साकोली विधानसभा क्षेत्रातील सेंदूरवाफा/साकोली येथील 'मंगल मूर्ती सभागृह' येथे २६ जुलै रोजी सकाळी ११:०० ते दुपारी ५:०० या कालावधीत 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियान शिबिराचे' आयोजन करण्यात आले आहे. महसूल व वन विभागाच्या ९ जुलै २०२६ च्या शासन निर्णयान्वये, महसूल विभाग अधिक लोकाभिमुख, पारदर्शक व गतिमान करण्यासाठी तसेच मुख्यमंत्री यांचा जन्मदिवस व माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त २२ जुलै ते २ ऑगस्ट २०२६ दरम्यान राज्यभरात मतदारसंघनिहाय ही शिबारे आयोजित करण्याचे निर्देश दिलेले आहेत. या शिबिरात सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार असून नागरिकांना एकाच छताखाली विविध सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये भोगवटदार वर्ग-२ चे वर्ग-१ मध्ये रूपांतरण, डिजिटल स्वाक्षरीचे ७/१२ व ८-अ वितरण, प्रलंबित फेरफार, विविध दाखले व प्रमाणपत्र वाटप, सामाजिक अर्थसहाय्य योजना, ॲग्रीस्टॅक व पीएम किसान नोंदणी, तुकडेबंदी कायद्याविरुद्ध व्यवहार नियमानुकूल करणे, आणि महिलांना शेतकरी दर्जा देण्याचे प्रमाणपत्र वाटप यासह अनेक कामे केली जातील. याशिवाय पुरवठा, भूमी अभिलेख, कृषी, एसटी, आरोग्य व पशुवैद्यकीय विभागांच्या योजनांचाही लाभ नागरिकांना घेता येणार असून साकोलीच्या उपविभागीय अधिकारी स्वाती देसाई यांनी सर्वांना शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
साकोली विधानसभा क्षेत्रातील सेंदूरवाफा/साकोली येथील 'मंगल मूर्ती सभागृह' येथे २६ जुलै रोजी सकाळी ११:०० ते दुपारी ५:०० या कालावधीत 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियान शिबिराचे' आयोजन करण्यात आले आहे. महसूल व वन विभागाच्या ९ जुलै २०२६ च्या शासन निर्णयान्वये, महसूल विभाग अधिक
लोकाभिमुख, पारदर्शक व गतिमान करण्यासाठी तसेच मुख्यमंत्री यांचा जन्मदिवस व माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त २२ जुलै ते २ ऑगस्ट २०२६ दरम्यान राज्यभरात मतदारसंघनिहाय ही शिबारे आयोजित करण्याचे निर्देश दिलेले आहेत. या शिबिरात सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार असून नागरिकांना
एकाच छताखाली विविध सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये भोगवटदार वर्ग-२ चे वर्ग-१ मध्ये रूपांतरण, डिजिटल स्वाक्षरीचे ७/१२ व ८-अ वितरण, प्रलंबित फेरफार, विविध दाखले व प्रमाणपत्र वाटप, सामाजिक अर्थसहाय्य योजना, ॲग्रीस्टॅक व पीएम किसान नोंदणी, तुकडेबंदी कायद्याविरुद्ध व्यवहार नियमानुकूल करणे, आणि
महिलांना शेतकरी दर्जा देण्याचे प्रमाणपत्र वाटप यासह अनेक कामे केली जातील. याशिवाय पुरवठा, भूमी अभिलेख, कृषी, एसटी, आरोग्य व पशुवैद्यकीय विभागांच्या योजनांचाही लाभ नागरिकांना घेता येणार असून साकोलीच्या उपविभागीय अधिकारी स्वाती देसाई यांनी सर्वांना शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
- साकोली विधानसभा क्षेत्रातील सेंदूरवाफा/साकोली येथील 'मंगल मूर्ती सभागृह' येथे २६ जुलै रोजी सकाळी ११:०० ते दुपारी ५:०० या कालावधीत 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियान शिबिराचे' आयोजन करण्यात आले आहे. महसूल व वन विभागाच्या ९ जुलै २०२६ च्या शासन निर्णयान्वये, महसूल विभाग अधिक लोकाभिमुख, पारदर्शक व गतिमान करण्यासाठी तसेच मुख्यमंत्री यांचा जन्मदिवस व माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त २२ जुलै ते २ ऑगस्ट २०२६ दरम्यान राज्यभरात मतदारसंघनिहाय ही शिबारे आयोजित करण्याचे निर्देश दिलेले आहेत. या शिबिरात सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार असून नागरिकांना एकाच छताखाली विविध सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये भोगवटदार वर्ग-२ चे वर्ग-१ मध्ये रूपांतरण, डिजिटल स्वाक्षरीचे ७/१२ व ८-अ वितरण, प्रलंबित फेरफार, विविध दाखले व प्रमाणपत्र वाटप, सामाजिक अर्थसहाय्य योजना, ॲग्रीस्टॅक व पीएम किसान नोंदणी, तुकडेबंदी कायद्याविरुद्ध व्यवहार नियमानुकूल करणे, आणि महिलांना शेतकरी दर्जा देण्याचे प्रमाणपत्र वाटप यासह अनेक कामे केली जातील. याशिवाय पुरवठा, भूमी अभिलेख, कृषी, एसटी, आरोग्य व पशुवैद्यकीय विभागांच्या योजनांचाही लाभ नागरिकांना घेता येणार असून साकोलीच्या उपविभागीय अधिकारी स्वाती देसाई यांनी सर्वांना शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.4
- सडक अर्जुनी येथे २६ जुलै रोजी कारगिल दिवस, नीट पेपरफुटी प्रकरणी आत्महत्या केलेले विद्यार्थी आणि दिल्ली येथे लाठीहल्ल्यात शहीद झालेल्यांना आदरांजली वाहण्यात आली. या प्रसंगी त्रिरत्न पत संस्था, शेंडा रोड ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत कॅन्डल मार्च काढण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अशोककुमार लांजेवार व रोशन बडोले यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले आणि सामूहिक राष्ट्रगीत गाऊन शहीदांना आदरांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाचे संचालन आशिष राऊत यांनी केले. या प्रसंगी महेंद्र चंद्रिकापुरे, भोजराज रामटेके, प्रा. संतोष रामटेके, असलेश अंबादे, चंद्रकांत गणवीर, शामराव बडोले, अतुल फुले, रजनीश पंचभाई, आशिष राऊत, पुरुषोत्तम रामटेके, अंगरराज सिडाम, बबन बडोले, राहुल गणवीर, निखिल शहारे व मनोज तागडे इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते.4
- महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या संततधार पावसामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाअभावी करपू लागलेली सोयाबीन, कापूस, तूर, उडीद आणि मूग ही पिके आता पुन्हा जोमाने वाढू लागल्याने शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. यंदाच्या हंगामात सुरुवातीला झालेल्या पावसानंतर दीर्घ खंड पडल्याने अनेक ठिकाणी पिके धोक्यात आली होती. काही शेतकऱ्यांना दुबार पेरणीचाही सामना करावा लागला होता. मात्र अलीकडे झालेल्या समाधानकारक पावसामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाला असून पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. पावसामुळे शेततळी, विहिरी आणि नाल्यांतील पाणीसाठ्यातही वाढ झाली आहे. आगामी काळात आणखी चांगला पाऊस झाल्यास यंदाचे खरीप उत्पादन समाधानकारक होईल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.1
- गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात असलेल्या बिबीटोला–सोनेगाव येथील शेतात बिबट्याची दोन लहान पिल्ले आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे आणि दहशतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती दिल्यानंतरही वन विभागाचे पथक तब्बल ३ तासांनंतर घटनास्थळी पोहोचल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. सुमारे १० दिवसांपूर्वी साहेसपूर येथील एका फार्महाऊसमध्येही बिबट्याची पिल्ले आढळून आली होती. अशा घटना वारंवार समोर येत असल्याने ग्रामस्थांची चिंता अधिकच वाढली आहे. बिबटे आता गावे आणि लोकवस्ती असलेल्या भागांपर्यंत पोहोचत असल्याचे सांगत, वन विभागाने परिसरात गस्त वाढवावी, तातडीने रेस्क्यू टीम पाठवावी आणि मानव–वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.1
- विदर्भाची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या नागपूर येथील धापेवाडा येथे आषाढी एकादशीनिमित्त भक्तांचा मोठा जनसागर उसळला आहे. या धार्मिक उत्सवातील मुख्य सोहळा ३० जुलै रोजी पार पडणार आहे.1
- 'बिरसा मिसाईल फोर्स'मध्ये सहभागी होण्यासाठी आजच ७९८७५६७५२५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.1
- पवनी येथील बाम्हणी येथे शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी बाम्हणी ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती आणि गावकऱ्यांच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली. या सोहळ्यात ग्रामस्थांनी एकत्र येत यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या पालकांचे पुष्पगुच्छ देऊन विशेष स्वागत केले. या कार्यक्रमाला कोंढा केंद्राचे केंद्रप्रमुख मा. मानप्रकाशजी येळेकर हे पूर्णवेळ उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल गावकऱ्यांनी शाळेचे मुख्याध्यापक तसेच शिक्षकांचेही मनापासून अभिनंदन केले.1
- भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (भाकप) महाराष्ट्र राज्य कौन्सिलच्या राज्यव्यापी आंदोलनाच्या आवाहनानुसार २४ जुलै रोजी साकोली तालुका कौन्सिलतर्फे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या साकोली विभागीय कार्यालयावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. मुख्य कार्यकारी अभियंत्यांच्या अनुपस्थितीत सहाय्यक कार्यकारी अभियंता एन.जी.गडपायले यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे निवेदन सादर करण्यात आले. भाकपचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉम्रेड शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळात एमएसईबी वर्कर्स फेडरेशनचे माजी विभागीय सचिव कॉम्रेड पी.जी.वसुले, राज्य कौन्सिल सदस्य सुनंदा रामटेके, तालुका कौन्सिल सदस्य देवांगना सयाम, विकास सिडाम, वासंती शहारे आणि नगर सचिव कुमार रामटेके यांचा समावेश होता. निवेदनात आरोप करण्यात आला आहे की, ग्राहकांच्या परवानगीशिवाय स्मार्ट मीटर लावणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे व विधिमंडळात सांगूनही, ग्राहकांच्या अनुपस्थितीत गुपचूपपणे, फायद्याचे गणित सांगून किंवा कारवाईची धमकी देऊन मोठ्या प्रमाणात स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत. यामुळे ग्राहकांना भरमसाट बिलांचा सामना करावा लागत आहे. हे निवेदन देण्यादरम्यान साकोलीतील शिवाजी वार्ड येथील एका गरीब विधवा महिलेने तक्रार केली की, मे महिन्यापर्यंत जुन्या मीटरवर जास्तीत जास्त ५०० रुपये येणारे वीज बिल, तिच्या गैरहजेरीत जूनमध्ये लावलेल्या नवीन मीटरमुळे जुलै महिन्यात २५०० रुपये आले आहे. या पार्श्वभूमीवर, ग्राहकांच्या संमतीविना लावलेले स्मार्ट मीटर काढून जुने मीटर पुन्हा लावावेत, स्मार्ट मीटरची सक्ती केली जाऊ नये आणि केंद्र सरकारने नॅशनल स्मार्ट मीटर ग्रिड मिशन व त्याअंतर्गत उद्योगपती मित्रांना दिलेली कंत्राटे तात्काळ रद्द करावीत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. सहाय्यक कार्यकारी अभियंत्यांनी हे निवेदन तातडीने पंतप्रधान व मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवण्याचे आश्वासन दिले.1