Shuru
Apke Nagar Ki App…
गौतमी पाटीलचं घुंगरु वाजणार कर्जत तालुक्यातील बहिरोबावाडीत
कर्जत लाईव्ह
गौतमी पाटीलचं घुंगरु वाजणार कर्जत तालुक्यातील बहिरोबावाडीत
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by कर्जत लाईव्ह1
- Post by समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा1
- नेवासा तालुक्यात शेतकरी हिताचा महत्त्वपूर्ण निर्णय नेवासा तालुक्यातील माळीचिंचोरे ते कारेगाव शिव रस्ता (अंदाजे १.२ कि.मी.) प्रशासकीय पुढाकारातून यशस्वीरित्या खुला करण्यात आला आहे. या रस्त्यामुळे परिसरातील सुमारे ७० गटांतील शेतकऱ्यांना थेट दिलासा मिळणार असून शेती वाहतूक व दैनंदिन हालचाली अधिक सुलभ होणार आहेत. तहसीलदार श्री. संजय बिरादार यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे स्थानिक पातळीवरील प्रलंबित प्रश्न मार्गी लागला असून ‘शासन जनतेच्या दारी’ या संकल्पनेला बळ मिळाले आहे. #नेवासा #अहिल्यानगर #शासनजनतेच्यादारी #शेतकरीहित #ग्रामीणविकास #रस्ताविकास #महसूलप्रशासन #सुशासन #लोकहितउपक्रम #महाराष्ट्रसरकार1
- रमजानच्या पवित्र महिन्याच्या निमित्ताने सोलापूरचे समाजसेवक फारुक शाब्दी यांनी 18 मार्च रोजी भव्य इफ्तार पार्टीचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात शहरातील मान्यवर, मित्रपरिवार आणि सर्वसामान्य नागरिकांना निमंत्रित करण्यात आले असून, सामाजिक ऐक्य आणि बंधुभाव वाढवण्याचा संदेश या उपक्रमातून दिला जाणार आहे. रमजानच्या या पवित्र काळात एकत्र येऊन उपवास सोडण्याचा हा कार्यक्रम विशेष आकर्षण ठरणार आहे. #FarukShabdi #IftarParty #Ramzan2026 #Solapur #Iftar #Unity #Brotherhood #RamadanSpecial1
- Post by M G1
- Post by Solapur News1
- मोहोळ :- तालुक्यातील दिव्यांग बांधवांना अर्थसहाय्य देण्याच्या हेतूने राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा. व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सन १९८० पासून राबविण्यात येत आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय, दिनांक २० ऑगस्ट २०१९ अन्वये विशेष सहाय्य योजनेतील लाभाथ्र्यांचे आधार कार्ड संबंधित योजनेशी ३ महिन्याच्या आत संलग्न करणे बंधनकारक करण्यात आले आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय, दिनांक १५ सप्टेंबर २०२५ अन्वये विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे मासिक अर्थसहाय्य रुपये १५०० वरुन २५०० इतके करण्यात आले आहे. व लाभाथ्र्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी.बी.टी. पोर्टलव्दारे थेट लाभाय्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात करण्यात येत आहे. दिव्यांग कल्याण विभाग, शासन निर्णय दिनांक २७ जून, २०२४ अन्वये शासनाकडून राबविण्यात येणान्या दिव्यांगासाठीच्या विविध योजना / सवलती इत्यादीचा लाभ मिळण्यासाठी राज्यातील दिव्यांगासाठी वैश्विक ओळखपत्र UDID Card अनिवार्य करण्यात आले आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दिनांक २४.०२.२०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना व योजनेतील दिव्यांग लाभाथ्र्यांसाठी योजना दिनांक ०१.०४.२०२६ पासून दिव्यांग कल्याण विभागामार्फत राबविण्यात येईल. तरी सर्व दिव्यांग लाभार्थी यांनी आपले वैश्विक ओळखपत्र UDID Card आणि आधार कार्ड दिनांक ३१.०३.२०२६ पूर्वी संलग्न करण्यासाठी संबंधित गावचे ग्राम महसूल अधिकारी यांचेकडे / तहसिल कार्यालय मोहोळ येथे आवश्यक कागदपत्रांसह तात्काळ भेट दयावी. तहसील कार्यालयात हे कागदपत्र सादर करा. 1) आधार कार्ड 2)दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र (UDID Card) 3) बँकेचे पासबुक 4) रेशनकार्ड व मोबाईल क्रमांक. या कागदपत्रांची मूळ प्रत व छायांकित प्रत सोबत घेवून यावे.1
- विद्यार्थ्यांच्या शरीर, मन, बुद्धीच्या विकासासाठी योग आवश्यक- स्वामी परमार्थदेव -हर्षवर्धन पाटील यांचा योग शिबिरात सहभाग -बावडा शिक्षण संकुल मध्ये योग शिबिर इंदापूर : प्रतिनिधी दि.11/3/26 योग म्हणजे केवळ व्यायाम नसून जगण्याची शिस्तबद्ध कला आहे. निरोगी शरीरातच निरोगी मन व निरोगी भविष्य दडलेले असते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शरीर, मन आणि बुद्धीच्या विकासासाठी योग आवश्यक असल्याचे प्रतिपादन पतंजली योगपीठ हरिद्वारचे मुख्य केन्द्रीय प्रभारी प. पू. स्वामी परमार्थदेवजी महाराज यांनी मंगळवारी (दि. 10) केले. बावडा येथील श्री शिवाजी एज्युकेशन संस्थेच्या शैक्षणिक संकुलच्या श्री शिवाजी विद्यालयाच्या आवारामध्ये पतंजली योगपीठ हरिद्वार संचलित पतंजली योग समिती भारत स्वाभिमान ट्रस्ट इंदापूर यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी आयोजित एक दिवसीय योग शिबिरामध्ये मार्गदर्शन करताना स्वामी परमार्थदेवजी महाराज बोलत होते. या योग शिबिराचे उद्घाटन राष्ट्रीय सहकारी साखर महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, प.पु.स्वामी परमार्थदेवजी मुख्य केंद्रीय प्रभारी पतंजली योगपीठ हरिद्वार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी प. पू. स्वामी परमार्थदेवजी यांनी विद्यार्थ्यांना जीवनामध्ये राग न येऊन देणे व संयम पाळणे हे यशस्वी जीवनासाठी आवश्यक असल्याचे व त्यासाठी योग व प्राणायाम आवश्यक असल्याचे नुमूद केले. निरोगी जीवन जगण्याची योग, प्राणायाम ही एक जीवन पद्धती असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच याप्रसंगी त्यांनी आरोग्यासाठी लाभदायक अशा प्रकारचे योग प्राणायामाची प्रात्यक्षिके केली तसेच काही योगासनांची प्रात्यक्षिके करून दाखवली. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनीही स्वामी परमार्थदेवजी यांच्याबरोबर योगासनाचा लाभ घेतला. या योग शिबिरास उदयसिंह पाटील, मनोज पाटील, किरण पाटील, डाॅ.लक्ष्मण आसबे, स्वप्निल घोगरे, पवनराजे घोगरे, संतोष सूर्यवंशी, अमोल घोगरे, रणजीत गिरमे, रणजीत घोगरे, आचार्य प्रितीश लाड राज्य, आचार्य अविनाश, चंद्रशेखर खापणे, योगरत्न दत्तात्रय अनपट पतंजली योग समिती इंदापूर, प्राचार्य दशरथ घोगरे, ग्रामस्थ, अध्यापक, अध्यापिका, विद्यार्थी उपस्थित होते. आभार उदयसिंह पाटील यांनी मानले. सूत्रसंचालन शब्बीर मुलाणी व अमर निलाखे यांनी केले...1