गोवंश हत्येच्या घटनेवरून जालन्यात खळबळ; मनपा कर्मचाऱ्यावर बडतर्फीची मागणी बजरंग दलाचे मनपा आयुक्तांना निवेदन; संबंधित कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाईची मागणी.. गोवंश हत्येच्या घटनेवरून जालन्यात खळबळ; मनपा कर्मचाऱ्यावर बडतर्फीची मागणी बजरंग दलाचे मनपा आयुक्तांना निवेदन; संबंधित कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाईची मागणी.. आज दिनांक 11 मंगळवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील अण्णाभाऊ साठे स्मारकाच्या मागील भागात मनपाच्या जागेवर अवैधरित्या गोवंशाची हत्या करून मोठ्या प्रमाणात गोमांस विक्री केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेदरम्यान गौरक्षकावर प्राणघातक हल्ला झाल्याचाही दावा करण्यात आला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी बजरंग दलाच्या वतीने महानगरपालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
गोवंश हत्येच्या घटनेवरून जालन्यात खळबळ; मनपा कर्मचाऱ्यावर बडतर्फीची मागणी बजरंग दलाचे मनपा आयुक्तांना निवेदन; संबंधित कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाईची मागणी.. गोवंश हत्येच्या घटनेवरून जालन्यात खळबळ; मनपा कर्मचाऱ्यावर बडतर्फीची मागणी बजरंग दलाचे मनपा आयुक्तांना निवेदन; संबंधित कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाईची मागणी.. आज दिनांक 11 मंगळवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील अण्णाभाऊ साठे स्मारकाच्या मागील भागात मनपाच्या जागेवर अवैधरित्या गोवंशाची हत्या करून मोठ्या प्रमाणात गोमांस विक्री केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेदरम्यान गौरक्षकावर प्राणघातक हल्ला झाल्याचाही दावा करण्यात आला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी बजरंग दलाच्या वतीने महानगरपालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
- छ. संभाजीनगर -स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरात भव्य तिरंगा यात्रा,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे मंत्री, खासदार, आमदार होणार सहभागी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरात भव्य तिरंगा यात्रा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे मंत्री, खासदार, आमदार होणार सहभागी मंत्री अतुल सावेंचे तिरंगा यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन तरुणाईला आकर्षिक करण्यासाठी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीने छत्रपती संभाजीनगरात १४ ऑगस्ट रोजी भव्य तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे. दुपारी २ वाजता संभाजी पेठ, औरंगपुरा येथून यात्रेला सुरुवात होऊन क्रांती चौकात समारोप होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह आमदार, खासदार आणि मंत्री सहभागी होणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मंत्री अतुल सावे यांनी केले आहे. Byte...1
- अभिजीत दिपकेंविरोधात पोलीस बॉईज संघटनेचे मूक आंदोलन,पोलीस संरक्षण काढण्याची मागणी. अभिजीत दिपके यांच्या घरासमोर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाला अपशब्द वापरून घराबाहेर काढल्या प्रकरणी पोलीस बॉईज संघटना आक्रमक झाली आहे 15 ऑगस्ट पर्यंत इतक्या यांनी माफी मागितली नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे पोलीस बॉईज संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर बेमुदत मूक आंदोलन करण्यात येत आहे.1
- सिल्लोड बाजार समिति के इतिहास में पहली बार महिला उपसभापति, विधायक अब्दुल सत्तार साहब ने किया सम्मान सिल्लोड बाजार समितीच्या सभापतीपदी सतीश ताठे तर उपसभापतीपदी अनुसयाबाई मोरे यांची बिनविरोध निवड; आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सत्कार#Sillod #SillodAPMC #SillodNews #AbdulSattar #SatishTathe #AnusayabaiMore #APMCElection #Shivsena #SillodRajkaran #MaharashtraNews #ChhatrapatiSambhajinagar #KrushiUtpannaBazarSamiti #1
- Navin Singh Oberoi ने Imtiaz Jaleel को दी जन्मदिन की खास बधाई! 🎉 Navin Singh Oberoi ने Imtiaz Jaleel को दी जन्मदिन की खास बधाई! 🎉1
- मंठा येथे काँग्रेस पार्टीच्या वतीने रघुपति राघव राजाराम सत्याग्रह रॅली मंठा येथे काँग्रेस पार्टीच्या वतीने राज्य शासनाच्या विरोधात रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन करण्यात आले यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष युवक घारे, जिल्हा अध्यक्ष कल्याण दळे, आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मोठा समावेश होता.1
- अवैध वाळू वाहतुकीवर तालुका जालना पोलिसांचा दणका! वाळूने भरलेला ट्रॅक्टर पकडला; तब्बल ८ लाख ७४ हजारांचा मुद्देमाल जप्त अवैध वाळू वाहतुकीवर तालुका जालना पोलिसांचा दणका! वाळूने भरलेला ट्रॅक्टर पकडला; तब्बल ८ लाख ७४ हजारांचा मुद्देमाल जप्त आज दिनांक 11 मंगळवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना तालुक्यात अवैधरित्या व विनापरवाना वाळू वाहतूक करणाऱ्यांविरोधात तालुका जालना पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गणेशनगर, गोलापांगरी परिसरात वाळूने भरलेला ट्रॅक्टर पोलिसांच्या हाती लागला असून, या कारवाईत महिंद्रा युवो ५८५ ट्रॅक्टर आणि वाळूने भरलेली ट्रॉली असा एकूण ८ लाख ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.1
- नशेच्या धुंदीत तरुणाचा महामार्गावर धिंगाणा; ‘मला मारा, नाहीतर मी कोणाला तरी मारेन’ म्हणत घातला गोंधळ! वैजापूरच्या नाशिक-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर नशेच्या अवस्थेतील एका तरुणाने भररस्त्यात वाहन थांबवून धिंगाणा घातला. ‘मला मारा, नाहीतर मी कोणाला तरी मारेन’, असे म्हणत तरुणाने रस्त्यावर गोंधळ घातल्याने वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या प्रकारामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी प्रल्हाद जटाले यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मोठ्या प्रयत्नांनंतर पोलिसांनी तरुणाला रस्त्यावरून हटवत वाहतूक सुरळीत केली. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नशेखोरीचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महामार्गावरील अशा घटना टाळण्यासाठी नशेखोरीला आळा घालण्यासोबतच प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.1
- सिल्लोड एसटी डेपो कॅन्टीनवर FDAची धडक कारवाई,अस्वच्छता, अपूर्ण रेकॉर्ड आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन; परवाना तत्काळ निलंबित सिल्लोड एसटी डेपो कॅन्टीनवर FDAची धडक कारवाई अस्वच्छता, अपूर्ण रेकॉर्ड आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन; परवाना तत्काळ निलंबित सिल्लोड प्रतिनिधी : ‘Safe Food, Safe Maharashtra’ मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने सिल्लोड एसटी बस डेपोतील M/s S.T. Canteen Upahar Gruh येथे धडक तपासणी केली. तपासणीदरम्यान कॅन्टीनमध्ये स्वच्छतेचा अभाव, अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन आणि आवश्यक नोंदींची कमतरता अशा अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या. फरशीपासून स्वयंपाकघरापर्यंत अस्वच्छता कॅन्टीनच्या तळमजल्यावरील फरशीवर धूळ, माती, वेष्टने आणि पॅकेजिंगचा कचरा आढळला. भिंतींचे पापुद्रे निघालेले असून रंग उडालेला व भिंती काळवंडलेल्या होत्या. खिडक्यांना कीटक व उंदीर रोखण्यासाठी आवश्यक वायर मेशही बसवलेली नव्हती. भांडी घासण्याची जागाही अत्यंत अस्वच्छ असल्याचे तपासणीत समोर आले. FSSAI परवाना फलक आणि पाणी तपासणी अहवालही नाही कॅन्टीनमध्ये FSSAI परवाना दर्शनी भागात लावलेला आढळला नाही. तसेच पाणी तपासणीचा अद्ययावत अहवाल उपलब्ध नव्हता. बेसन, तेल व काही किराणा मालाच्या खरेदीच्या नोंदी उपलब्ध असल्या तरी चिप्स, नमकीन आदी खाद्यपदार्थांच्या खरेदीचे रेकॉर्ड सादर करता आले नाही. ‘मयूर ब्रँड’ चणाडाळीचा साठा आणि त्याचे खरेदी रेकॉर्डही तपासणीवेळी उपलब्ध नव्हते. कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी नाही; कॅन्टीनचा परवाना निलंबित अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्रे उपलब्ध नव्हती. कर्मचाऱ्यांकडे ॲप्रन व हातमोजेही नव्हते. हात धुण्याची तसेच कपडे बदलण्याची स्वतंत्र सुविधा आढळली नाही. साफसफाईचे वेळापत्रक आणि कीटक नियंत्रणाचे रेकॉर्डही उपलब्ध नव्हते. उघड्या कचराकुंड्या, अयोग्य सांडपाणी वाहिन्या आणि अस्वच्छ परिसरामुळे अन्नसुरक्षेच्या दृष्टीने गंभीर त्रुटी आढळल्या. या सर्व त्रुटींची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने सदर कॅन्टीनचा परवाना तत्काळ निलंबित (Suspend Forthwith) केला असून कॅन्टीन बंद करण्यात आले आहे.1
- जालन्यात खाकी वर्दीचा थरकाप! सुंदरनगरमध्ये तब्बल २२ तलवारी अन् घातक शस्त्रांचा महासाठा जप्त; राजस्थानच्या 'अजमेर' कनेक्शनने खळबळ! जालन्यात खाकी वर्दीचा थरकाप! सुंदरनगरमध्ये तब्बल २२ तलवारी अन् घातक शस्त्रांचा महासाठा जप्त; राजस्थानच्या 'अजमेर' कनेक्शनने खळबळ! १० ऑगस्ट २०२६ सोमवार प्रतिनिधी. जी.बी हिवराळे जालना शहरातील संवेदनशील समजल्या जाणाऱ्या सुंदरनगर परिसरात चंदनझिरा पोलिसांनी अत्यंत धडक आणि धाडसी कारवाई करत एकाच झटक्यात २२ तलवारी, १५ खंजीर आणि ४ चॉपर असा तब्बल १ लाख ३४ हजार रुपयांचा अत्यंत घातक शस्त्रसाठा हस्तगत केला आहे. या थरारक कारवाईमुळे जालना पोलिसांच्या गोटात मोठी खळबळ उडाली असून, गुन्हेगारी विश्वात एकच कंप सुटला आहे चंदनझिरा पोलीस ठाणे, जालना मुख्य संशयित आरोपी: शेख माजेद शेख लतिफ कारवाईचे स्वरूप: गुप्त माहितीच्या आधारे सुंदरनगर परिसरातील संशयिताच्या घरावर अचानक टाकलेला छापा. सविस्तर घटनाक्रम व धक्कादायक खुलासे: १. गुप्त खबऱ्याची टिप आणि पोलिसांची ग्रँड एन्ट्री: १० ऑगस्ट २०२६ रोजी चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाला अत्यंत खात्रीशीर माहिती मिळाली की, जालना शहरातील सुंदरनगर भागातील एका घरात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर शस्त्रे लपवून ठेवण्यात आली आहेत. या माहितीची गंभीर दखल घेत पोलिसांनी तात्काळ सापळा रचून संबंधित घराची झडती घेतली. २. हादरवून टाकणारा शस्त्रसाठा जप्त: पोलिसांनी जेव्हा घरातील साहित्याची तपासणी केली, तेव्हा त्यांच्या अंगावर काटा आला. घरात एक-दोन नव्हे, तर तब्बल २२ धारदार तलवारी, १५ खंजीर आणि ४ चॉपर असा युद्धाच्या तयारीसारखा महासाठा सापडला. पोलिसांनी हा सर्व १ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल तात्काळ जप्त केला. ३. जालना, भोकरदन ते परतूर टार्गेट: प्राथमिक तपासात समोर आलेली माहिती अत्यंत संतापजनक आहे. हा सर्व शस्त्रसाठा केवळ बाळगण्यासाठी नव्हे, तर जालना, भोकरदन आणि परतूर या शहरांमधील विविध भागांत गुन्हेगारी कारवायांसाठी विक्री करण्याच्या उद्देशाने आणला गेला होता. ४. राजस्थानच्या 'अजमेर' कनेक्शनचा पर्दाफाश: या रॅकेटचे धागेदोरे राजस्थानात जुळले असल्याचे तपासात उघड झाले आहे. ही सर्व घातक शस्त्रे थेट राजस्थानमधील अजमेर येथून मागवण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पुढील तपास सुरू: पोलिसांनी मुख्य आरोपी शेख माजेद शेख लतिफ याला बेड्या ठोकल्या असून, त्याला न्यायालयात हजर करण्यात आले आहे. हा शस्त्रसाठा नेमका कोणासाठी मागवला होता, यामागे मोठे रॅकेट किंवा कोणती मोठी गँग कार्यरत आहे का, याचा कसून तपास आता चंदनझिरा पोलीस करत आहेत. शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा सापडल्याने नागरिकांमध्ये सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.1