संघटन सृजन अभियानातून’ कार्यकर्त्यांच्या सहभागावर भर; सशक्त व समावेशक संघटना उभारणीचा निर्धार – मोहन जोशी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यभर राबविण्यात येत असलेल्या ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत संघटन मजबुती व सोलापूर शहर काँग्रेसमध्ये पदाधिकारी निवड प्रक्रियेला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर AICC निरीक्षक देवासिश पटनाईक, प्रदेश निरीक्षक मोहन जोशी, यशराज पारखी, भाऊसाहेब आसबे तसेच प्रदेश सरचिटणीस दिनेश नवगीरे यांच्या उपस्थितीत शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी सखोल संवाद साधण्यात आला.यावेळी सर्व निरीक्षकांचे स्वागत सोलापूर शहर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांनी केले.या संवाद उपक्रमात कार्यकर्त्यांशी ‘वन-टू-वन’ चर्चा करून त्यांच्या भावना, अनुभव आणि सूचनांची थेट नोंद घेण्यात आली. संघटनेची मजबुती, पारदर्शकता आणि कार्यकर्ता-आधारित निवड प्रक्रिया हे मुख्य मुद्दे चर्चेच्या केंद्रस्थानी होते. यावेळी झालेल्या चर्चेत संघटनात्मक रचना अधिक प्रभावी, सक्रिय आणि सर्वसमावेशक करण्यावर विशेष भर देण्यात आला. कार्यकर्त्यांचा सहभाग, संवाद आणि समन्वय यांवर आधारित सक्षम व सशक्त संघटन उभारणीची गरज अधोरेखित करण्यात आली. विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निरीक्षकांसमोर आपले विचार मांडत संघटन बळकटीसाठी महत्त्वपूर्ण सूचना केल्या. तसेच यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना AICC निरीक्षक देवाशीष पटनायक यांनी सांगितले की, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत सोलापूर शहर काँग्रेसमध्ये पदाधिकारी निवड प्रक्रियेला नवी दिशा मिळत असून, कार्यकर्त्यांच्या सहभागातूनच नेतृत्वाची निवड केली जाणार असल्याचे AICC निरीक्षक देवाशीष पटनायक यांनी स्पष्ट केले. देवाशीष पटनायक म्हणाले की, काँग्रेस पक्ष हा कार्यकर्त्यांच्या बळावर उभा असून पक्षाची दिशा ही जनतेच्या प्रश्नांवर काम करण्याची आहे. यापुढे शहर व जिल्हाध्यक्षांना अधिक अधिकार देण्यात येणार असून, पदाधिकाऱ्यांची निवड ही आता दिल्लीतील वातानुकूलित दालनात न होता थेट कार्यकर्ते, नेते, ज्येष्ठ आणि महिला, तरुणांशी संवाद साधून केली जाणार आहे. एकाच पदासाठी इच्छुक असलेल्या इतरांना संघटनेत अन्य ठिकाणी संधी दिली जाईल. तसेच ब्लॉक आणि फ्रंटल संघटनांच्या निवडीही याच पारदर्शक पद्धतीने केल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
संघटन सृजन अभियानातून’ कार्यकर्त्यांच्या सहभागावर भर; सशक्त व समावेशक संघटना उभारणीचा निर्धार – मोहन जोशी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यभर राबविण्यात येत असलेल्या ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत संघटन मजबुती व सोलापूर शहर काँग्रेसमध्ये पदाधिकारी निवड प्रक्रियेला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर AICC निरीक्षक देवासिश पटनाईक, प्रदेश निरीक्षक मोहन जोशी, यशराज पारखी, भाऊसाहेब आसबे तसेच प्रदेश सरचिटणीस दिनेश नवगीरे यांच्या उपस्थितीत शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी सखोल संवाद साधण्यात आला.यावेळी सर्व निरीक्षकांचे स्वागत सोलापूर शहर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांनी केले.या संवाद उपक्रमात कार्यकर्त्यांशी ‘वन-टू-वन’ चर्चा करून त्यांच्या भावना, अनुभव आणि सूचनांची थेट नोंद घेण्यात आली. संघटनेची मजबुती, पारदर्शकता आणि कार्यकर्ता-आधारित निवड प्रक्रिया हे मुख्य मुद्दे चर्चेच्या केंद्रस्थानी होते. यावेळी झालेल्या चर्चेत संघटनात्मक रचना अधिक प्रभावी, सक्रिय आणि सर्वसमावेशक करण्यावर विशेष भर देण्यात आला. कार्यकर्त्यांचा सहभाग, संवाद आणि समन्वय यांवर आधारित सक्षम व सशक्त संघटन उभारणीची गरज अधोरेखित करण्यात आली. विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निरीक्षकांसमोर आपले विचार मांडत संघटन बळकटीसाठी महत्त्वपूर्ण सूचना केल्या. तसेच यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना AICC निरीक्षक देवाशीष पटनायक यांनी सांगितले की, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत सोलापूर शहर काँग्रेसमध्ये पदाधिकारी निवड प्रक्रियेला नवी दिशा मिळत असून, कार्यकर्त्यांच्या सहभागातूनच नेतृत्वाची निवड केली जाणार असल्याचे AICC निरीक्षक देवाशीष पटनायक यांनी स्पष्ट केले. देवाशीष पटनायक म्हणाले की, काँग्रेस पक्ष हा कार्यकर्त्यांच्या बळावर उभा असून पक्षाची दिशा ही जनतेच्या प्रश्नांवर काम करण्याची आहे. यापुढे शहर व जिल्हाध्यक्षांना अधिक अधिकार देण्यात येणार असून, पदाधिकाऱ्यांची निवड ही आता दिल्लीतील वातानुकूलित दालनात न होता थेट कार्यकर्ते, नेते, ज्येष्ठ आणि महिला, तरुणांशी संवाद साधून केली जाणार आहे. एकाच पदासाठी इच्छुक असलेल्या इतरांना संघटनेत अन्य ठिकाणी संधी दिली जाईल. तसेच ब्लॉक आणि फ्रंटल संघटनांच्या निवडीही याच पारदर्शक पद्धतीने केल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
- अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यभर राबविण्यात येत असलेल्या ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत संघटन मजबुती व सोलापूर शहर काँग्रेसमध्ये पदाधिकारी निवड प्रक्रियेला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर AICC निरीक्षक देवासिश पटनाईक, प्रदेश निरीक्षक मोहन जोशी, यशराज पारखी, भाऊसाहेब आसबे तसेच प्रदेश सरचिटणीस दिनेश नवगीरे यांच्या उपस्थितीत शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी सखोल संवाद साधण्यात आला.यावेळी सर्व निरीक्षकांचे स्वागत सोलापूर शहर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांनी केले.या संवाद उपक्रमात कार्यकर्त्यांशी ‘वन-टू-वन’ चर्चा करून त्यांच्या भावना, अनुभव आणि सूचनांची थेट नोंद घेण्यात आली. संघटनेची मजबुती, पारदर्शकता आणि कार्यकर्ता-आधारित निवड प्रक्रिया हे मुख्य मुद्दे चर्चेच्या केंद्रस्थानी होते. यावेळी झालेल्या चर्चेत संघटनात्मक रचना अधिक प्रभावी, सक्रिय आणि सर्वसमावेशक करण्यावर विशेष भर देण्यात आला. कार्यकर्त्यांचा सहभाग, संवाद आणि समन्वय यांवर आधारित सक्षम व सशक्त संघटन उभारणीची गरज अधोरेखित करण्यात आली. विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निरीक्षकांसमोर आपले विचार मांडत संघटन बळकटीसाठी महत्त्वपूर्ण सूचना केल्या. तसेच यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना AICC निरीक्षक देवाशीष पटनायक यांनी सांगितले की, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत सोलापूर शहर काँग्रेसमध्ये पदाधिकारी निवड प्रक्रियेला नवी दिशा मिळत असून, कार्यकर्त्यांच्या सहभागातूनच नेतृत्वाची निवड केली जाणार असल्याचे AICC निरीक्षक देवाशीष पटनायक यांनी स्पष्ट केले. देवाशीष पटनायक म्हणाले की, काँग्रेस पक्ष हा कार्यकर्त्यांच्या बळावर उभा असून पक्षाची दिशा ही जनतेच्या प्रश्नांवर काम करण्याची आहे. यापुढे शहर व जिल्हाध्यक्षांना अधिक अधिकार देण्यात येणार असून, पदाधिकाऱ्यांची निवड ही आता दिल्लीतील वातानुकूलित दालनात न होता थेट कार्यकर्ते, नेते, ज्येष्ठ आणि महिला, तरुणांशी संवाद साधून केली जाणार आहे. एकाच पदासाठी इच्छुक असलेल्या इतरांना संघटनेत अन्य ठिकाणी संधी दिली जाईल. तसेच ब्लॉक आणि फ्रंटल संघटनांच्या निवडीही याच पारदर्शक पद्धतीने केल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.1
- मोहोळ तालुक्यातील वटवटे येथील जकराया साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे ऊस बिल अद्याप दिले नाही कारखान्याला ऊस नेल्यापासून 14 दिवसाच्या आज शेतकऱ्यांना ऊस बिल देणे बंधनकारक असतानाही दिले नाही. बँकांचे हप्ते गेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्याला मार्च एंड चा आर्थिक फटका सहन करावा लागला. साखर कारखान्याने त्वरित ऊस बिल न दिल्यास साखर कारखान्यासमूर्तीवर आंदोलन करण्याचा इशारा डिजिटल शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल पाटील यांनी दिला आहे.1
- Post by Solapur News1
- लातूर जिल्हा पोलीस दलामार्फत राबविण्यात येत असलेल्या चालक पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत एक महत्त्वाचा टप्पा म्हणून दिनांक ०५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११.०० वा. पोलीस प्रशिक्षण केंद्र, बाभळगाव, लातूर येथे लेखी परीक्षा अत्यंत सुरळीत, शिस्तबद्ध व पारदर्शक वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली. सदर परीक्षेसाठी गुणवत्ता यादीतील एकूण (२६२) उमेदवार पात्र ठरले होते. त्यापैकी (२४१) उमेदवारांनी उपस्थित राहून परीक्षा दिली, तर (२१) उमेदवार गैरहजर राहिले. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशानुसार अत्यंत काटेकोर नियोजन व सक्षम अंमलबजावणीमुळे संपूर्ण परीक्षा प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडली. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशान्वये व अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर पोलिसांकडून लेखी परीक्षेला येणाऱ्या उमेदवारांच्या सोयीसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या त्यामध्ये बाहेरगावाहून आलेल्या उमेदवारांसाठी पोलीस मुख्यालयात निवासाची व्यवस्था करण्यात आली होती, उन्हाच्या तीव्रतेपासून संरक्षणासाठी आवश्यक ती व्यवस्था करण्यात आली.उमेदवार उपाशीपोटी परीक्षा देऊ नयेत यासाठी उमेदवारांच्या नाष्ट्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यांना नाश्त्यामध्ये बिस्किटे, केळी,उपमा देण्यात आला.उमेदवारांना योग्य मार्गदर्शन व तत्काळ सहाय्य मिळावे यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. या सर्व सुविधांमुळे उमेदवारांना मानसिक व शारीरिकदृष्ट्या सक्षम राहून परीक्षा देणे शक्य झाले. पोलीस अधीक्षक अमोल तांबे तसेच अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण हे स्वतः परीक्षा केंद्रामध्ये हजर होते. त्यांनी परीक्षा कक्षांची पाहणी करून संपूर्ण व्यवस्थेचा बारकाईने आढावा घेतला व संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देऊन परीक्षा प्रक्रिया अधिक सक्षम व सुरळीत पार पाडण्यास मार्गदर्शन केले. सदरची चालक पोलीस शिपाई पदासाठीची लेखी परीक्षा पूर्णतः पारदर्शक, निष्पक्ष व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी विशेष दक्षता घेण्यात आली होती. परीक्षा केंद्र परिसरात सर्वत्र अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणेद्वारे सतत निगराणी ठेवण्यात आली होती. तसेच प्रत्येक परीक्षा हॉलमध्येही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. याशिवाय, प्रत्येक परीक्षा कक्षामध्ये स्वतंत्रपणे पूर्णवेळ व्हिडिओ कॅमेऱ्याद्वारे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आले. या सर्व उपाययोजनांमुळे परीक्षा प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवणे शक्य झाले असून सर्व प्रकारच्या गैरप्रकारांना पूर्णतः आळा बसला. परीक्षेची निष्पक्षता अबाधित राहावी यासाठी उमेदवारांसोबतच परीक्षा केंद्रावरील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनाही मोबाईल फोन किंवा कोणतीही इलेक्ट्रॉनिक साधने वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली होती. सदर लेखी परीक्षेची तात्पुरती उत्तरतालिका (Provisional Answer Key) ही लातूर पोलिसांच्या अधिकृत संकेतस्थळ वर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या दर्शनी भागावरही ती लावण्यात आली आहे. उमेदवारांना कोणतेही आक्षेप असल्यास ते २४ तासांच्या आत खालील माध्यमांतून नोंदविण्याचे आवाहन करण्यात येत आहे दूरध्वनी : ०२३८२-२४२२९६ निर्धारित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या आक्षेपांचा विचार केला जाणार नाही, संपूर्ण परीक्षा प्रक्रिया अत्यंत पारदर्शक, निष्पक्ष व नियोजनबद्ध पद्धतीने पार पडल्यामुळे उमेदवारांनी समाधान व्यक्त केले. पोलीस प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या सुविधा, शिस्तबद्ध नियोजन व उत्कृष्ट व्यवस्थापन याबाबत उमेदवारांकडून कौतुक करण्यात आले.2
- Post by Vijay Meher1
- Post by Dr krishna karade1
- उदगीर शहरातील गांधी नगर व मुसा नगर परिसरात ४ एप्रिलच्या रात्री अचानक तुफान दगडफेक, दोन गटात राडा !! जवळपास 50 लोकांवर गुन्हा दाखल!! पोलिसाच्या जीपचेही मोठे नुकसान!! उदगीर (एल पी उगीले) उदगीर शहरातील गांधीनगर व मुसा नगर परिसरातील दोन गटांमध्ये अचानक वाद उसळल्याने तुफान दगडफेक झाली. याप्रकरणी उसळलेल्या दंगलीला ताब्यात घेण्याच्या दृष्टीने पोलिसांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली खरी मात्र चिडलेल्या जमावाने चक्क पोलीस गाडीवर प्रचंड दगडफेक करून पोलिसाच्या जीपचे मोठे नुकसान केले. याप्रकरणी पोलिस अंमलदार सतीश भानुदास पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उदगीर शहर पोलीस स्टेशन येथे गु.र.न. 99 /26 कलम 132, 121 (1), 125 (A), 189 (2), 191 (2)(3), 190, 324 (3) भारतीय न्याय संहितेच्या अनुषंगाने तसेच सार्वजनिक संपत्तीचे नुकसान प्रतिबंधक अधिनियम 1984 व सह कलम 135 महाराष्ट्र पोलीस कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपी आजम असलम जहागीरदार, आसिफ शेख लातूरकर, शार्दुल रशीद शेख, आशा उर्फ असलम शेख, रोशन ताजुद्दीन शेख (बिलाल), मोहित जागीरदार, जाकीर जागीरदार, बाबर शेख, आरिफ शेख, एजाज फारुख शेख, मोहेल लाला शेख, साहिल लाला शेख, मोईन हैदरसाब शेख, जुबेर मुसा शेख, इब्राहिम मुसा शेख, फिरोज ताहेर शेख, मोहसीन मकदुल मौलासाब शेख, मोहेल शेख, बबलू उर्फ मोहम्मद रफी, सोहेल लाईक लदाफ, वजीर मोईदिन शेख, दस्तगीर मोईदिन शेख, रईस बासू पटेल, सईद मुस्ताक जागीरदार, रोहित मुस्ताम जागीरदार, आदिल नजीर शेख, मोनू कालिया, मुज्जू कडबेवाल, गौस हकानी शेख, अयाज इस्माईल शेख उर्फ वाळूवाला, साहिल चांद पाशा मणियार, सय्यद बलीम अली, सय्यद अलीम इस्माईल, शेख इरफान इम्तियाज, किशोर ईश्वर मोतीराम, दिनेश धीरज कांबळे, सुमित कांबळे, या 37 व्यक्ती शिवाय इतर आठ ते दहा जण असा उल्लेख तक्रारीत करण्यात आलेला आहे. पोलीस सूत्राकडून हाती आलेली माहिती अशी की दिनांक चार एप्रिल रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास मौलाना आझाद शाळेजवळ मुसा नगरी येथे आरोपींनी गैर कायद्याची मंडळी जमवून तसेच जिल्हाधिकारी यांचे जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून तसेच शासकीय जीपवर दगडफेक करून फिर्यादी जखमी करून सोबतचे सहकारी यांना शासकीय काम करत असताना शासकीय कामात अडथळा निर्माण करून पोलीस जीपचे अंदाजे 15000 रुपयांचे नुकसान केले आहे वगैरे प्रमाणे तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील उदगीर शहर पोलीस स्टेशनचे ज्येष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अक्षय पाटील हे करत आहेत. प्रथमदर्शनी किरकोळ कारणांवरून घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दगडफेकीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दगडांचा खच आढळून आला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती सध्या नियंत्रणात असल्याचे सांगण्यात येत आहे. परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून नागरिकांना शांतता राखण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.4
- श्री.स्वामी समर्थाच्या १४८ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमीत्त येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान आयोजीत धर्मसंकीर्तन महोत्सवात गोवा येथील कीर्तनकार सुहास वझे यांच्या गोमंतक संत मंडळ संचलीत कीर्तन विद्यालयातील बाल युवा कीर्तनकारांची उत्कृष्ट कीर्तने स्वामी दरबारात संपन्न झाली. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान मधील धर्मसंकीर्तन महोत्सवात बालकीर्तनकारांची कीर्तन मैफील रंगल्याने गोव्यातील बाल युवा कीर्तनकारांच्या चक्री कीर्तनाने धर्मसंकीर्तन महोत्सवाचे दुसरे पुष्प बहरले. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या १४८ व्या पुण्यतिथी उत्सव धर्मसंकीर्तन महोत्सवात आज दुसरे पुष्प बालयुवा कीर्तनकार ह.भ.प.कु.सना साटेलकर ह.भ.प. कु.श्रुती घोडके, ह.भ.प.कु. सावली गावकर, ह.भ.प.कु.श्रीया साळगावकर यांची एकाचवेळी कीर्तनं संपन्न झाली. या चक्री कीर्तन सेवेतून त्यांनी पुर्व रंगात आपल्या कीर्तनातुन नश्वर मनुष्य देहाच्या उन्नतीसाठी देवभक्ती, देशभक्ती, व गुरु भक्ती अंगी रुजविण्यासाठी आपल्या जीवनातील कांही वेळ द्यावा असे आवाहन केले. अनेक राष्ट्रपुरूष व समाज सुधारकांनी त्यांच्या जीवनातील जवळपास सर्वच वेळ समाजासाठी अर्पण केला, म्हणुन आज आपण सुखाचे क्षण अनुभवत आहोत, पण त्यात विकारी वृत्तीने धुमाकूळ घातला आहे. सोशल मिडीयाचा वापर चुकीच्या मार्गाने जास्त प्रमाणात होत असून याचा परिणाम समाजाच्या नुकसानीत आहे. समाज संघटीत झाला तर असे बिकट प्रसंग निर्माण होणार नाहीत. माणसात नराचा नारायण होण्याची क्षमता आहे त्यासाठी योग्य साधन आपणास पाहिजे हे साधन फक्त संत चरित्राचा आभ्यास व आचरणातुन मिळेल असे विवेचन केले. कीर्तन सेवेच्या उत्तर रंगात संत चरित्र समजून घेवून त्याचं आचरण झालं तर समाज प्रगतशील होईल असेही विचार त्यांनी अनेक समाज पुरुष व संतांची दाखले देवुन व्यक्त करीत वेगवेगळ्या देव, देश, धर्म, संस्कृती तसेच हिंदू संस्कार, संताचे विचार, संत चरित्र, देश भक्तीचे विचार या चक्री कीर्तनात सांगितले. या कीर्तन सेवेत कीर्तनकार ह.भ.प.कु.सना साटेलकर ह.भ.प. कु.श्रुती घोडके, ह.भ.प.कु. सावली गावकर, ह.भ.प.कु.श्रीया साळगावकर यांना तबल्यावर उमेश नाईक, हार्मोनियमवर सुहास वझे, चिपळी साथ संदीप गावकर, दामोदर कामत यांनी साथ संगत केली. कार्यक्रमाच्या प्रारंभी ओंकार पाठक यांनी स्वागत व प्रास्ताविक केले तर मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी कीर्तनकार व सर्व मान्यवर कलाकारांचा श्री.स्वामी समर्थांचा प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सत्कार केला. या प्रसंगी मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, प्रा.शिवशरण अचलेर, श्रीमुख जगदाळे, बाळासाहेब कुलकर्णी, अक्षय सरदेशमुख, अमर पाटील, रमेश शिंदे, श्रीशैल गवंडी, एम.बी.पाटील सर, प्रसाद पाटील सर, दर्शन घाटगे, धनराज स्वामी, सागर गोंडाळ, स्वामी लोणारी, काशिनाथ इंडे, रवि महिंद्रकर, गिरीश पवार, संतोष पराणे, संजय पवार, मोहन जाधव, तुषार मोरे, बाळासाहेब एकबोटे आदींसह अनेक पुरुष व महिला स्वामी भक्त उपस्थित होते.1