Shuru
Apke Nagar Ki App…
kam karvana hoga to
Krishna Minj
kam karvana hoga to
More news from महाराष्ट्र and nearby areas
- mujrim Jain mein fir bhi pyar ka junoon1
- नाशिकमधील द्वारका परिसरात रस्त्याचे काम सुरू असताना एक आश्चर्यकारक गोष्ट समोर आली. कामादरम्यान जमिनीखाली सुमारे १२५ वर्षे जुनी विहीर सापडली. ही घटना केवळ एक ऐतिहासिक अवशेष सापडण्यापुरती मर्यादित नाही, तर ती आपल्याला विकास आणि निसर्ग यांच्यातील झालेला असमतोलाचा गंभीरपणे विचार करायला भाग पाडते. पूर्वीच्या काळात गावांची रचना करताना पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांना अत्यंत महत्त्व दिले जात असे. विहिरी, ओढे, तलाव आणि पाणवठे हे गावाच्या जीवनाचे केंद्र होते. लोक त्या जलस्रोतांचे जतन करत आणि त्याभोवतीच वस्ती विकसित होत असे. त्यामुळे पाणीटंचाईचा प्रश्न तुलनेने कमी जाणवत असे. परंतु गेल्या काही दशकांमध्ये शहरीकरण आणि विकासाच्या नावाखाली अनेक जुने जलमार्ग, विहिरी आणि तलाव बुजवले गेले. त्यावर रस्ते, बिल्डिंग आणि इतर बांधकामे उभी राहिली. परिणामी, नैसर्गिक जलसंचयाची व्यवस्था बिघडली आणि अनेक शहरांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली. द्वारका येथे सापडलेली ही विहीर आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देते — निसर्गाने दिलेले जलस्रोत नष्ट करून विकास करणे ही दीर्घकालीन उपाययोजना नाही. शाश्वत विकासासाठी जुन्या जलस्रोतांचे संवर्धन करणे आणि त्यांना पुन्हा जिवंत करणे अत्यावश्यक आहे. आज गरज आहे ती विकास आणि पर्यावरण यामध्ये समतोल राखण्याची. रस्ते, बिल्डिंग आणि आधुनिक सुविधा महत्त्वाच्या आहेतच, पण त्याचबरोबर नैसर्गिक जलस्रोत जपणे आणि पुनरुज्जीवन करणे हीही तितकीच मोठी जबाबदारी आहे. द्वारका येथील १२५ वर्षे जुनी विहीर केवळ भूतकाळाची आठवण नाही, तर भविष्यासाठी एक महत्त्वाचा इशारा आहे - जर आपण आजही निसर्गाचा विचार केला नाही, तर उद्या पाण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागू शकते. 💧🌱1
- प्रधानमंत्री पोषण शक्ती आहार योजनेअंतर्गत निविदा प्रक्रिया विद्यार्थ्यांच्या संख्येच्या आधारे ठरवली जाते, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली. निविदा निश्चित करताना अन्नपदार्थांचे बाजारभाव व बाजार समितीतील दरांचा विचार केला जातो. तसेच अन्नपदार्थांचे नमुने स्थानिक प्रयोगशाळेत तपासून गुणवत्ता निश्चित केल्यानंतरच अंतिम मंजुरी दिली जाते. या प्रक्रियेमुळे पारदर्शकता व गुणवत्तेला प्राधान्य दिले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.1
- देवळाली प्रवरात “कागदपत्रांसाठी सैनिक पत्नी त्रस्त; नगराध्यक्षांविरोधात धरणे आंदोलनाचा इशारा”. "नगराध्यक्षांनी" मानसिक छळ केल्याचा महिलेचा आरोप..!1
- नेवासा तालुक्यात शेतकरी हिताचा महत्त्वपूर्ण निर्णय नेवासा तालुक्यातील माळीचिंचोरे ते कारेगाव शिव रस्ता (अंदाजे १.२ कि.मी.) प्रशासकीय पुढाकारातून यशस्वीरित्या खुला करण्यात आला आहे. या रस्त्यामुळे परिसरातील सुमारे ७० गटांतील शेतकऱ्यांना थेट दिलासा मिळणार असून शेती वाहतूक व दैनंदिन हालचाली अधिक सुलभ होणार आहेत. तहसीलदार श्री. संजय बिरादार यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे स्थानिक पातळीवरील प्रलंबित प्रश्न मार्गी लागला असून ‘शासन जनतेच्या दारी’ या संकल्पनेला बळ मिळाले आहे. #नेवासा #अहिल्यानगर #शासनजनतेच्यादारी #शेतकरीहित #ग्रामीणविकास #रस्ताविकास #महसूलप्रशासन #सुशासन #लोकहितउपक्रम #महाराष्ट्रसरकार1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- नागरिकांच्या सुरक्षेच्या दुर्ष्टीने येवला-मनमाड -मालेगाव रस्त्यावरील अवजड वाहनांची वाहतूक २४ मार्च २०२६ पासून केवळ रात्री १० ते सकाळी ७ या वेळेतच सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिवसाच्या वेळी या मार्गावरून होणारी सर्व प्रकारच्या अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. या निर्णयामुळे येवला आणि मनमाड या शहरांतील मुख्य रस्त्यांवरील वाहतूक कोंडी सुटण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास आहे.1
- kam karvana hoga to1