Shuru
Apke Nagar Ki App…
छत्रपती शिवरायांचे विचार युवा पिढीने अंगिकारावे - कुलसचिव डॉ. अविनाश असनारे
Amravati News Update
छत्रपती शिवरायांचे विचार युवा पिढीने अंगिकारावे - कुलसचिव डॉ. अविनाश असनारे
More news from महाराष्ट्र and nearby areas
- अमरावतीच्या मेळघाटात बैलांचा नाही तर चक्क "बोकडपट"..1
- श्याम बाबा, श्री राणी सती दादीजी व श्री शिवपंचायतन मंदिराचा भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा १९ फेब्रुवारीला आर्वी (जि. वर्धा) – येथील श्री श्याम शक्ती सेवा समिती ट्रस्टच्या वतीने श्री श्याम बाबा, श्री राणी सती दादीजी तसेच श्री शिवपंचायतन मंदिराच्या भव्य प्राणप्रतिष्ठा समारंभाचे आयोजन करण्यात आले असून हा धार्मिक सोहळा रविवार, दि. १५ फेब्रुवारी २०२६ पासून गुरुवार, दि. १९ फेब्रुवारी २०२६ पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे. गुरुवार, दि. १९ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.१५ वाजता शुभ मुहूर्तावर मुख्य प्राणप्रतिष्ठा विधी पार पडणार आहे. या पवित्र प्रसंगी दररोज सकाळी देवपूजन, हवन, विविध धार्मिक विधी, सुंदरकांड पाठ, मंगलमय भजन संध्या, जागरण तसेच महिला मंडळांच्या भक्तीमय नृत्यप्रस्तुती यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तिसऱ्या दिवशी श्री राणी सती दादीजींचा मंगलपाठ, तर चौथ्या दिवशी भजन संध्या व जागरण होणार आहे. अंतिम दिवशी महाअभिषेक, न्यास विधी, शिखर कलश स्थापना, दिव्य शृंगार, छप्पन भोग, पूर्णाहुती आणि भव्य भजन संध्या आयोजित करण्यात आली असून त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे. मंदिर व सभामंडप उभारणीसाठी भूमिदान देणाऱ्या दानशूर व्यक्तींच्या पुण्यस्मरणार्थ हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमस्थळी भाविकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असून सर्व श्रद्धाळूंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन व आशीर्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. हा धार्मिक महोत्सव आर्वी शहरातील देऊरवाडा रोड परिसरातील शालीग्राम धर्मशाळेजवळील मंदिर प्रांगणात पार पडणार असून परिसरात उत्सवी व भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. *💥आर्वी येथे श्याम बाबा, श्री राणी सती दादीजी व श्री शिवपंचायतन मंदिराचा भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा १९ फेब्रुवारीला* *💥धार्मिक सोहळा रविवार, दि. १५ फेब्रुवारी २०२६ पासून गुरुवार, दि. १९ फेब्रुवारी २०२६ पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होणार* *💥या पवित्र प्रसंगी दररोज सकाळी देवपूजन, हवन, विविध धार्मिक विधी, सुंदरकांड पाठ, मंगलमय भजन संध्या, जागरण तसेच महिला मंडळांच्या भक्तीमय नृत्यप्रस्तुती यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन* *💥आर्वी शहरातील देऊरवाडा रोड परिसरातील शालीग्राम धर्मशाळेजवळील मंदिर प्रांगणात पार पडणार असून परिसरात उत्सवी व भक्तीमय वातावरण निर्माण* *💥भजन संध्या व जागरण होणार आहे. अंतिम दिवशी महाअभिषेक, न्यास विधी, शिखर कलश स्थापना, दिव्य शृंगार, छप्पन भोग, पूर्णाहुती आणि भव्य भजन संध्या* *✍️ *CT इंडियन न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे* 7350846789 *WhatsApp 84210782441
- Post by JKV NEWS 241
- ज्ञानेशप्रसाद, ब्युरो चिफ न्यूज मराठी वाशिम* संवाद:- 9923230821 रिसोड: न. प. चे कर्मचारी विनोद बांगर यांच्यामुळे, गावात पुन्: पक्षांचा चिव चिवाट ऐकायला मिळतोय!1
- राष्ट्रपतींच्या दौऱ्यानेच जाग आली का? संत नगरी शेगावात प्रशासनाच्या ‘तत्परते’वर नागरिकांचा सवाल शेगाव : देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या २५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या प्रस्तावित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संत नगरी शेगावात प्रशासन अक्षरशः धावपळ करताना दिसत आहे. छत्रपती संभाजी महाराज चौक ते आनंद सागर बाळापूर रोडवरील खड्डे बुजविण्याची कामे युद्धपातळीवर सुरू झाली असून खामगाव रोडवरील दुभाजकांची साफसफाई, झाडांची मशागत, गवत काढणे, रस्त्यांची स्वच्छता अशा सर्व कामांना अचानक वेग आला आहे. मात्र या ‘तत्परते’मुळे शहरातील नागरिकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे — ही कामे फक्त व्हीआयपी दौऱ्यापुरतीच का? काही दिवसांपूर्वीच शेगावातील प्रकट दिन सोहळा मोठ्या भक्तिभावात पार पडला. हजारो दिंड्या, वारकरी आणि भाविक संत नगरीत दाखल झाले होते. त्या वेळी रस्त्यांवरील खड्डे जैसे थे होते, अनेक ठिकाणी स्ट्रीट लाईट बंद होत्या, स्वच्छतेचा प्रश्न कायम होता. नगरपालिकेकडून कोणतीही ठोस हालचाल दिसून आली नाही. भक्तांच्या सोयी-सुविधांपेक्षा प्रशासनाची उदासीनता अधिक ठळकपणे जाणवत होती. आता मात्र राष्ट्रपतींचा दौरा जाहीर होताच काही दिवसांतच चित्र पालटले आहे. वर्षानुवर्षे नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणारे प्रशासन अचानक सक्रिय झाले आहे. जे काम नियमित देखभाल म्हणून व्हायला हवे होते, ते आज ‘ततडीच्या कामां’च्या नावाखाली सुरू आहे. त्यामुळे नागरिक संतप्त होत विचारत आहेत — शेगावातील समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रपतींच्या दौऱ्याचीच गरज होती का? संत नगरीचा दर्जा, येथील लाखो भाविकांची वर्दळ, शहराची वाढती लोकसंख्या या सगळ्यांचा विचार करता रस्ते, प्रकाश व्यवस्था आणि स्वच्छता ही मूलभूत कामे कायमस्वरूपी दर्जेदार असणे अपेक्षित आहे. परंतु येथे परिस्थिती उलटी दिसते. सामान्य नागरिकांच्या दैनंदिन अडचणींकडे दुर्लक्ष आणि व्हीआयपींसाठी तातडीची ‘मेकओव्हर’ मोहीम — हीच प्रशासनाची कार्यपद्धती बनली आहे का, असा रोखठोक सवाल आता केला जात आहे. राष्ट्रपतींचा दौरा हा निश्चितच शहरासाठी अभिमानाचा क्षण आहे. मात्र त्या निमित्ताने सुरू झालेली ही धावपळ प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारावर बोट ठेवणारी ठरत आहे. संत नगरी शेगावात विकास हा कायमस्वरूपी आणि नागरिककेंद्री होणार की तो फक्त मोठ्या पाहुण्यांच्या स्वागतापुरताच मर्यादित राहणार? हा प्रश्न आज प्रत्येक शेगावकराच्या मनात घुमत आहे.1
- जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या अंधश्रद्धा निर्मूलन उपक्रमांतर्गत अंनत श्री विभूषीत जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी, जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिणपीठ नाणीजधाम यांच्या समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळयाचे आयोजन दिनांक 22 व 23 फेब्रुवारी 2026 रोजी ज.न.म. संस्थान, उपपीठ पश्चिम विदर्भ, चिंचोली फाटा (सवर्णा), खामगाव हायवे, ता. शेगाव, जि. बुलढाणा येथे सकाळी 9:00 वाजता आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पश्चिम विदर्भ पीठ प्रमुख श्री कुंडलिकराव वायभासे, व्यवस्थापक श्री सुरेश मोरे, पीठ प्रसिद्धी प्रमुख अमर इधोळ यांनी एका प्रसिध्दी प्रत्रकाद्वारे दिली आहे. कार्यक्रमाच्या अनुषंगाने संस्थानाच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात जसे की, ग्रामस्वच्छता अभियान, शैक्षणिक उपक्रमांतर्गत इंग्रजी माध्यमांची मोफत शाळा, मोफत वेदपाठ शाळा, रक्तदान शिबिर, वैद्यकीय उपक्रमांतर्गत मोफत दवाखाना, मरणोत्तर देहदान, मोफत रुग्णवाहिका सेवा - महाराष्ट्रात विविध महामार्गावर 53 रुग्णवाहिका 24 तास अखंडपणे अपघातग्रस्तांच्या सेवेत कार्यरत आहेत. तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे पुनर्वसन, महिला सक्षमीकरण अंतर्गत मोफत शिलाई यंत्र वाटप, मोफत घरघंटी वाटप, आपत्कालीन मदत उपक्रम, कायदेविषयक साक्षरता शिबिरे, रक्तदान शिबिरांतर्गत या वर्षी जानेवारी 2026 मध्ये घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून अवघ्या 15 दिवसांमध्ये 1,71,150 रक्त कुपिंकांचे संकलन करण्यात आले, ब्लड इन नीड, "एक पेड माँ के नाम" वृक्षारोपण उपक्रमांतर्गत 1,10,687 वृक्षारोपण नोव्हेंबर 2025 महिन्यांमध्ये करण्यात आले, इत्यादी उपक्रम आयोजित केली जातात. या कार्यक्रमासाठी पश्चिम विदर्भ पिठ अंतर्गत जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, भाविक भक्त, साधक, शिष्य, हितचिंतक यांनी दि. 22 व 23 फेब्रुवारी 2026 रोजी जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रवचन व दर्शन सोहळ्याचा लाभ घ्यावा. या कार्यक्रमात दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी साधक दीक्षा व 23 फेब्रुवारी 2026 रोजी उपासक दीक्षा कार्यक्रम संपन्न होणार आहे. तरी जास्तीत जास्त भाविकांनी उपासक दीक्षा व उपासक यांनी साधक दीक्षा घेण्यासाठी नोंदणी करावी. या समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळयासाठी येणाऱ्या भाविकांसाठी कार्यक्रमाच्या दोनही दिवस महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. तरी या महंन्मंगल समयी आपण सर्वांनी सहकुटुंब, सहपरिवार, आप्तइष्ट मित्रांसह उपस्थित राहून परमश्रद्धेय रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या प्रवचन व दर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन पश्चिम विदर्भ पीठ समिती, जिल्हा सेवा समिती यांनी केले आहे.1
- HbA1c पर अंधा विश्वास diabetes और आपकी health के लिए खतरनाक हो सकता है🔥☺️ #drmeherabbas #Hba1c #diabetestest #BloodSugar #DiabetesControl #SugarTest #diabetesawareness DrMeher Abbas TopFans @highlight1
- छत्रपती शिवरायांचे विचार युवा पिढीने अंगिकारावे - कुलसचिव डॉ. अविनाश असनारे1