Shuru
Apke Nagar Ki App…
अवैध वाळू वाहतुकीवर तालुका जालना पोलिसांचा दणका! वाळूने भरलेला ट्रॅक्टर पकडला; तब्बल ८ लाख ७४ हजारांचा मुद्देमाल जप्त अवैध वाळू वाहतुकीवर तालुका जालना पोलिसांचा दणका! वाळूने भरलेला ट्रॅक्टर पकडला; तब्बल ८ लाख ७४ हजारांचा मुद्देमाल जप्त आज दिनांक 11 मंगळवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना तालुक्यात अवैधरित्या व विनापरवाना वाळू वाहतूक करणाऱ्यांविरोधात तालुका जालना पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गणेशनगर, गोलापांगरी परिसरात वाळूने भरलेला ट्रॅक्टर पोलिसांच्या हाती लागला असून, या कारवाईत महिंद्रा युवो ५८५ ट्रॅक्टर आणि वाळूने भरलेली ट्रॉली असा एकूण ८ लाख ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सय्यद अबरार सय्यद अफसर
अवैध वाळू वाहतुकीवर तालुका जालना पोलिसांचा दणका! वाळूने भरलेला ट्रॅक्टर पकडला; तब्बल ८ लाख ७४ हजारांचा मुद्देमाल जप्त अवैध वाळू वाहतुकीवर तालुका जालना पोलिसांचा दणका! वाळूने भरलेला ट्रॅक्टर पकडला; तब्बल ८ लाख ७४ हजारांचा मुद्देमाल जप्त आज दिनांक 11 मंगळवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना तालुक्यात अवैधरित्या व विनापरवाना वाळू वाहतूक करणाऱ्यांविरोधात तालुका जालना पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गणेशनगर, गोलापांगरी परिसरात वाळूने भरलेला ट्रॅक्टर पोलिसांच्या हाती लागला असून, या कारवाईत महिंद्रा युवो ५८५ ट्रॅक्टर आणि वाळूने भरलेली ट्रॉली असा एकूण ८ लाख ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- अवैध वाळू वाहतुकीवर तालुका जालना पोलिसांचा दणका! वाळूने भरलेला ट्रॅक्टर पकडला; तब्बल ८ लाख ७४ हजारांचा मुद्देमाल जप्त अवैध वाळू वाहतुकीवर तालुका जालना पोलिसांचा दणका! वाळूने भरलेला ट्रॅक्टर पकडला; तब्बल ८ लाख ७४ हजारांचा मुद्देमाल जप्त आज दिनांक 11 मंगळवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना तालुक्यात अवैधरित्या व विनापरवाना वाळू वाहतूक करणाऱ्यांविरोधात तालुका जालना पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गणेशनगर, गोलापांगरी परिसरात वाळूने भरलेला ट्रॅक्टर पोलिसांच्या हाती लागला असून, या कारवाईत महिंद्रा युवो ५८५ ट्रॅक्टर आणि वाळूने भरलेली ट्रॉली असा एकूण ८ लाख ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.1
- शेगाव पंढरपूर दिंडी मार्गावर नायगाव येथे पुलावर जाग जाग्यावर खड्डे शेगाव पंढरपूर दिंडी महामार्गावर नायगाव ती ब्राह्मणी येथील पुलावर काही ठिकाणी जाग जागेवर खड्डे व गजबाहेर निघालेले आहेत तरी प्रशासन दुर्लक्ष करते याच्यामुळे मोठा अपघात होऊ शकतो1
- व्यापारीकडून शेतकऱ्याला शिवीगाळीचा आरोप; गंगापूर बाजार समितीत शेतकऱ्यांची मोठी गर्दी गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाऱ्याने शेतकऱ्याला शिवीगाळ केल्याचा आरोप झाल्यानंतर मोठ्या संख्येने शेतकरी बाजार समितीत दाखल झाले. या घटनेमुळे बाजार समिती परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. शेतकऱ्यांनी संबंधित व्यापाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली. या प्रकरणी बाजार समिती प्रशासनाकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.1
- सिल्लोड बाजार समिति के इतिहास में पहली बार महिला उपसभापति, विधायक अब्दुल सत्तार साहब ने किया सम्मान सिल्लोड बाजार समितीच्या सभापतीपदी सतीश ताठे तर उपसभापतीपदी अनुसयाबाई मोरे यांची बिनविरोध निवड; आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सत्कार#Sillod #SillodAPMC #SillodNews #AbdulSattar #SatishTathe #AnusayabaiMore #APMCElection #Shivsena #SillodRajkaran #MaharashtraNews #ChhatrapatiSambhajinagar #KrushiUtpannaBazarSamiti #1
- झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला CJPचा पाठिंबा; अभिजीत दिपकेंची सरकारवर टीका *छत्रपती संभाजीनगर* अभिजीत दिपके बाईट*झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला CJPचा पाठिंबा; अभिजीत दिपकेंची सरकारवर टीका झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या वापरावरून कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. राजकीय पक्षांकडून आंदोलन केलं जात असताना पोलिसांकडून लाठीचार्ज केला जात नाही, मात्र विद्यार्थी आणि तरुणांच्या आंदोलनावरच लाठीचार्ज आणि गॅसचा वापर केला जातो, हे अत्यंत वेदनादायी असल्याचं अभिजीत दिपके यांनी म्हटलं आहे. झारखंडमधील आंदोलनाला CJPचा पूर्ण पाठिंबा असून, आंदोलनाचे नेतृत्व करणारे देवेंद्र महातो यांच्याशी आपण संवाद साधला असल्याची माहितीही त्यांनी दिली. दरम्यान, झारखंडच्या आंदोलनात अभिजीत दिपके स्वतः सहभागी का झाले नाहीत, असा सवाल केला असता, आंदोलनाचं चांगलं नेतृत्व देवेंद्र महातो करत असून त्यांचं नेतृत्व पुढे यावं, यासाठी CJPकडून सहकार्य केलं जात असल्याचं दिपकेंनी स्पष्ट केलं. आंदोलन हायजॅक करण्याचा आमचा उद्देश नसून, आमची टीम तिथे पाठवण्यात आली आहे आणि आम्ही पूर्णपणे त्यांच्या पाठीशी असल्याचं त्यांनी सांगितलं. तर दुसरीकडे, 15 ऑगस्टपासून ग्रामीण भागातील शाळांच्या सुधारणेसाठी CJPकडून नवं धोरण स्वीकारलं जाणार असल्याची घोषणाही अभिजीत दिपके यांनी केली आहे. स्वातंत्र्याला 80 वर्षे होत असतानाही ग्रामीण भागातील अनेक शाळांची अवस्था खराब आहे. मोठ्या इमारती, संसद भवन आणि लोकप्रतिनिधींची घरं उभी राहिली, मात्र सर्वसामान्य शेतकरी आणि मजुरांच्या मुलांच्या शाळांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप त्यांनी केला. याच पार्श्वभूमीवर 15 ऑगस्टला हिंगोलीतील आपल्या गावी जाऊन सरपंच आणि ग्रामस्थांशी संवाद साधत गावातील शाळा सुधारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं दिपकेंनी सांगितलं. त्यासोबतच खासगी शाळांमधील कथित लूट थांबवण्यासाठी कॅप लागला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.1
- फाळणीच्या वेदनांना उजाळा; जालन्यात ‘विभाजन विभीषिका स्मृती दिना’निमित्त विविध उपक्रम ९ ते १७ ऑगस्टदरम्यान ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत परिसंवाद, रॅली, प्रदर्शनांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन फाळणीच्या वेदनांना उजाळा; जालन्यात ‘विभाजन विभीषिका स्मृती दिना’निमित्त विविध उपक्रम ९ ते १७ ऑगस्टदरम्यान ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत परिसंवाद, रॅली, प्रदर्शनांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन आज दिनांक 11 मंगळवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : भारताच्या फाळणीदरम्यान लाखो नागरिकांना सोसाव्या लागलेल्या वेदना, विस्थापन आणि संघर्षाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी येत्या १४ ऑगस्ट रोजी ‘विभाजन विभीषिका स्मृती दिन’ देशभर साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त जालना जिल्ह्यात ९ ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत विविध देशभक्तीपर आणि जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. फाळणीच्या काळातील इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचावा आणि त्या काळातील सामाजिक परिणाम तसेच संघर्षातून मिळणारे धडे विद्यार्थ्यांना समजावेत, यासाठी शाळा व महाविद्यालयांमध्ये परिसंवाद, चर्चासत्रे, प्रश्नमंजुषा आणि निबंध स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. यासोबतच ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम, ‘हर घर तिरंगा’ अभियान, ‘वंदे मातरम्’ विषयावरील प्रदर्शन, तिरंगा रंगाची रोषणाई, तिरंगा ई-बाईक रॅली, तिरंगा रॅली, ‘सेल्फी विथ तिरंगा’ तसेच रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. फाळणीच्या काळातील घटनांवर आधारित छायाचित्रे, ऐतिहासिक दस्तऐवज आणि माहितीपर साहित्याचे प्रदर्शन भरवून नागरिकांना त्या काळातील परिस्थितीची माहिती करून दिली जाणार आहे. या उपक्रमांमधून फाळणीच्या कटू आठवणींचे स्मरण करताना देशाची एकता, अखंडता आणि राष्ट्रभावना अधिक बळकट करण्याचा संदेश दिला जाणार आहे. शाळा, महाविद्यालये आणि विविध शैक्षणिक संस्थांनी या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना इतिहासाची जाणीव करून द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे1
- शहागडमध्ये पिसाळलेल्या श्वानांचा धुमाकूळ:सर्वत्र भीतीचे वातावरण अंबड तालुक्यातील शहागड येथे गावात पिसाळलेल्या श्वानांचा धुमाकूळ सुरू असून, गेल्या दोन दिवसांत शाळकरी विद्यार्थ्यांसह ५ ते ७ जणांना श्वानांनी चावा घेतला आहे. त्यामुळे पालक व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामपंचायतीने तातडीने श्वान पथक पाचारण करून पिसाळलेल्या श्वानांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.1