Shuru
Apke Nagar Ki App…
शिक्षिका महिलेच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची? कोण देणार याचे उत्तर?
AapTak Hindi News Channel
शिक्षिका महिलेच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची? कोण देणार याचे उत्तर?
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by AapTak Hindi News Channel1
- नेकनूर येथे कासार समाजाचा महाकुंभ..! कालिका मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी..1
- अवकाळी पावसाचा तडाखा; गारपीट-वाऱ्यामुळे पिकांचे मोठे नुकसान ! गहू, ज्वारी, कांदा पिके आडवी फळबागांनाही फटका.. जालना जिल्ह्यात १९ मार्च ते २ एप्रिल दरम्यान सलग चार वेळा अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांनी हजेरी लावत शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे रब्बी हंगामातील पिके अक्षरशः आडवी पडली असून फळबागांनाही मोठा फटका बसला आहे. परिणामी तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.1
- जाहिरात बनवून मिळेल संपर्क करा 90968280801
- बदनापूर जिल्हा जालना बदनापूर शहरातील नळ योजनेच्या पुरवठ्यात गटाराचे दूषित पाणी मिसळत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. जुन्या, जीर्ण पाइपलाइनमध्ये गटाराचे पाणी मिसळल्यामुळे कॉलरा, टायफॉइड, काविळ आणि जुलाब यांसारखे जलजन्य आजार पसरत आहेत. योग्य जलशुद्धीकरण यंत्रणेचा अभाव आणि नगर पंचायतचे दुर्लक्ष यामुळे नागरिकांना गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाण्याचा सामना करावा लागत आहे. प्रमुख आरोग्य धोके आणि कारणे: - दूषित पाणी: पिण्याच्या नळांमध्ये सांडपाणी मिसळत असल्याने माती व लहान जीवजंतू असलेले पाणी पुरवले जात आहे. - आजारांचा प्रादुर्भाव: दूषित पाण्यामुळे नागरिकांना वांत्या, जुलाब, अतिसार व ताप यांसारख्या साथीच्या आजारांचा सामना करावा लागतोय. - जीर्ण पाइपलाइन: अनेक वर्षांपासून जुन्या झालेल्या पाइपलाइन आणि गटारांच्या पाईप्स जवळील पाईप्समुळे सांडपाणी पिण्याच्या पाण्यात मिसळत आहे. - जलशुद्धीकरणाचा अभाव: अनेक पाणीपुरवठा योजनांमध्ये जलशुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वित नसल्याने अशुद्ध पाणी पुरवले जात आहे. नागरिकांची आवाज: - डॉ. परवीन अन्सारी (वार्ड एक महिला):* अलनूर मस्जिद परिसरात मागील तीन महिन्यापासून दूषित पाणी पुरवठा होत आहे. नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु असताना जुनी पाईपलाईन फुटली असता थातूर मातुर जोडणी केल्याने गटाराचे पाणी नळ योजनेच्या पाण्यात मिसळत आहे. - चित्रा संतोष पवार (नगर अध्यक्ष): नगर पंचायतने पाणी शुद्धतेची माहिती देण्याची जबाबदारी पार पाडली नाही. संबंधित अभियांत्याला सूचना दिली असून दोन दिवसात पाईपलाईन दुरुस्ती करण्यात येईल व पाणी तपासून घेतले जाईल. नगर पंचायतने त्वरित दखल घेऊन समस्या सोडवावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.10
- शेतकऱ्याची मुलगी बनली पोलीस,गावकऱ्यानी गुलाल उधळून केले जंगी स्वागत... भोकरदन तालुक्यातील क्षीरसागर येथील कु. शितल नाना मोरे यवतमाळ येथे महाराष्ट्र महिला पोलीस मध्ये निवड झाल्याबद्दल गावकरी, महिला, पुरुषानी मोठ्या उत्साहाने पेढे वाटून,गुलाल उधळत जंगी स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी अशोक पांडुरंग साबळे,दिलीप काकाराव साबळे, बालु मोरे, भागवत साबळे, सचिन मोरे, पंढरी साबळे,समाधान कोलते, निवृत्ती साबळे, संतोष साबळे, सौ. संगीता दिलीप साबळे,सौ. कविता बाळू मोरे यांच्या सह गावकऱ्यांची उपस्थिती होती1
- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मंठा नगरपंचायतीतर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष अरुणभाऊ वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसराची स्वच्छता करण्यात आली. या उपक्रमात नगरपंचायत कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्मारक परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा संदेश देत जयंतीपूर्वी परिसराची साफसफाई करण्यात आली. यावेळी नागरिकांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत अशा उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.1
- आयशर टेम्पो झाडाला धडकला; भीषण अपघातात दोघांचा मृत्यू.. जालना शहरातील कन्हैयानगर परिसरात भीषण अपघात घडून दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. भरधाव वेगातील आयशर टेम्पो वडाच्या झाडाला धडकल्याने झाड मुळासकट उखडून पडले, एवढी धडक तीव्र होती. जालना-जिंतूर मार्गावरून शिर्डीकडे चारा घेऊन जाणारा (एमएच २२ ए ३३७२) क्रमांकाचा आयशर टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने कन्हैयानगर येथील सेंट मेरी शाळेसमोर अपघातग्रस्त झाला. हा अपघात पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास घडला. या दुर्घटनेत अविनाश लोंढे (रा. डुकरी पिंपरी, ता. जालना) व सुरेश पालवे (रा. जिंतूर, जि. परभणी) यांचा जागीच मृत्यू झाला अशी माहिती मिळाली.1