Shuru
Apke Nagar Ki App…
हनुमान जन्मोत्सव निमित्त मानवत येथील श्री अंधारवड मारोती मंदिर येथे १८९६ पासून गाड्या ओढण्याची परंपरा
विलास बारहाते
हनुमान जन्मोत्सव निमित्त मानवत येथील श्री अंधारवड मारोती मंदिर येथे १८९६ पासून गाड्या ओढण्याची परंपरा
More news from महाराष्ट्र and nearby areas
- चोरट्यांनी कारची केली चोरी - तीच झाला अपघात ; चोरटे फरार.. कजगाव परिसरात दिनांक २ एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास एक धक्कादायक कार चोरीची घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, हीच चोरी गेलेली कार नागद जवळील जामडी परिसरात भरधाव वेगात नेत असताना अपघातग्रस्त झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघात झाल्यानंतर चोरट्यांनी गाडी घटनास्थळीच सोडून पळ काढला. अपघात झालेल्या गाडीचे मालक इंदल सिंग सरदार सिंग परदेशी असल्याचे सांगितले जात आहे.1
- Post by AapTak Hindi News Channel1
- शेतकऱ्याची मुलगी बनली पोलीस,गावकऱ्यानी गुलाल उधळून केले जंगी स्वागत... भोकरदन तालुक्यातील क्षीरसागर येथील कु. शितल नाना मोरे यवतमाळ येथे महाराष्ट्र महिला पोलीस मध्ये निवड झाल्याबद्दल गावकरी, महिला, पुरुषानी मोठ्या उत्साहाने पेढे वाटून,गुलाल उधळत जंगी स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी अशोक पांडुरंग साबळे,दिलीप काकाराव साबळे, बालु मोरे, भागवत साबळे, सचिन मोरे, पंढरी साबळे,समाधान कोलते, निवृत्ती साबळे, संतोष साबळे, सौ. संगीता दिलीप साबळे,सौ. कविता बाळू मोरे यांच्या सह गावकऱ्यांची उपस्थिती होती1
- Post by Mohammad Rafikh1
- लातूर जिल्हा संविधानाचा बालेकिल्ला. गांधी चौक पोलिसांनी गोंधळ घालून शांतता भंग करून दहशत वाजवणाऱ्या आरोपीची काढली धिंड. लातूर प्रतिनिधी, शुक्रवार दि. 03 एप्रिल 2026. लातूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गांधी चौक हद्दीत गंजगोलाई ते मस्जिद रोडवर सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या व दहशत माजवणाऱ्या आरोपीस पोलिसांनी भररस्त्यात धिंड काढून त्यांनी घातलेल्या धिंगाणा या ठिकाणाची ओळख परेड करून चांगलाच धडा शिकवला आहे. जुन्या वादातून संघर्ष, मद्यपान करून गोंधळ, आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांवर कारवाई करत पोलिसांनी शहरात लातूर जिल्हा संविधानाचा बालेकिल्ला असल्याचे आज लातूरातील शांतता भंग करणाऱ्या दहशत पसरवणाऱ्यांना दाखवून दिले आहे. लातूरमध्ये विशेष मोहीम: शहरातील प्रमुख चौक आणि बसस्थानक परिसरात, तसेच सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून गोंधळ घालून शांतता भंग करणाऱ्या आरोपींवर असेच पुढे मोहीम चालू ठेवणार असल्याचे गांधी चौक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील रेजीतवाड यांनी सांगितले.1
- देविदास गुरधाळे मामांच्या समरणार्थ 92 फुटी अस्थी विसर्जन घाटाच्या कामाचा शुभारंभ लातूर जिल्ह्यातील सलगरा येथे रस्ते विकास महामंडळाचे MD डॉ. अनिलकुमार गायकवाड यांच्या हस्ते भूमिपूजन लातूर जिल्ह्याचे सुपुत्र देविदास गुरधाळे मामा यांच्या समरणार्थ डॉ. अनिलकुमार गायकवाड सामाजिक सेवाकुंड ट्रस्टच्या वतीने भव्य अस्थी विसर्जन घाट सोबतच मनोहरी गार्डन, पूजा विधिसाठी सभागृह, नर्मदेश्वर शिव मंदिराची उभारणी करण्यात येणार आहे. या भव्य कार्याचा भूमिपूजन समारंभ राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिलकुमार गायकवाड यांच्या शुभ हस्ते झाला. यावेळी सलगरा येथील ग्रामस्थ प्रतिष्ठित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. लातूर जिल्ह्यात कुठेही अस्थी विसर्जन घाट, धोबी घाट, गणपती विसर्जन घाट नाही. यासाठी जिल्ह्यातील लोकांना पंढरपूर नाशिक येथे जावे लागते. धोबी घाट नसल्याने दगडावरून पडल्याने अपघाताच्या घटना येथे घडल्या होत्या. गावाकऱ्यांच्या मागणीनुसार ग्रामपंचायतने ठराव घेऊन सेवाकुंड ट्रस्टकडे ही मागणी केली. सेवाकुंडचे अध्यक्ष अश्वजित भैय्या गायकवाड यांनी देविदास गुरधाळे मामा यांच्या आठवणीत अजरामर असे स्मारक बांधण्याची घोषणा केली. या मध्ये अस्थी विसर्जन घाट, गार्डन, शिव मंदिर, सांभामंडप, धोबी घाट, गणपती विसर्जन घाट उभारण्याचा निर्णय घेतला. सेवाकुंडचे पदाधिकारी स्वतः इंजिनियर असलेले दत्ताजी गवळे आणि ओम खानापुरे यांच्यावर व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात आली आहे.1
- अवकाळी पावसाचा तडाखा; गारपीट-वाऱ्यामुळे पिकांचे मोठे नुकसान ! गहू, ज्वारी, कांदा पिके आडवी फळबागांनाही फटका.. जालना जिल्ह्यात १९ मार्च ते २ एप्रिल दरम्यान सलग चार वेळा अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांनी हजेरी लावत शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे रब्बी हंगामातील पिके अक्षरशः आडवी पडली असून फळबागांनाही मोठा फटका बसला आहे. परिणामी तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.1
- Post by Mohammad Rafikh1
- बदनापूर जिल्हा जालना बदनापूर शहरातील नळ योजनेच्या पुरवठ्यात गटाराचे दूषित पाणी मिसळत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. जुन्या, जीर्ण पाइपलाइनमध्ये गटाराचे पाणी मिसळल्यामुळे कॉलरा, टायफॉइड, काविळ आणि जुलाब यांसारखे जलजन्य आजार पसरत आहेत. योग्य जलशुद्धीकरण यंत्रणेचा अभाव आणि नगर पंचायतचे दुर्लक्ष यामुळे नागरिकांना गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाण्याचा सामना करावा लागत आहे. प्रमुख आरोग्य धोके आणि कारणे: - दूषित पाणी: पिण्याच्या नळांमध्ये सांडपाणी मिसळत असल्याने माती व लहान जीवजंतू असलेले पाणी पुरवले जात आहे. - आजारांचा प्रादुर्भाव: दूषित पाण्यामुळे नागरिकांना वांत्या, जुलाब, अतिसार व ताप यांसारख्या साथीच्या आजारांचा सामना करावा लागतोय. - जीर्ण पाइपलाइन: अनेक वर्षांपासून जुन्या झालेल्या पाइपलाइन आणि गटारांच्या पाईप्स जवळील पाईप्समुळे सांडपाणी पिण्याच्या पाण्यात मिसळत आहे. - जलशुद्धीकरणाचा अभाव: अनेक पाणीपुरवठा योजनांमध्ये जलशुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वित नसल्याने अशुद्ध पाणी पुरवले जात आहे. नागरिकांची आवाज: - डॉ. परवीन अन्सारी (वार्ड एक महिला):* अलनूर मस्जिद परिसरात मागील तीन महिन्यापासून दूषित पाणी पुरवठा होत आहे. नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु असताना जुनी पाईपलाईन फुटली असता थातूर मातुर जोडणी केल्याने गटाराचे पाणी नळ योजनेच्या पाण्यात मिसळत आहे. - चित्रा संतोष पवार (नगर अध्यक्ष): नगर पंचायतने पाणी शुद्धतेची माहिती देण्याची जबाबदारी पार पाडली नाही. संबंधित अभियांत्याला सूचना दिली असून दोन दिवसात पाईपलाईन दुरुस्ती करण्यात येईल व पाणी तपासून घेतले जाईल. नगर पंचायतने त्वरित दखल घेऊन समस्या सोडवावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.10