logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

विद्यार्थ्यांत एआयबाबत जनजागृती; वेदपाठक इन्स्टिट्यूटचा उपक्रम शिरूर { डेली न्यूज पोस्ट 24} तंत्रज्ञानाच्या झपाट्याने बदलणाऱ्या युगात विद्यार्थ्यांनी आधुनिक ज्ञानाशी सुसंगत राहावे यासाठी शिरूर येथील वेदपाठक कम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या वतीने कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) विषयावर जनजागृती अभियान राबवण्यात आले. या उपक्रमांतर्गत शिरूर, पारनेर आणि श्रीगोंदा तालुक्यातील सुमारे २५ ते ३० शाळांना भेट देत दहावीच्या विद्यार्थ्यांना एआय तंत्रज्ञानाची माहिती प्रात्यक्षिकांसह देण्यात आली. या अभियानात विद्यार्थ्यांना एआयचा शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि भविष्यातील करिअरमध्ये कसा उपयोग होऊ शकतो, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच अभ्यासासाठी विविध डिजिटल माध्यमांचा वापर कसा करावा, माहिती शोधणे, प्रेझेंटेशन तयार करणे आणि सर्जनशील कामे सोप्या पद्धतीने कशी करता येतात याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. या कार्यक्रमात पुण्यातील प्रा. विजय नवले, डॉ. एल. डी. देशमुख, प्रा. प्रशांत टेंबरे आणि प्रा. दिगंबर ढोकले यांनी मार्गदर्शन केले. आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास विद्यार्थ्यांसमोर करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध होऊ शकतात, असा संदेश त्यांनी दिला. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये वाढत चाललेल्या मोबाईलच्या अतिवापराबाबतही जागरूकता करण्यात आली. मोबाईलच्या अतिवापरामुळे अभ्यास, मानसिक आरोग्य आणि एकाग्रतेवर होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती देत मोबाईलचा मर्यादित व योग्य वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे २० शाळांतील प्राचार्यांनी ‘आदर्श प्राचार्य’ म्हणून संस्थेचे कौतुक करत सन्मानही केला. या कार्यक्रमाला विविध शाळांतील मुख्याध्यापक, प्राचार्य आणि शिक्षकांची उपस्थिती होती. केंद्रप्रमुख संजय वेदपाठक यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. पियुष वेदपाठक, यश नेवसे आणि सिद्धार्थ शेवंते यांनी या उपक्रमासाठी विशेष सहकार्य केले. विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची योग्य दिशा देणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरल्याचे मत शिक्षकांनी व्यक्त केले.

7 hrs ago
user_Satish Dhumal
Satish Dhumal
Media house शिरूर, पुणे, महाराष्ट्र•
7 hrs ago
de95e706-669b-48a6-a4ea-55376c0f2f72

विद्यार्थ्यांत एआयबाबत जनजागृती; वेदपाठक इन्स्टिट्यूटचा उपक्रम शिरूर { डेली न्यूज पोस्ट 24} तंत्रज्ञानाच्या झपाट्याने बदलणाऱ्या युगात विद्यार्थ्यांनी आधुनिक ज्ञानाशी सुसंगत राहावे यासाठी शिरूर येथील वेदपाठक कम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या वतीने कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) विषयावर जनजागृती अभियान राबवण्यात आले. या उपक्रमांतर्गत शिरूर, पारनेर आणि श्रीगोंदा तालुक्यातील सुमारे २५ ते ३० शाळांना भेट देत दहावीच्या विद्यार्थ्यांना एआय तंत्रज्ञानाची माहिती प्रात्यक्षिकांसह देण्यात आली. या अभियानात विद्यार्थ्यांना एआयचा शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि भविष्यातील करिअरमध्ये कसा उपयोग होऊ शकतो, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच अभ्यासासाठी विविध डिजिटल माध्यमांचा वापर कसा करावा, माहिती शोधणे, प्रेझेंटेशन तयार करणे आणि सर्जनशील कामे सोप्या पद्धतीने कशी करता येतात याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. या कार्यक्रमात पुण्यातील प्रा. विजय नवले, डॉ. एल. डी. देशमुख, प्रा. प्रशांत टेंबरे आणि

02506fec-829d-4e9f-b7a8-0f866afd8f5d

प्रा. दिगंबर ढोकले यांनी मार्गदर्शन केले. आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास विद्यार्थ्यांसमोर करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध होऊ शकतात, असा संदेश त्यांनी दिला. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये वाढत चाललेल्या मोबाईलच्या अतिवापराबाबतही जागरूकता करण्यात आली. मोबाईलच्या अतिवापरामुळे अभ्यास, मानसिक आरोग्य आणि एकाग्रतेवर होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती देत मोबाईलचा मर्यादित व योग्य वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे २० शाळांतील प्राचार्यांनी ‘आदर्श प्राचार्य’ म्हणून संस्थेचे कौतुक करत सन्मानही केला. या कार्यक्रमाला विविध शाळांतील मुख्याध्यापक, प्राचार्य आणि शिक्षकांची उपस्थिती होती. केंद्रप्रमुख संजय वेदपाठक यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. पियुष वेदपाठक, यश नेवसे आणि सिद्धार्थ शेवंते यांनी या उपक्रमासाठी विशेष सहकार्य केले. विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची योग्य दिशा देणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरल्याचे मत शिक्षकांनी व्यक्त केले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by NEWS 24 MAHARASHTRA
    1
    Post by NEWS 24 MAHARASHTRA
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • राहुरीत पोलिसांवर काही तरुणांनी चा हल्ला हल्ला करणारे तीन तरुण पोलिसांनी अटक करून भर बाजारपेठेमध्ये त्यांची धिंड काढले आहे
    1
    राहुरीत पोलिसांवर काही तरुणांनी चा हल्ला हल्ला करणारे तीन तरुण पोलिसांनी अटक करून भर बाजारपेठेमध्ये त्यांची धिंड काढले आहे
    user_पत्रकार जालिंदर आल्हाट
    पत्रकार जालिंदर आल्हाट
    Rahuri, Ahmednagar•
    5 hrs ago
  • ५० लाखांच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण; पोलिसांचा थरारक पाठलाग करून ५ आरोपी अटकेत पिंपरी : प्रतिनिधी, पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक, गुंडा विरोधी पथक आणि काळेवाडी पोलिसांच्या संयुक्त कारवाईत ५० लाख रुपयांच्या खंडणीसाठी एका व्यापाऱ्याचे अपहरण करणाऱ्या ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी थरारक पाठलाग करून अपहृत व्यक्तीची सुखरूप सुटका केली. ९ मार्च रोजी रहाटणी येथील शिवराजनगर परिसरातून एका व्यापाऱ्याचे स्विफ्ट कारमधून अपहरण करून आरोपींनी ५० लाख रुपयांची खंडणी मागितली होती. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती. याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखेच्या पथकांनी तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्हीच्या मदतीने तपास सुरू केला. आरोपी अपहृत व्यक्तीला उत्तरप्रदेशकडे घेऊन जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर संगमनेर टोल नाक्यावर सापळा रचण्यात आला. या कारवाईत पाच आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून दोन देशी पिस्तुल, सहा जिवंत काडतुसे, मोबाईल फोन, रोख रक्कम व स्विफ्ट कारसह एकूण १८.२८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान आरोपींनी अपहृत व्यक्तीला चंदनापुरी घाट परिसरात सोडून दिले होते. पोलिसांनी शोध घेऊन त्या व्यक्तीला सुखरूप ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा व काळेवाडी पोलिसांच्या पथकाने केली असून पुढील तपास सुरू आहे.
    1
    ५० लाखांच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण; पोलिसांचा थरारक पाठलाग करून ५ आरोपी अटकेत
पिंपरी : प्रतिनिधी, पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक, गुंडा विरोधी पथक आणि काळेवाडी पोलिसांच्या संयुक्त कारवाईत ५० लाख रुपयांच्या खंडणीसाठी एका व्यापाऱ्याचे अपहरण करणाऱ्या ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी थरारक पाठलाग करून अपहृत व्यक्तीची सुखरूप सुटका केली.
९ मार्च रोजी रहाटणी येथील शिवराजनगर परिसरातून एका व्यापाऱ्याचे स्विफ्ट कारमधून अपहरण करून आरोपींनी ५० लाख रुपयांची खंडणी मागितली होती. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती. याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखेच्या पथकांनी तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्हीच्या मदतीने तपास सुरू केला. आरोपी अपहृत व्यक्तीला उत्तरप्रदेशकडे घेऊन जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर संगमनेर टोल नाक्यावर सापळा रचण्यात आला.
या कारवाईत पाच आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून दोन देशी पिस्तुल, सहा जिवंत काडतुसे, मोबाईल फोन, रोख रक्कम व स्विफ्ट कारसह एकूण १८.२८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान आरोपींनी अपहृत व्यक्तीला चंदनापुरी घाट परिसरात सोडून दिले होते. पोलिसांनी शोध घेऊन त्या व्यक्तीला सुखरूप ताब्यात घेतले.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा व काळेवाडी पोलिसांच्या पथकाने केली असून पुढील तपास सुरू आहे.
    user_R A News
    R A News
    Local News Reporter Pimpri Chanchwad, Pune•
    6 hrs ago
  • Post by Maharashtra 18 news
    1
    Post by Maharashtra 18 news
    user_Maharashtra 18 news
    Maharashtra 18 news
    Pimpri Chanchwad, Pune•
    7 hrs ago
  • पिंपरी चिंचवड : - पिंपरी चिंचवड शहरातील एका व्यापाऱ्याचं 50 लाख रुपयांसाठी अपहरण करण्यात आले असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे, याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकाने संगमनेर येथे तब्बल 100 किलोमीटर पाठलाग करून पाच आरोपींना अटक करत व्यापाऱ्याची सुखरूप सुटका केली आहे, 9 मार्च रोजी सायंकाळी 5:15 च्या सुमारास राहटणी येथील शिवराज नगर येथून हॉटेलच्या बाहेरून एका चार चाकी वाहनातून *सुरेशकुमार बाबूमल जयस्वानी* या 47 वर्षीय व्यावसायिकाचा अपहरण करण्यात आलं होतं. याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात पाच अनोळखी व्यक्तीच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा आधार घेत या पाचही जणांना ताब्यात घेतला आहे. हे पाचही आरोपी मूळचे बिहार मधील असून अपहरण करण्याकरिता ते पिंपरी चिंचवड शहरात आले असल्याची माहिती समोर आली या अपहरणाचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील कैद झाला आहे.... #पिंपरीचिंचवड #अपहरण #व्यापारीअपहरण #खंडणीप्रकरण #पिंपरीचिंचवडपोलीस #गुंडाविरोधीपथक #राहटणी #काळेवाडीपोलीस #सीसीटीव्ही #गुन्हेवार्ता #पुणेबातम्या #क्राईमन्यूज #महाराष्ट्रबातम्या #PimpriChinchwad #KidnappingCase #BusinessmanKidnapped #CrimeNews #PuneCrime #PimpriChinchwadPolice #AntiGundaSquad #CCTVFootage #MaharashtraNews #BreakingNews #PuneNews #IndiaCrime
    1
    पिंपरी चिंचवड : -
पिंपरी चिंचवड शहरातील एका व्यापाऱ्याचं 50 लाख रुपयांसाठी अपहरण करण्यात आले असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे, याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकाने संगमनेर येथे तब्बल 100 किलोमीटर पाठलाग करून पाच आरोपींना अटक करत व्यापाऱ्याची सुखरूप सुटका केली आहे, 9 मार्च रोजी सायंकाळी 5:15 च्या सुमारास राहटणी येथील शिवराज नगर येथून हॉटेलच्या बाहेरून एका चार चाकी वाहनातून *सुरेशकुमार बाबूमल जयस्वानी*  या 47 वर्षीय व्यावसायिकाचा अपहरण करण्यात आलं होतं. याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात पाच अनोळखी व्यक्तीच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा आधार घेत या पाचही जणांना ताब्यात घेतला आहे. हे पाचही आरोपी मूळचे बिहार मधील असून अपहरण करण्याकरिता ते पिंपरी चिंचवड शहरात आले असल्याची माहिती समोर आली या अपहरणाचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील कैद झाला आहे....
#पिंपरीचिंचवड #अपहरण #व्यापारीअपहरण #खंडणीप्रकरण #पिंपरीचिंचवडपोलीस #गुंडाविरोधीपथक #राहटणी #काळेवाडीपोलीस #सीसीटीव्ही #गुन्हेवार्ता #पुणेबातम्या #क्राईमन्यूज #महाराष्ट्रबातम्या
#PimpriChinchwad #KidnappingCase #BusinessmanKidnapped #CrimeNews #PuneCrime #PimpriChinchwadPolice #AntiGundaSquad #CCTVFootage #MaharashtraNews #BreakingNews #PuneNews #IndiaCrime
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • #psi #atulshete #pcmc #pune #marathinews
    1
    #psi #atulshete #pcmc #pune #marathinews
    user_Loknyay News
    Loknyay News
    Media company पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • देहूरोड येथे सलामती पीर उर्स उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न.... ईदगाह मैदानातील दर्ग्यावर हजारो भाविकांची उपस्थिती; रमजाननिमित्त रोजा इफ्तार व लंगर-ए-आमची व्यवस्था... देहूरोड येथील ईदगाह मैदानात असलेल्या हजरत सलामती पीर दर्ग्यावर १४ वा उर्स उत्सव मोठ्या दिमाखात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. राज्यभरातून आलेल्या हजारो भाविकांनी दर्ग्यावर हजेरी लावून सलामती पीर साहेबांचे यांचे दर्शन घेतले. या उर्स उत्सवाचे आयोजन सलामती पीर दर्गा ट्रस्ट तसेच जामा मशीद ॲडहोक कमिटी यांच्या वतीने करण्यात आले होते. सध्या पवित्र रमजान महिना सुरू असल्याने ईदगाह मैदानात ट्रस्टच्या वतीने सर्व भाविकांसाठी रोजा इफ्तारची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच संध्याकाळी सर्वांसाठी लंगर-ए-आम चे आयोजन करण्यात आले होते. उर्स उत्सवानिमित्त दर्गा परिसरात दिवसभर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. भक्तांनी प्रार्थना करून सलामती पीर यांच्याप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला विशेष करून या उर्स साठी अनेक सुफी संत, इस्लामिक गुरु त्याचप्रमाणे सर्वधर्मचे मान्यवर व सर्वसामान्य नागरिक मोठे संख्येने उपस्थित होते.
    1
    देहूरोड येथे सलामती पीर उर्स उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न....
ईदगाह मैदानातील दर्ग्यावर हजारो भाविकांची उपस्थिती; रमजाननिमित्त रोजा इफ्तार व लंगर-ए-आमची व्यवस्था...
देहूरोड येथील ईदगाह मैदानात असलेल्या हजरत सलामती पीर दर्ग्यावर १४ वा उर्स उत्सव मोठ्या दिमाखात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. राज्यभरातून आलेल्या हजारो भाविकांनी दर्ग्यावर हजेरी लावून सलामती पीर साहेबांचे यांचे दर्शन घेतले.
या उर्स उत्सवाचे आयोजन सलामती पीर दर्गा ट्रस्ट तसेच जामा मशीद ॲडहोक कमिटी यांच्या वतीने करण्यात आले होते.
सध्या पवित्र रमजान महिना सुरू असल्याने ईदगाह मैदानात ट्रस्टच्या वतीने सर्व भाविकांसाठी रोजा इफ्तारची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच संध्याकाळी सर्वांसाठी लंगर-ए-आम चे आयोजन करण्यात आले होते.
उर्स उत्सवानिमित्त दर्गा परिसरात दिवसभर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. भक्तांनी प्रार्थना करून सलामती पीर यांच्याप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला विशेष करून या उर्स साठी अनेक सुफी संत, इस्लामिक गुरु त्याचप्रमाणे सर्वधर्मचे मान्यवर व सर्वसामान्य नागरिक मोठे संख्येने उपस्थित होते.
    user_Shaurya Varta News
    Shaurya Varta News
    Local News Reporter पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • नांदेड येथे उद्योजक मा.नितीन भाऊ गवळी यांना सर्वोत्कृष्ट पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले याबद्दल सर्व क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे
    1
    नांदेड येथे उद्योजक मा.नितीन भाऊ गवळी यांना सर्वोत्कृष्ट पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले याबद्दल सर्व क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे
    user_R A News
    R A News
    Local News Reporter Pimpri Chanchwad, Pune•
    6 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.