Shuru
Apke Nagar Ki App…
AQS NEWS channel ko saport karo aur channel ki subscribe karho
Anis qureshi sillod
AQS NEWS channel ko saport karo aur channel ki subscribe karho
More news from महाराष्ट्र and nearby areas
- मुंबई.राज्यात धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने ६० ट्रॅफिक गार्डन्स उभारले जाणार मुंबई.राज्यात धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने ६० ट्रॅफिक गार्डन्स उभारले जाणार आहेत. या अभिनव उपक्रमामुळे बालपणापासूनच वाहतूक शिस्तीचे संस्कार मुलांमध्ये रुजण्यास मदत होईल.1
- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात विहिरीची मोटर दुरुस्त करताना वडील आणि त्यांच्या दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. धानोरा येथे घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे.1
- रिकाम्या रूम असूनही रुग्णांना प्रतीक्षा; घाटीत संतापाची लाट रिकाम्या रूम असूनही रुग्णांना प्रतीक्षा; घाटीत संतापाची लाट छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालयातील अनेक रूम रिकाम्या असूनही गंभीर रुग्णांना बेड उपलब्ध करून दिले जात नसल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. वार्ड क्रमांक 2, 8, 19 आणि 37 मध्ये रिकाम्या रूम दिसत असतानाही “बेड नाही” असे सांगितले जात असल्याने नातेवाईकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. डॉक्टर व कर्मचाऱ्यांकडून उद्धट वागणूक मिळत असल्याचा आरोप करत, गोरगरीब रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असल्याची तक्रार नातेवाईकांनी केली. काही डॉक्टर वेळेवर तपासणीसाठी येत नसल्याने रुग्णांचे हाल होत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.1
- वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला येथे भीषण आग पहाटे 4 वाजेच्या सुमारास 8 ते 10 दुकाने जळून खाक छत्रपती संभाजीनगर मार्गावरील घटना किराणा दुकान, हॉटेल, टायर दुकानांसह अनेक व्यावसायिक गाळ्यांचे मोठे नुकसान शिऊर पोलिसांची घटनास्थळी धाव वैजापूर नगर परिषद आणि छत्रपती संभाजीनगर अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली आगीत अंदाजे 40 ते 50 लाख रुपयांचे नुकसान छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग... आगीचे कारण अद्याप अस्पष्ट, पुढील तपास सुरू ANC : वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला येथे सोमवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. छत्रपती संभाजीनगर मार्गावरील 8 ते 10 दुकाने या आगीत पूर्णपणे जळून खाक झाली. आगीत किराणा दुकान, हॉटेल, टायर दुकानांसह अनेक व्यावसायिक गाळ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच शिऊर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच वैजापूर नगर परिषदेचे अग्निशामक दल आणि छत्रपती संभाजीनगर अग्निशामक विभागाला पाचारण करण्यात आले. दोन्ही विभागाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. या घटनेत अंदाजे 40 ते 50 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून पोलिस पुढील तपास करत आहेत.4
- औरंगाबादच्या फुलंब्री तालुक्यात प्रथमच महाराणा प्रताप यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याची स्थापना करण्यात आली आहे. हा तालुक्यात अशा प्रकारचा पहिलाच पुतळा असल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.1
- येवला/येवला उपजिल्हा रुग्णालयात बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त फळे व बिस्किट वाटप येवला उपजिल्हा रुग्णालयात बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त फळे व बिस्किट वाटप1
- महाराष्ट्रातील शेगावातील श्री गजानन महाराज मंदिरात आता मोबाईल वापरण्यावर सक्त बंदी घालण्यात आली आहे. मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी आणि भाविकांना शांततेत दर्शन घेता यावे यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. नियम मोडणाऱ्या भाविकांचा मोबाईल जप्त करण्यात येईल, असे संस्थानने स्पष्ट केले आहे.1
- जय लक्ष्मी कंपनीने सिल्लोडच्या राजनगाव येथील म्हारोळा रोडवरील महार हडूळे अवैधपणे खोदून मुरुमाची वाहतूक सुरू केली आहे. हा प्रकार दिवसाढवळ्या सुरू असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.1