Shuru
Apke Nagar Ki App…
मानवत तालुक्यात परत एक्सीडेंट एक जागीच ठार तर दोन जखमी
Ramesh Mulgir
मानवत तालुक्यात परत एक्सीडेंट एक जागीच ठार तर दोन जखमी
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by Ramesh Mulgir1
- सेलूतील खून प्रकरणी आरोपीच्या अटकेच्या मागणीसाठी नातेवाईकांचा ठिय्या1
- Post by Mohsin ahmed khan1
- हिंगोली (प्रतिनिधी) : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात हिंगोली जिल्ह्यातील बाराशिव येथे आज नागरिकांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष किशोर ढगे व स्थानिक शेतकरी, ग्रामस्थ आणि विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.बैठकीत महामार्गामुळे शेती जमीन संपादन, पर्यावरणीय परिणाम तसेच स्थानिकांच्या उपजीविकेवर होणाऱ्या परिणामांबाबत तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. उपस्थितांनी शासनाने हा प्रकल्प राबविताना स्थानिकांचा विचार न केल्याचा आरोप करत संताप व्यक्त केला.यावेळी अनेकांनी आपले मत मांडत महामार्गाच्या प्रस्तावाला विरोध दर्शविला आणि हा प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी केली. तसेच पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.1
- मंठा (जि. जालना) प्रतिनिधी — मंठा तालुक्यातील पूर्णा नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष सुभाष सखाराम जाधव यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असून संबंधित वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसवलेली नाही. तसेच अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेही नसल्याने या अवैध प्रकाराला चालना मिळत आहे. एकाच रॉयल्टी पावतीचा दिवसातून अनेक वेळा वापर होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. याशिवाय, वाळू वाहतूक करणारी वाहने क्षमतेपेक्षा जास्त वाळू भरून वेगाने धावत असल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. अनेक वाहनांना नंबर प्लेट नसून झाकण (कव्हर) नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. शासनाच्या नियमांनुसार ३ फूटपर्यंत उत्खननाची परवानगी असताना प्रत्यक्षात १० ते १५ फूट खोल उत्खनन होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तक्रार करूनही तहसील कार्यालयाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात आला असून उलट तक्रारदारांवर दबाव टाकला जात असल्याचेही सांगण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित प्रकरणाची तात्काळ चौकशी करून अवैध वाळू उत्खनन व वाहतूक बंद करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच वाळू वाहतुकीसाठी जीपीएस व सीसीटीव्ही व्यवस्था अनिवार्य करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच तक्रारदारांचे संरक्षण करण्याचीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. दरम्यान, योग्य ती कारवाई न झाल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.1
- रील्सचा नाद जीवावर बेतला! समृद्धी महामार्गावर लक्झरी बस पलटी-दीड वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू, २५ जण जखमी समृद्धी महामार्ग वर आज १९ एप्रिल रविवारी पहाटे एक भीषण अपघात घडला असून, या दुर्घटनेत दीड वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच सुमारे २० ते २५ प्रवासी जखमी झाले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.1
- Post by अशोक दगडू वाघमारे1
- Post by Ramesh Mulgir1