जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला हरताळ; उमरखेडमध्ये पेट्रोल पंप प्रकरणात नियमांची पायमल्ली जनतेच्या भावना पायदळी तुडविल्या -बसवेश्वर क्षीरसागर उमरखेड (जि. यवतमाळ) : जिल्हाधिकाऱ्यांच्या स्पष्ट आदेशानंतरही संबंधित अधिकाऱ्यांकडून अंमलबजावणी न झाल्यामुळे उमरखेड येथे पेट्रोल पंप प्रकरणात गंभीर अनियमितता उघडकीस आली आहे. या प्रकरणात शासन आदेश व अटींचे सरळ उल्लंघन होत असल्याचा आरोप अर्जदारांनी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पेट्रोल पंपासाठी दिलेल्या लीजचा कालावधी संपल्यानंतर नूतनीकरणासाठी अर्ज करण्यात आला होता. मात्र, या प्रक्रियेदरम्यान आवश्यक अटी व शर्तींची पूर्तता करण्यात आलेली नाही. विशेषतः, रस्त्याच्या मध्यापासून निर्धारित अंतराच्या आत डिझेल व पेट्रोल टाक्या असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले असून त्या हटविण्याची प्रक्रिया प्रलंबित आहे. यापूर्वी मा. जिल्हाधिकारी, यवतमाळ यांनी आदेश देऊन अतिक्रमण हटविण्याचे निर्देश दिले होते. तसेच, आदेशातील अट क्रमांक ६ ची पूर्तता झाल्याशिवाय लीजची नोंदणी करू नये आणि तोपर्यंत पेट्रोल-डिझेल विक्री स्थगित ठेवावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. तरीही संबंधितांकडून या आदेशाचे पालन झाले नसल्याचे समोर आले आहे. अर्जदार बसवेश्वर क्षीरसागर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संबंधित अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून नियमबाह्य पद्धतीने प्रक्रिया सुरू ठेवली आहे. त्यामुळे सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या पार्श्वभूमीवर अर्जदारांनी मागणी केली आहे की, अतिक्रमण तात्काळ हटवण्यात यावे, अटींची पूर्तता होईपर्यंत लीज नोंदणी थांबवावी, तसेच संबंधित पेट्रोल पंपाची विक्री त्वरित स्थगित करण्यात यावी दरम्यान, या गंभीर प्रकरणात जिल्हा प्रशासन काय भूमिका घेणार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला हरताळ; उमरखेडमध्ये पेट्रोल पंप प्रकरणात नियमांची पायमल्ली जनतेच्या भावना पायदळी तुडविल्या -बसवेश्वर क्षीरसागर उमरखेड (जि. यवतमाळ) : जिल्हाधिकाऱ्यांच्या स्पष्ट आदेशानंतरही संबंधित अधिकाऱ्यांकडून अंमलबजावणी न झाल्यामुळे उमरखेड येथे पेट्रोल पंप प्रकरणात गंभीर अनियमितता उघडकीस आली आहे. या प्रकरणात शासन आदेश व अटींचे सरळ उल्लंघन होत असल्याचा आरोप अर्जदारांनी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पेट्रोल पंपासाठी दिलेल्या लीजचा कालावधी संपल्यानंतर नूतनीकरणासाठी अर्ज करण्यात आला होता. मात्र, या प्रक्रियेदरम्यान आवश्यक अटी व शर्तींची पूर्तता करण्यात आलेली नाही. विशेषतः, रस्त्याच्या मध्यापासून निर्धारित अंतराच्या आत डिझेल व पेट्रोल टाक्या असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले असून त्या हटविण्याची प्रक्रिया प्रलंबित आहे. यापूर्वी मा. जिल्हाधिकारी, यवतमाळ यांनी आदेश देऊन अतिक्रमण हटविण्याचे निर्देश दिले होते. तसेच, आदेशातील अट क्रमांक ६ ची पूर्तता झाल्याशिवाय लीजची नोंदणी करू नये आणि तोपर्यंत पेट्रोल-डिझेल विक्री स्थगित ठेवावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. तरीही संबंधितांकडून या आदेशाचे पालन झाले नसल्याचे समोर आले आहे. अर्जदार बसवेश्वर क्षीरसागर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संबंधित अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून नियमबाह्य पद्धतीने प्रक्रिया सुरू ठेवली आहे. त्यामुळे सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या पार्श्वभूमीवर अर्जदारांनी मागणी केली आहे की, अतिक्रमण तात्काळ हटवण्यात यावे, अटींची पूर्तता होईपर्यंत लीज नोंदणी थांबवावी, तसेच संबंधित पेट्रोल पंपाची विक्री त्वरित स्थगित करण्यात यावी दरम्यान, या गंभीर प्रकरणात जिल्हा प्रशासन काय भूमिका घेणार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
- परभणी : अनुसूचित जाती उपवर्गीकरण संदर्भातील बदर समितीचा अहवाल सार्वजनिक करावा. जोपर्यंत अद्यावत जनगणना होत नाही तोपर्यंत याबाबत कुठलाही निर्णय न घेण्याच्या मागणीसाठी शहरातील सर्व आंबेडकरी संघटनाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. या संदर्भात जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, वर्गीकरणासाठी कोणते सामाजिक, आर्थिक निकष, सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय किंवाकोणत्या अभ्यासगटाच्या शिफारसी विचारात घेतल्या आहेत याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर डी. एन. दाभाडे, रामकिशन कांबळे, नदीम इनामदार, जयप्रकाश इंगोले, एन. जी. खंदारे, रवी सोनकांबळे, सुहास पंडीत, सिध्दार्थ भराडे आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.1
- माजी जि.प. सदस्य श्री संग्राम हयगले यांचा शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश कासराळी ता. बिलोली जि. नांदेड येथील माजी जिल्हा परिषद सदस्य श्री संग्राम हयगले यांनी दि. 27 एप्रिल 2026 रोजी मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात शिवसेना (शिंदे गट) मध्ये अधिकृत प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा ठाणे येथील स्व. मातोश्री गंगुबाई शिंदे सभागृहात पार पडला. या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री, शिवसेना मुख्यनेते मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या उपस्थित श्री. संग्राम हयगले यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह पक्षात प्रवेश करून शिवसेनेशी निष्ठा व्यक्त केली. कार्यक्रमाला विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. यावेळी महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री, शिवसेना मुख्यनेते मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांचे खाजगी सचिव तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) चे महाव्यवस्थापक मा. बालाजी पाटील खतगावकर साहेब, संपर्क प्रमुख श्री मडावी, जिल्हा प्रमुख श्री उमेश मुंढे तसेच सेवानिवृत्त सनदी अधिकारी मधुजी गिरगावकर उपस्थित होते. याशिवाय सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री अशोक गोपछडे, लगूळ येथील माजी सरपंच बाबुराव गोसलोड, विजयनगर ग्रामपंचायतीचे सरपंच प्रतिनिधी राजकुमार गुरगुरलवार, श्री विनोद निलावार आणि अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देखील मोठ्या संख्येने शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे बिलोली तालुक्यात शिवसेना (शिंदे गट) अधिक बळकट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक राजकारणात या घडामोडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून आगामी काळात याचा राजकीय समीकरणांवर परिणाम होणार असल्याची चर्चा आहे.1
- आगामी जनगणना प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्हाधिकारी यांनी नागरिकांना महत्त्वपूर्ण आवाहन करत सविस्तर मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी जनगणनेचे महत्त्व, प्रशासनाची तयारी आणि नागरिकांची भूमिका यावर प्रकाश टाकला. जिल्हाधिकारी म्हणाले की, जनगणना ही केवळ लोकसंख्या मोजणी नसून देशाच्या विकासाचा पाया आहे. शासनाच्या विविध योजना, निधी वाटप, तसेच सामाजिक व आर्थिक धोरणांची आखणी ही जनगणनेच्या अचूक आकडेवारीवर आधारित असते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने प्रामाणिकपणे आणि अचूक माहिती देणे अत्यंत गरजेचे आहे. प्रशासनाच्या तयारीविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, जनगणनेसाठी जिल्ह्यातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यावर भर दिला जात आहे. तसेच, नागरिकांनी कोणतीही भीती किंवा गैरसमज न ठेवता जनगणना अधिकाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. दिलेली माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, याची हमीही त्यांनी दिली. जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, जनगणना ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून त्यातूनच जिल्ह्याचा आणि देशाचा सर्वांगीण विकास शक्य आहे. त्यामुळे “माझी जनगणना, माझी जबाबदारी” या भावनेतून सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवले जाणार असून, ग्रामीण व शहरी भागात जनगणनेविषयी जागरूकता वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.1
- Post by Sharad Dayedar1
- Post by Ramesh Mulgir1
- प्रशासनाचे दुर्लक्ष चव्हाट्यावर; तक्रारदारांचे तहसीलसमोर अर्धनग्न आंदोलन मंठा (प्रतिनिधी) – पूर्णा नदीपात्रातील अवैध रेती उत्खननाच्या तक्रारींकडे प्रशासनाने वारंवार दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप करत तक्रारदारांनी अखेर आक्रमक पवित्रा घेतला. मंगळवार, दि. २८ एप्रिल रोजी मंठा तहसील कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करत त्यांनी संताप व्यक्त केला. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, जेसीबी व पोकलॅन्डसारख्या यंत्रांच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन सुरू असून नियमांची सर्रास पायमल्ली होत आहे. याबाबत अनेकदा निवेदने देऊनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आंदोलनादरम्यान प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दोषी अधिकारी आणि संबंधितांवर तात्काळ कडक कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. तसेच, ड्रोनच्या माध्यमातून सर्व रेती घाटांचे मोजमाप करून निष्पक्ष चौकशी करावी आणि तोपर्यंत उत्खनन पूर्णपणे बंद ठेवावे, अशीही मागणी पुढे करण्यात आली. या आंदोलनामुळे तहसील कार्यालय परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाने आंदोलनाची दखल घेत प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, “तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल,” असा इशारा आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला दिला आहे.1
- परभणी (प्रतिनिधी) : परभणी तालुक्यातील लोहगाव येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत पाच दुकाने पूर्णतः जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे, आग लागली तेव्हा सर्व दुकानदार गावातील एका लग्नसमारंभासाठी गेले होते, त्यामुळे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, लोहगावातील बाजारपेठ परिसरात अचानक दुपारच्या च्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. सुरुवातीला आग लहान स्वरूपाची होती, मात्र काही वेळातच तिने भीषण रूप धारण केले आणि शेजारील चार दुकानेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. गावकऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. तसेच अग्निशमन दलालाही माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून अथक प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणली.1
- अप्पर तहसील कार्यालय मागणीसाठी शेवली कडकडीत बंद आठवडी बाजारही बंद ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा1
- मंठा तालुक्यातील हेलस येथे एका ७० वर्षीय वृद्धाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. अचित विश्वनाथराव खराबे (वय ७०) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीने गळफास घेऊन जीवन संपवले. घटनास्थळी सापडलेल्या सुसाइड नोटमध्ये "माझ्या आत्महत्येला कोणीही जबाबदार नाही" असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच मंठा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पुरूषोत्तम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे हेलस परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.1