेशन येथील आठवडी बाजाराची जागा चिखलमय झाल्याने व्यापाऱ्यांना बाजार थेट रस्त्यावर भरवावा लागला. त्यामुळे वाहनचालकांना वाहतूक कोंडी व गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. बाजाराच्या ठिकाणी तातडीने मुरूम टाकून व्यवस्था सुधारावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी ग्रामपंचायतीकडे केली आहे. पावसाळ्यात दरवर्षी हीच समस्या निर्माण होत असल्याने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचीही मागणी होत आहे.1
- बसस्थानकात आला हार्ट अटॅक, कंडक्टरने वाचवला जीव कंडक्टरची माणुसकीचे दर्शन ANC - छत्रपती संभाजीनगर येथील मध्यवर्ती बसस्थानकात एका महिला प्रवाशाला अचानक हृदयविकाराचा झटका येऊन ती बेशुद्ध पडली. यावेळी वाहक संगीता पालवे यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ सीपीआर देण्यास सुरुवात केली. सुरक्षारक्षक कविता भुतेकर यांनीही मदत केली. वेळेत मिळालेल्या प्राथमिक उपचारांमुळे महिलेची श्वसनक्रिया पूर्ववत होण्यास मदत झाली. त्यानंतर तिला तातडीने शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. या धाडसी आणि तत्पर कृतीबद्दल प्रवासी व एसटी कर्मचाऱ्यांनी संगीता पालवे यांचे कौतुक केले.1