पंढरपूर येथील आषाढी एकादशीच्या यात्रेदरम्यान चंद्रभागा नदीत स्नान करताना पाण्यात बुडणाऱ्या एका भाविकाला वाशिम जिल्ह्यातील स्वामी विवेकानंद आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या जवानांनी तत्परतेने सुरक्षितपणे बाहेर काढून त्याचे प्राण वाचवले आहेत. चंद्रभागेच्या पात्रात स्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी जमलेली असताना हा भाविक पाण्यात बुडत असल्याचे पथकाच्या सदस्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता पथकाने प्रसंगावधान राखत बचावकार्य सुरू केले आणि एक मोठा अनर्थ टळला. आषाढी यात्रेदरम्यान लाखो भाविक पंढरपुरात दाखल होत असल्याने गर्दीच्या ठिकाणी व नदीपात्रात दुर्घटना घडण्याची दाट शक्यता लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन पथके सज्ज असतात. 'सेवा हीच खरी भक्ती' याचा प्रत्यय देत भाविकाला जीवनदान देणाऱ्या वाशिमच्या स्वामी विवेकानंद आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या या धाडसी आणि सेवाभावी कार्याचे उपस्थित भाविकांकडून मोठे कौतुक होत असून हे पथक बुडणाऱ्या भाविकासाठी देवदूत ठरले आहे.
पंढरपूर येथील आषाढी एकादशीच्या यात्रेदरम्यान चंद्रभागा नदीत स्नान करताना पाण्यात बुडणाऱ्या एका भाविकाला वाशिम जिल्ह्यातील स्वामी विवेकानंद आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या जवानांनी तत्परतेने सुरक्षितपणे बाहेर काढून त्याचे प्राण वाचवले आहेत. चंद्रभागेच्या
पात्रात स्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी जमलेली असताना हा भाविक पाण्यात बुडत असल्याचे पथकाच्या सदस्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता पथकाने प्रसंगावधान राखत बचावकार्य सुरू केले आणि एक मोठा
अनर्थ टळला. आषाढी यात्रेदरम्यान लाखो भाविक पंढरपुरात दाखल होत असल्याने गर्दीच्या ठिकाणी व नदीपात्रात दुर्घटना घडण्याची दाट शक्यता लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन पथके सज्ज असतात. 'सेवा हीच खरी भक्ती' याचा प्रत्यय
देत भाविकाला जीवनदान देणाऱ्या वाशिमच्या स्वामी विवेकानंद आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या या धाडसी आणि सेवाभावी कार्याचे उपस्थित भाविकांकडून मोठे कौतुक होत असून हे पथक बुडणाऱ्या भाविकासाठी देवदूत ठरले आहे.
- चांदूर रेल्वे उपविभागाच्या वतीने धामणगाव रेल्वे येथील 'गणेश इन' सभागृहात श्री छत्रपती शिवाजी महाराज भव्य 'महाराजस्व समाधान शिबिर' अत्यंत उत्साहात आणि दिमाखात पार पडले. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करत जयंतीनिमित्त या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांचे व शेतकऱ्यांचे महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्न, विविध शासकीय दाखले आणि प्रशासकीय कामे एकाच छताखाली जलद गतीने मार्गी लावणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता. या शिबिराच्या माध्यमातून परिसरातील शेकडो नागरिकांना व शेतकऱ्यांना विविध महसुली कामांचा तात्काळ निपटारा करून शासकीय दाखले व कल्याणकारी योजनांचे प्रत्यक्ष वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसड, नगराध्यक्षा सौ. अर्चना अडसड (रोठे अक्का), उपविभागीय अधिकारी (महसूल) आणि महसूल विभागाचे विविध वरिष्ठ अधिकारी विशेष रूपाने उपस्थित होते. तसेच धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे आणि नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील महसूल अधिकारी-कर्मचारी, नगरपरिषदेचे कर्मचारी, महिला बचत गटांच्या प्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
- केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर खामगाव येथे विद्यार्थी कृती समितीच्या वतीने शनिवारी सायंकाळी नगर परिषद भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जोरदार जल्लोष करण्यात आला. या राजीनाम्यामुळे लोकशाही आणि संविधानाच्या मूल्यांचा विजय झाल्याची तीव्र भावना विद्यार्थी कृती समितीने व्यक्त केली आहे. या उत्साहाच्या वेळी विद्यार्थ्यांनी परिसरात मोठ्या प्रमाणात आतषबाजी केली आणि जोरदार घोषणाबाजी करत आपला आनंद साजरा केला. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याचे स्वागत करत विद्यार्थी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत हा विजय उत्सव साजरा केला.4
- श्री क्षेत्र वैष्णव गडावर भक्तीचा महासागर पाहायला मिळाला आहे. या भक्तिमय वातावरणात लाखो भाविकांनी उपस्थित राहून पांडुरंगाचे दर्शन घेतले.1
- आषाढी एकादशीच्या पावन पर्वाचे औचित्य साधून अकोट तालुक्यातील संत नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंडगाव येथे लिटिल चॅम्प्स कॉन्व्हेंट आणि नारायणराव पिंपळे प्रायमरी इंग्लिश स्कूलच्या वतीने वारकरी संप्रदायाची परंपरा जपणारा अनोखा सांस्कृतिक उपक्रम उत्साहात पार पडला. या वेळी लहान विद्यार्थ्यांनी टाळ-मृदुंगाच्या निनादात आणि हरिनामाच्या गजरात पारंपरिक दिंडी काढली. या सोहळ्यामुळे संपूर्ण मुंडगाव परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला असून मुंडगावात जणू पंढरपूरच अवतरल्याचा अनुभव उपस्थितांनी घेतला. या दिंडीत विठ्ठल-रुक्मिणी, संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्या वेशभूषेत सजलेल्या चिमुकल्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. डोक्यावर तुळशी वृंदावन, हातात भगवी पताका आणि पारंपरिक पोशाख परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी "विठ्ठल... विठ्ठल... जय हरी विठ्ठल..." असा अखंड नामघोष करत पंढरपूरच्या वारीचा अनुभव साकारला. बालकांच्या या निरागस भक्तीभावाने आणि कौशल्यपूर्ण सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकून घेतली. विद्यार्थ्यांमध्ये बालपणापासूनच भक्ती, समता, सेवाभाव आणि भारतीय संस्कृतीची मूल्ये रुजावीत, या उद्देशाने शाळेतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका सरिता पिंपळे, संचालिका योगिताताई पिंपळे यांच्यासह चंचल देवगिरे, गायत्री येवतकर, तृप्ती सांगोळे, स्वाती सुरपाटणे, निकिता दहीभात, निकिता वानखडे, वंदना म्हैसने, इतर शिक्षक व पालकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. वारकरी परंपरेची ओळख नव्या पिढीपर्यंत पोहोचविणाऱ्या शाळेच्या या उपक्रमाचे नागरिक व पालकांकडून विशेष कौतुक केले जात आहे.1
- वर्धा जिल्ह्यातील आर्वी बसस्थानकावर जागोजागी अत्यंत मोठे खड्डे पडले असून बसेसच्या येण्या-जाण्याच्या मुख्य मार्गावरच बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना दररोज मोठा त्रास सहन करावा लागत आहे. स्थानकातून बसेस बाहेर जाताना आणि आत येताना बसची बॉडी खड्ड्यांमध्ये आदळत आहे. याच गाड्यांमधून दररोज प्रवासी आणि शालेय विद्यार्थी प्रवास करत असल्याने त्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला असून अपघाताची दाट शक्यता बनली आहे. जुलै महिना सुरू झाला तरीही बसस्थानकावरील हे खड्डे अद्याप बुजवण्यात आलेले नाहीत. या बसस्थानकाच्या नवीन सिमेंटिंकरण आणि मजबुतीकरणासाठी ₹3 कोटींचा निधी मंजूर झालेला आहे, तरीही अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही. कोणतेही कारण नसताना वर्षानुवर्षे कामे लांबवत ठेवण्याची प्रथाच आर्वीचे स्थानिक लोकप्रतिनिधी चालवत आहेत. स्थानिक विधानसभा आमदार, विधान परिषद आमदार, राज्यसभा खासदार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून गाढ झोपेत आहेत. तसेच राज्याचे परिवहन मंत्री आणि मुंबईतील महामंडळ प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करत असून त्यांना स्थानिक नागरिकांची कोणतीही काळजी नसल्याची स्थिती आहे. या सर्व प्रकारावर आम आदमी पार्टी आर्वीचे संयोजक अक्षय राऊत यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. परिवहन मंत्री आणि राज्य सरकारने या समस्येची तात्काळ दखल घेऊन प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.4
- देशातील परीक्षा व्यवस्थेत मोठ्या सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. परीक्षा पद्धती अधिक सक्षम करण्यासाठी हाय पॉवर टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखाली या हाय पॉवर टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली आहे. ही टास्क फोर्स परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणणे, तिची सुरक्षितता वाढवणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अधिक प्रभावीपणे करण्यासाठी विविध महत्त्वपूर्ण उपाययोजना सुचवणार आहे.1
- जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील मातोश्री नथिबाई प्रायमरी व प्री प्रायमरी इंग्लिश स्कूलमध्ये आषाढी एकादशीच्या निमित्ताने भव्य रिंगण सोहळा अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. टाळ-मृदुंगाचा गजर, भगवे झेंडे आणि 'विठ्ठल-विठ्ठल' नामाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तीरसात न्हाऊन निघाला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवदास सोळंके यांनी भूषवले, तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार अनिल भगत यांची विशेष उपस्थिती होती. या सोहळ्यात शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी संत आणि देव-देवतांच्या वेशभूषेत सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी भगवान श्रीविठ्ठल, रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज आदी संत महात्म्यांच्या आकर्षक वेशभूषा साकारल्या होत्या. डोक्यावर तुळशी वृंदावन, हातात टाळ-मृदुंग आणि भगवे झेंडे घेऊन निघालेली शिस्तबद्ध दिंडी विद्यालयाच्या आवारातील मार्गावरून मार्गस्थ झाली. चिमुकल्यांच्या निरागस अभिव्यक्तीने आणि भक्तीभावाने उपस्थितांची मने जिंकून घेतली असून प्रांगणात जमलेल्या पालक व नागरिकांचे विशेष लक्ष वेधले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील शिक्षिका ज्योती खवले, गीता तेटू, रुचिता कुरवाडे, वर्षा वंडाळे, अर्चना मिसाळ, अश्विनी दामधर, उज्ज्वला धुर्डे, निकीता धुळे, दिपाली नानग्दे, साक्षी ताडे आणि श्रृती वसुले यांनी मोलाचे नियोजन केले. तसेच विशाल वसुलकार, रामेश्वर कुनगाडे, अभिषेक वंडाळे आणि आशा वसुलकार यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले. या भव्य सोहळ्यामुळे सुनगाव नगरी काही वेळ पूर्णपणे विठ्ठलमय झाली होती.1
- कळंब येथील रॉयल पॅलेस येथे २५ जुलै रोजी दुपारी एक वाजता 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान' पार पडले. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या हस्ते पार पडले. या शिबिरामध्ये कळंब, बाभुळगाव, केळापूर व पांढरकवडा तालुक्यातील नागरिक, शेतकरी आणि लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ वितरित करण्यात आला. यामध्ये महिलांना शेतकरी दर्जा प्रमाणपत्र, स्वामित्व सनद, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे मंजुरी आदेश तसेच मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेसह विविध महसुली सेवांचा लाभ प्रदान करण्यात आला. त्यासोबतच लोकसेवा हक्क कायदा, जीवंत सातबारा मोहीम, अभिलेख दुरुस्ती, घरकुल योजना आणि राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना आदी विविध शासकीय योजनांची माहिती देऊन पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज स्वीकारण्यात आले. राळेगाव विधानसभा मतदारसंघातील २७ विभागांच्या सहभागातून आयोजित या अभियानाद्वारे ३,८१५ हून अधिक लाभार्थ्यांना ५,७०७ विविध योजनांचा लाभ देण्यात आला असून, नागरिकांनी शासनाच्या योजनांचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार धीरज स्थूल, तहसीलदार अमित भोईटे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
- जालना जिल्ह्यातील मंठा येथील विवेकानंद सेवा केंद्र शाळेच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त भक्तीमय दिंडीचे आयोजन करण्यात आले. या दिंडीच्या माध्यमातून वारकरी संस्कृतीचा उत्साहात जागर करण्यात आला.1