Shuru
Apke Nagar Ki App…
शहागडमध्ये पिसाळलेल्या श्वानांचा धुमाकूळ:सर्वत्र भीतीचे वातावरण अंबड तालुक्यातील शहागड येथे गावात पिसाळलेल्या श्वानांचा धुमाकूळ सुरू असून, गेल्या दोन दिवसांत शाळकरी विद्यार्थ्यांसह ५ ते ७ जणांना श्वानांनी चावा घेतला आहे. त्यामुळे पालक व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामपंचायतीने तातडीने श्वान पथक पाचारण करून पिसाळलेल्या श्वानांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
किशोर शिंदे
शहागडमध्ये पिसाळलेल्या श्वानांचा धुमाकूळ:सर्वत्र भीतीचे वातावरण अंबड तालुक्यातील शहागड येथे गावात पिसाळलेल्या श्वानांचा धुमाकूळ सुरू असून, गेल्या दोन दिवसांत शाळकरी विद्यार्थ्यांसह ५ ते ७ जणांना श्वानांनी चावा घेतला आहे. त्यामुळे पालक व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामपंचायतीने तातडीने श्वान पथक पाचारण करून पिसाळलेल्या श्वानांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- अवैध वाळू वाहतुकीवर तालुका जालना पोलिसांचा दणका! वाळूने भरलेला ट्रॅक्टर पकडला; तब्बल ८ लाख ७४ हजारांचा मुद्देमाल जप्त अवैध वाळू वाहतुकीवर तालुका जालना पोलिसांचा दणका! वाळूने भरलेला ट्रॅक्टर पकडला; तब्बल ८ लाख ७४ हजारांचा मुद्देमाल जप्त आज दिनांक 11 मंगळवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना तालुक्यात अवैधरित्या व विनापरवाना वाळू वाहतूक करणाऱ्यांविरोधात तालुका जालना पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गणेशनगर, गोलापांगरी परिसरात वाळूने भरलेला ट्रॅक्टर पोलिसांच्या हाती लागला असून, या कारवाईत महिंद्रा युवो ५८५ ट्रॅक्टर आणि वाळूने भरलेली ट्रॉली असा एकूण ८ लाख ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.1
- शेगाव पंढरपूर दिंडी मार्गावर नायगाव येथे पुलावर जाग जाग्यावर खड्डे शेगाव पंढरपूर दिंडी महामार्गावर नायगाव ती ब्राह्मणी येथील पुलावर काही ठिकाणी जाग जागेवर खड्डे व गजबाहेर निघालेले आहेत तरी प्रशासन दुर्लक्ष करते याच्यामुळे मोठा अपघात होऊ शकतो1
- मंठा येथे काँग्रेस पार्टीच्या वतीने रघुपति राघव राजाराम सत्याग्रह रॅली मंठा येथे काँग्रेस पार्टीच्या वतीने राज्य शासनाच्या विरोधात रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन करण्यात आले यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष युवक घारे, जिल्हा अध्यक्ष कल्याण दळे, आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मोठा समावेश होता.1
- सुनेत्राताई पवार यांच्याबाबतच्या वक्तव्याचा वडवणीत राष्ट्रवादीकडून निषेध तहसील कार्यालयासमोर निदर्शने; महिलांचा सन्मान राखण्याची मागणी वडवणी प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री मा. श्रीमती सुनेत्राताई पवार यांच्याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आमदार प्रकाशदादा सोळंके यांच्या आदेशानुसार वडवणी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी संबंधित वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविण्यात आला. राजकारणामध्ये मतभेद असणे स्वाभाविक आहे. मात्र, राजकीय मतभेद व्यक्त करताना महिलांचा सन्मान, प्रतिष्ठा आणि सभ्य भाषेची मर्यादा कायम राखली पाहिजे. सार्वजनिक जीवनातील व्यक्तींविषयी वक्तव्य करताना राजकीय संस्कार आणि सामाजिक जबाबदारीचे भान ठेवणे आवश्यक असल्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केली. तहसील कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी निषेधाच्या घोषणा देत आपला रोष व्यक्त केला. संबंधित वक्तव्याचा निषेध नोंदवत लोकशाही व शांततेच्या मार्गाने प्रशासनासमोर आपली भूमिका मांडण्यात आली. यावेळी वडवणी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष शेषराव जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बजरंग सांबळे, संतोष पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांचा सन्मान हीच लोकशाहीची खरी ओळख असून, राजकीय मतभेद असले तरी सभ्यतेची मर्यादा जपली गेली पाहिजे, असा सूर यावेळी आंदोलनातून उमटला.तालुकाध्यक्ष विकास मुंडे, संदीपान आप्पा खळगे, तालुका उपाध्यक्ष महादेवराव सावंत, आबेद भाई शेख, संजय अंबुरे, , दिलीपराव मस्करे, राजेभाऊ लंगे, भैय्या वाघमोडे, सुजित वाघमारे, अशोकराव टिपरे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.1
- धर्मेंद्र गेला आता बारी नरेंद्र आणि महाराष्ट्रातील देवेंद्रची थेट इशारा आनंदराज आंबेडकर यांचा धर्मेंद्र गेला आता बारी नरेंद्र आणि महाराष्ट्रातील देवेंद्रची थेट इशारा आनंदराज आंबेडकर यांचा1
- रस्ते बनवा आणि खड्डे करा आणि जनता त्रस्त यास जबाबदार कोण? राजीव गांधी चौक ते अंबिका चौक दरम्यान चा रस्ता सदरील कामामुळे खोदण्यात आला होता व त्यास लेव्हल न करता तसेच भरण्यात आले व पावसामुळे जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. रस्ते बनवा आणि खड्डे करा आणि जनता त्रस्त यास जबाबदार कोण?1
- फाळणीच्या वेदनांना उजाळा; जालन्यात ‘विभाजन विभीषिका स्मृती दिना’निमित्त विविध उपक्रम ९ ते १७ ऑगस्टदरम्यान ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत परिसंवाद, रॅली, प्रदर्शनांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन फाळणीच्या वेदनांना उजाळा; जालन्यात ‘विभाजन विभीषिका स्मृती दिना’निमित्त विविध उपक्रम ९ ते १७ ऑगस्टदरम्यान ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत परिसंवाद, रॅली, प्रदर्शनांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन आज दिनांक 11 मंगळवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : भारताच्या फाळणीदरम्यान लाखो नागरिकांना सोसाव्या लागलेल्या वेदना, विस्थापन आणि संघर्षाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी येत्या १४ ऑगस्ट रोजी ‘विभाजन विभीषिका स्मृती दिन’ देशभर साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त जालना जिल्ह्यात ९ ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत विविध देशभक्तीपर आणि जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. फाळणीच्या काळातील इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचावा आणि त्या काळातील सामाजिक परिणाम तसेच संघर्षातून मिळणारे धडे विद्यार्थ्यांना समजावेत, यासाठी शाळा व महाविद्यालयांमध्ये परिसंवाद, चर्चासत्रे, प्रश्नमंजुषा आणि निबंध स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. यासोबतच ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम, ‘हर घर तिरंगा’ अभियान, ‘वंदे मातरम्’ विषयावरील प्रदर्शन, तिरंगा रंगाची रोषणाई, तिरंगा ई-बाईक रॅली, तिरंगा रॅली, ‘सेल्फी विथ तिरंगा’ तसेच रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. फाळणीच्या काळातील घटनांवर आधारित छायाचित्रे, ऐतिहासिक दस्तऐवज आणि माहितीपर साहित्याचे प्रदर्शन भरवून नागरिकांना त्या काळातील परिस्थितीची माहिती करून दिली जाणार आहे. या उपक्रमांमधून फाळणीच्या कटू आठवणींचे स्मरण करताना देशाची एकता, अखंडता आणि राष्ट्रभावना अधिक बळकट करण्याचा संदेश दिला जाणार आहे. शाळा, महाविद्यालये आणि विविध शैक्षणिक संस्थांनी या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना इतिहासाची जाणीव करून द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे1
- शहागडमध्ये पिसाळलेल्या श्वानांचा धुमाकूळ:सर्वत्र भीतीचे वातावरण अंबड तालुक्यातील शहागड येथे गावात पिसाळलेल्या श्वानांचा धुमाकूळ सुरू असून, गेल्या दोन दिवसांत शाळकरी विद्यार्थ्यांसह ५ ते ७ जणांना श्वानांनी चावा घेतला आहे. त्यामुळे पालक व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामपंचायतीने तातडीने श्वान पथक पाचारण करून पिसाळलेल्या श्वानांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.1