logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

देश हा जनतेचा असून तो कोणाच्याही वैयक्तिक मालकीचा नाही, असा ठाम आणि थेट इशारा देण्यात आला आहे. जनतेचा आवाज दाबण्याचा प्रत्येक प्रयत्न लोकशाहीला कमकुवत करण्याऐवजी अधिक मजबूतच करतो, अशी भूमिका मांडण्यात आली आहे. संविधान, लोकशाही आणि सामान्य जनतेच्या मूलभूत हक्कांसाठी उठणारा आवाज दाबणे अशक्य असून, हा संघर्ष आणि जनतेचा आवाज दिवसेंदिवस अधिक बुलंद होत राहील, असा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.

1 day ago
user_Vainganga News Live Network
Vainganga News Live Network
Press advisory पोंभुर्णा, चंद्रपूर, महाराष्ट्र•
1 day ago

देश हा जनतेचा असून तो कोणाच्याही वैयक्तिक मालकीचा नाही, असा ठाम आणि थेट इशारा देण्यात आला आहे. जनतेचा आवाज दाबण्याचा प्रत्येक प्रयत्न लोकशाहीला कमकुवत करण्याऐवजी अधिक मजबूतच करतो, अशी भूमिका मांडण्यात आली आहे. संविधान, लोकशाही आणि सामान्य जनतेच्या मूलभूत हक्कांसाठी उठणारा आवाज दाबणे अशक्य असून, हा संघर्ष आणि जनतेचा आवाज दिवसेंदिवस अधिक बुलंद होत राहील, असा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मुल तालुक्यात आज सकाळी 10 वाजता मुल पोलिसांनी एक धडक कारवाई करत अवैध गोवंश तस्करीचा मोठा डाव उधळून लावला आहे. छत्तीसगडहून आंध्र प्रदेशच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या एका संशयित आयशर वाहनाचा पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून त्याला जाळ्यात पकडले. या धडक कारवाईत वाहनातून ३७ गोधनांची यशस्वी सुटका करण्यात आली आहे. पोलिसांनी आयशर वाहनासह एकूण सुमारे १८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मुल तालुक्यात अलीकडच्या काळात झालेली गोधन तस्करीविरोधातील ही सर्वात मोठी आणि कौतुकास्पद कारवाई मानली जात आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास मूल पोलीस करत आहेत.
    1
    मुल तालुक्यात आज सकाळी 10 वाजता मुल पोलिसांनी एक धडक कारवाई करत अवैध गोवंश तस्करीचा मोठा डाव उधळून लावला आहे. छत्तीसगडहून आंध्र प्रदेशच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या एका संशयित आयशर वाहनाचा पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून त्याला जाळ्यात पकडले.

या धडक कारवाईत वाहनातून ३७ गोधनांची यशस्वी सुटका करण्यात आली आहे. पोलिसांनी आयशर वाहनासह एकूण सुमारे १८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मुल तालुक्यात अलीकडच्या काळात झालेली गोधन तस्करीविरोधातील ही सर्वात मोठी आणि कौतुकास्पद कारवाई मानली जात आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास मूल पोलीस करत आहेत.
    user_Disha News
    Disha News
    Media house चंद्रपूर, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या संततधार पावसामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाअभावी करपू लागलेली सोयाबीन, कापूस, तूर, उडीद आणि मूग ही पिके आता पुन्हा जोमाने वाढू लागल्याने शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. यंदाच्या हंगामात सुरुवातीला झालेल्या पावसानंतर दीर्घ खंड पडल्याने अनेक ठिकाणी पिके धोक्यात आली होती. काही शेतकऱ्यांना दुबार पेरणीचाही सामना करावा लागला होता. मात्र अलीकडे झालेल्या समाधानकारक पावसामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाला असून पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. पावसामुळे शेततळी, विहिरी आणि नाल्यांतील पाणीसाठ्यातही वाढ झाली आहे. आगामी काळात आणखी चांगला पाऊस झाल्यास यंदाचे खरीप उत्पादन समाधानकारक होईल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.
    1
    महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या संततधार पावसामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाअभावी करपू लागलेली सोयाबीन, कापूस, तूर, उडीद आणि मूग ही पिके आता पुन्हा जोमाने वाढू लागल्याने शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.

यंदाच्या हंगामात सुरुवातीला झालेल्या पावसानंतर दीर्घ खंड पडल्याने अनेक ठिकाणी पिके धोक्यात आली होती. काही शेतकऱ्यांना दुबार पेरणीचाही सामना करावा लागला होता. मात्र अलीकडे झालेल्या समाधानकारक पावसामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाला असून पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे.

पावसामुळे शेततळी, विहिरी आणि नाल्यांतील पाणीसाठ्यातही वाढ झाली आहे. आगामी काळात आणखी चांगला पाऊस झाल्यास यंदाचे खरीप उत्पादन समाधानकारक होईल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.
    user_Taha Mirza
    Taha Mirza
    Teacher महागाव, यवतमाळ, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • हिंगणघाट पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने (डीबी स्क्वॉड) अवैध दारूची वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई केली. या कारवाईत तीन वेगवेगळ्या छाप्यांमध्ये ₹2 लाख 88 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात दोन मोटारसायकली, एक मोपेड तसेच मोठ्या प्रमाणात देशी व विदेशी दारू जप्त करण्यात आली. तिन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 26 जुलै 2026 रोजी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गुन्हे प्रकटीकरण पथक परिसरात गस्त घालत असताना मौजा लाडकी-बुरकोणी मार्गावर दोन मोटारसायकलींवरून अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करणारे बबन थुल व भगवान काळे यांना ताब्यात घेण्यात आले. बबन थुल याच्याकडून रॉकेट कंपनीच्या 90 मिली क्षमतेच्या देशी दारूच्या 100 सिलबंद बाटल्या (किंमत ₹12,000) तसेच हिरो पॅशन प्रो मोटारसायकल (किंमत ₹90,000) असा एकूण ₹1.02 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर भगवान काळे याच्याकडून रॉकेट कंपनीच्या 90 मिलीच्या 100 देशी दारूच्या बाटल्या (किंमत ₹12,000) व हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकल (किंमत ₹70,000) असा एकूण ₹82 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याच दरम्यान संत तुकडोजी वॉर्ड येथील संदीप चाफले हा आपल्या मोपेडच्या डिकीत विदेशी दारू ठेवून विक्री करत असल्याचे आढळून आले. त्याच्याकडून हिरो डेस्टिनी मोपेड (किंमत ₹1 लाख), रॉयल स्टॅग कंपनीच्या 180 मिलीच्या 6 बाटल्या तसेच रॉयल चॅलेंजर्स कंपनीच्या 180 मिलीच्या 4 बाटल्या असा एकूण ₹1.04 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या तिन्ही कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण ₹2.88 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक तसेच पोलीस निरीक्षक अनिल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश इटकल आणि डीबी पथकातील पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, प्रवीण बोधणे, पोलीस नाईक राजेश शेंडे, पोलीस शिपाई मंगेश वाघमारे, आशिष नेवारे व रोहित साठे यांनी संयुक्तपणे केली.
    1
    हिंगणघाट पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने (डीबी स्क्वॉड) अवैध दारूची वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई केली. या कारवाईत तीन वेगवेगळ्या छाप्यांमध्ये ₹2 लाख 88 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात दोन मोटारसायकली, एक मोपेड तसेच मोठ्या प्रमाणात देशी व विदेशी दारू जप्त करण्यात आली. तिन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

26 जुलै 2026 रोजी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गुन्हे प्रकटीकरण पथक परिसरात गस्त घालत असताना मौजा लाडकी-बुरकोणी मार्गावर दोन मोटारसायकलींवरून अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करणारे बबन थुल व भगवान काळे यांना ताब्यात घेण्यात आले. बबन थुल याच्याकडून रॉकेट कंपनीच्या 90 मिली क्षमतेच्या देशी दारूच्या 100 सिलबंद बाटल्या (किंमत ₹12,000) तसेच हिरो पॅशन प्रो मोटारसायकल (किंमत ₹90,000) असा एकूण ₹1.02 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर भगवान काळे याच्याकडून रॉकेट कंपनीच्या 90 मिलीच्या 100 देशी दारूच्या बाटल्या (किंमत ₹12,000) व हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकल (किंमत ₹70,000) असा एकूण ₹82 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याच दरम्यान संत तुकडोजी वॉर्ड येथील संदीप चाफले हा आपल्या मोपेडच्या डिकीत विदेशी दारू ठेवून विक्री करत असल्याचे आढळून आले. त्याच्याकडून हिरो डेस्टिनी मोपेड (किंमत ₹1 लाख), रॉयल स्टॅग कंपनीच्या 180 मिलीच्या 6 बाटल्या तसेच रॉयल चॅलेंजर्स कंपनीच्या 180 मिलीच्या 4 बाटल्या असा एकूण ₹1.04 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या तिन्ही कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण ₹2.88 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक तसेच पोलीस निरीक्षक अनिल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश इटकल आणि डीबी पथकातील पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, प्रवीण बोधणे, पोलीस नाईक राजेश शेंडे, पोलीस शिपाई मंगेश वाघमारे, आशिष नेवारे व रोहित साठे यांनी संयुक्तपणे केली.
    user_Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    हिंगणघाट, वर्धा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • आज आपल्या सेहताकडे लक्ष पुरवा. प्रत्येक आरोग्य समस्यांचा योग्य आणि सुरक्षित उपाय उपलब्ध आहे. हृदयरोग, मधुमेह, मूत्रपिंडाचे आजार, यकृत आजार, आणि फुफ्फुसाचे आजार (अस्थमा आणि क्षयरोग) यांसारख्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य सल्ला महत्त्वाचा आहे. मधुमेहाच्या उपचारात एक नवीन आणि सोपी पद्धत साप्ताहिक इंसुलिन आहे, ज्याचा उल्लेख डॉ. मेहेर अब्बास यांनी केला आहे. या प्रकारचा इंसुलिन प्रकार 1 आणि प्रकार 2 मधुमेहाच्या रुग्णांसाठी उपयुक्त आहे. स्वास्थ्यविषयक कोणत्याही सल्ल्यासाठी किंवा नियुक्ती बुक करण्यासाठी +91 9125734374 या क्रमांकात संपर्क साधा. #DrMeherAbbas #Diabetes #Insulin #Awiqliinsulininjection #Type1diabetes #Type2diabetes
    1
    आज आपल्या सेहताकडे लक्ष पुरवा. प्रत्येक आरोग्य समस्यांचा योग्य आणि सुरक्षित उपाय उपलब्ध आहे. हृदयरोग, मधुमेह, मूत्रपिंडाचे आजार, यकृत आजार, आणि फुफ्फुसाचे आजार (अस्थमा आणि क्षयरोग) यांसारख्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य सल्ला महत्त्वाचा आहे.

मधुमेहाच्या उपचारात एक नवीन आणि सोपी पद्धत साप्ताहिक इंसुलिन आहे, ज्याचा उल्लेख डॉ. मेहेर अब्बास यांनी केला आहे. या प्रकारचा इंसुलिन प्रकार 1 आणि प्रकार 2 मधुमेहाच्या रुग्णांसाठी उपयुक्त आहे.

स्वास्थ्यविषयक कोणत्याही सल्ल्यासाठी किंवा नियुक्ती बुक करण्यासाठी +91 9125734374 या क्रमांकात संपर्क साधा.

#DrMeherAbbas #Diabetes #Insulin #Awiqliinsulininjection #Type1diabetes #Type2diabetes
    user_Dr.Mirza Md.Meher Abbas
    Dr.Mirza Md.Meher Abbas
    Doctor India•
    9 hrs ago
  • महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील मुख्याधिकारी राहुल परिहार यांच्या विरोधात माहिती अधिकार कायदा आणि दप्तर दिरंगाई अधिनियम अंतर्गत चौकशीची मागणी करण्यात आली आहे. या मागणीचा आधार म्हणून माहिती अधिकार कायद्याच्या तरतुदींचा आणि दप्तर दिरंगाई अधिनियमाच्या तरतुदींचा संदर्भ घेतला गेला आहे. या चौकशीची मागणी केली गेली आहे कारण राहुल परिहार यांच्यावर काही आरोप आहेत ज्यांचा विचार करणे आवश्यक आहे. या मागणीमुळे संबंधित प्राधिकरणांवर दबाव आला आहे की ते या आरोपांची तपासणी करावीत आणि योग्य कारवाई करावीत.
    1
    महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील मुख्याधिकारी राहुल परिहार यांच्या विरोधात माहिती अधिकार कायदा आणि दप्तर दिरंगाई अधिनियम अंतर्गत चौकशीची मागणी करण्यात आली आहे. या मागणीचा आधार म्हणून माहिती अधिकार कायद्याच्या तरतुदींचा आणि दप्तर दिरंगाई अधिनियमाच्या तरतुदींचा संदर्भ घेतला गेला आहे.

या चौकशीची मागणी केली गेली आहे कारण राहुल परिहार यांच्यावर काही आरोप आहेत ज्यांचा विचार करणे आवश्यक आहे. या मागणीमुळे संबंधित प्राधिकरणांवर दबाव आला आहे की ते या आरोपांची तपासणी करावीत आणि योग्य कारवाई करावीत.
    user_SATISH BHALERAO
    SATISH BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात मांडळ-किन्ही-शिवणी-कुजबा रस्त्यावर होणाऱ्या जनक्षोभाचा आवाज जोर धरू लागला आहे. वर्षभरातच लाखो रुपये खर्च करून बनवलेल्या या रस्त्यावरून डांबर गायब झाले असून ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. सरकारी पैशांची उधळपट्टी आणि अधिकाऱ्यांची भ्रष्ट वृत्ती याचा जिवंत पुरावा म्हणजे हा रस्ता! वर्षभरापूर्वीच बनवलेला हा रस्ता आज शोधूनही सापडत नाही. रस्त्यावरून डांबर गायब झाले असून ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. हा रस्ता आहे की मृत्यूची दरी? असा संताप आता नागरिक व्यक्त करत आहेत. कंत्राटदार-अधिकारी साखळीचा भांडाफोड: वर्षभरात रस्ता उखडतोच कसा? निकृष्ट दर्जाची खडी आणि नावापुरते डांबर वापरून लाखो रुपयांचा निधी हडप करण्यात आला आहे. बांधकाम विभागाच्या मेहेरबानीमुळेच कंत्राटदाराचे उखडले पांढरे झाले असून सामान्य जनतेला मात्र धुळीचे आणि खड्ड्यांचे साम्राज्य सहन करावे लागत आहे. प्रवाशांच्या जिवाशी खेळ: या रस्त्यावरून रोज हजारो शेतकरी, शाळकरी मुले आणि नागरिक प्रवास करतात. खड्ड्यांमुळे दररोज गाड्यांचे अपघात होत असून निष्पाप लोक जखमी होत आहेत. एखादा मोठा जीव गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार का? असा सवाल विचारला जात आहे. अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करा: या रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा स्पष्ट संशय आहे. त्यामुळे संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या मालमत्तेची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत (ACB) कसून चौकशी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी प्रहार जनशक्ती पक्ष, शिवसेना व त्रस्त ग्रामस्थांनी केली आहे. ७ दिवसांत काम नाही तर 'ठिय्या' आंदोलन! सार्वजनिक बांधकाम विभागाने गाढ झोपेतून जागे व्हावे. येत्या ७ दिवसांच्या आत या रस्त्याचे काम दर्जेदार पद्धतीने सुरू झाले नाही, तर PWD कार्यालयावर धडक मोर्चा काढून कार्यालयाचे कामकाज ठप्प केले जाईल आणि तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. ग्रामस्थांचा सवाल: "जनतेचा कर रूपाने आलेला पैसा भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या खिशात जात असेल, तर आम्ही गप्प बसणार नाही. ७ दिवसांत रस्त्याची दुरुस्ती झाली नाही तर PWD अधिकाऱ्यांना रस्त्यावरील खड्ड्यांत बसवून जाब विचारू!"
    1
    नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात मांडळ-किन्ही-शिवणी-कुजबा रस्त्यावर होणाऱ्या जनक्षोभाचा आवाज जोर धरू लागला आहे. वर्षभरातच लाखो रुपये खर्च करून बनवलेल्या या रस्त्यावरून डांबर गायब झाले असून ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.

सरकारी पैशांची उधळपट्टी आणि अधिकाऱ्यांची भ्रष्ट वृत्ती याचा जिवंत पुरावा म्हणजे हा रस्ता! वर्षभरापूर्वीच बनवलेला हा रस्ता आज शोधूनही सापडत नाही. रस्त्यावरून डांबर गायब झाले असून ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. हा रस्ता आहे की मृत्यूची दरी? असा संताप आता नागरिक व्यक्त करत आहेत.

कंत्राटदार-अधिकारी साखळीचा भांडाफोड: वर्षभरात रस्ता उखडतोच कसा? निकृष्ट दर्जाची खडी आणि नावापुरते डांबर वापरून लाखो रुपयांचा निधी हडप करण्यात आला आहे. बांधकाम विभागाच्या मेहेरबानीमुळेच कंत्राटदाराचे उखडले पांढरे झाले असून सामान्य जनतेला मात्र धुळीचे आणि खड्ड्यांचे साम्राज्य सहन करावे लागत आहे.

प्रवाशांच्या जिवाशी खेळ: या रस्त्यावरून रोज हजारो शेतकरी, शाळकरी मुले आणि नागरिक प्रवास करतात. खड्ड्यांमुळे दररोज गाड्यांचे अपघात होत असून निष्पाप लोक जखमी होत आहेत. एखादा मोठा जीव गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार का? असा सवाल विचारला जात आहे.

अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करा: या रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा स्पष्ट संशय आहे. त्यामुळे संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या मालमत्तेची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत (ACB) कसून चौकशी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी प्रहार जनशक्ती पक्ष, शिवसेना व त्रस्त ग्रामस्थांनी केली आहे.

७ दिवसांत काम नाही तर 'ठिय्या' आंदोलन! सार्वजनिक बांधकाम विभागाने गाढ झोपेतून जागे व्हावे. येत्या ७ दिवसांच्या आत या रस्त्याचे काम दर्जेदार पद्धतीने सुरू झाले नाही, तर PWD कार्यालयावर धडक मोर्चा काढून कार्यालयाचे कामकाज ठप्प केले जाईल आणि तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

ग्रामस्थांचा सवाल: "जनतेचा कर रूपाने आलेला पैसा भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या खिशात जात असेल, तर आम्ही गप्प बसणार नाही. ७ दिवसांत रस्त्याची दुरुस्ती झाली नाही तर PWD अधिकाऱ्यांना रस्त्यावरील खड्ड्यांत बसवून जाब विचारू!"
    user_Sanjay bhagawan atkari
    Sanjay bhagawan atkari
    Mechanic कुही, नागपूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • कळंब येथील रॉयल पॅलेस येथे २५ जुलै रोजी दुपारी एक वाजता 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान' पार पडले. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या हस्ते पार पडले. या शिबिरामध्ये कळंब, बाभुळगाव, केळापूर व पांढरकवडा तालुक्यातील नागरिक, शेतकरी आणि लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ वितरित करण्यात आला. यामध्ये महिलांना शेतकरी दर्जा प्रमाणपत्र, स्वामित्व सनद, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे मंजुरी आदेश तसेच मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेसह विविध महसुली सेवांचा लाभ प्रदान करण्यात आला. त्यासोबतच लोकसेवा हक्क कायदा, जीवंत सातबारा मोहीम, अभिलेख दुरुस्ती, घरकुल योजना आणि राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना आदी विविध शासकीय योजनांची माहिती देऊन पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज स्वीकारण्यात आले. राळेगाव विधानसभा मतदारसंघातील २७ विभागांच्या सहभागातून आयोजित या अभियानाद्वारे ३,८१५ हून अधिक लाभार्थ्यांना ५,७०७ विविध योजनांचा लाभ देण्यात आला असून, नागरिकांनी शासनाच्या योजनांचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार धीरज स्थूल, तहसीलदार अमित भोईटे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    1
    कळंब येथील रॉयल पॅलेस येथे २५ जुलै रोजी दुपारी एक वाजता 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान' पार पडले. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या हस्ते पार पडले.

या शिबिरामध्ये कळंब, बाभुळगाव, केळापूर व पांढरकवडा तालुक्यातील नागरिक, शेतकरी आणि लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ वितरित करण्यात आला. यामध्ये महिलांना शेतकरी दर्जा प्रमाणपत्र, स्वामित्व सनद, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे मंजुरी आदेश तसेच मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेसह विविध महसुली सेवांचा लाभ प्रदान करण्यात आला. त्यासोबतच लोकसेवा हक्क कायदा, जीवंत सातबारा मोहीम, अभिलेख दुरुस्ती, घरकुल योजना आणि राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना आदी विविध शासकीय योजनांची माहिती देऊन पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज स्वीकारण्यात आले.

राळेगाव विधानसभा मतदारसंघातील २७ विभागांच्या सहभागातून आयोजित या अभियानाद्वारे ३,८१५ हून अधिक लाभार्थ्यांना ५,७०७ विविध योजनांचा लाभ देण्यात आला असून, नागरिकांनी शासनाच्या योजनांचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार धीरज स्थूल, तहसीलदार अमित भोईटे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    user_Amol sangani
    Amol sangani
    पत्रकार राळेगाव, यवतमाळ, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • चंद्रपूर शहरातील मुख्य मार्गावरील 'अरेबियन ताज बिर्याणी' हॉटेलचे संचालक आणि एमआयएमचे (MIM) नगरसेवक अझहर शेख यांच्यावर झालेला हल्ला प्राणघातक नव्हता, हे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांनी हे स्पष्ट केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नगरसेवक अझहर शेख यांचा हा वाद तिरंगा रॅलीवरून झाला होता. सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीतून सुरुवातीला दोन व्यक्तींमध्ये आपापसात झटापटी झाल्याचे दिसून आले आहे. मात्र, या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या धारदार शस्त्राचा वापर झालेला नाही किंवा जीवघेणा हल्ला झालेला नाही, असे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी शहर पोलिसांत फरान फिरोज खान (२७), फेजान फिरोज खान (२२) आणि फिरोज गुलजार खान (४६) या तीन आरोपींविरोधात कलम ११८(१), २९६, ३५१, २८९(२), १८९(४), १९१(२), १९१(३) आणि १९० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतर आरोपींचा शोध सुरू असून, शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क आहे, असे प्रमोद चौगुले यांनी सांगितले.
    1
    चंद्रपूर शहरातील मुख्य मार्गावरील 'अरेबियन ताज बिर्याणी' हॉटेलचे संचालक आणि एमआयएमचे (MIM) नगरसेवक अझहर शेख यांच्यावर झालेला हल्ला प्राणघातक नव्हता, हे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांनी हे स्पष्ट केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नगरसेवक अझहर शेख यांचा हा वाद तिरंगा रॅलीवरून झाला होता. सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीतून सुरुवातीला दोन व्यक्तींमध्ये आपापसात झटापटी झाल्याचे दिसून आले आहे. मात्र, या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या धारदार शस्त्राचा वापर झालेला नाही किंवा जीवघेणा हल्ला झालेला नाही, असे निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी शहर पोलिसांत फरान फिरोज खान (२७), फेजान फिरोज खान (२२) आणि फिरोज गुलजार खान (४६) या तीन आरोपींविरोधात कलम ११८(१), २९६, ३५१, २८९(२), १८९(४), १९१(२), १९१(३) आणि १९० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतर आरोपींचा शोध सुरू असून, शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क आहे, असे प्रमोद चौगुले यांनी सांगितले.
    user_Disha News
    Disha News
    Media house चंद्रपूर, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.