Shuru
Apke Nagar Ki App…
आरक्षण वर्गीकरण तात्काळ लागू करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे. आंदोलकांनी प्रशासनाकडे आरक्षण वर्गीकरणाची अंमलबजावणी त्वरित करण्याची मागणी केली.
माधव गायकवाड
आरक्षण वर्गीकरण तात्काळ लागू करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे. आंदोलकांनी प्रशासनाकडे आरक्षण वर्गीकरणाची अंमलबजावणी त्वरित करण्याची मागणी केली.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- आरक्षण वर्गीकरण तात्काळ लागू करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे. आंदोलकांनी प्रशासनाकडे आरक्षण वर्गीकरणाची अंमलबजावणी त्वरित करण्याची मागणी केली.1
- एमआयएमचे वारिस पठाण यांनी नितीश राणे यांच्या मानसिक संतुलनावर भाष्य केले आहे. पठाण यांच्या म्हणण्यानुसार, नितीश राणे यांचे मानसिक संतुलन ठीक नाही.1
- नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील उंद्री येथील पाझर तलावाच्या दुरुस्ती कामात निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा आरोप करत स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. सुमारे ४० लाख रुपयांच्या निधीतून सुरू असलेल्या या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचे ग्रामस्थ बोलत असून, त्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. शेतकरी व ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, पाझर तलावाच्या पाळीसाठी नवीन साहित्य आणण्याऐवजी पूर्णतः काळी माती आणि मुरमाचा वापर करण्यात आला आहे, तसेच तलावाच्या कडेला असलेलेच दगड, मुरूम व माती वापरून काम उरकण्यात आले आहे. अंदाजपत्रकात रॉयल्टीसाठी जवळपास ९ लाख रुपये दाखवले असताना, प्रत्यक्षात कोणत्या साहित्यावर रॉयल्टी भरली, असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत. याव्यतिरिक्त, पाळीची अपेक्षित उंची ३० फूट असताना ती प्रत्यक्षात २५ ते २६ फूट, तर काही ठिकाणी केवळ ६ ते ७ फूटच करण्यात आल्याचा आरोप आहे. पूर्वी रुंद असलेली पाळी आता लहान व अरुंद केल्याने “पाळीवरून माणूस किंवा जनावरे फिरली तरी घसरून पडतील अशी परिस्थिती आहे,” असे काही शेतकऱ्यांनी म्हटले आहे. वाळूच्या कामातही माती व मुरूमच भरल्याचा आरोप असून, सांडवा जुनाच ठेवण्यात आला आहे. पाळीच्या खालच्या बाजूस कालवा करून दगडी पिचिंग करणे आवश्यक असताना तेही न केल्यामुळे मोठ्या पावसात तलाव फुटण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. यामुळे बाजूच्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान होण्याचीही चिंता आहे. शेतकरी सुधाकर वडजे यांनी कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असून, काम सुरू असताना ग्रामपंचायत किंवा लघुपाटबंधारे विभागातील संबंधित अधिकारी फिरकलेही नाहीत, असे सांगितले. याबाबत माहिती देताना अभियंता चौधरी धीरज यांनी हे काम नक्षत्र कन्स्ट्रक्शन कंपनीला दिल्याचे सांगितले. त्यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता, त्यांनी काम जवळपास ९० टक्के पूर्ण झाल्याचा दावा करत काम मजबूत व टिकाऊ पद्धतीने केल्याचे म्हटले. तसेच, काही काम शिल्लक राहिल्यास पुन्हा येऊन पूर्ण केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, पावसाळा तोंडावर आलेला असताना उर्वरित काम पावसात कसे पूर्ण होणार, असा प्रश्न उंद्री येथील शेतकरी उपस्थित करत आहेत. शासनाचा निधी हा शेतकरी व सर्वसामान्यांच्या हितासाठी असतो की ठेकेदार व अधिकाऱ्यांना मोठे करण्यासाठी, अशी संतप्त प्रतिक्रिया जनमानसातून उमटत आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून कामाची गुणवत्ता तपासण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.1
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाने सरकारकडे तीव्र मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की शासकीय कामे थांबवून शेतकऱ्यांना पेरणीसाठी मुबलक इंधन उपलब्ध करून द्यावे. त्याचबरोबर, इंधनाची खोटी दरवाढ तात्काळ थांबवण्यात यावी, अशी मागणीही पक्षाने केली आहे.1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- लातूर तालुक्यातील मांजरी, सखरा, काडगाव, भुसामुदर्गा, टाकळी, जेवळी आणि हरंगुळ या सात गावातील शेतकरी शेतीसाठी पाणी मिळावे या मागणीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. या गावातील हजारो एकर शेती मांजरा धरणातून कॅनलद्वारे येणाऱ्या पाण्यावर अवलंबून असून, शेतकऱ्यांचा आरोप आहे की गेल्या अनेक वर्षांपासून पाणीपुरवठा अनियमित होत आहे. यंदा तीव्र उष्णतेमुळे आणि पाण्याअभावी ऊसासह इतर पिके वाळून जात असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. त्यांनी रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या अनोख्या आंदोलनात शेतकऱ्यांनी रस्त्यावर चप्पल ठेवून निषेध व्यक्त केला, ज्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. यावेळी आंदोलकांनी “शेती वाचवा, पाणी द्या” आणि “शेतकऱ्यांना न्याय द्या” अशा घोषणा दिल्या. शेतकऱ्यांनी प्रशासनाला तात्काळ पाणी सोडण्याचे आवाहन केले आहे, अन्यथा याहून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.1
- परळी शहरातील श्री पद्मावती शिक्षण संस्था संचालित संस्कार प्राथमिक शाळेच्या १९९९-२००० या शैक्षणिक वर्षातील सातवी उत्तीर्ण माजी विद्यार्थ्यांचा भव्य स्नेहमेळावा पद्मावती विभागामध्ये उत्साहात आणि भावनिक वातावरणात नुकताच पार पडला. आजवर दहावी-बारावीच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहमेळावे मोठ्या उत्साहात साजरे झाल्याचे पाहायला मिळाले असले तरी, संस्कार प्राथमिक शाळेच्या सातवीच्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल २५ वर्षांनंतर एकत्र येऊन स्नेहमेळाव्याचे आयोजन करत एक आगळावेगळा उपक्रम राबवला. या सोहळ्यात अनेक वर्षांनंतर भेटलेल्या मित्रांनी शालेय जीवनातील सुवर्णक्षणांना उजाळा दिला, ज्यामुळे बालपणीच्या आठवणी पुन्हा जिवंत झाल्या. कार्यक्रमस्थळी दाखल होताच जुन्या मित्रांच्या चेहऱ्यावरील आनंद, शिक्षकांविषयी व्यक्त झालेला आदर आणि बालपणीच्या आठवणींमध्ये हरवून गेलेले भावनिक क्षण उपस्थितांच्या मनाला भिडले. यावेळी शाळेत पुन्हा एकदा १९९९-२००० चा काळ अवतरल्याचे दृश्य पाहायला मिळाले. या विशेष स्नेहमेळाव्यासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री कैलास तांदळे अध्यक्षस्थानी होते, तर सचिव श्री दीपक तांदळे, सहसचिव श्रीमती प्रेमिलाताई तांदळे मॅडम, मुख्याध्यापिका सौ. माधुरीताई तांदळे, श्री कराड सर, श्री पाचांगे सर, श्री अनकाडे सर, पर्यवेक्षक श्री इंगळे सर, श्रीम.रणखांब मॅडम, श्री गित्ते सर, श्रीम. साळुंके मॅडम आणि श्री दैठणेकर सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी दिपक ढाकणे, राज रत्नपारखे, अमोल धुमाळ, गणेश टाक, राजेश देशमाने, शैलेश चांडक, सागर टाक, अमोल राजूरकर, धीरज काळे, विपुल बियाणी, वैभव घोडके, श्रीकांत बाहेती, श्रीकांत शर्मा, धनराज स्वामी, प्रताप सोनवणे, भगवान कराळे, उदय पेंटेवार, विशाल आडेपवार, दिलीप खोशे, अशोक कराळे, मनोज मोरे, अमजद पठाण, संभाजी काटे, उमेश फुलझळके, आनंद रेळेकर, दिपाली आघाव, गौतमी भद्रे, पूजा चांडक, स्वाती, मनीषा, श्वेता दीक्षित, गीता काबरा, दिपाली दहातोंडे, पल्लवी हुलगुंडे, वर्षा अदोडे, चंद्रमणी वाघमारे, गंगाधर रायभोळे, श्रीकांत काकडे, अमोल मुळे, पवन भोयटे आदी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या यशस्वी वाटचालीचे कौतुक करत “संस्कार प्राथमिक शाळा ही केवळ शिक्षण देणारी शाळा नसून विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देणारे संस्कार मंदिर आहे,” असे गौरवोद्गार काढले. १९९९-२००० मध्ये सातवी उत्तीर्ण झालेले हे विद्यार्थी आज डॉक्टर, शिक्षक, अभियंते, उद्योजक, शासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते अशा विविध प्रतिष्ठित पदांवर कार्यरत असून आपापल्या क्षेत्रात यशाचे शिखर गाठले आहे. त्यांच्या बोलण्यातून शाळेप्रती असलेले प्रेम आणि गुरुजनांविषयीची कृतज्ञता प्रकर्षाने जाणवत होती. कार्यक्रमादरम्यान जुन्या आठवणींना उजाळा देताना वातावरण अनेकदा भावुक झाले. वर्गातील गंमती-जमती, शाळेतील सहली, सांस्कृतिक कार्यक्रम, मधल्या सुट्टीतील धम्माल, शिक्षकांचा धाक आणि मित्रांसोबतचे अविस्मरणीय क्षण आठवून अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. “मोठी पदे मिळाली, आयुष्य पुढे गेले; पण शाळेतील मैत्री आणि शिक्षकांचे संस्कार हेच आमच्या आयुष्याचे खरे भांडवल आहे,” अशा भावना अनेक माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. या स्नेहमेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली. जुन्या आठवणींना उजाळा देणारे फोटो, संवाद, हास्यकल्लोळ आणि मैत्रीचा उत्स्फूर्त आनंद यामुळे संपूर्ण परिसर भारला होता. अनेक विद्यार्थ्यांनी शाळेच्या विकासासाठी भविष्यात विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविण्याचा संकल्पही यावेळी व्यक्त केला. “एक शाळा... एक संस्कार... आणि आयुष्यभर साथ देणारी मैत्री,” अशी भावना व्यक्त करत सर्व माजी विद्यार्थ्यांनी पुन्हा भेटण्याचा निर्धार केला. शाळेने आणि माजी विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. शेवटी, सर्वांनी एकत्र येऊन ‘संस्कार’च्या आठवणी कायम जपण्याचा संकल्प करत भावपूर्ण वातावरणात कार्यक्रमाचा समारोप केला.1
- मोमिन आर्ट अकादमीने एका अप्रतिम कला प्रदर्शनाचे यशस्वी आयोजन केले, ज्यासोबतच प्रमाणपत्र वितरण सोहळाही उत्साहात पार पडला.1