चालक पोलीस शिपाई पदासाठी लेखी परीक्षा अत्यंत पारदर्शक, नियोजनबद्ध वातावरणात यशस्वीरीत्या पार लातूर जिल्हा पोलीस दलामार्फत राबविण्यात येत असलेल्या चालक पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत एक महत्त्वाचा टप्पा म्हणून दिनांक ०५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११.०० वा. पोलीस प्रशिक्षण केंद्र, बाभळगाव, लातूर येथे लेखी परीक्षा अत्यंत सुरळीत, शिस्तबद्ध व पारदर्शक वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली. सदर परीक्षेसाठी गुणवत्ता यादीतील एकूण (२६२) उमेदवार पात्र ठरले होते. त्यापैकी (२४१) उमेदवारांनी उपस्थित राहून परीक्षा दिली, तर (२१) उमेदवार गैरहजर राहिले. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशानुसार अत्यंत काटेकोर नियोजन व सक्षम अंमलबजावणीमुळे संपूर्ण परीक्षा प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडली. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशान्वये व अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर पोलिसांकडून लेखी परीक्षेला येणाऱ्या उमेदवारांच्या सोयीसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या त्यामध्ये बाहेरगावाहून आलेल्या उमेदवारांसाठी पोलीस मुख्यालयात निवासाची व्यवस्था करण्यात आली होती, उन्हाच्या तीव्रतेपासून संरक्षणासाठी आवश्यक ती व्यवस्था करण्यात आली.उमेदवार उपाशीपोटी परीक्षा देऊ नयेत यासाठी उमेदवारांच्या नाष्ट्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यांना नाश्त्यामध्ये बिस्किटे, केळी,उपमा देण्यात आला.उमेदवारांना योग्य मार्गदर्शन व तत्काळ सहाय्य मिळावे यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. या सर्व सुविधांमुळे उमेदवारांना मानसिक व शारीरिकदृष्ट्या सक्षम राहून परीक्षा देणे शक्य झाले. पोलीस अधीक्षक अमोल तांबे तसेच अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण हे स्वतः परीक्षा केंद्रामध्ये हजर होते. त्यांनी परीक्षा कक्षांची पाहणी करून संपूर्ण व्यवस्थेचा बारकाईने आढावा घेतला व संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देऊन परीक्षा प्रक्रिया अधिक सक्षम व सुरळीत पार पाडण्यास मार्गदर्शन केले. सदरची चालक पोलीस शिपाई पदासाठीची लेखी परीक्षा पूर्णतः पारदर्शक, निष्पक्ष व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी विशेष दक्षता घेण्यात आली होती. परीक्षा केंद्र परिसरात सर्वत्र अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणेद्वारे सतत निगराणी ठेवण्यात आली होती. तसेच प्रत्येक परीक्षा हॉलमध्येही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. याशिवाय, प्रत्येक परीक्षा कक्षामध्ये स्वतंत्रपणे पूर्णवेळ व्हिडिओ कॅमेऱ्याद्वारे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आले. या सर्व उपाययोजनांमुळे परीक्षा प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवणे शक्य झाले असून सर्व प्रकारच्या गैरप्रकारांना पूर्णतः आळा बसला. परीक्षेची निष्पक्षता अबाधित राहावी यासाठी उमेदवारांसोबतच परीक्षा केंद्रावरील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनाही मोबाईल फोन किंवा कोणतीही इलेक्ट्रॉनिक साधने वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली होती. सदर लेखी परीक्षेची तात्पुरती उत्तरतालिका (Provisional Answer Key) ही लातूर पोलिसांच्या अधिकृत संकेतस्थळ वर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या दर्शनी भागावरही ती लावण्यात आली आहे. उमेदवारांना कोणतेही आक्षेप असल्यास ते २४ तासांच्या आत खालील माध्यमांतून नोंदविण्याचे आवाहन करण्यात येत आहे दूरध्वनी : ०२३८२-२४२२९६ निर्धारित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या आक्षेपांचा विचार केला जाणार नाही, संपूर्ण परीक्षा प्रक्रिया अत्यंत पारदर्शक, निष्पक्ष व नियोजनबद्ध पद्धतीने पार पडल्यामुळे उमेदवारांनी समाधान व्यक्त केले. पोलीस प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या सुविधा, शिस्तबद्ध नियोजन व उत्कृष्ट व्यवस्थापन याबाबत उमेदवारांकडून कौतुक करण्यात आले.
चालक पोलीस शिपाई पदासाठी लेखी परीक्षा अत्यंत पारदर्शक, नियोजनबद्ध वातावरणात यशस्वीरीत्या पार लातूर जिल्हा पोलीस दलामार्फत राबविण्यात येत असलेल्या चालक पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत एक महत्त्वाचा टप्पा म्हणून दिनांक ०५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११.०० वा. पोलीस प्रशिक्षण केंद्र, बाभळगाव, लातूर येथे लेखी परीक्षा अत्यंत सुरळीत, शिस्तबद्ध व पारदर्शक वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली. सदर परीक्षेसाठी गुणवत्ता यादीतील एकूण (२६२) उमेदवार पात्र ठरले होते. त्यापैकी (२४१) उमेदवारांनी उपस्थित राहून परीक्षा दिली, तर (२१) उमेदवार गैरहजर राहिले. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशानुसार अत्यंत काटेकोर नियोजन व सक्षम अंमलबजावणीमुळे संपूर्ण परीक्षा प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडली. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशान्वये व अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर पोलिसांकडून लेखी परीक्षेला येणाऱ्या उमेदवारांच्या सोयीसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या त्यामध्ये बाहेरगावाहून आलेल्या उमेदवारांसाठी पोलीस मुख्यालयात निवासाची व्यवस्था करण्यात आली होती, उन्हाच्या तीव्रतेपासून संरक्षणासाठी आवश्यक ती व्यवस्था करण्यात आली.उमेदवार उपाशीपोटी परीक्षा देऊ नयेत यासाठी उमेदवारांच्या नाष्ट्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यांना नाश्त्यामध्ये बिस्किटे, केळी,उपमा देण्यात आला.उमेदवारांना योग्य मार्गदर्शन व तत्काळ सहाय्य मिळावे यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. या सर्व सुविधांमुळे उमेदवारांना मानसिक व शारीरिकदृष्ट्या सक्षम राहून परीक्षा देणे शक्य झाले. पोलीस अधीक्षक अमोल तांबे तसेच अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण हे स्वतः परीक्षा केंद्रामध्ये हजर होते. त्यांनी परीक्षा कक्षांची पाहणी
करून संपूर्ण व्यवस्थेचा बारकाईने आढावा घेतला व संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देऊन परीक्षा प्रक्रिया अधिक सक्षम व सुरळीत पार पाडण्यास मार्गदर्शन केले. सदरची चालक पोलीस शिपाई पदासाठीची लेखी परीक्षा पूर्णतः पारदर्शक, निष्पक्ष व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी विशेष दक्षता घेण्यात आली होती. परीक्षा केंद्र परिसरात सर्वत्र अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणेद्वारे सतत निगराणी ठेवण्यात आली होती. तसेच प्रत्येक परीक्षा हॉलमध्येही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. याशिवाय, प्रत्येक परीक्षा कक्षामध्ये स्वतंत्रपणे पूर्णवेळ व्हिडिओ कॅमेऱ्याद्वारे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आले. या सर्व उपाययोजनांमुळे परीक्षा प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवणे शक्य झाले असून सर्व प्रकारच्या गैरप्रकारांना पूर्णतः आळा बसला. परीक्षेची निष्पक्षता अबाधित राहावी यासाठी उमेदवारांसोबतच परीक्षा केंद्रावरील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनाही मोबाईल फोन किंवा कोणतीही इलेक्ट्रॉनिक साधने वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली होती. सदर लेखी परीक्षेची तात्पुरती उत्तरतालिका (Provisional Answer Key) ही लातूर पोलिसांच्या अधिकृत संकेतस्थळ वर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या दर्शनी भागावरही ती लावण्यात आली आहे. उमेदवारांना कोणतेही आक्षेप असल्यास ते २४ तासांच्या आत खालील माध्यमांतून नोंदविण्याचे आवाहन करण्यात येत आहे दूरध्वनी : ०२३८२-२४२२९६ निर्धारित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या आक्षेपांचा विचार केला जाणार नाही, संपूर्ण परीक्षा प्रक्रिया अत्यंत पारदर्शक, निष्पक्ष व नियोजनबद्ध पद्धतीने पार पडल्यामुळे उमेदवारांनी समाधान व्यक्त केले. पोलीस प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या सुविधा, शिस्तबद्ध नियोजन व उत्कृष्ट व्यवस्थापन याबाबत उमेदवारांकडून कौतुक करण्यात आले.
- लातूर जिल्हा पोलीस दलामार्फत राबविण्यात येत असलेल्या चालक पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत एक महत्त्वाचा टप्पा म्हणून दिनांक ०५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११.०० वा. पोलीस प्रशिक्षण केंद्र, बाभळगाव, लातूर येथे लेखी परीक्षा अत्यंत सुरळीत, शिस्तबद्ध व पारदर्शक वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली. सदर परीक्षेसाठी गुणवत्ता यादीतील एकूण (२६२) उमेदवार पात्र ठरले होते. त्यापैकी (२४१) उमेदवारांनी उपस्थित राहून परीक्षा दिली, तर (२१) उमेदवार गैरहजर राहिले. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशानुसार अत्यंत काटेकोर नियोजन व सक्षम अंमलबजावणीमुळे संपूर्ण परीक्षा प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडली. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशान्वये व अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर पोलिसांकडून लेखी परीक्षेला येणाऱ्या उमेदवारांच्या सोयीसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या त्यामध्ये बाहेरगावाहून आलेल्या उमेदवारांसाठी पोलीस मुख्यालयात निवासाची व्यवस्था करण्यात आली होती, उन्हाच्या तीव्रतेपासून संरक्षणासाठी आवश्यक ती व्यवस्था करण्यात आली.उमेदवार उपाशीपोटी परीक्षा देऊ नयेत यासाठी उमेदवारांच्या नाष्ट्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यांना नाश्त्यामध्ये बिस्किटे, केळी,उपमा देण्यात आला.उमेदवारांना योग्य मार्गदर्शन व तत्काळ सहाय्य मिळावे यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. या सर्व सुविधांमुळे उमेदवारांना मानसिक व शारीरिकदृष्ट्या सक्षम राहून परीक्षा देणे शक्य झाले. पोलीस अधीक्षक अमोल तांबे तसेच अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण हे स्वतः परीक्षा केंद्रामध्ये हजर होते. त्यांनी परीक्षा कक्षांची पाहणी करून संपूर्ण व्यवस्थेचा बारकाईने आढावा घेतला व संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देऊन परीक्षा प्रक्रिया अधिक सक्षम व सुरळीत पार पाडण्यास मार्गदर्शन केले. सदरची चालक पोलीस शिपाई पदासाठीची लेखी परीक्षा पूर्णतः पारदर्शक, निष्पक्ष व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी विशेष दक्षता घेण्यात आली होती. परीक्षा केंद्र परिसरात सर्वत्र अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणेद्वारे सतत निगराणी ठेवण्यात आली होती. तसेच प्रत्येक परीक्षा हॉलमध्येही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. याशिवाय, प्रत्येक परीक्षा कक्षामध्ये स्वतंत्रपणे पूर्णवेळ व्हिडिओ कॅमेऱ्याद्वारे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आले. या सर्व उपाययोजनांमुळे परीक्षा प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवणे शक्य झाले असून सर्व प्रकारच्या गैरप्रकारांना पूर्णतः आळा बसला. परीक्षेची निष्पक्षता अबाधित राहावी यासाठी उमेदवारांसोबतच परीक्षा केंद्रावरील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनाही मोबाईल फोन किंवा कोणतीही इलेक्ट्रॉनिक साधने वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली होती. सदर लेखी परीक्षेची तात्पुरती उत्तरतालिका (Provisional Answer Key) ही लातूर पोलिसांच्या अधिकृत संकेतस्थळ वर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या दर्शनी भागावरही ती लावण्यात आली आहे. उमेदवारांना कोणतेही आक्षेप असल्यास ते २४ तासांच्या आत खालील माध्यमांतून नोंदविण्याचे आवाहन करण्यात येत आहे दूरध्वनी : ०२३८२-२४२२९६ निर्धारित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या आक्षेपांचा विचार केला जाणार नाही, संपूर्ण परीक्षा प्रक्रिया अत्यंत पारदर्शक, निष्पक्ष व नियोजनबद्ध पद्धतीने पार पडल्यामुळे उमेदवारांनी समाधान व्यक्त केले. पोलीस प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या सुविधा, शिस्तबद्ध नियोजन व उत्कृष्ट व्यवस्थापन याबाबत उमेदवारांकडून कौतुक करण्यात आले.2
- उदगीर शहरातील गांधी नगर व मुसा नगर परिसरात ४ एप्रिलच्या रात्री अचानक तुफान दगडफेक, दोन गटात राडा !! जवळपास 50 लोकांवर गुन्हा दाखल!! पोलिसाच्या जीपचेही मोठे नुकसान!! उदगीर (एल पी उगीले) उदगीर शहरातील गांधीनगर व मुसा नगर परिसरातील दोन गटांमध्ये अचानक वाद उसळल्याने तुफान दगडफेक झाली. याप्रकरणी उसळलेल्या दंगलीला ताब्यात घेण्याच्या दृष्टीने पोलिसांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली खरी मात्र चिडलेल्या जमावाने चक्क पोलीस गाडीवर प्रचंड दगडफेक करून पोलिसाच्या जीपचे मोठे नुकसान केले. याप्रकरणी पोलिस अंमलदार सतीश भानुदास पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उदगीर शहर पोलीस स्टेशन येथे गु.र.न. 99 /26 कलम 132, 121 (1), 125 (A), 189 (2), 191 (2)(3), 190, 324 (3) भारतीय न्याय संहितेच्या अनुषंगाने तसेच सार्वजनिक संपत्तीचे नुकसान प्रतिबंधक अधिनियम 1984 व सह कलम 135 महाराष्ट्र पोलीस कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपी आजम असलम जहागीरदार, आसिफ शेख लातूरकर, शार्दुल रशीद शेख, आशा उर्फ असलम शेख, रोशन ताजुद्दीन शेख (बिलाल), मोहित जागीरदार, जाकीर जागीरदार, बाबर शेख, आरिफ शेख, एजाज फारुख शेख, मोहेल लाला शेख, साहिल लाला शेख, मोईन हैदरसाब शेख, जुबेर मुसा शेख, इब्राहिम मुसा शेख, फिरोज ताहेर शेख, मोहसीन मकदुल मौलासाब शेख, मोहेल शेख, बबलू उर्फ मोहम्मद रफी, सोहेल लाईक लदाफ, वजीर मोईदिन शेख, दस्तगीर मोईदिन शेख, रईस बासू पटेल, सईद मुस्ताक जागीरदार, रोहित मुस्ताम जागीरदार, आदिल नजीर शेख, मोनू कालिया, मुज्जू कडबेवाल, गौस हकानी शेख, अयाज इस्माईल शेख उर्फ वाळूवाला, साहिल चांद पाशा मणियार, सय्यद बलीम अली, सय्यद अलीम इस्माईल, शेख इरफान इम्तियाज, किशोर ईश्वर मोतीराम, दिनेश धीरज कांबळे, सुमित कांबळे, या 37 व्यक्ती शिवाय इतर आठ ते दहा जण असा उल्लेख तक्रारीत करण्यात आलेला आहे. पोलीस सूत्राकडून हाती आलेली माहिती अशी की दिनांक चार एप्रिल रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास मौलाना आझाद शाळेजवळ मुसा नगरी येथे आरोपींनी गैर कायद्याची मंडळी जमवून तसेच जिल्हाधिकारी यांचे जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून तसेच शासकीय जीपवर दगडफेक करून फिर्यादी जखमी करून सोबतचे सहकारी यांना शासकीय काम करत असताना शासकीय कामात अडथळा निर्माण करून पोलीस जीपचे अंदाजे 15000 रुपयांचे नुकसान केले आहे वगैरे प्रमाणे तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील उदगीर शहर पोलीस स्टेशनचे ज्येष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अक्षय पाटील हे करत आहेत. प्रथमदर्शनी किरकोळ कारणांवरून घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दगडफेकीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दगडांचा खच आढळून आला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती सध्या नियंत्रणात असल्याचे सांगण्यात येत आहे. परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून नागरिकांना शांतता राखण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.4
- Post by Dr krishna karade1
- वडवणी प्रतिनिधी - आज दिनांक ५/४/२०२६ रविवार रोजी वडवणी शहरात भाजपा च्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान संपन्न.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष दिनकरराव आंधळे, शिवाजी सानप , मंच्छिद्रनाथ झाटे, संजय आंधळे उपस्थित होते.1
- श्री गरुड पुराणकथा (कथा प्रवक्ते) श्री.ह.भ.प. हनुमंत महाराज शिंदे. संपर्क :9529144913.1
- अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यभर राबविण्यात येत असलेल्या ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत संघटन मजबुती व सोलापूर शहर काँग्रेसमध्ये पदाधिकारी निवड प्रक्रियेला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर AICC निरीक्षक देवासिश पटनाईक, प्रदेश निरीक्षक मोहन जोशी, यशराज पारखी, भाऊसाहेब आसबे तसेच प्रदेश सरचिटणीस दिनेश नवगीरे यांच्या उपस्थितीत शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी सखोल संवाद साधण्यात आला.यावेळी सर्व निरीक्षकांचे स्वागत सोलापूर शहर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांनी केले.या संवाद उपक्रमात कार्यकर्त्यांशी ‘वन-टू-वन’ चर्चा करून त्यांच्या भावना, अनुभव आणि सूचनांची थेट नोंद घेण्यात आली. संघटनेची मजबुती, पारदर्शकता आणि कार्यकर्ता-आधारित निवड प्रक्रिया हे मुख्य मुद्दे चर्चेच्या केंद्रस्थानी होते. यावेळी झालेल्या चर्चेत संघटनात्मक रचना अधिक प्रभावी, सक्रिय आणि सर्वसमावेशक करण्यावर विशेष भर देण्यात आला. कार्यकर्त्यांचा सहभाग, संवाद आणि समन्वय यांवर आधारित सक्षम व सशक्त संघटन उभारणीची गरज अधोरेखित करण्यात आली. विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निरीक्षकांसमोर आपले विचार मांडत संघटन बळकटीसाठी महत्त्वपूर्ण सूचना केल्या. तसेच यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना AICC निरीक्षक देवाशीष पटनायक यांनी सांगितले की, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत सोलापूर शहर काँग्रेसमध्ये पदाधिकारी निवड प्रक्रियेला नवी दिशा मिळत असून, कार्यकर्त्यांच्या सहभागातूनच नेतृत्वाची निवड केली जाणार असल्याचे AICC निरीक्षक देवाशीष पटनायक यांनी स्पष्ट केले. देवाशीष पटनायक म्हणाले की, काँग्रेस पक्ष हा कार्यकर्त्यांच्या बळावर उभा असून पक्षाची दिशा ही जनतेच्या प्रश्नांवर काम करण्याची आहे. यापुढे शहर व जिल्हाध्यक्षांना अधिक अधिकार देण्यात येणार असून, पदाधिकाऱ्यांची निवड ही आता दिल्लीतील वातानुकूलित दालनात न होता थेट कार्यकर्ते, नेते, ज्येष्ठ आणि महिला, तरुणांशी संवाद साधून केली जाणार आहे. एकाच पदासाठी इच्छुक असलेल्या इतरांना संघटनेत अन्य ठिकाणी संधी दिली जाईल. तसेच ब्लॉक आणि फ्रंटल संघटनांच्या निवडीही याच पारदर्शक पद्धतीने केल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.1
- --- (प्रतिनिधी) :- आष्टी तालुक्यातील अंभोरा येथील सुपुत्र व नवी मुंबई पनवेल येथून दैनिक युवक आधारच्या माध्यमातून पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे संपादक संतोष शिवदास आमले यांना World Cultural and Educational Organisation तर्फे ‘Honorary Doctorate Award’ या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. हा सन्मान मिळाल्याने परिसरात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर संस्था भारत सरकार मान्यताप्राप्त असून, संस्थेच्या मूल्यांकन मंडळाने संचालक व अध्यक्ष यांच्या अधिकाराने हा सन्मान जाहीर केला आहे. पत्रकारिता क्षेत्रातील त्यांचे निष्ठावान, धडाडीचे व समाजाभिमुख कार्य लक्षात घेऊन हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे. आमले यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडत सामान्य जनतेच्या अडचणी प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे काम सातत्याने केले आहे. त्यांच्या लेखणीने समाजप्रबोधन घडवून आणत जनजागृतीची महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. ‘दैनिक युवक आधार’च्या माध्यमातून त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली असून, विविध वर्तमानपत्रांमध्ये उपसंपादक म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय काम पाहिले आहे. सध्या ते नवी मुंबई, पनवेल येथे वास्तव्यास असून ‘दैनिक युवक आधार’चे सर्व कामकाज ते समर्थपणे सांभाळत आहेत. त्यांच्या कार्यातून सामाजिक बांधिलकी, प्रामाणिकपणा आणि जनहिताचा ध्यास स्पष्टपणे दिसून येतो. पत्रकारितेला केवळ व्यवसाय न मानता समाजसेवेचे प्रभावी साधन म्हणून त्यांनी जपले आहे. या सन्मानामुळे अंभोरा गावासह आष्टी तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. संतोष आमले यांच्या या यशामुळे ग्रामीण भागातील तरुणांना प्रेरणा मिळत असून, जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक मेहनतीच्या जोरावर कोणतेही उद्दिष्ट साध्य करता येते, याचे हे उत्तम उदाहरण ठरत आहे.1
- लातूर शहरात वाहतुकीचे शिस्तबद्ध नियमन करणे, ध्वनीप्रदूषणावर आळा घालणे तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी लातूर पोलीस दलाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. विशेषतः बुलेट मोटार सायकलींना अनधिकृतरित्या बसविण्यात येणारे मोडिफाईड (फटाका आवाज करणारे) सायलेंसर वापरणाऱ्या वाहनधारकांविरोधात कठोर कारवाई करण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांच्या आदेशान्वये, अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विठ्ठल दराडे यांच्या नेतृत्वात ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत दि. ०४/०४/२०२६ रोजी लातूर शहरात मोठा आवाज करणारे फटाका सायलेंसर बसविलेल्या बुलेट वाहनांवर कडक कारवाई करण्यात आली असून विविध पोलीस ठाण्यांत खालीलप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. १) बुलेट मोटार सायकल क्र. MH-24 CC 0229 चे मालक वैजनाथ चंद्रसेन घोडके (वय २२ वर्षे, रा. एकुर्गा, ता. जि. लातूर) यांनी वाहनामध्ये अनधिकृत बदल करून कर्णकर्कश आवाजाचा मोडिफाईड सायलेंसर बसविला होता. सदर वाहन चालक किशोर सुरेश लाळगे (वय २९ वर्षे, रा. हरंगुळ बु., ता. जि. लातूर) यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन एमआयडीसी, लातूर येथे भारतीय न्याय संहिता २०२३ व मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २) बुलेट वाहन क्र. MH-24 BF 0833 चे चालक व मालक सुनील गुरुनाथ बिराजदार (वय ३८ वर्षे, रा. ताजपूर, ता. निलंगा, जि. लातूर) यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन गांधी चौक, लातूर येथे संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ३) बुलेट वाहन क्र. MH-24 AM 1777 चे चालक आलेश व्यंकट सुरवसे (वय २१ वर्षे, रा. चिकुर्डा, ता. जि. लातूर) यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन शिवाजीनगर, लातूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ४) बुलेट वाहन क्र. MH-24 BD 5703 चे चालक प्रणव प्रताप गरड (वय २१ वर्षे, रा. मासुर्डी, ता. औसा, जि. लातूर) यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन शिवाजीनगर, लातूर येथे कारवाई करण्यात आली आहे. ५) बुलेट वाहन क्र. MH-24 AQ 4042 चे चालक प्रेम भास्कर चव्हाण (रा. प्रकाश नगर, लातूर) यांच्याविरुद्धही संबंधित कायद्यान्वये पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ६)बुलेट मोटार सायकल क्र. MH-14 BG 3121 चे चालक तेजस भास्कर केंद्रे (वय ३३ वर्षे, रा. डोंगरपिंपळा, ता. अंबाजोगाई, जि. बीड) याने सदर वाहनाला अनधिकृतरित्या बदल केलेला (मोडिफाईड) सायलेंसर बसविण्यात आला होता. ध्वनी मापन यंत्राद्वारे तपासणी केली असता १०१.७ डेसिबल इतका आवाज नोंदविण्यात आला, जो निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ व मोटार वाहन कायद्यांतर्गत पोलीस ठाणे गांधी चौक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ७) दिपक दिलीप नवले (वय ३३ वर्षे, रा. चिंचोली (ब), ता. जि. लातूर) याने बुलेट मोटार सायकल क्र. MH-24 BF 6983 ही धोकादायक पद्धतीने चालविताना आढळून आला. सदर वाहनालाही अनधिकृतरित्या मोडिफाईड सायलेंसर बसविण्यात आलेला असून संबंधित कायद्यांनुसार पोलीस ठाणे गांधी चौक येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ८)बालाजी विशवनाथ कांबळे वय 45 वर्ष,राहणार गांधी नगर, उदगीर याने त्याची बुलेट क्र MH 24 BQ 3740 ही इतरांचे जिविताला घोका निर्माण होईल अशा भरधाव वेगात हयगय व निष्काळजीपणाने वाहन चालवुन अनाधिकृतरित्या बदल केलेले मॉडीफाय सायलेन्सर बसून दोन्ही प्रदूषण केले म्हणून पोलीस ठाणे उदगीर शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरील सर्व प्रकरणांमध्ये संबंधित वाहनधारकांनी सार्वजनिक रस्त्यावर भरधाव वेगात, निष्काळजीपणे व धोकादायक पद्धतीने वाहन चालवून इतरांच्या जीवितास धोका निर्माण केल्याचे आढळून आले. तसेच वाहनांमध्ये अनधिकृतरित्या मोडिफाईड सायलेंसर बसवून कर्णकर्कश आवाज निर्माण करण्यात येत होता. ध्वनी मापन यंत्राद्वारे (डेसीबल मीटर) तपासणी केली असता आवाजाची पातळी निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक असल्याचे निदर्शनास आले असल्याने वरनमूद आरोपी विरुद्ध कलम 281 भारतीय न्याय संहिता 2023 कलम 184,198 मोटार वाहन कायदा, केंद्रीय मोटार बाहन अधिनियम 1989 चे कलम 120 प्रमाणे कार्यवाही करण्यात आलेली आहे. या प्रकारामुळे विशेषतः वयोवृद्ध नागरिक, महिला, बालके, तसेच हृदयविकार व इतर आजारांनी ग्रस्त रुग्णांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ही कडक कारवाई करण्यात येत आहे. या मोहिमेत वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक विठ्ठल दराडे, पोलीस ठाणे गांधी चौक चे पोलीस निरीक्षक सुनील रेजीतवाड यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक गित्ते, पोउपनि माधव केंद्रे तसेच वाहतूक शाखेतील अधिकारी व अंमलदार यांनी सक्रिय सहभाग घेतला. लातूर पोलीस दलातर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपल्या दुचाकी वाहनांमध्ये कंपनीने दिलेले मूळ सायलेंसरच वापरावेत. कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बदल करू नयेत किंवा मोडिफाईड सायलेंसर बसवू नयेत. ही मोहीम पुढील काळात अधिक तीव्र करण्यात येणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई कायम सुरू राहणार आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व शांततामय वातावरण राखण्यासाठी लातूर पोलीस दल सदैव कटिबद्ध आहे.1