Shuru
Apke Nagar Ki App…
मनपा स्तरावर जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्स प्रशिक्षणाला सुरुवात,आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी वर्षा लढ्ढा यांच्या हस्ते उदघाटन
Amravati News Update
मनपा स्तरावर जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्स प्रशिक्षणाला सुरुवात,आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी वर्षा लढ्ढा यांच्या हस्ते उदघाटन
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by Amravati News Update1
- दलित वस्ती सुधार योजनेतील भ्रष्टाचाराविरोधात माजी सरपंचांचे आमरण उपोषण धामणगाव रेल्वे ग्रामपंचायत बोरगाव धांदे येथील दलित वस्ती सुधार योजनेत झालेल्या कथित भ्रष्टाचाराविरोधात माजी सरपंच श्रीमती श्रुती अंकुश उईके यांनी आमरण उपोषणाचा सुरू केले आहे . याबाबत त्यांनी पंचायत समिती धामणगाव रेल्वे येथील गटविकास अधिकाऱ्यांना लेखी सूचना दिली आहे. पंचायत समिती कार्यालयाच्या दिनांक १२ मार्च २०२६ च्या अहवालामध्ये दलित वस्ती सुधार योजनेत गंभीर गैरव्यवहार उघड झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र अहवालानंतरही संबंधित दोषींवर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा आरोप श्रीमती उईके यांनी केला आहे. या प्रकरणात दोषींवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत, खोट्या सह्यांच्या आधारे करण्यात आलेल्या RTGS व्यवहारातील संबंधित व्यक्ती व बँक कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, बनावट कागदपत्रे तयार करून सादर करणाऱ्यांसह त्यांना मान्यता देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी तसेच ग्रामपंचायत बोरगाव धांदे येथील दलित वस्ती सुधार योजनेची विभागीय चौकशी करून आजपर्यंत झालेल्या सर्व कामे व पेमेंटची सखोल चौकशी करण्यात यावी, अशा प्रमुख मागण्या त्यांनी मांडल्या आहेत. दरम्यान, आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी श्रीमती श्रुती उईके या मंगळवार दिनांक ७ एप्रिल २०२६ पासून पंचायत समिती प्रांगण, धामणगाव रेल्वे येथे शांततापूर्ण आमरण उपोषणास बसल्या आहे . या आंदोलनामुळे तालुक्यातील राजकीय व प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे1
- *गॅस टंचाई विरोधात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन* वाशीम:-राज्यभर सुरु असलेल्या गॅस टंचाई ,गॅस कमतरतेमुळे दैनंदिन जीवनावर झालेल्या गंभीर परिणामा बाबतीत वंचित बहुजन आघाडी आक्रमक होऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनात महिला पदाधिकाऱ्यांनी चौकात जिल्हाधिकारी कार्यालय बाहेरील रस्त्यावर प्रत्यक्ष चूल पेटवून भाकरी तयार केली. ती भाकरी आपल्या मागण्यांच्या निवेदन जिल्हाधिकारी यांना सुपूर्द केली.या कृतीतून गॅस टंचाईचे सामान्य कुटुंबात आलेल्या संकटाचे जीवंत चित्र उभे करण्यात आले. आपल्या निवेदनात पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या. गॅस सिलेंडरसाठी होणारी कृत्रिम टंचाई थांबवावी.गॅस सिलेंडरचा काळा बाजार रोखावा. 25 दिवसानंतर गॅस सिलेंडर मिळेल, ही अट शिथिल करावी. काळाबाजार करणार्यांवर सक्त कारवाई करण्यात यावी. जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्य़ात उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत किती लोकांना गॅस सिलेंडर दिले आहे? यांचे ऑडिट करावे.इत्यादीं मागण्या करण्यात आल्या. सदरील आंदोलनात प्रा.रंगनाथ धांडे जिल्हा महासचिव वंचित बहुजन आघाडी, ज्योतीताई इंगळे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष, सूर्यकांत गायकवाड युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष संतोष राव सरकटे माझी जिल्हा सचिव दिलीप भगत तालुका अध्यक्ष सोनाजी इंगळे, सुरेश सोनवणे सुनिता ताई खाडे, प्रतिभाताई अंभोरे, मिलनताई बनसोड,स्वप्नील खडसे संतोष सरकटे नारायण मिटकरी विशाल इंगोले किशोर पंडित अनिल खडसे अखिल भगत, कैलास राऊत, निलेश भोजने, अरविंद पडघान कांताबाई खिल्लारे कांताबाई साबळे कल्पना रवी कुमार देवळे गोदावरी प्रधान अनंत कुमार जुमडे, विलास खिल्लारे, सुमनबाई ताजने ,मिनल बनसोड,मायाताई इंगोले,नारायण खोडके, रवींद्र इंगोले, भगवत चव्हाण, दिनेश खडसे,महेश तायडे दीपक आगलावे, आकाश इंगोले, प्रा.मुकुंद खडसे, महेश खडसे, उपस्थित होते.3
- यवतमाळ जिल्ह्यात कापसाच्या दरात सध्या मोठी वाढ झाली असून प्रति क्विंटल दर सुमारे ८,१०० रुपयांपर्यंत, तर खंडीचा दर तब्बल ५७ हजार रुपयांवर पोहोचला आहे. मात्र या दरवाढीचा प्रत्यक्ष फायदा शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे चित्र आहे. उत्पादन खर्च वाढ, साठवणुकीची अडचण आणि तातडीच्या पैशाच्या गरजेमुळे अनेक शेतकरी आधीच कमी दरात कापूस विक्री करतात. परिणामी, सध्या वाढलेल्या दराचा लाभ व्यापाऱ्यांनाच होत असून ते कमी दरात खरेदी करून जास्त दराने विक्री करत मालामाल होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा आणि बाजार व्यवस्थेत पारदर्शकता यावी अशी मागणी आज दिनांक 7 एप्रिल रोजी तीन वाजता जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.1
- वडकी :-वडकी येथून खैरी मार्गे जाणाऱ्या माढेळी वरोरा रस्त्या वर खैरी येथील गोटाडी ते खैरी गावात शिरणाऱ्या रस्त्यावर गावात शिरताच गावातील रस्त्याच्या कडेला असलेली नाली संपूर्ण बुझल्याने त्याचे घाण पाणी रोड वर पसरत असून उन्हाळ्यामध्ये पण पावसाळ्या सारखं दृश्य पाहव्यास मिळत आहे. हा संपूर्ण प्रकार खैरी येथील मी माणूस एक संघटन चे चालक किशोर सोनवणे यांनी आपल्या सोशल मीडिया द्वारे सतत अशा प्रकारचे दुर्लक्षित कार्य प्रशासनाच्या निर्दशानात आणून देण्याचे काम करीत असतात हा पण प्रकार गेल्या अनेक दिवसा पासून पाठपुरावा करीत आहे पण आजच्या या प्रकाराणे खरंच आपले हात टेकले परंतु शासन दुर्लक्ष करीतच असल्याचे दिसत आहे. हा खड्डा आपल्या घरासमोरच असल्यामुळे या खड्ड्या मुळे अनेकांना दुखापत होत त्यांना मदत करण्या पलीकडे दुसरे मी काहीच करू शकत नाही असे मी माणूस एक संघटना चे किशोर सोनवणे यांनी म्हटले आहे. त्याच्या या घटनेच्या कार्यामुळे अनेकांना मदत झाली असून पण हि समस्या सोडविण्यात आपण हरलो अशी त्यांनी सोशल मीडिया वर व्यक्त केली आहे.1
- गॅस टंचाई विरोधात वंचित बहुजन आघाडीकडून यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजीमध्ये ' चूल ' पेटवुन आंदोलन करण्यात आलं. घाटंजी तहसील कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं. आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनी सहभागी झाले होते.1
- चित्रकूट राजापुर के गुरगौला में ग्रामीणों ने खनन माफिया पर किसानों की भूमि ओर खनन करने लगाया आरोप पहुंचे डीएम कार्यालय मामला चित्रकूट जनपद के जनपद के राजापुर तहसील क्षेत्र से गुरगौला गांव का है जहां ग्रामीणों ने खनन माफिया पर किसानों की भूमि पर खनन करने का आरोप लगाया है और आज मंगलवार की दोपहर 12 बजे जिला धिकारी कार्यालय पहुंचे और जिलाधिकारी को ज्ञापन सौंपा खनन माफिया के खिलाफ कार्रवाई की मांग की है ग्रामीणों ने बताया कि खाना खनन माफिया जगजीत सिंह पटेल निवासी फतेहपुर को गुरगौला ने बालू खनन का पट्टा किया गया जिसमें चिन्हांकित स्थान के अलावा जगजीत सिंह द्वारा किसानों की भूमि पर बालू खनन किया जा रहा है जिसकी शिकायत संबंधित अधिकारियों से करने पर अधिकारियों द्वारा उल्टा उन्हें ही धमकाया जा रहा है जिससे थक हार कर ग्रामीण आज जिला अधिकारी कार्यालय पहुंचे है आप भी सुने क्या कहना डीएम को ज्ञापन देने आए ग्रामीणों का1
- Post by Amravati News Update1