Shuru
Apke Nagar Ki App…
सकल हिंदू समाजाच्या वतीने गो सन्मान अभियान भव्य दिंडी यात्रा... लातूर : सकल हिंदू समाजाच्या वतीने “गो सन्मान अभियान” अंतर्गत आज लातूर शहरात हनुमान चौकापासून ते तहसील कार्यालय पर्यंत भव्य दिंडी यात्रेचे आयोजन करण्यात आले. या यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून मोठ्या संख्येने महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले.
Latur 24
सकल हिंदू समाजाच्या वतीने गो सन्मान अभियान भव्य दिंडी यात्रा... लातूर : सकल हिंदू समाजाच्या वतीने “गो सन्मान अभियान” अंतर्गत आज लातूर शहरात हनुमान चौकापासून ते तहसील कार्यालय पर्यंत भव्य दिंडी यात्रेचे आयोजन करण्यात आले. या यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून मोठ्या संख्येने महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- सामाजिक कार्यकर्ते संदिप देशमुख यांनी डाॅक्टर झाकिर हूसेन चौक येथे झालेली वाहणांची गर्दी बाजूला सारली...1
- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल चुकीचा काहीही इतिहास बरळणारा वाचाळखोर यांना पोकळ बांबूचे फटके देऊन झोडपून काढल्याशिवाय ही नालायक सुधरणार नाहीत मग ते कोणीही असो 😡 आमच्या दैवताच्या नावाने तुमच्या राजकीय पोळ्या भाजायचं बंद करा याचे परिणाम काय होतील याचा विचार देखील करू शकणार नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे तुम्हाला कधी कधी कुठ कस पळवून हाणतील सांगता देखील येणार नाही.1
- जायकवाडी कालव्यात तात्काळ पाणी सोडा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कार्यकारी अभियंतांची खुर्ची केली जप्त?1
- जायकवाडी धरण येथून शेतीसाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या दाबावरून परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला आहे. धरणातून बाराशे क्युसेक्सने पाणी सोडले जात असल्याचा दावा असताना, तेच पाणी परभणीपर्यंत येईपर्यंत केवळ सुमारे आठशे क्युसेक्स दाबाने पोहोचत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. यामुळे कॅनॉलमधील पाण्याचा वेग कमी झाला असून, शेतीपर्यंत पाणी पोहोचत नाही. परिणामी रब्बी हंगाम जवळपास हातातून गेला असून, आता उसासारखी उभी पिकेही करपण्याच्या मार्गावर आहेत. शेतकऱ्यांसमोर गंभीर पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी जायकवाडी प्रकल्पाच्या “दोन” कार्यालयात धडक दिली. अधीक्षक अभियंता अनुपस्थित असल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यानंतर आंदोलन तीव्र होत गेले आणि संतप्त कार्यकर्त्यांनी कार्यकारी अभियंत्यांची खुर्चीच उचलून नेली. “जोपर्यंत कॅनॉलमधून योग्य दाबाने पाणीपुरवठा होत नाही, तोपर्यंत ही खुर्ची परत दिली जाणार नाही,” असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. या घटनेतून प्रशासनाविषयीचा रोष स्पष्टपणे समोर आला असून, शेतकऱ्यांच्या पाण्याच्या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.1
- वार्ड क्रमांक 18 में सड़क और नाली निर्माण कार्य का उद्घाटन समारोह उत्साह के साथ संपन्न1
- Post by दिपक हैबतराव चोरमले1
- श्री क्षेत्र रामसगाव येथे दुर्दैवी घटना: गोदावरी नदीत बुडून एकाचा मृत्यू जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील तीर्थक्षेत्र रामसगाव येथे आज सोमवारी (२७ एप्रिल) सकाळी सुमारे ११ वाजताच्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली. गोदावरी नदीत उडी घेतल्याने एकाचा बुडून मृत्यू झाला.1
- *भुवन रेती घाटावर अवैध उपसा जोमात; ठेकेदार–महसूल कर्मचाऱ्यांच्या संगनमताचा आरोप* (एकाच पावतीवर दिवसभर वाळू वाहतूक, कोऱ्या पावत्या आढळल्याने लाखो रुपयांच्या महसूल घोटाळ्याची शक्यता) मंठा तालुक्यातील भुवन येथील रेती घाटावर अवैध रेती उपसा जोमात सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. अधिकृत लिलावधारकाच्या ताब्यात घाट देण्यात आला असला तरी, महसूल कर्मचारी आणि ठेकेदार यांच्या संगनमतातून शासनाच्या महसुलाला लाखो रुपयांचा चुना लावला जात असल्याची चर्चा आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, एकाच रॉयल्टी पावतीवर दिवसभर अनेक फेऱ्या मारल्या जात आहेत. दोन ब्रासच्या पावतीवर चार ब्रासची गाडी, तर चार ब्रासच्या पावतीवर सहा ब्रासपर्यंत वाळू भरली जात असल्याचा आरोप आहे. धक्कादायक बाब म्हणजे अनेक पावत्यांवर तारीख, वेळ आणि ब्रासची नोंदच नसून काही पावत्या कोऱ्या आढळल्या आहेत. या प्रकारामुळे शासनाच्या महसुलाला मोठा फटका बसत असल्याने नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.1
- विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये मागील एक महिन्यापासून रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) या विषयावर विशेष प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. हा उपक्रम सायन्स किड्झ मुंबई अॅकॅडमीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे मार्गदर्शन (प्रशिक्षक) रवी गुप्ता यांनी केले,जे सध्या अमेरिकेत कार्यरत आहेत. त्यांनी तेथील प्रगत तंत्रज्ञानाचा अनुभव घेऊन, येथील विद्यार्थ्यांना आधुनिक रोबोटिक्स आणि AI विषयी सखोल मार्गदर्शन केले.या प्रशिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना केवळ सैद्धांतिक ज्ञान न देता प्रत्यक्ष प्रकल्पांच्या माध्यमातून शिकविण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वतः काही नाविन्यपूर्ण प्रकल्प तयार केले, जसे की स्मार्ट फूड बॉक्स फॉर नॉन-प्रिव्हिलेज्ड पीपल हा प्रकल्प गरजू लोकांपर्यंत अन्न पोहोचवण्यासाठी उपयुक्त ठरतो, ज्यामुळे अन्नाची नासाडी कमी होऊन गरजूंना मदत मिळू शकते.शेतकऱ्यांसाठी ऑटोमॅटिक वेदर सिस्टीम या प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना हवामानाची अचूक माहिती आणि अलर्ट मिळू शकतात,ज्यामुळे ते आपल्या पिकांची योग्य काळजी घेऊ शकतात.या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना भविष्यासाठी तयार करणे हा होता. आजच्या युगात रोबोटिक्स आणि AI हे केवळ विषय नसून भविष्यातील तंत्रज्ञानाची पायाभरणी आहेत. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता,तार्किक विचारशक्ती, समस्या सोडविण्याची क्षमता आणि नवकल्पनांची आवड विकसित झाली आहे.विवेकानंद इंग्लिश स्कूल मधील हा उपक्रम लहान शहरांतील विद्यार्थ्यांना जागतिक तंत्रज्ञानाशी जोडण्याचा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरत आहे. खरंच,आजचे हे विद्यार्थी उद्याचे वैज्ञानिक,अभियंते आणि नवोन्मेषक बनण्याच्या दिशेने आत्मविश्वासाने वाटचाल करत आहेत. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या या उपक्रमाची आज सांगता करण्यात आली. हा उपक्रम शाळेचे अध्यक्ष आदरणीय श्री. संदीप दादा बाहेकर सर, शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय श्रीमती. रश्मी यादव मॅडम, (प्रशिक्षक) रवी गुप्ता सर,राठोड सर,सर्व शिक्षक वृंद,तसेच पालक आणि विद्यार्थी यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी बाहेकर सर व यादव मॅडम यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.त्यानंतर उपक्रमाचे मार्गदर्शक रवी गुप्ता सर यांना श्रीफळ,शाल,गुच्छ देऊन,सन्मानित करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी बनवलेल्या प्रकल्पाची पाहणी बाहेकर सर यादव मॅडम तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली. त्यावेळी विद्यार्थ्यांसह पालकवर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावेळी शाळेचे अध्यक्ष बाहेकर सर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असे उपक्रम शाळेमार्फत राबवली जातील. असे आपल्या मनोगतात त्यांनी सांगितले.तसेच शाळेचे विद्यार्थी भविष्यात प्रकल्पाच्या माध्यमातून, योग्य प्रशिक्षण घेऊन,देश विदेशात गरुड झेप घेतील.अशी आशा व्यक्त केली. या प्रकल्पाचे पंचक्रोशीसह इतर सर्व स्तरातून जोरदार कौतुक होत आहे. शाळेने असे उत्कृष्ट उपक्रम यापुढेही विद्यार्थ्यांसाठी राबवावे अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.1