Shuru
Apke Nagar Ki App…
दिल्लीतील जंतरमंतर येथे विद्यार्थ्यांकडून सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अहिल्यानगरमध्ये लाक्षणिक मौन आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान अण्णा हजारे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर राळेगणसिद्धी येथे परतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना अण्णा हजारे यांनी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीचे थेट समर्थन केले. जनता ही मालक आहे आणि शिक्षणमंत्री हे सेवक आहेत, त्यामुळे मालकांनी मागणी केली असल्यास त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि हेच त्यांचे कर्तव्य आहे, अशा स्पष्ट शब्दांत अण्णा हजारे यांनी आपली भूमिका मांडली.
Aniket raju yadav
दिल्लीतील जंतरमंतर येथे विद्यार्थ्यांकडून सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अहिल्यानगरमध्ये लाक्षणिक मौन आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान अण्णा हजारे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर राळेगणसिद्धी येथे परतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना अण्णा हजारे यांनी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीचे थेट समर्थन केले. जनता ही मालक आहे आणि शिक्षणमंत्री हे सेवक आहेत, त्यामुळे मालकांनी मागणी केली असल्यास त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि हेच त्यांचे कर्तव्य आहे, अशा स्पष्ट शब्दांत अण्णा हजारे यांनी आपली भूमिका मांडली.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- दिल्लीतील जंतरमंतर येथे विद्यार्थ्यांकडून सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अहिल्यानगरमध्ये लाक्षणिक मौन आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान अण्णा हजारे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर राळेगणसिद्धी येथे परतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना अण्णा हजारे यांनी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीचे थेट समर्थन केले. जनता ही मालक आहे आणि शिक्षणमंत्री हे सेवक आहेत, त्यामुळे मालकांनी मागणी केली असल्यास त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि हेच त्यांचे कर्तव्य आहे, अशा स्पष्ट शब्दांत अण्णा हजारे यांनी आपली भूमिका मांडली.1
- NEET-UG 2026 परीक्षा घोटाळा, पेपर लीक आणि शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात अहिल्यानगरमध्ये भव्य जनआक्रोश आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. खासदार डॉ. निलेशजी लंके साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन शनिवार, २५ जुलै २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता अहिल्यानगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर काढले जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना जाब विचारण्यासाठी आता जनता रस्त्यावर उतरत असल्याचे यात स्पष्ट करण्यात आले आहे. या आंदोलनाद्वारे NEET-UG 2026 परीक्षा घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करावी, पेपर लीक प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई व्हावी, विद्यार्थ्यांना न्याय देऊन पारदर्शक परीक्षा व्यवस्था उभारली जावी आणि शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराला आळा घातला जावा, अशा मुख्य मागण्या मांडण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांचे भविष्य वाचवण्यासाठी आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, युवक व नागरिकांनी या जनआंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.1
- आषाढी एकादशीचे औचित्य साधून शिरूर शहरातील विविध शाळांमध्ये अत्यंत भक्तिमय वातावरणात दिंडी सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले. वारकरी वेशभूषा, टाळ-मृदुंगाचा गजर, विठ्ठलनामाचा जयघोष, अभंग, भक्तिगीते, रिंगण सोहळे आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले. या उपक्रमांतून विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाची परंपरा, भारतीय संस्कृती, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक मूल्यांची प्रत्यक्ष ओळख करून देण्यात आली. या सोहळ्यात आर. एम. धारीवाल इंग्लिश मीडियम स्कूलच्या नर्सरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत दिंडी काढली, विठ्ठल-रुक्मिणी मंदिराची आकर्षक प्रतिकृती साकारली आणि "माऊली" या शब्दाची अक्षररचना केली. न्यू इंग्लिश स्कूलमध्ये "ज्ञानोबा-तुकाराम" च्या जयघोषात दिंडी काढण्यात आली. बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळांनी संयुक्तपणे रामलिंग रोड ते हलवाई चौकापर्यंत भव्य दिंडी सोहळा आयोजित केला, जिथे हलवाई चौक गणेश मित्र मंडळ आणि सुवर्णा ज्वेलर्सच्या वतीने बाल वारकऱ्यांना फराळी चिवडा व केळीचे वाटप करण्यात आले. याशिवाय विद्याधाम प्रशाला प्राथमिक शाळा, डेक्कन इंग्लिश मीडियम स्कूल आणि शिरूर नगरपरिषद शाळा क्रमांक ४ येथेही दिंडी सोहळे उत्साहात पार पडले. सोहळ्यादरम्यान नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे यांनी विद्यार्थ्यांना "वारी स्वच्छतेची" हा संदेश दिला आणि शाळेतील उपक्रमांचे कौतुक केले. या प्रसंगी उपनगराध्यक्ष मितेश गादिया, सदाशिव पवार, केशरताई पवार, पोलीस निरीक्षक विनोद पाटील, धरमचंद फुलफगर, शिरीषकुमार बरमेचा, विविध सभापती, नगरसेवक, मुख्याध्यापक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरातील पालक आणि नागरिकांनीही या सर्व उपक्रमांचे उत्स्फूर्त स्वागत करत विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे भरभरून कौतुक केले.4
- विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी बुलंद आवाज उठवत आदरणीय रवींद्र धणक सर यांनी NEET पेपर लीक आणि जंतर-मंतर आंदोलनाच्या मुद्द्यावर आपले परखड आणि रोखठोक भाषण दिले आहे.1
- कॉक्रोज जनता पक्षाकडून करण्यात आलेल्या आंदोलनावर अमृता फडणवीस यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.1
- पैठण तालुक्यातील बिडकीन येथे विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांच्या समर्थनार्थ आयोजित करण्यात आलेले जाहीर शांततापूर्ण निषेध आंदोलन यशस्वीरीत्या पार पडले. या आंदोलनाला संपूर्ण विद्यार्थीवर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला पाठिंबा दर्शवला. या आंदोलनात विविध सामाजिक संघटनांचे प्रमुख आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये आदिवासी चक्रीवादळ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप सुरेश गायकवाड, संघर्ष अकॅडमीचे रवी सर जाधव, बिडकीनचे सामाजिक कार्यकर्ते अमोल भाऊ पवार, टायगर ग्रुपचे अध्यक्ष संदीप भाऊ गायकवाड आणि हिंदवी स्वराज्य सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बप्पासाहेब पाटील आमले (रांजणगाव खुरी) उपस्थित होते. याशिवाय लोहगावचे दीपक जगधने व आंद्रेश पगारे, महाराष्ट्र उपाध्यक्ष रवी भाऊ बोरसे, महाराष्ट्र सचिव रविंद्र भाऊ गायकवाड, गंगापूर तालुका सदस्य किशोर पवार, गंगापूरचे अजय खुरसने, बिडकीनचे सामाजिक कार्यकर्ते अजय भाऊ भिवसाने, वंचित बहुजन आघाडीचे ढोले सर आणि सामाजिक कार्यकर्ते अफसर तडवी या मान्यवरांनीही आंदोलनाला उपस्थिती लावली.2
- भाजप सरकार आणि पोलीस प्रशासन खाजगी गुंड वृत्तीच्या तरुणांच्या हातात पोलिसांच्या काठ्या देऊन आंदोलन करणाऱ्या तरुण विद्यार्थ्यांना मारहाण करत असल्याचा घणाघाती आरोप करण्यात आला आहे. केंद्रातील सरकार अशा गुंड वृत्तीच्या लोकांना पोलिसांच्या काठ्या देऊन ही मारहाण घडवून आणत आहे. मात्र, सत्ताधारी आणि पोलिसांच्या माध्यमातून निर्माण केली जाणारी ही दहशत भारतातील तरुण मोडून काढतील, असा ठाम इशारा देण्यात आला आहे.1
- रोहित पवार यांनी एक व्हिडिओ शेअर करत भाजपवर गंभीर आरोप केला आहे. विद्यार्थ्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा रोहित पवार यांनी या व्हिडिओद्वारे केला आहे.1