logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

दक्षिण मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकाचा उदगीरकरांना ठेंगा उदगीर (एल पी उगीले) उदगीर रेल्वे स्टेशन येथे दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजय कुमार श्रीवास्तव तसेच विभागीय व्यवस्थापक गोपालकृष्णन यांच्यासह आपल्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यासोबत 17 फेब्रुवारी 2020 रोजी सुरक्षा पाहणी दौऱ्यावर येणार आहेत आणि दुपारी बारा वाजता उदगीर रेल्वे स्टेशनला भेट देणार आहेत, अशा पद्धतीचा निरोप आला होता. विशेष म्हणजे या महाप्रबंधकाच्या दौऱ्यासाठी माजी मंत्री तथा विद्यमान आमदार संजय बनसोडे आणि लातूर जिल्ह्याचे खासदार डॉ. शिवाजीराव काळगे यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. यापूर्वी 11 जुलै 2025 मध्ये संजय कुमार श्रीवास्तव यांनी मध्य रेल्वेचे महाप्रबंधक पदाचा पदभार स्वीकारला त्यानंतर त्यांचा हा पहिला सुरक्षा पाणी दौरा होता. या दौऱ्यात हैदराबाद पुणे मुंबई वंदे भारत स्लीपर वर्जन हैदराबाद इंटरसिटी सोबत स्टेशन विकासाबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात होती संघर्ष समितीच्या माध्यमातून बेल सकारगा येथे नवीन क्रॉसिंग स्टेशन निर्माण करावे लातूर रोड व परळी येथे नवीन बायपास लाईन टाकावी विकाराबाद परळी वैजनाथ 265 किलोमीटर दुहेरीकरण लाईन मंजूर असून त्यास गती देण्यासाठी प्रयत्न करावेत अशा विविध मागण्या करण्यात येणार होत्या तसेच अनेक रेल्वे प्रस्ताव असून त्या लवकरात लवकर चालू करण्याची ही मागणी या परिसरातील प्रवाशांच्या वतीने रेल्वे संघर्ष समिती करणार होती मात्र हे सर्व असे असले तरीही महाप्रबंधकांनी उदगीर स्टेशनवर न थांबता सरळ ते बिदरला गेल्याने उदगीर परिसरातील रेल्वे प्रवाशांना धक्का बसला आहे. उदगीर परिसरातील लोकांना महाप्रबंधक आणि ठेंगा दाखवल्याबद्दल लोकांमध्ये चीड निर्माण झाली आहे. रेल्वे प्रशासनाच्या वतीने उदगीर रेल्वे स्टेशनचे शुशोभीकरण करण्यात आले होते, त्यासंदर्भात ही त्यांनी पाहणी केली नाही याबद्दलही रेल्वेचे कर्मचारीही नाराज आहेत.

on 17 February
user_Laxman Ugile
Laxman Ugile
उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
on 17 February

दक्षिण मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकाचा उदगीरकरांना ठेंगा उदगीर (एल पी उगीले) उदगीर रेल्वे स्टेशन येथे दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजय कुमार श्रीवास्तव तसेच विभागीय व्यवस्थापक गोपालकृष्णन यांच्यासह आपल्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यासोबत 17 फेब्रुवारी 2020 रोजी सुरक्षा पाहणी दौऱ्यावर येणार आहेत आणि दुपारी बारा वाजता उदगीर रेल्वे स्टेशनला भेट देणार आहेत, अशा पद्धतीचा निरोप आला होता. विशेष म्हणजे या महाप्रबंधकाच्या दौऱ्यासाठी माजी मंत्री तथा विद्यमान आमदार संजय बनसोडे आणि लातूर जिल्ह्याचे खासदार डॉ. शिवाजीराव काळगे यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. यापूर्वी 11 जुलै 2025 मध्ये संजय कुमार श्रीवास्तव यांनी मध्य रेल्वेचे महाप्रबंधक पदाचा पदभार स्वीकारला त्यानंतर त्यांचा हा पहिला सुरक्षा पाणी दौरा होता. या दौऱ्यात हैदराबाद पुणे मुंबई वंदे भारत स्लीपर वर्जन हैदराबाद इंटरसिटी सोबत स्टेशन विकासाबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात होती संघर्ष समितीच्या माध्यमातून बेल सकारगा येथे नवीन क्रॉसिंग स्टेशन निर्माण करावे लातूर रोड व परळी येथे नवीन बायपास लाईन टाकावी विकाराबाद परळी वैजनाथ 265 किलोमीटर दुहेरीकरण लाईन मंजूर असून त्यास गती देण्यासाठी प्रयत्न करावेत अशा विविध मागण्या करण्यात येणार होत्या तसेच अनेक रेल्वे प्रस्ताव असून त्या लवकरात लवकर चालू करण्याची ही मागणी या परिसरातील प्रवाशांच्या वतीने रेल्वे संघर्ष समिती करणार होती मात्र हे सर्व असे असले तरीही महाप्रबंधकांनी उदगीर स्टेशनवर न थांबता सरळ ते बिदरला गेल्याने उदगीर परिसरातील रेल्वे प्रवाशांना धक्का बसला आहे. उदगीर परिसरातील लोकांना महाप्रबंधक आणि ठेंगा दाखवल्याबद्दल लोकांमध्ये चीड निर्माण झाली आहे. रेल्वे प्रशासनाच्या वतीने उदगीर रेल्वे स्टेशनचे शुशोभीकरण करण्यात आले होते, त्यासंदर्भात ही त्यांनी पाहणी केली नाही याबद्दलही रेल्वेचे कर्मचारीही नाराज आहेत.

More news from Maharashtra and nearby areas
  • नांदेड (प्रतिनिधी) – पीपल्स कॉलेज, नांदेड येथे जागतिक महिला दिनानिमित्त पीपल्स कॉलेज नांदेड व राष्ट्र सेविका समितीच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम काही विद्यार्थी संघटना व विद्यार्थ्यांच्या विरोधामुळे रद्द करण्यात आला. या कार्यक्रमाला सहाय्यक विद्यार्थी आंदोलन, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन विद्यार्थी सेना आणि एस.एफ.आय. या संघटनांनी तीव्र विरोध दर्शविला. विद्यार्थ्यांनी एकत्र येत आंदोलन केल्यामुळे अखेर महाविद्यालय प्रशासनाने कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला. पीपल्स कॉलेजचे प्राचार्य यांनी याबाबत अधिकृत पत्र देत कार्यक्रम रद्द झाल्याची माहिती दिली. तसेच भविष्यात महाविद्यालयात आरएसएसशी संबंधित कार्यक्रम होणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. या आंदोलनात अक्षयकुमार गायकवाड, कुलदीप राक्षसमारे, प्रबुद्ध काळे, आतिश ढगे, साई पाटील, प्रथम तारु, प्रज्ञा साळवे, नम्रता निवडंगे , आदित्य कांबळे, प्रशिक ढगे, प्रशांत गाडेकर,प्रफुल कोंडकर, मीना आरसे, निखिल महाबळे आणि आदी विद्यार्थी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
    4
    नांदेड (प्रतिनिधी) – पीपल्स कॉलेज, नांदेड येथे जागतिक महिला दिनानिमित्त पीपल्स कॉलेज नांदेड व राष्ट्र सेविका समितीच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम काही विद्यार्थी संघटना व विद्यार्थ्यांच्या विरोधामुळे रद्द करण्यात आला.
या कार्यक्रमाला सहाय्यक विद्यार्थी आंदोलन, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन विद्यार्थी सेना आणि एस.एफ.आय. या संघटनांनी तीव्र विरोध दर्शविला. विद्यार्थ्यांनी एकत्र येत आंदोलन केल्यामुळे अखेर महाविद्यालय प्रशासनाने कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला.
पीपल्स कॉलेजचे प्राचार्य यांनी याबाबत अधिकृत पत्र देत कार्यक्रम रद्द झाल्याची माहिती दिली. तसेच भविष्यात महाविद्यालयात आरएसएसशी संबंधित कार्यक्रम होणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या आंदोलनात अक्षयकुमार गायकवाड, कुलदीप राक्षसमारे, प्रबुद्ध काळे, आतिश ढगे, साई पाटील, प्रथम तारु, प्रज्ञा साळवे, नम्रता निवडंगे , आदित्य कांबळे, प्रशिक ढगे, प्रशांत गाडेकर,प्रफुल कोंडकर, मीना आरसे, निखिल महाबळे आणि  आदी विद्यार्थी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
    user_Mohammad Rafikh
    Mohammad Rafikh
    Graphic designer Nanded, Maharashtra•
    3 hrs ago
  • प्रभाग 2 मे अली खान मित्र मंडळ और जाकेर लाला के और से इफ्तार दावत
    1
    प्रभाग 2 मे अली खान मित्र मंडळ और जाकेर लाला के और से  इफ्तार दावत
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    6 hrs ago
  • Post by Mohsin ahmed khan
    7
    Post by Mohsin ahmed khan
    user_Mohsin ahmed khan
    Mohsin ahmed khan
    Advertising agency परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • Post by Saudagar Gaikwad
    1
    Post by Saudagar Gaikwad
    user_Saudagar Gaikwad
    Saudagar Gaikwad
    तुळजापूर, उस्मानाबाद, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • #maxparbhani #BabajaniDurrani #JunaidKhan Babajani Durrani Junaid Khan Durrani
    1
    #maxparbhani 
#BabajaniDurrani 
#JunaidKhan
Babajani Durrani 
Junaid Khan Durrani
    user_Max Parbhani Live
    Max Parbhani Live
    News Anchor पाथरी, परभणी, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • विलास बारहाते मानवत : येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत १६ मार्च २०२६ रोजी विद्यार्थ्यांसाठी असणारा उपक्रम मिशन डायमंडचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. उद्घाटन मानवत नगरपरिषदेचे उपाध्यक्ष डॉ. अंकुश लाड यांच्या हस्ते झाले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक माणिक घाटूळ शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राणी गोलाईत, उपाध्यक्ष विलास बारहाते, प्रसाद दहिने, माजी अध्यक्ष मोहन लाड, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य संदिप पवार, नामदेव खिळदकर, रामभाऊ गोलाईत, सीमा हरगुडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. प्रथम आलेल्या मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच शाळेच्या वतीने आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक माणिक घाटूळ हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून नगरपालिकेचे उपाध्यक्ष डॉ. अंकुश लाड हे होते. शालेय जीवनातील अभ्यास,व MCQ प्रश्नांचा सराव उपयुक्त आहे असे प्रतिपादन डॉ.अंकुश लाड यांनी शाळेत मिशन डायमंडचे उद्घाटन प्रसंगी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माणिक घाटूळ यांनी केले. मिशन डायमंडसाठी विद्यार्थ्यांना संदिप पवार यांनी शुभेच्छा दिल्या. तर नामदेव खिळदकर यांनी मिशन डायमंड बद्दल सविस्तर माहिती दिली. सुत्रसंचालन सोमनाथ मोहकरे यांनी केले. तर आभार कर्णराज दुधाळ यांनी मांडले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व SMC सदस्य यांनी परिश्रम घेतले.
    1
    विलास बारहाते 
मानवत : येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत १६ मार्च २०२६ रोजी विद्यार्थ्यांसाठी असणारा उपक्रम मिशन डायमंडचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. उद्घाटन मानवत नगरपरिषदेचे उपाध्यक्ष डॉ. अंकुश लाड यांच्या हस्ते झाले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक माणिक घाटूळ शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राणी गोलाईत, उपाध्यक्ष विलास बारहाते, प्रसाद दहिने, माजी अध्यक्ष मोहन लाड, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य संदिप पवार, नामदेव खिळदकर, रामभाऊ गोलाईत, सीमा हरगुडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
प्रथम आलेल्या मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच शाळेच्या वतीने आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक माणिक घाटूळ हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून नगरपालिकेचे उपाध्यक्ष डॉ. अंकुश लाड हे होते. शालेय जीवनातील अभ्यास,व MCQ प्रश्नांचा सराव उपयुक्त आहे असे प्रतिपादन डॉ.अंकुश लाड यांनी शाळेत मिशन डायमंडचे उद्घाटन प्रसंगी केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माणिक घाटूळ यांनी केले. मिशन डायमंडसाठी विद्यार्थ्यांना संदिप पवार यांनी शुभेच्छा दिल्या. तर नामदेव खिळदकर यांनी मिशन डायमंड बद्दल सविस्तर माहिती दिली. सुत्रसंचालन सोमनाथ मोहकरे यांनी केले. तर आभार कर्णराज दुधाळ यांनी मांडले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी 
सर्व शिक्षक व SMC सदस्य यांनी परिश्रम घेतले.
    user_विलास बारहाते
    विलास बारहाते
    मानवत, परभणी, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष चितळे यांनी ठाम भूमिका मांडली की, मुंबईतील दादर रेल्वे स्टेशन याला परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे. ही मागणी तात्काळ मान्य न झाल्यास देशभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. पक्षाच्या वतीने सांगण्यात आले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशासाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे, त्यामुळे त्यांच्या नावाने महत्त्वाच्या ठिकाणांचे नामकरण होणे गरजेचे आहे. या मागणीसाठी प्रशासनाला निवेदनही देण्यात आले असून, सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.
    1
    यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष चितळे यांनी ठाम भूमिका मांडली की, मुंबईतील दादर रेल्वे स्टेशन याला परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे. ही मागणी तात्काळ मान्य न झाल्यास देशभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
पक्षाच्या वतीने सांगण्यात आले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशासाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे, त्यामुळे त्यांच्या नावाने महत्त्वाच्या ठिकाणांचे नामकरण होणे गरजेचे आहे.
या मागणीसाठी प्रशासनाला निवेदनही देण्यात आले असून, सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.
    user_Mohammad Rafikh
    Mohammad Rafikh
    Graphic designer Nanded, Maharashtra•
    7 hrs ago
  • आंतरराज्य सीमेवर असलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातील अक्कलकोट तालुक्यात BSNL ची कनेक्टिव्हिटी पूर्णपणे ठप्प झाल्याचा गंभीर मुद्दा खासदार प्रणिती शिंदे यांनी आज संसदेत उपस्थित केला. गेल्या एका वर्षापासून BSNL अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. नवीन टॉवर उभारण्यासाठी निधी उपलब्ध नसल्याची कबुली संबंधित अधिकाऱ्यांनी दिल्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील नागरिकांना मोबाईल व इंटरनेट सेवांपासून वंचित राहावे लागत असल्याचेही त्यांनी केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून दिले. देशात एकीकडे 5G सेवांचा मोठ्या प्रमाणावर गाजावाजा केला जात असताना ग्रामीण व सीमावर्ती भागात मूलभूत नेटवर्क सुविधांचाही अभाव असल्याची वस्तुस्थिती त्यांनी मांडली. BSNL च्या पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी व इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेडेशनसाठी आवश्यक निधी न दिल्यामुळे ही सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी हळूहळू खाजगीकरणाच्या दिशेने ढकलली जात असल्याचा आरोपही खासदार शिंदे यांनी केला. “BSNL ची सध्याची यंत्रणा कार्यक्षम नसताना ती बदलण्यासाठी आणि ग्रामीण भागातील कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी केंद्र सरकार नेमकी कोणती ठोस पावले उचलणार?” असा थेट सवाल त्यांनी संसदेत उपस्थित केला. अक्कलकोटसारख्या सीमावर्ती भागातील नागरिकांना तातडीने दर्जेदार दूरसंचार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने त्वरित आणि प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी ठाम मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी केली. यावर उत्तर देताना केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी BSNL च्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा सुरू असून, 4G सेवा अधिक सक्षम केल्यानंतर लवकरच 5G सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले.
    1
    आंतरराज्य सीमेवर असलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातील अक्कलकोट तालुक्यात BSNL ची कनेक्टिव्हिटी पूर्णपणे ठप्प झाल्याचा गंभीर मुद्दा खासदार प्रणिती शिंदे यांनी आज संसदेत उपस्थित केला.
गेल्या एका वर्षापासून BSNL अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
नवीन टॉवर उभारण्यासाठी निधी उपलब्ध नसल्याची कबुली संबंधित अधिकाऱ्यांनी दिल्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील नागरिकांना मोबाईल व इंटरनेट सेवांपासून वंचित राहावे लागत असल्याचेही त्यांनी केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून दिले.
देशात एकीकडे 5G सेवांचा मोठ्या प्रमाणावर गाजावाजा केला जात असताना ग्रामीण व सीमावर्ती भागात मूलभूत नेटवर्क सुविधांचाही अभाव असल्याची वस्तुस्थिती त्यांनी मांडली. BSNL च्या पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी व इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेडेशनसाठी आवश्यक निधी न दिल्यामुळे ही सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी हळूहळू खाजगीकरणाच्या दिशेने ढकलली जात असल्याचा आरोपही खासदार शिंदे यांनी केला.
“BSNL ची सध्याची यंत्रणा कार्यक्षम नसताना ती बदलण्यासाठी आणि ग्रामीण भागातील कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी केंद्र सरकार नेमकी कोणती ठोस पावले उचलणार?” असा थेट सवाल त्यांनी संसदेत उपस्थित केला.
अक्कलकोटसारख्या सीमावर्ती भागातील नागरिकांना तातडीने दर्जेदार दूरसंचार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने त्वरित आणि प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी ठाम मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी केली.
यावर उत्तर देताना केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी BSNL च्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा सुरू असून, 4G सेवा अधिक सक्षम केल्यानंतर लवकरच 5G सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले.
    user_Akkalkot news
    Akkalkot news
    Press reporter अक्कलकोट, सोलापूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • जालना शहरातील बस स्थानक परिसरात चोरी करणाऱ्या चार सराईत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून त्यांच्या ताब्यातून सुमारे रु. ९२,४७०/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे चोरी व घरफोडीचे एकूण १० गुन्हे उघडकीस आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जालना बस स्थानक परिसरात तसेच शहरातील विविध भागात चोरी व घरफोडीच्या घटना वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने विशेष पथक तयार करून तपास सुरू केला. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून चार सराईत आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी जालना शहर व परिसरातील चोरी आणि घरफोडीचे १० गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेले साहित्य जप्त करण्यात आले असून त्याची किंमत सुमारे रु. ९२,४७०/- इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पुढील तपास जालना पोलिसांकडून सुरू असून आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तसेच ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली असून नागरिकांनी संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
    1
    जालना शहरातील बस स्थानक परिसरात चोरी करणाऱ्या चार सराईत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून त्यांच्या ताब्यातून सुमारे रु. ९२,४७०/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे चोरी व घरफोडीचे एकूण १० गुन्हे उघडकीस आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जालना बस स्थानक परिसरात तसेच शहरातील विविध भागात चोरी व घरफोडीच्या घटना वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने विशेष पथक तयार करून तपास सुरू केला. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून चार सराईत आरोपींना ताब्यात घेतले.
आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी जालना शहर व परिसरातील चोरी आणि घरफोडीचे १० गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेले साहित्य जप्त करण्यात आले असून त्याची किंमत सुमारे रु. ९२,४७०/- इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी पुढील तपास जालना पोलिसांकडून सुरू असून आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
तसेच ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली असून नागरिकांनी संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
    user_Sandip Gaikwad
    Sandip Gaikwad
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    10 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.