Shuru
Apke Nagar Ki App…
Sharad Dayedar
More news from महाराष्ट्र and nearby areas
- बक्षीस पत्राचे फेरफार करण्याकरिता पाच हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या लाचखोर उपअधीक्षकांसह परीरक्षण भूमापक याला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक यवतमाळ यांनी उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात मंगळवारी दि. ३ फेब्रुवारी रोजी केली. या कारवाईने कार्यालयात एकच खळबळ उडाली. आरोपी सखाराम नरसिंग पवार उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय दिग्रस व आशिष काशिनाथ शेलोकर नझुल परीरक्षण भूमापक, भूमी अभिलेख कार्यालय दिग्रस असे लाचखोर अधिकाऱ्यांचे नावे आहे. दिग्रस भूमी अभिलेख कार्यालयात भूमापक आशिष शेलोकार यांनी तक्रारदार यांच्या कडुन पंचासमक्ष लाच स्वीकारली.रक्कमेतील दोन हजार पाचशे रुपये ठेऊन उर्वरित रक्कम दोन हजार पाचशे रुपये उपअधीक्षक सखाराम नरसिंग पवार यांना दिले. दोन्ही आरोपींना उप अधीक्षक भूमी अभिलेख याचे कक्षामध्ये रंगेहाथ पकडण्यात आले आहे. हि कारवाई पोलीस अधीक्षक बापु बागर, अँटी करप्शन ब्युरो अमरावती, सचित्र शिंदे अप्पर पोलीस अधीक्षक अमरावती, व पोलीस उपअधीक्षक अभय अष्टेकर, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोज ओरके अँटी करप्शन ब्युरो यवतमाळ, पोलीस निरीक्षक अर्जुन घनवट, यवतमाळ, अंमलदार अतुल मत्ते, सुधीर कांबळे, सचिन भोयर, राकेश सावसाकडे, पोलीस शिपाई सुरज मेश्राम, आकाश सहारे, महिला पोलिस मयुरी कोल्हे, चालक अतुल नागमोते यांनी सापळा यशस्वी केला.1
- नक्की. तुमचा मुद्दा ठेवत भाषा थोडी अधिक धारदार, स्पष्ट आणि जनआवाहनात्मक अशी सुधारित मांडणी देतो 👇 सुधारित आवाहन (प्रचारासाठी योग्य) खामगांव शहरातील नागरिकांनो, खामगांव नगर परिषदेच्या वतीने मालमत्ता करामध्ये अव्वाच्या सव्वा वाढ करण्यात आलेली आहे. ही अन्यायकारक व जुलमी वाढ सर्वसामान्य नागरिकांवर मोठा आर्थिक भार टाकणारी आहे. ही मालमत्ता कर वाढ रद्द व्हावी किंवा किमान कमी व्हावी, यासाठी खामगांव नगर परिषद हद्दीतील प्रत्येक मालमत्ता धारकाने वैयक्तिकरित्या हरकत अर्ज सादर करून या अन्यायकारक निर्णयाचा ठाम विरोध करावा, असे आवाहन खामगांव शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात येत आहे.1
- खामगाव: शहरातील अत्यंत गजबजलेला परिसर असलेल्या मस्तान चौकात रात्री च्या सुमारास दोन बेवारस बैलांमध्ये जोरदार झुंज झाली. या भीषण युद्धामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, भररस्त्यात सुरू असलेल्या या प्रकारामुळे नागरिकांची मोठी धावपळ झाली. मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी अचानक दोन बैल एकमेकांसमोर आले आणि त्यांच्यात झुंज सुरू झाली. मस्तान चौक हा शहरातील मुख्य व्यापारी मार्ग असल्याने तिथे नेहमीच लोकांची वर्दळ असते. झुंज सुरू होताच आसपासच्या दुकानदारांनी आपली दुकाने सुरक्षित केली, तर वाहनधारकांनी आपली वाहने वळवून पळ काढला. एककीकडे भीतीचे वातावरण असताना, दुसरीकडे ही झुंज पाहण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. अनेक तरुण या घटनेचे व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद करताना दिसले. मात्र, या गर्दीमुळे बैलांना बाजूला जाण्यास जागा उरली नाही आणि ते अधिकच बिथरले. या प्रकारामुळे चौकातील वाहतूक सुमारे अर्धा ते एक तास पूर्णपणे विस्कळीत झाली होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र दुचाकींचे किरकोळ नुकसान झाल्याची चर्चा आहे. शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त नगरपालिकेने तातडीने करावा, अशी मागणी आता मस्तान चौकातील स्थानिक रहिवासी आणि व्यापाऱ्यांकडून केली जात आहे.1
- नागरीकांच्या आरोग्यासी खेळ करणा-या फॅक्टरीवर धाड टाकुन ७० हजाराचा माल जप्त करण्यात आला. यवतमाळातील लोहारा एमआयडीसीमध्ये घडल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी अन्न प्रशासन विभागाकडून या फॅक्टरीला सील ठोकण्यात आले आहे.1
- भाजप कार्यालय राळेगाव येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने घेण्यात आली पत्रकार परिषद राळेगाव शहरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज दिनांक 2 फेब्रुवारी रोजी सहा वाजता भाजपा कार्यालयात राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या उपस्थित पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत राळेगाव शहरातील विकास कामे पतदिव्यांचा प्रलंबित प्रश्न व नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून व डॉ. अशोकराव उईके यांच्या नेतृत्वात मंजूर झालेल्या पाणीपुरवठा योजनेबाबत पत्रकारांना माहिती देण्यात आली नजीकच्या काळात ही योजना लवकर कार्यान्वित होईल यासाठी योजना आखण्यात आली या पत्रकार परिषदेला भाजपा तालुका अध्यक्ष छायाताई पिंपरे, शुभम मुके व इतर पदाधिकारी व शहरातील पत्रकार बांधव उपस्थित होते.1
- Post by Raghunath Aghao1
- #Hashtag #IndiaUSDeal #भारतअमेरिकाकरार #शेतकरी #DrAjitNavale #AgricultureNews #ShegaonLive अशाच महत्त्वाच्या आणि निर्भीड बातम्यांसाठी Shegaon Live ला Subscribe करा1
- खामगाव : तालुक्यातील पोरज येथील शेतकऱ्यांनी सन 2024-25 च्या खरीप हंगामात एका नामांकित कंपनीचे मका बियाणे खरेदी करून शेतात पेरणी केली होती. परंतु मका पीक वाढले पण कणसात दाणेच भरले नाहीत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.त्यामुळे शेतकऱ्यांनी तालुका कृषि कार्यालय अधिकारी कार्यालयाकडे तक्रार करून प्रति एकरी 60 हजार रूपये भरपाई देण्यात यावी तसेच संबंधित कंपनीविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात यावी अन्यथा 2 फेब्रुवारी पासून कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. परंतु कृषि अधिकाऱ्यांनी तक्रारीची दखल घेतली नसल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी 2 फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण सुरू केले होतो.अखेर आज तिसऱ्या दिवशी 4 फेब्रुवारी रोजी कृषि प्रशासनाला जाग आली आणि उपोषणकर्त्या शेतकऱ्यांसोबत तालुका कृषि अधिकारी सुनिल पवार यांनी भेट देऊन चर्चा केली. यावेळी तालुका कृषि अधिकारी यांनी प्रति एकर 25 हजार रूपये नुकसान भरपाई मिळवून देण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या हस्ते नारळ पाणी घेऊन उपोषणाची सांगता केली. यावेळी शिवसेनेचे अमोल अंधारे, तालुका प्रमुख राजेंद्र बघे, विजय बोराडे आदी उपस्थित होती.3
- आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी जाणून घेतल्या राळेगाव शहरातील नागरिकांच्या समस्या राळेगाव राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी आज दिनांक 4 फेब्रुवारी रोजी तीन वाजता राळेगाव शहराला सदिच्छा भेट दिली या भेटीदरम्यान त्यांनी शहरातील नागरिकांच्या भेटी घेऊन विविध समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांच्यासोबत भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल्लसिंह चौहान, भाजपा तालुकाध्यक्ष सौ. छायाताई पिंपरे, शहराध्यक्ष शुभम मुके यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.1