logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

देशातील परीक्षा व्यवस्थेत मोठ्या सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. परीक्षा पद्धती अधिक सक्षम करण्यासाठी हाय पॉवर टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखाली या हाय पॉवर टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली आहे. ही टास्क फोर्स परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणणे, तिची सुरक्षितता वाढवणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अधिक प्रभावीपणे करण्यासाठी विविध महत्त्वपूर्ण उपाययोजना सुचवणार आहे.

12 hrs ago
user_ALM Bharat
ALM Bharat
Local News Reporter हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
12 hrs ago

देशातील परीक्षा व्यवस्थेत मोठ्या सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. परीक्षा पद्धती अधिक सक्षम करण्यासाठी हाय पॉवर टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखाली या हाय पॉवर टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली आहे. ही टास्क फोर्स परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणणे, तिची सुरक्षितता वाढवणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अधिक प्रभावीपणे करण्यासाठी विविध महत्त्वपूर्ण उपाययोजना सुचवणार आहे.

More news from Maharashtra and nearby areas
  • काँग्रेस प्रभारी रेहाना रियाज चिस्ती यांच्या नेतृत्वाखाली परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक पार पडली.
    1
    काँग्रेस प्रभारी रेहाना रियाज चिस्ती यांच्या नेतृत्वाखाली परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक पार पडली.
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    11 hrs ago
  • कळंब येथील रॉयल पॅलेस येथे २५ जुलै रोजी दुपारी एक वाजता 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान' पार पडले. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या हस्ते पार पडले. या शिबिरामध्ये कळंब, बाभुळगाव, केळापूर व पांढरकवडा तालुक्यातील नागरिक, शेतकरी आणि लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ वितरित करण्यात आला. यामध्ये महिलांना शेतकरी दर्जा प्रमाणपत्र, स्वामित्व सनद, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे मंजुरी आदेश तसेच मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेसह विविध महसुली सेवांचा लाभ प्रदान करण्यात आला. त्यासोबतच लोकसेवा हक्क कायदा, जीवंत सातबारा मोहीम, अभिलेख दुरुस्ती, घरकुल योजना आणि राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना आदी विविध शासकीय योजनांची माहिती देऊन पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज स्वीकारण्यात आले. राळेगाव विधानसभा मतदारसंघातील २७ विभागांच्या सहभागातून आयोजित या अभियानाद्वारे ३,८१५ हून अधिक लाभार्थ्यांना ५,७०७ विविध योजनांचा लाभ देण्यात आला असून, नागरिकांनी शासनाच्या योजनांचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार धीरज स्थूल, तहसीलदार अमित भोईटे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    1
    कळंब येथील रॉयल पॅलेस येथे २५ जुलै रोजी दुपारी एक वाजता 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान' पार पडले. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या हस्ते पार पडले.

या शिबिरामध्ये कळंब, बाभुळगाव, केळापूर व पांढरकवडा तालुक्यातील नागरिक, शेतकरी आणि लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ वितरित करण्यात आला. यामध्ये महिलांना शेतकरी दर्जा प्रमाणपत्र, स्वामित्व सनद, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे मंजुरी आदेश तसेच मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेसह विविध महसुली सेवांचा लाभ प्रदान करण्यात आला. त्यासोबतच लोकसेवा हक्क कायदा, जीवंत सातबारा मोहीम, अभिलेख दुरुस्ती, घरकुल योजना आणि राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना आदी विविध शासकीय योजनांची माहिती देऊन पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज स्वीकारण्यात आले.

राळेगाव विधानसभा मतदारसंघातील २७ विभागांच्या सहभागातून आयोजित या अभियानाद्वारे ३,८१५ हून अधिक लाभार्थ्यांना ५,७०७ विविध योजनांचा लाभ देण्यात आला असून, नागरिकांनी शासनाच्या योजनांचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार धीरज स्थूल, तहसीलदार अमित भोईटे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    user_Amol sangani
    Amol sangani
    पत्रकार राळेगाव, यवतमाळ, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • परभणी महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आक्रमक झाले आहेत. वाढीव अनुदानासह विविध प्रलंबित मागण्यांवर राज्य शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी ठाम मागणी परभणी महानगरपालिका अधिकारी-कर्मचारी संघटनेने केली आहे. राज्य शासनाने या मागण्यांवर वेळेत सकारात्मक निर्णय न घेतल्यास १० ऑगस्टपासून कामबंद आंदोलन छेडण्याचा थेट इशारा संघटनेने दिला आहे.
    1
    परभणी महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आक्रमक झाले आहेत. वाढीव अनुदानासह विविध प्रलंबित मागण्यांवर राज्य शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी ठाम मागणी परभणी महानगरपालिका अधिकारी-कर्मचारी संघटनेने केली आहे.

राज्य शासनाने या मागण्यांवर वेळेत सकारात्मक निर्णय न घेतल्यास १० ऑगस्टपासून कामबंद आंदोलन छेडण्याचा थेट इशारा संघटनेने दिला आहे.
    user_जागर महाराष्ट्राचा न्यूज
    जागर महाराष्ट्राचा न्यूज
    मानवत, परभणी, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • बुलढाणा जिल्ह्यातील तब्बल ३५ हजार शेतकऱ्यांचा पीक विमा अडकला आहे. याप्रश्नी क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर आक्रमक झाले असून त्यांनी अडकलेल्या पीक विम्याच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे.
    1
    बुलढाणा जिल्ह्यातील तब्बल ३५ हजार शेतकऱ्यांचा पीक विमा अडकला आहे. याप्रश्नी क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर आक्रमक झाले असून त्यांनी अडकलेल्या पीक विम्याच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे.
    user_Raghunath Aghao
    Raghunath Aghao
    Farmer लोणार, बुलढाणा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • चांदूर रेल्वे उपविभागाच्या वतीने धामणगाव रेल्वे येथील 'गणेश इन' सभागृहात श्री छत्रपती शिवाजी महाराज भव्य 'महाराजस्व समाधान शिबिर' अत्यंत उत्साहात आणि दिमाखात पार पडले. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करत जयंतीनिमित्त या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांचे व शेतकऱ्यांचे महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्न, विविध शासकीय दाखले आणि प्रशासकीय कामे एकाच छताखाली जलद गतीने मार्गी लावणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता. या शिबिराच्या माध्यमातून परिसरातील शेकडो नागरिकांना व शेतकऱ्यांना विविध महसुली कामांचा तात्काळ निपटारा करून शासकीय दाखले व कल्याणकारी योजनांचे प्रत्यक्ष वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसड, नगराध्यक्षा सौ. अर्चना अडसड (रोठे अक्का), उपविभागीय अधिकारी (महसूल) आणि महसूल विभागाचे विविध वरिष्ठ अधिकारी विशेष रूपाने उपस्थित होते. तसेच धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे आणि नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील महसूल अधिकारी-कर्मचारी, नगरपरिषदेचे कर्मचारी, महिला बचत गटांच्या प्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    1
    चांदूर रेल्वे उपविभागाच्या वतीने धामणगाव रेल्वे येथील 'गणेश इन' सभागृहात श्री छत्रपती शिवाजी महाराज भव्य 'महाराजस्व समाधान शिबिर' अत्यंत उत्साहात आणि दिमाखात पार पडले. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करत जयंतीनिमित्त या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांचे व शेतकऱ्यांचे महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्न, विविध शासकीय दाखले आणि प्रशासकीय कामे एकाच छताखाली जलद गतीने मार्गी लावणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता.

या शिबिराच्या माध्यमातून परिसरातील शेकडो नागरिकांना व शेतकऱ्यांना विविध महसुली कामांचा तात्काळ निपटारा करून शासकीय दाखले व कल्याणकारी योजनांचे प्रत्यक्ष वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसड, नगराध्यक्षा सौ. अर्चना अडसड (रोठे अक्का), उपविभागीय अधिकारी (महसूल) आणि महसूल विभागाचे विविध वरिष्ठ अधिकारी विशेष रूपाने उपस्थित होते. तसेच धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे आणि नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील महसूल अधिकारी-कर्मचारी, नगरपरिषदेचे कर्मचारी, महिला बचत गटांच्या प्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    user_Santosh Waghmare
    Santosh Waghmare
    T. V. News Reporter Dhamangaon Railway, Amravati•
    11 hrs ago
  • जालना जिल्ह्यातील मंठा येथील विवेकानंद सेवा केंद्र शाळेच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त भक्तीमय दिंडीचे आयोजन करण्यात आले. या दिंडीच्या माध्यमातून वारकरी संस्कृतीचा उत्साहात जागर करण्यात आला.
    1
    जालना जिल्ह्यातील मंठा येथील विवेकानंद सेवा केंद्र शाळेच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त भक्तीमय दिंडीचे आयोजन करण्यात आले. या दिंडीच्या माध्यमातून वारकरी संस्कृतीचा उत्साहात जागर करण्यात आला.
    user_Sandip Gaikwad
    Sandip Gaikwad
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • Post by माधव गायकवाड
    1
    Post by माधव गायकवाड
    user_माधव गायकवाड
    माधव गायकवाड
    उमरी, नांदेड, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे राळेगाव शहरातील वसंत जिनिंग येथे महिलांसाठी मोफत NCMC (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) स्मार्ट कार्ड नोंदणी व वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शनिवार, २५ जुलै रोजी सकाळी १० वाजल्यापासून सुरू झालेल्या या उपक्रमात एकूण १,४७९ महिलांनी मोफत नोंदणीचा लाभ घेतला. महिला सन्मान योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत मिळणाऱ्या या स्मार्ट कार्डमुळे महिलांना एसटी बससह विविध सार्वजनिक वाहतूक सेवांचा अधिक सुलभ, सुरक्षित आणि सन्मानपूर्वक प्रवास करणे शक्य होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते झाले. त्यांनी लाभार्थी महिलांना स्मार्ट कार्डचे वितरण करताना, राज्य शासन महिलांच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने विविध लोककल्याणकारी योजना राबवत असल्याचे सांगत महिलांनी आर्थिक व सामाजिक प्रगतीसाठी या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. याप्रसंगी भाजप यवतमाळ जिल्हाध्यक्ष ॲड. प्रफुल्लसिंह चौहान यांनीही या योजनेमुळे दैनंदिन प्रवासात महिलांना मोठी मदत मिळेल असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाला महामंडळाचे अधिकारी, भाजपचे विविध आघाड्यांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन संयोजक ॲड. प्रितेश वर्मा यांच्यासह सहसंयोजक प्रकाश खुडसंगे, बादशाह काजी व उमेश मेश्राम यांनी पार पाडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश खुडसंगे यांनी केले, प्रास्ताविकातून ॲड. प्रितेश वर्मा यांनी उद्देश स्पष्ट केला, तर बादशाह काजी यांनी उपस्थितांचे आभार मानले. महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला.
    1
    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे राळेगाव शहरातील वसंत जिनिंग येथे महिलांसाठी मोफत NCMC (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) स्मार्ट कार्ड नोंदणी व वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शनिवार, २५ जुलै रोजी सकाळी १० वाजल्यापासून सुरू झालेल्या या उपक्रमात एकूण १,४७९ महिलांनी मोफत नोंदणीचा लाभ घेतला. महिला सन्मान योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत मिळणाऱ्या या स्मार्ट कार्डमुळे महिलांना एसटी बससह विविध सार्वजनिक वाहतूक सेवांचा अधिक सुलभ, सुरक्षित आणि सन्मानपूर्वक प्रवास करणे शक्य होणार आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते झाले. त्यांनी लाभार्थी महिलांना स्मार्ट कार्डचे वितरण करताना, राज्य शासन महिलांच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने विविध लोककल्याणकारी योजना राबवत असल्याचे सांगत महिलांनी आर्थिक व सामाजिक प्रगतीसाठी या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. याप्रसंगी भाजप यवतमाळ जिल्हाध्यक्ष ॲड. प्रफुल्लसिंह चौहान यांनीही या योजनेमुळे दैनंदिन प्रवासात महिलांना मोठी मदत मिळेल असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाला महामंडळाचे अधिकारी, भाजपचे विविध आघाड्यांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे नियोजन संयोजक ॲड. प्रितेश वर्मा यांच्यासह सहसंयोजक प्रकाश खुडसंगे, बादशाह काजी व उमेश मेश्राम यांनी पार पाडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश खुडसंगे यांनी केले, प्रास्ताविकातून ॲड. प्रितेश वर्मा यांनी उद्देश स्पष्ट केला, तर बादशाह काजी यांनी उपस्थितांचे आभार मानले. महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला.
    user_Amol sangani
    Amol sangani
    पत्रकार राळेगाव, यवतमाळ, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • अकोला जिल्ह्यातील अकोट शहरातील शासकीय धान्य गोदामाची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली आहे. सततच्या पावसामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून कचरा आणि झुडपांमुळे लाखो रुपयांचे शासकीय अन्नधान्य धोक्यात आल्याचा आरोप होत आहे. गोदाम परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला असून तेथे काम करणाऱ्या हमाल आणि कर्मचाऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व स्वच्छ शौचालयाची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. पुरवठा विभागाच्या या निष्काळजीपणाविरोधात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणात जिल्हा प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
    1
    अकोला जिल्ह्यातील अकोट शहरातील शासकीय धान्य गोदामाची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली आहे. सततच्या पावसामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून कचरा आणि झुडपांमुळे लाखो रुपयांचे शासकीय अन्नधान्य धोक्यात आल्याचा आरोप होत आहे.

गोदाम परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला असून तेथे काम करणाऱ्या हमाल आणि कर्मचाऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व स्वच्छ शौचालयाची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. पुरवठा विभागाच्या या निष्काळजीपणाविरोधात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणात जिल्हा प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
    user_MOHAMMED RIZWAN RAHEMAN
    MOHAMMED RIZWAN RAHEMAN
    Construction Contractor मूर्तिजापूर, अकोला, महाराष्ट्र•
    13 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.