मराठवाडा दुष्काळमुक्तीच्या घोषणा; पण लेंडी प्रकल्पबाधित हसनाळ प.मु. अजूनही नागरी सुविधांपासून वंचित मुख्यमंत्र्यांच्या विकासाच्या आश्वासनांच्या पार्श्वभूमीवर हसनाळच्या पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर. मराठवाडा दुष्काळमुक्तीच्या घोषणा; पण लेंडी प्रकल्पबाधित हसनाळ प.मु. अजूनही नागरी सुविधांपासून वंचित मुख्यमंत्र्यांच्या विकासाच्या आश्वासनांच्या पार्श्वभूमीवर हसनाळच्या पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर नांदेड : प्रतिनिधी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी कृष्णा खोऱ्यातील तसेच कोकणातील वाहून जाणारे पाणी मराठवाड्यात आणण्याचा निर्धार व्यक्त केला. पुढील पिढीला दुष्काळ पाहावा लागू नये, यासाठी शासन वेगाने काम करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. पाणी, उद्योग, दळणवळण, आरोग्य आणि रोजगाराच्या माध्यमातून मराठवाड्याच्या विकासाचे चित्र मुख्यमंत्र्यांनी मांडले. मात्र, या विकासाच्या घोषणांच्या पार्श्वभूमीवर लेंडी प्रकल्पबाधित हसनाळ प.मु. येथील नागरिकांचा प्रश्न अद्याप कायम आहे. प्रकल्पासाठी विस्थापित झालेल्या नागरिकांच्या पुनर्वसनाच्या ठिकाणी आजही आवश्यक नागरी सुविधा पूर्णपणे उपलब्ध नसल्याची स्थानिक नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे एकीकडे मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाची मोठी स्वप्ने दाखविली जात असताना दुसरीकडे प्रकल्पबाधित नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र आहे. पुनर्वसन झाले; पण सुविधा कुठे? लेंडी प्रकल्पाच्या कामामुळे बाधित झालेल्या हसनाळ प.मु. येथील नागरिकांसाठी नवीन पुनर्वसन गावठाण उभारण्यात आले. मात्र, नवीन गावठाणात रस्ता, पाणी, वाहतूक आणि इतर नागरी सुविधांचा प्रश्न अद्याप पूर्णपणे सुटलेला नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. माकणी फाटा ते हसनाळ प.मु. नवीन पुनर्वसन गावठाण हा सुमारे ३.५ किलोमीटरचा प्रमुख रस्ता खराब अवस्थेत असल्याने वाहतुकीची मोठी अडचण निर्माण होत आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नियमित वाहतूक तसेच एसटी बससेवेवरही परिणाम होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. या मार्गावर कोळनूर, हसनाळ प.मु. आणि भिंगोलीसह अनेक गावांतील नागरिकांची ये-जा अवलंबून आहे. विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांचीच गैरसोय रस्त्याची दुरवस्था केवळ वाहतुकीचा प्रश्न राहिलेला नसून त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांवर, शेतकऱ्यांवर, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांवर होत आहे. विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयात जाण्यासाठी अडचणी येतात, तर रुग्णांना उपचारासाठी बाहेर घेऊन जाताना नागरिकांना त्रास सहन करावा लागतो, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. एका वर्षानंतरही पूरग्रस्तांच्या जखमा ताज्याच १७ ऑगस्ट २०२५ रोजी हसनाळ प.मु. परिसरात आलेल्या भीषण पुरामुळे मोठे नुकसान झाले होते. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाल्याची स्थानिकांची माहिती आहे. या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले असले तरी पूरग्रस्त आणि प्रकल्पबाधित नागरिकांच्या पुनर्वसनाशी संबंधित अनेक प्रश्न अद्याप कायम असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये आहे. या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी वेळोवेळी निवेदने, पाठपुरावा आणि आंदोलने केली. मागील वर्षीच्या पुराच्या स्मृतीदिनी लेंडी नदीत जलसमाधी आंदोलन करूनही नागरिकांनी आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. सरकारच्या मोठ्या घोषणांमध्ये हसनाळचा प्रश्न कुठे? मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठवाड्यातील दुष्काळ कायमचा संपविण्यासाठी मोठ्या जलप्रकल्पांची दिशा स्पष्ट केली आहे. कृष्णा खोऱ्यातून अतिरिक्त ३० टीएमसी पाणी मराठवाड्यात आणण्याचे काम सुरू करण्याचे तसेच कोकणातील उल्हास खोऱ्यातून सुमारे ७० टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्यासाठी प्रकल्प अहवालाचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी सांगितले. छत्रपती संभाजीनगरला दररोज पिण्याचे पाणी, औद्योगिक विकासासाठी हजारो एकर जमीन, सहापदरी रस्ते, आरोग्य सुविधांचा विस्तार आणि रोजगारनिर्मितीच्या योजनांची माहितीही त्यांनी दिली. मात्र, ज्यांच्या जमिनी आणि जीवनावर विकासप्रकल्प उभे राहत आहेत, त्या प्रकल्पबाधित नागरिकांना त्यांच्या पुनर्वसन गावठाणात मूलभूत नागरी सुविधा देण्याची जबाबदारी कोणाची? असा प्रश्न हसनाळ प.मु. येथील नागरिक उपस्थित करीत आहेत. विकासाचा लाभ प्रकल्पबाधितांपर्यंत कधी पोहोचणार? मराठवाड्याच्या विकासासाठी मोठमोठे जलप्रकल्प आणि पायाभूत सुविधा उभारण्याचे नियोजन सुरू असताना, लेंडी प्रकल्पामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना अद्याप रस्ता, वाहतूक आणि आवश्यक नागरी सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असेल, तर विकासाच्या या प्रक्रियेचा लाभ सर्वसामान्य प्रकल्पबाधितांपर्यंत कधी पोहोचणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे. मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प स्वागतार्ह; मात्र आधीच विकासासाठी आपली जमीन, घरे आणि गाव गमावलेल्या लेंडी प्रकल्पबाधित हसनाळ प.मु.च्या नागरिकांना त्यांच्या हक्काच्या पुनर्वसनात मूलभूत सुविधा मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. शासनाने हसनाळ प.मु.च्या नवीन पुनर्वसन गावठाणातील नागरी सुविधांचा प्रत्यक्ष आढावा घेऊन प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत आणि प्रकल्पबाधित नागरिकांना सन्मानाने जगण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
मराठवाडा दुष्काळमुक्तीच्या घोषणा; पण लेंडी प्रकल्पबाधित हसनाळ प.मु. अजूनही नागरी सुविधांपासून वंचित मुख्यमंत्र्यांच्या विकासाच्या आश्वासनांच्या पार्श्वभूमीवर हसनाळच्या पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर. मराठवाडा दुष्काळमुक्तीच्या घोषणा; पण लेंडी प्रकल्पबाधित हसनाळ प.मु. अजूनही नागरी सुविधांपासून वंचित मुख्यमंत्र्यांच्या विकासाच्या आश्वासनांच्या पार्श्वभूमीवर हसनाळच्या पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर नांदेड : प्रतिनिधी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी कृष्णा खोऱ्यातील तसेच कोकणातील वाहून जाणारे पाणी मराठवाड्यात आणण्याचा निर्धार व्यक्त केला. पुढील पिढीला दुष्काळ पाहावा लागू नये, यासाठी शासन वेगाने काम करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. पाणी, उद्योग, दळणवळण, आरोग्य आणि रोजगाराच्या माध्यमातून मराठवाड्याच्या विकासाचे चित्र मुख्यमंत्र्यांनी मांडले. मात्र, या विकासाच्या घोषणांच्या पार्श्वभूमीवर लेंडी प्रकल्पबाधित हसनाळ प.मु. येथील नागरिकांचा प्रश्न अद्याप कायम आहे. प्रकल्पासाठी विस्थापित झालेल्या नागरिकांच्या पुनर्वसनाच्या ठिकाणी आजही आवश्यक नागरी सुविधा पूर्णपणे उपलब्ध नसल्याची स्थानिक नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे एकीकडे मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाची मोठी स्वप्ने दाखविली जात असताना दुसरीकडे प्रकल्पबाधित नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष
करावा लागत असल्याचे चित्र आहे. पुनर्वसन झाले; पण सुविधा कुठे? लेंडी प्रकल्पाच्या कामामुळे बाधित झालेल्या हसनाळ प.मु. येथील नागरिकांसाठी नवीन पुनर्वसन गावठाण उभारण्यात आले. मात्र, नवीन गावठाणात रस्ता, पाणी, वाहतूक आणि इतर नागरी सुविधांचा प्रश्न अद्याप पूर्णपणे सुटलेला नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. माकणी फाटा ते हसनाळ प.मु. नवीन पुनर्वसन गावठाण हा सुमारे ३.५ किलोमीटरचा प्रमुख रस्ता खराब अवस्थेत असल्याने वाहतुकीची मोठी अडचण निर्माण होत आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नियमित वाहतूक तसेच एसटी बससेवेवरही परिणाम होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. या मार्गावर कोळनूर, हसनाळ प.मु. आणि भिंगोलीसह अनेक गावांतील नागरिकांची ये-जा अवलंबून आहे. विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांचीच गैरसोय रस्त्याची दुरवस्था केवळ वाहतुकीचा प्रश्न राहिलेला नसून त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांवर, शेतकऱ्यांवर, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांवर होत आहे. विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयात जाण्यासाठी अडचणी येतात, तर रुग्णांना उपचारासाठी बाहेर घेऊन जाताना नागरिकांना त्रास सहन करावा लागतो, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. एका वर्षानंतरही पूरग्रस्तांच्या जखमा ताज्याच १७ ऑगस्ट
२०२५ रोजी हसनाळ प.मु. परिसरात आलेल्या भीषण पुरामुळे मोठे नुकसान झाले होते. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाल्याची स्थानिकांची माहिती आहे. या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले असले तरी पूरग्रस्त आणि प्रकल्पबाधित नागरिकांच्या पुनर्वसनाशी संबंधित अनेक प्रश्न अद्याप कायम असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये आहे. या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी वेळोवेळी निवेदने, पाठपुरावा आणि आंदोलने केली. मागील वर्षीच्या पुराच्या स्मृतीदिनी लेंडी नदीत जलसमाधी आंदोलन करूनही नागरिकांनी आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. सरकारच्या मोठ्या घोषणांमध्ये हसनाळचा प्रश्न कुठे? मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठवाड्यातील दुष्काळ कायमचा संपविण्यासाठी मोठ्या जलप्रकल्पांची दिशा स्पष्ट केली आहे. कृष्णा खोऱ्यातून अतिरिक्त ३० टीएमसी पाणी मराठवाड्यात आणण्याचे काम सुरू करण्याचे तसेच कोकणातील उल्हास खोऱ्यातून सुमारे ७० टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्यासाठी प्रकल्प अहवालाचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी सांगितले. छत्रपती संभाजीनगरला दररोज पिण्याचे पाणी, औद्योगिक विकासासाठी हजारो एकर जमीन, सहापदरी रस्ते, आरोग्य सुविधांचा विस्तार आणि रोजगारनिर्मितीच्या योजनांची
माहितीही त्यांनी दिली. मात्र, ज्यांच्या जमिनी आणि जीवनावर विकासप्रकल्प उभे राहत आहेत, त्या प्रकल्पबाधित नागरिकांना त्यांच्या पुनर्वसन गावठाणात मूलभूत नागरी सुविधा देण्याची जबाबदारी कोणाची? असा प्रश्न हसनाळ प.मु. येथील नागरिक उपस्थित करीत आहेत. विकासाचा लाभ प्रकल्पबाधितांपर्यंत कधी पोहोचणार? मराठवाड्याच्या विकासासाठी मोठमोठे जलप्रकल्प आणि पायाभूत सुविधा उभारण्याचे नियोजन सुरू असताना, लेंडी प्रकल्पामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना अद्याप रस्ता, वाहतूक आणि आवश्यक नागरी सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असेल, तर विकासाच्या या प्रक्रियेचा लाभ सर्वसामान्य प्रकल्पबाधितांपर्यंत कधी पोहोचणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे. मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प स्वागतार्ह; मात्र आधीच विकासासाठी आपली जमीन, घरे आणि गाव गमावलेल्या लेंडी प्रकल्पबाधित हसनाळ प.मु.च्या नागरिकांना त्यांच्या हक्काच्या पुनर्वसनात मूलभूत सुविधा मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. शासनाने हसनाळ प.मु.च्या नवीन पुनर्वसन गावठाणातील नागरी सुविधांचा प्रत्यक्ष आढावा घेऊन प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत आणि प्रकल्पबाधित नागरिकांना सन्मानाने जगण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
- मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त तहसील कार्यालयात वृक्षारोपण उपक्रम उत्साहात (मुखेड :- प्रतिनिधी) मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त आज दि. १७ सप्टेंबर रोजी तहसील कार्यालय परिसरात वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ. तुषार राठोड हे उपस्थित होते. यावेळी तहसीलदार अभयराय नंजुडे, पुरवठा अधिकारी, नायब तहसीलदार यांच्यासह तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना अभिवादन करून ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर तहसील कार्यालयाच्या आवारात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार डॉ. तुषार राठोड म्हणाले की, "मराठवाड्याच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे. त्यांच्या बलिदानाची आठवण म्हणून आपण पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला पाहिजे. एक झाड लावणे हीच खरी आदरांजली ठरेल." तहसीलदार अभयराय नंजुडे यांनी देखील उपस्थितांना वृक्ष संवर्धन करण्याचे आवाहन केले. हा उपक्रम अतिशय उत्साहात आणि पर्यावरणपूरक संदेश देत पार पडला. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त तहसील कार्यालयात वृक्षारोपण उपक्रम उत्साहात (मुखेड :- प्रतिनिधी) मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त आज दि. १७ सप्टेंबर रोजी तहसील कार्यालय परिसरात वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ. तुषार राठोड हे उपस्थित होते. यावेळी तहसीलदार अभयराय नंजुडे, पुरवठा अधिकारी, नायब तहसीलदार यांच्यासह तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना अभिवादन करून ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर तहसील कार्यालयाच्या आवारात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार डॉ. तुषार राठोड म्हणाले की, "मराठवाड्याच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे. त्यांच्या बलिदानाची आठवण म्हणून आपण पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला पाहिजे. एक झाड लावणे हीच खरी आदरांजली ठरेल." तहसीलदार अभयराय नंजुडे यांनी देखील उपस्थितांना वृक्ष संवर्धन करण्याचे आवाहन केले. हा उपक्रम अतिशय उत्साहात आणि पर्यावरणपूरक संदेश देत पार पडला.3
- ST आरक्षणासाठी धनगर समाजाचा एल्गार; महामोर्चास परभणीत जनसागर उसळला ST आरक्षणासाठी धनगर समाजाचा एल्गार; महामोर्चास परभणीत जनसागर उसळला1
- नांदेड रोडवर चालत्या कारवर वडाचे झाड कोसळले; चालक सुखरूप, कारचे मोठे नुकसान. नांदेड रोडवर चालत्या कारवर वडाचे झाड कोसळले; चालक सुखरूप, कारचे मोठे नुकसान. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. गुरुवार दिनांक 17 सप्टेंबर 2026. नांदेड रोडवरील कृपासदन शाळा परिसरात बुधवार दिनांक 16 सप्टेंबर 2026 रोजी एक मोठी दुर्घटना टळली. रस्त्यावरून जात असलेल्या एका चालत्या कारवर अचानक रस्त्याच्या कडेला असलेले जुने वडाचे झाड कोसळले. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असले, तरी सुदैवाने कारचालक यातून सुखरूप बचावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड रोडवरील कृपासदन परिसराकडून एक कार (क्रमांक एमएच 02 इझेड 2579) शहराच्या दिशेने जात होती. कार कृपासदन शाळेजवळ आली असता, अचानक रस्त्याच्या बाजूला असलेले एक भलेमोठे वडाचे झाड चालत्या कारच्या पुढील भागावर कोसळले. झाड पडल्याचा जोरदार आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी प्रसंगावधान राखून कारमध्ये अडकलेल्या चालकाला सुखरूप बाहेर काढले. झाड थेट कारच्या बोनेटवर व टपाच्या समोरील भागावर पडल्याने कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. वाहतूक विस्कळीत. मुख्य रस्त्यावरच झाड कोसळल्यामुळे नांदेड रोडवरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच महापालिका प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी पोहोचून रस्ता साफ करण्याचे काम सुरू केले. क्रेन आणि कटरच्या साहाय्याने झाडाच्या फांद्या बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली. जुनी झाडे हटवण्याची मागणी या परिसरात रस्त्याच्या कडेला असलेली अनेक झाडे अत्यंत जुनी व धोकादायक झाली आहेत. प्रशासनाने अशा धोकादायक झाडांची त्वरित पाहणी करून ती हटवावीत, जेणेकरून भविष्यात अशा घटना पुनरावृत्त होणार नाहीत, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी व वाहनधारकांनी केली आहे.4
- दिव्यांग व्यक्ती तपासणीची होत आहे गैरसोय.!! तपासणीसाठी उपकरणे,विशेषतज्ञ लातूरला मग तपासणी देखावे येथे कशाला?? निलंगा उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग व्यक्तींची होत आहे गैरसोय..!! तपासणी टीम चे वेळ निश्चित नाही!! महिन्यातून दोन दिवस निलंगा तालुक्यातील दिव्यांगाना तपासाला यायला सुद्धा विशेषतज्ञाना वेळ नाही?1
- धानोरा (जहाँगीर) येथे ७९ व्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या ७९ व्या दिनानिमित्त धानोरा (जहाँगीर) ता.कळमनुरी जि.हिंगोली येथील ग्रामपंचायत कार्यालयात तंटामुक्ती अध्यक्ष प्रफुल्ल पाईकराव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.तसेच ॲड.रवि शिंदे यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी,भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, शहीद-ए-आजम भगतसिंग यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच तेथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गावचे चेअरमन बंडू कोरडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपसरपंच टोपाजी पोटे, सहशिक्षक भुरके,मगरे, यांच्या सह बाबुराव मस्के,मोतीराम मोरे, मुंजाजी बर्गे,सुभाष सरडे,निस्सारखॉं पठाण,भीमराव पाईकराव,विश्वनाथ जाधव, साहेबराव डोंगरे,कैलास सापनार, रमेश ढबाले,दिनकर पाईकराव,प्रदीप बरडे, सुभाष सापनार,मारोती कोरडे,नामदेव शिंदे ,प्रकाश भुजंगळे, सुहास मस्के,सलीम पठाण,कृष्णा पोटे,गौतम ढबाले, प्रमोद पाईकराव,फैजान पठाण, आकाश पाईकराव,प्रमोद डोंगरे, संदीप पाईकराव,समाधान पाईकराव,शुभम मुळे,हर्षद पाईकराव,अंगणवाडी कर्मचारी फमीदा बेगम,सौ.शोभा चिरमाडे, सौ.नाजुका डोंगरे,रोजगार सेवक सुनील पाईकराव, ग्रामपंचायत सेवक संभा पोटे,संतोष चिरमाडे यांच्यासह ग्रामस्थ तसेच विद्यार्थीची मोठ्या संख्येने उपस्थिती होती .1
- स्टेट बैंक ऑफ इंडिया शाखा प्रबंधक उमरखेड़ कि ओर से 1000 वृक्ष लगाये गए SBI स्टेट बैंक ऑफ इंडिया शाखा प्रबंधक मैनेजर उमरखेड़ कि ओर से 1000 वृक्ष लगाये गए शहर में SBI स्टेट बैंक ऑफ इंडिया शाखा प्रबंधक मैनेजर उमरखेड़ साहब का उपक्रम उमरखेड़ के लोकप्रिय नेता नितिन भाऊ भूतड़ा भी रहे शामिल उमरखेड़ थानेदार शंकर पांचाल साहब के हाथों से पेड़ लगाए गए1
- सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च, श्री गणेश चतुर्थीच्या धर्तीवर कायदा व सुवेव्यवस्था आभाधित ठेवण्यासाठी पुन्हा सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च संपन्न सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च, श्री गणेश चतुर्थीच्या धर्तीवर कायदा व सुवेव्यवस्था आभाधित ठेवण्यासाठी पुन्हा सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च संपन्न सोनपेठ (दर्शन) :- सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च, श्री गणेश चतुर्थीच्या धर्तीवर कायदा व सुवेव्यवस्था आभाधित ठेवण्यासाठी पुन्हा सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च संपन्न1
- लातूरमध्ये परळीच्या तरुणाचा भररस्त्यात चाकू भोसकून खून; परळीतील नगरसेवकासह तिघे फरार. लातूरमध्ये परळीच्या तरुणाचा भररस्त्यात चाकू भोसकून खून; परळीतील नगरसेवकासह तिघे फरार. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. गुरुवार दिनांक 17 सप्टेंबर 2026. हॉटेलमध्ये जेवणादरम्यान झालेल्या वादातून मित्रानेच मित्राच्या छातीत सुरा खुपसून खून केल्याची धक्कादायक घटना लातूर शहरातील उस्मानपुरा/इस्लामपुरा भागातील हॉटेल उमेरासमोर घडली. बाबा अली शेख (वय ३८, रा. परळी) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी परळीतील नगरसेवक खालेद शेख याच्यासह तीन मित्रांवर संशय असून, घटनेनंतर सर्व आरोपी पसार झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परळी येथून बाबा अली शेख, नगरसेवक खालेद शेख, अल्फाज पठाण आणि उमेर हे चौघे जण लातूरला आले होते. बसवेश्वर कॉलेज ते खोरीगल्ली रस्त्यावरील हॉटेल उमेरा येथे दिनांक 16 सप्टेंबर 2026 रोजी बुधवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास जेवत असताना त्यांच्यात तीव्र वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर चौघेही हॉटेलबाहेर रस्त्यावर आले. तेथे तिघांनी मिळून बाबा अली यांच्या छातीत तीक्ष्ण चाकू खुपसला. गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. नियोजनबद्ध कटाचा संशय. बाबा अली शेख आणि आरोपींमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून जुना वाद होता. त्यामुळेच नियोजनबद्ध कट रचून खून करण्याच्या हेतूने त्याला परळीहून लातुरात आणले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पालकमंत्री शहरात असतानाच थरार. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहणासाठी लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले हे शहरात मुक्कामी होते. हा खुनाचा थरार घडला, नेमक्या त्याच वेळी पालकमंत्री घटनास्थळापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावरील एका गणेश मंडळात आरती करत होते. शहरात कडक पोलीस बंदोबस्त असतानाही भररस्त्यात घडलेल्या या हत्याकांडामुळे लातूर व परळी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस सध्या फरार आरोपींचा तीव्र शोध घेत आहेत.1