नैसर्गिक संकटाला तोंड देत उत्पन्न घेण्यासाठी जिवाचे रान करणाऱ्या शेतकऱ्यांना आता वन्यप्राण्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वाशीम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील वाडीरायताळ, देगाव, लिंगापेन आणि किनखेडा या परिसरात जंगली रोहींनी धुडगूस घालून सोयाबीन पिकांची मोठी नासाडी केली आहे. खरिपातील सोयाबीनची पेरणी झाल्यानंतर शेतात अंकुर उगवून पीक उत्तम बहरलेले असतानाच रोहींच्या हैदोसामुळे पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. विशेषतः लिंगापेन आणि परिसरात जंगली रोहींचे अनेक कळप वावरत असून एका एका कळपात ३० ते ५० रोही आहेत. हे रोही पिकांवर ताव मारण्यापेक्षा शेतात धुडगूस घालून पिकांचे अधिक नुकसान करत आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. वन्यप्राण्यांच्या या उपद्रवामुळे शेतकरी कमालीचे त्रस्त झाले असून वन विभागाने या रोही प्राण्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे.
नैसर्गिक संकटाला तोंड देत उत्पन्न घेण्यासाठी जिवाचे रान करणाऱ्या शेतकऱ्यांना आता वन्यप्राण्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वाशीम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील वाडीरायताळ, देगाव, लिंगापेन आणि किनखेडा या परिसरात जंगली रोहींनी धुडगूस घालून सोयाबीन पिकांची मोठी नासाडी केली आहे. खरिपातील सोयाबीनची पेरणी झाल्यानंतर शेतात अंकुर उगवून पीक उत्तम बहरलेले असतानाच रोहींच्या हैदोसामुळे पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. विशेषतः लिंगापेन आणि परिसरात जंगली रोहींचे अनेक कळप वावरत असून एका एका कळपात ३० ते ५० रोही आहेत. हे रोही पिकांवर ताव मारण्यापेक्षा शेतात धुडगूस घालून पिकांचे अधिक नुकसान करत आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. वन्यप्राण्यांच्या या उपद्रवामुळे शेतकरी कमालीचे त्रस्त झाले असून वन विभागाने या रोही प्राण्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे.
- नैसर्गिक संकटाला तोंड देत उत्पन्न घेण्यासाठी जिवाचे रान करणाऱ्या शेतकऱ्यांना आता वन्यप्राण्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वाशीम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील वाडीरायताळ, देगाव, लिंगापेन आणि किनखेडा या परिसरात जंगली रोहींनी धुडगूस घालून सोयाबीन पिकांची मोठी नासाडी केली आहे. खरिपातील सोयाबीनची पेरणी झाल्यानंतर शेतात अंकुर उगवून पीक उत्तम बहरलेले असतानाच रोहींच्या हैदोसामुळे पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. विशेषतः लिंगापेन आणि परिसरात जंगली रोहींचे अनेक कळप वावरत असून एका एका कळपात ३० ते ५० रोही आहेत. हे रोही पिकांवर ताव मारण्यापेक्षा शेतात धुडगूस घालून पिकांचे अधिक नुकसान करत आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. वन्यप्राण्यांच्या या उपद्रवामुळे शेतकरी कमालीचे त्रस्त झाले असून वन विभागाने या रोही प्राण्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे.1
- श्री क्षेत्र वैष्णव गडावर भक्तीचा महासागर पाहायला मिळाला आहे. या भक्तिमय वातावरणात लाखो भाविकांनी उपस्थित राहून पांडुरंगाचे दर्शन घेतले.1
- जालना जिल्ह्यातील मंठा येथील विवेकानंद सेवा केंद्र शाळेच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त भक्तीमय दिंडीचे आयोजन करण्यात आले. या दिंडीच्या माध्यमातून वारकरी संस्कृतीचा उत्साहात जागर करण्यात आला.1
- शेतकरी कर्ज मुक्ती योजनेच्या माध्यमातून ५६ लाख शेतकऱ्यांना एकूण ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा लाभ मिळाला असल्याची माहिती पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली आहे.1
- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्ता जयश्रीताई शेळके यांनी बुलढाणा येथे अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. अर्थमंत्र्यांच्या या विधानाचा जोरदार समाचार घेताना 'हा प्रकार म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत' असा थेट हल्लाबोल जयश्रीताई शेळके यांनी केला आहे.1
- काँग्रेस प्रभारी रेहाना रियाज चिस्ती यांच्या नेतृत्वाखाली परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक पार पडली.1
- पंढरपूर येथील आषाढी एकादशीच्या यात्रेदरम्यान चंद्रभागा नदीत स्नान करताना पाण्यात बुडणाऱ्या एका भाविकाला वाशिम जिल्ह्यातील स्वामी विवेकानंद आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या जवानांनी तत्परतेने सुरक्षितपणे बाहेर काढून त्याचे प्राण वाचवले आहेत. चंद्रभागेच्या पात्रात स्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी जमलेली असताना हा भाविक पाण्यात बुडत असल्याचे पथकाच्या सदस्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता पथकाने प्रसंगावधान राखत बचावकार्य सुरू केले आणि एक मोठा अनर्थ टळला. आषाढी यात्रेदरम्यान लाखो भाविक पंढरपुरात दाखल होत असल्याने गर्दीच्या ठिकाणी व नदीपात्रात दुर्घटना घडण्याची दाट शक्यता लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन पथके सज्ज असतात. 'सेवा हीच खरी भक्ती' याचा प्रत्यय देत भाविकाला जीवनदान देणाऱ्या वाशिमच्या स्वामी विवेकानंद आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या या धाडसी आणि सेवाभावी कार्याचे उपस्थित भाविकांकडून मोठे कौतुक होत असून हे पथक बुडणाऱ्या भाविकासाठी देवदूत ठरले आहे.4