Shuru
Apke Nagar Ki App…
"उन्हाच्या तीव्रतेमुळे पाणीसाठा कमी होत आहे. नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करण्याची गरज निर्माण झाली आहे."
समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
"उन्हाच्या तीव्रतेमुळे पाणीसाठा कमी होत आहे. नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करण्याची गरज निर्माण झाली आहे."
More news from महाराष्ट्र and nearby areas
- सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यात असलेल्या अप्पर मंद्रुप तहसीलदार कार्यालयाच्या हद्दीत अवैधरित्या वाळू उपसा सुरू आहे.अवैध रित्या वाळू उपसा करत असल्याचे पुरावे देत प्रहारच्या जिल्हाध्यक्षकांनी अप्पर तहसीलदारांना निवेदन दिले आहे.प्रहारचे जिल्हाध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी मंद्रुप येथील अप्पर तहसीलदार यांना निवेदन देत महसूलमंत्री बावनकुळे यांचा पुतळा नदीपात्रातील वाळूत दफन करणार इशारा दिला आहे.दक्षिण सोलापूर तालुक्यातील भीमा व सिना नदीची वाळू मोठ्या प्रमाणात अवैधरित्या उपसा केली जात आहे वाळू माफियांना वेळीच रोखा अशी मागणी अजित कुलकर्णी यांनी केली आहे.शेतकऱ्यांना घेऊन मोठे जनआंदोलन उभे करणार असाही इशारा दिला आहे.1
- नेवासा तालुक्यात शेतकरी हिताचा महत्त्वपूर्ण निर्णय नेवासा तालुक्यातील माळीचिंचोरे ते कारेगाव शिव रस्ता (अंदाजे १.२ कि.मी.) प्रशासकीय पुढाकारातून यशस्वीरित्या खुला करण्यात आला आहे. या रस्त्यामुळे परिसरातील सुमारे ७० गटांतील शेतकऱ्यांना थेट दिलासा मिळणार असून शेती वाहतूक व दैनंदिन हालचाली अधिक सुलभ होणार आहेत. तहसीलदार श्री. संजय बिरादार यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे स्थानिक पातळीवरील प्रलंबित प्रश्न मार्गी लागला असून ‘शासन जनतेच्या दारी’ या संकल्पनेला बळ मिळाले आहे. #नेवासा #अहिल्यानगर #शासनजनतेच्यादारी #शेतकरीहित #ग्रामीणविकास #रस्ताविकास #महसूलप्रशासन #सुशासन #लोकहितउपक्रम #महाराष्ट्रसरकार1
- Post by Saudagar Gaikwad1
- Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज1
- विक्रम शिंदे / भोर दि.18 पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉंग्रेस वीरधवल जगदाळे यांची तर उपाध्यक्षपदी विवेक वळसे पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.मात्र भोर तालुक्याची संधी गेल्याने कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.मात्र भोंगवली कामथडी गटातून जिल्हा परिषदेवर निवडून गेलेले भोरचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते विक्रम खुटवड यांना अध्यक्षपदी संधी न मिळाल्याने कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.1
- पिंपरी चिंचवड : - पिंपरी चिंचवड शहरातील भक्ती शक्ती चौकाजवळ काल रात्री साडेआठ वाजता दरम्यान अचानक एका दुचाकी वाहनाने पेठ घेतला आहे. दुचाकी वाहन आगीत जळत असतानाची दृश्य रस्त्याने ये जा करणाऱ्या काही नागरिकांनी आपल्या मोबाईल मध्ये टिपली आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने या आगीची वर्दी मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी तातडीने पोहोचून दुचाकी वाहनला लागलेली आग आटोक्यात आणली आहे... #PimpriChinchwad #BhaktiShaktiChowk #BikeFire #FireIncident #BreakingNews #PCMC #FireBrigade #MaharashtraNews #LocalNews #ViralVideo #पिंपरीचिंचवड #भक्तीशक्तीचौक #दुचाकीआग #आगघटना #अग्निशमनदल #ताज्या_बातम्या #स्थानिकबातम्या #महाराष्ट्रन्यूज #ब्रेकिंगन्यूज2
- विक्रम शिंदे /भोर दि.18 भोर महाड मार्गावरील वरंधा घाटात उंबर्डेवाडी येथे इनोव्हा कार( एम एच ०६ बी एम 7911 )जळून खाक झाल्याची घटना घडली आहे . इनोव्हा कार महाडच्या दिशेने जात असताना घडली हि घटना घडली आहे .मात्र आग लागल्याचे वेळीच लक्षात आल्याने प्रवासी बचावले आहेत.2
- पिंपरी चिंचवड : - खंडणीसाठी अपहरण आणि कोयत्याचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना पिंपरी चिंचवड पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने बेड्या ठोकल्यात, पवन छगन उजगरे, सुमित हनुमंत कराड अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत, या कारवाईत पोलिसांनी दोन रिक्षा, दोन कोयते, मोबाईल फोन आणि काही रोख रक्कम असा 5 लाख 16 हजार 90 रुपयांचा मुद्देमाल ही जप्त केलाय, आरोपींना अटक केल्याने भोसरी आणि सांगवी पोलिसांत दाखल असलेल्या गुन्ह्यांची उकल झाली आहे....2
- तासगाव प्रतिनिधी अट्रोसिटी कायद्यातील तातडीच्या अटकेची तरतूद शिथिल करण्याचा सरकारचा निर्णय हा दलितांवरील अत्याचारांना प्रोत्साहन देणारा असल्याचा आरोप राष्ट्रीय दलित पँथर सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रशांत केदार यांनी केला आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ तहसील कार्यालयासमोर पँथर सेनेच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी दंडाला काळी फित बांधून समाजकल्याण मंत्री संजय शिरसाठ यांच्या राजीनाम्याची मागणी केली. “अट्रोसिटी कायद्यातील बदल हे संविधानविरोधी असून दलित, आदिवासी आणि मागासवर्गीयांच्या अधिकारांवर गदा आणणारे आहेत,” असे मत प्रशांत केदार व राज्य संपर्क प्रमुख युनूस कोल्हापूरे यांनी व्यक्त केले. तहसीलदार अतुल पाटोळे यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की, अट्रोसिटी कायदा हा केंद्र सरकारचा असून राज्य सरकारने केवळ त्याची अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे. मात्र तातडीची अटक थांबवून आधी प्राथमिक तपासणी करण्याचा निर्णय हा पीडितांना न्याय मिळण्यात अडथळा निर्माण करणारा आहे. “तातडीची अटक शिथिल केल्यास गुन्हेगारांचे मनोबल वाढेल आणि पीडितांवर दबाव टाकण्याची शक्यता वाढेल,” असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला. तसेच, या निर्णयामुळे दलित आणि आदिवासी समाजाच्या विश्वासाला तडा गेल्याचे सांगत, हा निर्णय तात्काळ मागे न घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. या आंदोलनात प्रमिला गावडे, विजयाताई माळी, निशांत आवळेकर, अंकुश केंगार, ऋषिकेश गुजले, श्रुष्टी कांबळे, गुरुनाथ धाबडे, राहुल साठे, नितीन जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. फोटो ओळ : दंडाला काळी फित बांधून समाजकल्याण मंत्री संजय शिरसाठ यांच्या विरोधात निदर्शने करताना प्रशांत केदार, युनूस कोल्हापूरे, प्रमिला गावडे व अन्य कार्यकर्ते.1