Shuru
Apke Nagar Ki App…
लातूर-अहमदपूर माजी मंत्री विनायकराव पाटील शदर पवारांना धक्का देत अनेक कार्यकर्त्यांसह केला शिंदे शिवसेनेत जाहीर प्रवेश लातूर-अहमदपूर माजी मंत्री विनायकराव पाटील शदर पवारांना धक्का देत अनेक कार्यकर्त्यांसह केला शिंदे शिवसेनेत जाहीर प्रवेश
Janta police taims
लातूर-अहमदपूर माजी मंत्री विनायकराव पाटील शदर पवारांना धक्का देत अनेक कार्यकर्त्यांसह केला शिंदे शिवसेनेत जाहीर प्रवेश लातूर-अहमदपूर माजी मंत्री विनायकराव पाटील शदर पवारांना धक्का देत अनेक कार्यकर्त्यांसह केला शिंदे शिवसेनेत जाहीर प्रवेश
More news from महाराष्ट्र and nearby areas
- मेघा इंजीनियरिंग ची खोटी आश्वासने गावकऱ्यांचा संताप ... पेण तालुक्यातील मुंगोशी बेलावडे ग्रामपंचायत या हद्दीमध्ये मेघा इंजीनियरिंग अँड इन्फ्रा प्रा लिमिटेड यांनी सुमारे 300 मीटर खोल जल बोगदा करण्याचे काम सुरू आहे त्यामध्ये ग्रामपंचायत हद्दीतील असणारे सर्व पाण्याचे झरे या बोगद्यामध्ये आल्याने सर्व विहिरी व पाणी आटलेला आहे त्या टनल मधलं पाणी हे नाल्यामध्ये सोडल्याने संपूर्ण शेतीचे सुद्धा नुकसान झालं आहे पाण्याची क्षारता जास्त असल्याने तेथील शेतकऱ्यांना मोठा घटका बसला आहे गावामध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध नाही टँकर ने पाणी गावाला पोचवलं जातंय आतून टर्नलच्या निघालेल्या मटेरियल मुळे अनेक जीवजंतूचा नुकसान झाला आहे भाजपाला लावू शकत नाही शेतीचं उत्पन्न घेऊ शकत नाही या भागामध्ये या टर्नल मुले अनेकांचे नुकसान झालेला आहे याकरता येणाऱ्या दोन दिवसात प्रांत अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये बैठक बोलवण्यात आलेले आहे त्यामध्ये जर मार्ग निघाला नाही त्याला समस्त गावकरी 12 आदिवासी वाड्या व अनेक महसूल गावे मिळून या मेघा इंजीनियरिंग पूर्ण काम बंद करणार असा इशारा दिला आहे. राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी संजय गायकवाड पेण रायगड1
- जायकवाडी धरण येथून शेतीसाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या दाबावरून परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला आहे. धरणातून बाराशे क्युसेक्सने पाणी सोडले जात असल्याचा दावा असताना, तेच पाणी परभणीपर्यंत येईपर्यंत केवळ सुमारे आठशे क्युसेक्स दाबाने पोहोचत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. यामुळे कॅनॉलमधील पाण्याचा वेग कमी झाला असून, शेतीपर्यंत पाणी पोहोचत नाही. परिणामी रब्बी हंगाम जवळपास हातातून गेला असून, आता उसासारखी उभी पिकेही करपण्याच्या मार्गावर आहेत. शेतकऱ्यांसमोर गंभीर पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी जायकवाडी प्रकल्पाच्या “दोन” कार्यालयात धडक दिली. अधीक्षक अभियंता अनुपस्थित असल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यानंतर आंदोलन तीव्र होत गेले आणि संतप्त कार्यकर्त्यांनी कार्यकारी अभियंत्यांची खुर्चीच उचलून नेली. “जोपर्यंत कॅनॉलमधून योग्य दाबाने पाणीपुरवठा होत नाही, तोपर्यंत ही खुर्ची परत दिली जाणार नाही,” असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. या घटनेतून प्रशासनाविषयीचा रोष स्पष्टपणे समोर आला असून, शेतकऱ्यांच्या पाण्याच्या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.1
- राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी गटशेती (समूह शेती) हा प्रभावी पर्याय म्हणून पुढे येत आहे. लहान-लहान तुकड्यांमध्ये विभागलेल्या जमिनीमुळे उत्पादन खर्च वाढत असताना, शेतकरी एकत्र येऊन शेती करण्याचा मार्ग स्वीकारत आहेत. यामुळे मोठ्या क्षेत्रावर पीक घेणे शक्य होत असून आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर सुलभ होत आहे. गटशेतीमुळे शेतकऱ्यांमध्ये समन्वय वाढतो, उत्पादन खर्च कमी होतो आणि बाजारपेठेत स्पर्धात्मक दर मिळण्यास मदत होते. ठिबक सिंचन, ड्रोन तंत्रज्ञान, तसेच यांत्रिकीकरण यांचा वापर सामूहिक पद्धतीने करता येत असल्याने उत्पादनात वाढ होत आहे. दरम्यान, राज्यात आधुनिक शेती तंत्रज्ञानावर भर दिला जात असून AI, ड्रोन, नैसर्गिक शेती आणि अन्नप्रक्रिया यांसारख्या नव्या संकल्पनांना चालना दिली जात आहे. अशा उपक्रमांमुळे गटशेती अधिक सक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तज्ञांच्या मते, भविष्यात शेती केवळ पारंपरिक न राहता तंत्रज्ञानावर आधारित व्यवसाय बनत असून गटशेती हीच शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी महत्त्वाची किल्ली ठरणार आहे.1
- Post by दिपक हैबतराव चोरमले1
- सस्नेह जय महाराष्ट्र… स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त… आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या प्रेरणेतून… हदगाव नगरीत उभा राहिला… एक आदर्श… एक संस्कार… आणि एक सामाजिक क्रांती…! आजच्या काळात… लग्न म्हणजे वाढता खर्च… दिखाऊपणा… आणि अनेक कुटुंबांसाठी ओझं… अशा परिस्थितीत सामूहिक विवाह ही फक्त परंपरा नाही… तर समाजाला दिलासा देणारी… समानतेचा संदेश देणारी… एक शक्ती आहे…! आणि हीच संकल्पना प्रत्यक्षात उतरवली… आमदार बाबुराव कदम कोहळीकर साहेबांनी… Baburao kadam kohalikar ज्यांनी आजच्या काळातही… साधेपणा आणि सामाजिक बांधिलकी जिवंत ठेवत… एक प्रेरणादायी उदाहरण घालून दिलं…! उद्योग मंत्री उदय सामंत साहेबांच्या उपस्थितीत… हदगाव येथे तब्बल २९ जोडप्यांचा विवाह मोठ्या उत्साहात… आणि मंगलमय वातावरणात पार पडला…! या सोहळ्याला लाभली मान्यवरांची उपस्थिती… मा. आमदार हेमंतभाऊ पाटील साहेब… Hemant Patil - हेमंत पाटील मा. आमदार संतोष बांगर साहेब… Mla Santosh Bangar माजी खासदार शिवाजीराव माने साहेब… मा. आमदार उत्तमराव इंगळे साहेब… या भव्य सोहळ्याचं सुंदर सूत्रसंचालन केलं… मुरलीधर हुंबर्डे यांनी… Murlidhar Hambarde Patil ज्यांनी प्रत्येक क्षण अधिक संस्मरणीय बनवला…! तसंच… हदगाव–हिमायतनगर तालुक्यातील सर्व शिवसैनिक आणि युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी… हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अक्षरशः जीवाचं रान केलं…! हा फक्त विवाह सोहळा नव्हता… तर समाजाला नवा विचार देणारा… साधेपणातून एकात्मता निर्माण करणारा… आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी आदर्श ठरणारा एक ऐतिहासिक उपक्रम होता…! सामूहिक विवाह — काळाची गरज… आणि समाजासाठी एक शक्तिशाली दिशा…! जय महाराष्ट्र…! 🚩1
- दिनांक 25/04/2026 रोजी उपविभाग पुसद येथे हजर करीत असतांना माहीती मिळाली कि, मौजे-पुसद ते वाशिम रोडवरील खंडाळा घाटातील सेवादासनगरचे शिवारातील ई क्लास जमीनच्या ठिकाणी मृतक दिलीप महादू ढाकरे वय 39 वर्ष, रा. फेट्रा ता. पुसद जि. यवतमाळ यास कोणीतरी अज्ञात इसमांने कोणत्यातरी अज्ञात कारणाने त्याचे डोक्यावर दगड टाकून जिवेठार मारुन पुरावा नष्ट करण्याच्या इरादयाने चेहरा विदृप केलेल्या स्थितीत मिळून आल्याने पोलीस स्टेशन वसंतनगर अप क्रमांक 154/2026 कलम 103(1), 238 भान्यास प्रमाणे दिनांक 25/04/2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर प्रेताची पाहणी करता त्यास कोणीतरी अज्ञात इसमांने कोणत्यातरी कारणाने जिवेठार मारुन पुरावा नष्ट करण्याच्या इराइयाने त्याचा चेहरा विदृप केला होता. त्याबाबत मा. पोलीस अधीक्षक सा यवतमाळ यांनी पोलीस निरीक्षक सा स्थागुशा यवतमाळ यांना सदर गुन्हयातील अनोळखी आरोपी शोध घेवून गुन्हा उघडकीस आणन्या करीता आदेशित केले होते. पोलीस निरीक्षक, स्थागुशा यवतमाळ यांनी त्यांचे अधिनस्थ स्थानिक गुन्हे शाखा कॅम्प पुसद पथक यांना सदर गुन्हयातील मृतक यांचे अज्ञात मारेकरी यांचा शोध घेवून गुन्हा उघडकीस आणन्याकरीता आदेशित केले होते. त्यासाठी स्थागुशा कॅम्प पुसद कडील अधिकारी व अंमलदार यांच्या पथकांने गुन्हयाचे घटनास्थळी भेट देवून बारकाईने पाहणी केली गुन्हयाच्या अनुषंगाने मृतक यांचे नातेवाईक यांच्याकडे सखोल तपास करुन गुन्हा उघडकीस आणन्याचा प्रयत्न करीत असतांना दिनांक 27/04/2026 रोजी स्थागुशा यवतमाळ कॅम्प पुसद कडील पथक मृतक यांचे मारेकरी व गुन्हयातील मृतक यांचे मोटार सायकल बाबत माहीती काढत असतांना पोहवा/1867 कुणाल मुंडोकार यांना गोपनिय माहीती मिळाली कि, मृतक दिलीप महादू ढाकरे यांची बजाज कंपनीची प्लॅटीना मोटार सायकल ही सेवादास नगर येथील इमस नामे-गोपाल ऊर्फ गोलू बाळू पवार यांच्याकडे असून तो विक्री करीत आहे अशी माहीती मिळाल्याने संशयीत इसम गोपाल ऊर्फ गोलू बाळू पवार रा. सेवादास नगर ता. पुसद जि. यवतमाळ यास अतिशय शिताफिने पोलीस कौशल्याचा वापर करुन ताब्यात घेवून गुन्हयाच्या अनुषंगाने विचारपूस केली असता उडवाउडवीचे उत्तरे देत असल्याने त्यास अधिक विश्वासात घेवून अतिशय चिकाटीने गुन्हयाच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने व त्याचे साथीदार प्रकाश ऊर्फ पक्या उत्तम राठोड यांनी मृतक यांच्याकडे लुटमार करुन पैसे मिळविण्याच्या इरादयाने मृतक खंडाळा घाटात रोडच्या बाजूला खाली बसलेला दिसल्याने त्यास फरफरट खंडाळा घाटाच्या खाली एका निंबाच्या व काटेरी झाडा खाली नेवून त्याचे पॅन्टीची व शर्टची खिसे चेक करुन त्याचे डोक्यावर लहान व मोठ्या आकाराचे दगड टाकून पुरावा नष्ट करण्याचे इरादयाने चेहरा विदृप करुन जिवेठार मारुन त्याची मोटार सायकल घेवून गेले असल्याचे निष्पन्न करुन वसंतनगर पोलीस स्टेशन अप क्रमांक अप क्रमांक 154/2026 कलम 103(1), 238 भान्यास हा अतिशय क्लिष्ट व गुंतागुतीचा गुन्हा उघड करुन आरोपी 1) गोपाल ऊर्फ गोलू बाळू पवार वय 26 वर्ष, रा सेवादास नगर ता पुसद जि यवतमाळ येथून ताब्यात घेवून पुढील तपास कामी पोलीस स्टेशन वसंतनगर यांच्या ताब्यात दिले. सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री कुमार चिंता (भा.पो.से) सा, मा.अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. अशोक थोरात (म.पो.से) सा, मा. सहा पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद श्री. हर्षवर्धन बी.जे सा तसेच मा. पोलीस निरीक्षक श्री सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, मा. पोलीस निरीक्षक दिनेश झांबरे पोलीस स्टेशन वसंतनगर यांचे मार्गदर्शनात सपोनि/धिरज बांडे, पोउपनि/शरद लोहकरे, सफौ/मुन्ना आडे, पोहवा/संतोष भोरगे, पोहवा/तेजाब रणखांब, पोहवा/सुभाष जाधव, पोहवा कुणाल मुंडोकार, पोहवा/रमेश राठोड, पोशि/सुनिल पंडागळे, चापोउपनि रविंद्र शिरामे, पोशि/राजेश जाधव सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.3
- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल चुकीचा काहीही इतिहास बरळणारा वाचाळखोर यांना पोकळ बांबूचे फटके देऊन झोडपून काढल्याशिवाय ही नालायक सुधरणार नाहीत मग ते कोणीही असो 😡 आमच्या दैवताच्या नावाने तुमच्या राजकीय पोळ्या भाजायचं बंद करा याचे परिणाम काय होतील याचा विचार देखील करू शकणार नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे तुम्हाला कधी कधी कुठ कस पळवून हाणतील सांगता देखील येणार नाही.1
- Post by Shaikh irfan Shaikh isa1
- हिमायतनगर येथे आज तहजीब फाउंडेशन आणि हाजी अब्दुल वहीद सेठ यांनी हिमायतनगरमध्ये एक नवा इतिहास रचला आहे. आज रविवार,आज दिनांक २६ एप्रिल 2026 रोजी संपन्न झालेल्या ३२ निकाह सोहळ्यासह त्यांनी २००७ पासून आतापर्यंत एकूण ५४० लेकींना स्वतःच्या मुलीप्रमाणे मानून त्यांचे संसार थाटले आहेत.या भव्य सोहळ्याचे आणि संपूर्ण व्यवस्थेचे मॅनेजमेंट मुबीन सेठ आणि त्यांच्या टीमने अत्यंत चोखपणे सांभाळले. पितृत्वाचे कर्तव्य आणि सन्मान: हाजी साहेबांनी या लेकींना निरोप देताना एका पित्याप्रमाणे त्यांचे सर्व हक्क आणि सन्मान जपला आहे. या सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थिती कासिम मौलाना, खुदुस मौलाना आणि अजीम मौलाना यांची होती.आणि नगराध्यक्ष शेख रफीक, माजी उपनगराध्यक्ष जावेद भाई यांच्यासह शहरातील सर्व सन्माननीय नगरसेवक आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.तहजीब फाउंडेशनच्या या अफाट कार्याचे आणि मुबीन सेठ व टीमच्या व्यवस्थापनाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.1