Shuru
Apke Nagar Ki App…
क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी 15 जूनपासून बुलढाणा येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफी मिळावी या प्रमुख मागणीसाठी तुपकर हे अनिश्चित काळासाठी अन्नत्याग करणार आहेत.
Raghunath Aghao
क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी 15 जूनपासून बुलढाणा येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफी मिळावी या प्रमुख मागणीसाठी तुपकर हे अनिश्चित काळासाठी अन्नत्याग करणार आहेत.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी 15 जूनपासून बुलढाणा येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफी मिळावी या प्रमुख मागणीसाठी तुपकर हे अनिश्चित काळासाठी अन्नत्याग करणार आहेत.1
- मंठा तालुक्यातील वझर सरकटे येथील रमाई आवास योजना २०२३-२४ मधील लाभार्थ्यांना घरकुल मंजूर होऊनही निधी मिळवण्यासाठी पंचायत समितीचे उंबरठे झिजवावे लागत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. घरकुलासाठी आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही तब्बल सहा महिने उलटून गेले आहेत, तरी निधी मिळाला नसल्याने लाभार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि. १५ जून रोजी संतप्त लाभार्थ्यांनी मंठा पंचायत समिती येथे धाव घेत गटविकास अधिकारी यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला. यावेळी काही लाभार्थ्यांनी घरकुलाच्या हप्त्यासाठी पैशांची मागणी होत असल्याचा आरोप केला, तसेच पैसे देऊनही त्यांना वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याची खंत व्यक्त केली. 'घरकुल मिळवण्यासाठी शासनाकडे हात जोडायचे की संबंधितांच्या मागण्या पूर्ण करायच्या?' असा संतप्त सवाल उपस्थित करत लाभार्थ्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. शासनाच्या गोरगरीबांसाठी असलेल्या योजनेतही लाभार्थ्यांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लाभार्थ्यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की, पंधरा दिवसांच्या आत घरकुलाचा निधी खात्यात जमा झाला नाही, तर मंठा पंचायत समितीसमोर आमरण उपोषण करण्यात येईल. या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. गोरगरीबांना हक्काचे घर मिळावे यासाठी शासन कोट्यवधी रुपयांच्या योजना राबवत असताना, कागदपत्रांची पूर्तता करूनही लाभार्थ्यांना निधीसाठी चकरा माराव्या लागत असतील, तर ही बाब प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरत आहे. आता या लाभार्थ्यांच्या आरोपांची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई होणार का, की हे प्रकरण केवळ कागदोपत्रीच राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.1
- आम्ही स्वतः व्यायाम करतो आणि लोकांनाही व्यायाम करण्यास मदत करतो.1
- श्रीराम प्रतिष्ठान, सेलू यांच्या वतीने सॅनरो नॉलेज सिटी, रवळगाव रोड, सेलू येथे बहुकोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी "PRINCE Infotainment Park" हा प्रकल्प साकारला जात आहे. "Ultimate Destination for Learning & Fun" या संकल्पनेवर आधारित हा प्रकल्प मराठवाड्यातील विद्यार्थी, पालक आणि पर्यटकांसाठी शिक्षण व मनोरंजनाचे नवे पर्व ठरणार असून, सन २०२६ च्या उत्तरार्धात तो नागरिकांच्या सेवेत दाखल होईल. श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांच्या संकल्पनेतून साकारत असलेले हे इन्फोटेंटमेंट पार्क विज्ञान, क्रीडा, निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा संगम घडविणारे मराठवाड्यातील पहिले विज्ञान-पर्यटन केंद्र ठरणार आहे. या पार्कमध्ये Curiosity SIAC (Science Innovation & Activity Centre), ऑलिम्पिक दर्जाचा जलतरण तलाव, किड्स स्विमिंग पूल, बहुउद्देशीय क्रीडा संकुल, अटल टिंकरिंग लॅब, IgniteX स्किल लॅब, खुल्या वातावरणातील विज्ञान उद्यान, बोटॅनिकल गार्डन आणि बहुउद्देशीय सभागृह अशा विविध आकर्षणांचा समावेश असणार आहे. Curiosity SIAC हे महाराष्ट्रातील सातवे विज्ञान केंद्र ठरणार असून, त्यास राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग (RGSTC), नेहरू सायन्स सेंटर, मुंबई तसेच होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र यांचे सहकार्य लाभले आहे. या केंद्रात व्हर्च्युअल अॅनाटॉमी लॅब, स्पेस व्हॉयेज सिम्युलेटर, व्हीआर केमिस्ट्री लॅब, ऑगमेंटेड रिअॅलिटी लॅब, होलोग्राम थिएटर, रोबोटिक्स व कोडिंग लॅब यांसारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. या प्रकल्पात परभणी जिल्ह्यातील पहिला ऑलिम्पिक दर्जाचा जलतरण तलाव आणि अत्याधुनिक क्रीडा सुविधा हे आणखी एक वैशिष्ट्य ठरेल. या प्रकल्पाचा उद्देश विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, क्रीडा आणि नवोपक्रम यांचा प्रत्यक्ष अनुभव देणे हा आहे. याबाबत बोलताना श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांनी नमूद केले की, "भौगोलिक मर्यादा गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या आड येऊ नयेत, ही आमची भूमिका आहे. PRINCE Infotainment Park च्या माध्यमातून सेलू हे महाराष्ट्रातील विज्ञान-पर्यटनाचे नवे केंद्र म्हणून उदयास येईल. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना आता विज्ञान केंद्रांचा अनुभव घेण्यासाठी पुणे किंवा मुंबईला जाण्याची गरज भासणार नाही." सुमारे १०,००० हून अधिक वार्षिक पर्यटकांना आकर्षित करण्याची क्षमता असलेल्या या प्रकल्पाचा लाभ परभणीसह नांदेड, लातूर आणि आसपासच्या पाच जिल्ह्यांतील ५०० हून अधिक शाळांमधील विद्यार्थ्यांना होणार आहे. PRINCE Infotainment Park हा केवळ एक प्रकल्प नसून, ग्रामीण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी विज्ञान, नवोपक्रम आणि मनोरंजनाच्या नव्या संधी निर्माण करणारा एक ऐतिहासिक उपक्रम ठरणार आहे.2
- जालना जिल्ह्यात महिलांच्या सुरक्षिततेसाठी आता दामिनी पथक पूर्णपणे सक्रिय झाले आहे. या पथकाच्या सक्रियतेमुळे टवाळ-खोरांवर कठोर कारवाई केली जाईल आणि त्यांना धडा शिकवला जाईल. महिलांच्या सुरक्षेसाठी एक विशेष हेल्पलाइन नंबर देखील सक्रिय करण्यात आला आहे, ज्यामुळे त्यांना तात्काळ मदत मिळू शकेल.1
- राज्य सरकारने जाहीर केलेल्या 'फसव्या' कर्जमाफी योजनेविरोधात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आज, १५ जूनच्या सकाळपासून बुलढाणा शहरातील चिखली रोडवरील आपल्या निवासस्थानासमोर अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे. या योजनेत असलेल्या जाचक अटी आणि शर्तींमुळे लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार असल्याचा आरोप करत तुपकर यांनी हे पाऊल उचलले आहे. आंदोलनाला सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी आई-वडिलांचे दर्शन घेतले, तर पत्नी शर्वरी तुपकर यांनी त्यांचे औक्षण केले. माध्यमांशी संवाद साधताना रविकांत तुपकर यांनी राज्य सरकारची ही योजना कर्जमाफी नसून 'वन टाइम सेटलमेंट' असल्याचा दावा केला. त्यांनी सरकारवर 'वसुलीचा धंदा' करत असल्याचा आरोप करत स्पष्ट केले की, जर एखाद्या शेतकऱ्यावर पाच लाखांचे कर्ज असेल, तर त्याला आधी तीन लाख भरावे लागतील आणि नंतर सरकार दोन लाख भरेल. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी तीन लाख कुठून आणायचे, असा प्रश्न विचारत त्यांना पुन्हा सावकाराच्या दारात जावे लागेल, असे तुपकर म्हणाले. त्यांनी सरकारला जनाची नाही तर मनाचीही लाज नसल्याचे म्हटले आणि ही योजना केवळ 'नौटंकीपणा' असल्याचे आरोप केले. तुपकर यांनी सरकारच्या धोरणांवरही टीका केली. त्यांच्या मते, सरकारच्या बिनडोक आयात-निर्यात धोरणांमुळे, शेतमालाचे पडलेले भाव आणि खते, औषधे, बियाण्यांच्या वाढलेल्या किमतींमुळे शेतकरी आधीच अडचणीत आहेत. उद्योगपतींना फायदा मिळवून देण्यासाठी सरकारला शेतकऱ्यांचे बळी हवे आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला. जर सरकारला शेतकऱ्यांच्या रक्ताची एवढी भूक असेल, तर मी स्वतः बलिदान द्यायला तयार आहे, असे ठामपणे सांगत, आता काहीही झाले तरी मागे हटणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा हा वणवा राज्यभर पसरेल आणि हे आंदोलन सरकारला महागात पडेल, असा इशाराही त्यांनी दिला. या आंदोलनाला बुलढाणा जिल्ह्यासह राज्यभरातील शेतकरी टप्प्याटप्प्याने पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यात पोहोचणार आहेत. तुपकर यांनी महाराष्ट्रातील गावागावातील शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरून फसव्या कर्जमाफीच्या जीआरची होळी करण्याचे आवाहन केले. हे आंदोलन कोणत्याही पक्षाचे किंवा संघटनेचे नसून, शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी सुरू केलेले आंदोलन असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.1
- शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आक्रमक भूमिका घेत, रविकांत तुपकर यांनी बुलडाणा येथे बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.1
- अप्पर तहसील यादीत सेवलीला डावलल्याच्या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीने धरणे व निदर्शने आंदोलनाचे आयोजन केले आहे.1