Shuru
Apke Nagar Ki App…
नांदेड येथील केंब्रिज स्कूलच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 'शिक्षणाची वारी विठ्ठलाच्या दारी' म्हणत भव्य दिंडी काढण्यात आली. विद्यार्थ्यांना संस्कृतीचा वारसा लाभावा आणि संस्कृतीची योग्य जाण व्हावी या हेतूने शाळेतर्फे सर्व सणांचे सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जातात. या दिंडीमध्ये विविध प्रकारचे देखावे सादर करण्यात आले तसेच त्याद्वारे सामाजिक संदेशही देण्यात आला. अत्यंत उत्साही वातावरणात ही दिंडी पार पडली.
माधव गायकवाड
नांदेड येथील केंब्रिज स्कूलच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 'शिक्षणाची वारी विठ्ठलाच्या दारी' म्हणत भव्य दिंडी काढण्यात आली. विद्यार्थ्यांना संस्कृतीचा वारसा लाभावा आणि संस्कृतीची योग्य जाण व्हावी या हेतूने शाळेतर्फे सर्व सणांचे सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जातात. या दिंडीमध्ये विविध प्रकारचे देखावे सादर करण्यात आले तसेच त्याद्वारे सामाजिक संदेशही देण्यात आला. अत्यंत उत्साही वातावरणात ही दिंडी पार पडली.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षातर्फे विजय मोर्चा काढण्यात आला. हा विजय मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आला. या मोर्चामध्ये नांदेड जिल्ह्याचे खासदार रवींद्र चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.1
- नांदेड जिल्ह्यातील माहूर येथील सांदिपानि पब्लिक स्कूलमध्ये आषाढी महोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांच्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवाच्या निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांनी एकत्र येत विविध उपक्रम उत्साहात पार पाडले आहेत.1
- राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या प्रक्रियेला विरोध दर्शवण्यासाठी नांदेडमध्ये आगामी ९ ऑगस्ट रोजी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या निर्णयाला अनुसूचित जातीतील ५९ जातींच्या संघटनांकडून विरोध केला जात असून, या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील सर्व अनुसूचित जातींमधील नागरिकांना एकत्रित करून हा मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा ९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता आयटीआय चौकातील महात्मा फुले पुतळ्यापासून सुरू होईल. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहोचून या मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर होणार आहे.1
- मुखेड तालुक्यातील जाहूर येथील मुस्लिम समाज, ग्रामस्थ आणि कब्रिस्तान कमिटीच्या वतीने देगलूर येथील उपविभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. जाहूर येथील कब्रस्तानावरील सर्व अतिक्रमण हटवून त्याची हद्द कायम करून देण्यात यावी, या मुख्य मागणीसाठी हे आंदोलन छेडण्यात आले आहे. या आंदोलनामध्ये जाहूर येथील ग्रामस्थ आणि कब्रिस्तान कमिटीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. प्रशासनाने कब्रस्तानाची हद्द निश्चित करावी आणि तेथील अतिक्रमण लवकरात लवकर हटवावे, अशी जोरदार मागणी आंदोलकांनी प्रशासनाकडे लावून धरली आहे.2
- नांदेड जिल्ह्यातील देगलूर शहरात आषाढी एकादशीनिमित्त श्री गजानन महाराज व श्री दत्तात्रय महाराज मंदिर प्रतिष्ठान बापू मार्केटच्या वतीने श्री विठ्ठल रखुमाई देवतांची शहरातून भव्य शोभायात्रा दिंडी काढण्यात आली. या शोभायात्रेत महिला, पुरुष, लहान मुले-मुली आणि प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. याप्रसंगी श्री विठ्ठल रुक्माई देवतांची पूजा करण्यात आली असून भाविकांनी मोठ्या संख्येने प्रसादाचा लाभ घेतला. या कार्यक्रमाचे नियोजन संस्थानचे अध्यक्ष, माजी पोलीस उपअधीक्षक तथा राष्ट्रीय पत्रकार संघ भारत महाराष्ट्र राज्य कार्यकारी सदस्य रमेश कंतेवार आणि इतर पदाधिकारी व सदस्यांनी केले होते. या शोभायात्रेत आमदार जितेश अंतापूरकर, लक्ष्मीकांत पद्ममवार, नगरसेवक अनिल बोनलावार, श्रीधर दीक्षित, वैजनाथ स्वामी, अशोक साखरे यांच्यासह अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.1
- विभागीय आयुक्त झाल्यानंतर नांदेडमध्ये पहिला दौरा करण्यात आला असून, या वेळी विविध विषयांचा पूर्ण आढावा घेण्यात आला आहे. या दौऱ्यादरम्यान पाऊस, कर्ज, कर्जमाफी आणि पेरणी यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तलाठी, बीडीओ, तहसीलदार तसेच इतर अधिकाऱ्यांना सोबत घेऊन ही बैठक घेण्यात आली आहे.2
- हिमायतनगर–भोकर राष्ट्रीय महामार्गावरील सोनारी फाट्यावर भरधाव चारचाकीने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे परिसरात पुन्हा एकदा स्पीड ब्रेकरचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सोनारी फाट्यासह महामार्गावरील गावांच्या मुख्य चौकात आणि बसथांब्यांजवळ स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी ग्रामस्थांकडून अनेक वर्षांपासून केली जात आहे. मात्र, महामार्ग विभागाच्या दुर्लक्षामुळेच अपघातांची मालिका सुरूच असल्याचा थेट आरोप नागरिकांनी केला आहे. प्रशासनाच्या या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त करत 'आणखी किती बळी गेल्यानंतर प्रशासन जागे होणार?' असा रोखठोक आणि संतप्त सवाल आता स्थानिक नागरिकांकडून विचारला जात आहे.1